वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आज एकावन्नावा वसुंधरा दिन जगभर साजरा केला जात आहे. या वर्षीचा विषय आहे, ‘रिस्टोअर द अर्थ’- पृथ्वीचे पुनर्जीवन करा. दर वर्षी २२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिवस’म्हणजेच अर्थ डे म्हणून साजरा केला जातो. पहिला वसुंधरा दिवस २२ एप्रिल १९७० रोजी अमेरिकेत साजरा झाला.
April 22, 2021
(डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला १८ जानेवारी २०१७ ला पस्तीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो. त्याची अपरिहार्यता, त्या काळातल्या घडामोडी, त्यावेळचं वातावरण आणि सरकारची भूमिका यांचा वेध घेत ते दिवस पुन्हा जागवणारा जयंत पवार यांचा लेख.)
January 22, 2017
निवडणुकीच्या काळामध्ये वाढलेला माओवादी हिंसाचार अजून वाढतच आहे. त्यामुळे 23 मेला मिळणाऱ्या नवीन सरकार पुढे माओवाद कसा संपवायचा हे एक मोठे आव्हान असणार आहे. या लेखामध्ये आपण माओवाद्यांच्या विरुद्ध सुरक्षात्मक उपाय अजुन मजबुत करता येतील यावर विचार करू.
May 7, 2019
आमचं सू सेंटर हे छोटं गाव, आयोवा राज्याच्या अगदी वायव्य (north west) कोपर्यात येतं. तिथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्याची हद्द सुरू होते. थोडं वेगळ्या दिशेने उत्तरेला गेलं की मिनेसोटा राज्याची हद्द सुरू होते आणि नैऋत्य दिशेला (southwest) गेलं की तासा दीड तासानी नेब्रास्का राज्याचा काही भाग लागतो. ही सगळी राज्यं तशी भरपूर मोठी आहेत आणि सारीच शेती प्रधान! बहुतेक वस्ती ही छोट्या गावांतून किंवा अगदी छोट्या गावकुसांतून! सू सेंटरहून सव्वा तासाच्या अंतरावर साउथ डकोटा राज्यातलं सू फॉल्स (Sioux Falls) नावाचं दीड दोन लाख लोकवस्तीचं मोठं शहर आहे. साउथ डकोटा, आयोवा, मिनेसोटा आणि नेब्रास्का या चारही राज्यांच्या सीमेलगतचं असं हे सर्वात मोठं शहर. त्यामुळे दोन तीन तासांच्या अंतरावरूनही लोकं ड्राइव्ह करून सू फॉल्सला शॉपिंग करायला येतात.
या सू फॉल्समधे नऊ दहा वर्षांपूर्वी बर्यापैकी भारतीय वस्ती होती. साधारणपणे पन्नास सत्तर भारतीय कुटुंबे असावीत. त्यामुळे दिवाळीसारख्या सणाच्या वगैरे निमित्ताने या भारतीय मंडळींनी एकत्र यावं, यात काही नवल नव्हतं. आसपासच्या छोटया गावांत, चुकून माकून येऊन एकाकी पडलेल्या आमच्यासारख्या थोडयाफार भारतीयांना तर असे पन्नास शंभर भारतीय चेहरे एकत्र पाहूनच भरून यायचं. हळू हळू थोडयाफार ओळखी होऊ लागल्या होत्या. त्यातूनच सू फॉल्समधेच राहणारं गुर्जर नावाचं एक महाराष्ट्रीयन मुंबईकर कुटुंब आमच्या चांगलं ओळखीचं झालं होतं. एकमेकांकडे जाणं येणं सुरू झालं होतं.
अशाच एका भेटीमधे थॅंक्सगिव्हींगच्या सेलचा विषय निघाला होता. आम्ही आमची उत्सुकता दर्शवली आणि गुर्जरांनी आम्हाला आदल्या दिवशीच त्यांच्याकडे येऊन राहायचा प्रस्ताव दिला. पहाटे सहा वाजता, दुकाने उघडण्याच्या आधी, आमच्या सू सेंटरहून नोव्हेंबरच्या कडक थंडीमधे दीड तास ड्राईव्ह करून येण्याच्या कल्पनेने आम्ही आधीच गारठलेले होतो. त्यामुळे आदल्या रात्रीच सू फॉल्सला येऊन गुर्जरांच्या घरी मुक्काम ठोकायचा, ही कल्पना फारच भन्नाट होती. श्रीयुत गुर्जरांना स्वत:ला, पहाटे उठून थंडीत कुडकुडत शॉपिंगला जायचा उत्साह नव्हता. पण सौ. अनुपमा गुर्जर आणि त्यांची अकरा बारा वर्षाची मुलगी रश्मी मात्र एका पायावर तयार होत्या. त्यामुळे रात्रीचा मुक्काम आणि अनुपमाचे अनुभवी मार्गदर्शन अशा दोन्ही गोष्टींचा लाभ अचानक पदरात पडला. आंधळ्याने एकाही डोळ्याची अपेक्षा केली नव्हती आणि देवाने अचानक दोन्ही डोळे दिले होते.
आम्ही थॅंक्सगिव्हींगच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता गुर्जरांच्या घरी पोहोचलो. थोडं फ्रेश होऊन स्थिरस्थावर होताच अनुपमाने वर्तमानपत्रांचा गठ्ठा पुढयात टाकला. नशीब आम्ही DVD – VCR player घ्यायचं आधीच ठरवलं होतं. नाहीतर वर्तमानपत्रांमधल्या त्या जाहिराती आणि विविध स्टोअर्सचे fliers पाहून आम्ही चक्रावूनच गेलो असतो.
– डॉ. संजीव चौबळ
March 24, 2016
भारत ब्रिटिशअंमलमुक्त झाल्यानंतरच्या कालचक्रातील 16 वार्षिक आवर्तने पूर्ण झाल्याच्या दिवशी कसोटी सामन्यांमधील गोलंदाजाचे पहिले त्रिशतक पूर्ण झाले. (सतरावा किंवा आजचा तथाकथित ’त्रेपन्नावा स्वातंत्र्यदिन’ असे म्हणणे ही शब्दांची क्रूर थट्टा तर आहेच…
August 15, 2010
सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कांदळगाव हे एक ऐतिहासिक गाव आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मालवण एस.टी. स्टॅंड पासून अवघ्या ७ ते ८ कि.मी. अंतरावर असलेले कांदळगाव याला ऐतिहासिक महत्त्व आहे. कांदळगावचे श्री देव रामेश्वर हे ग्रामदैवत. दर तीन वर्षांनी हा श्री देव रामेश्वर आपल्या पंचायतनासह सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीला जातो. हा सोहळा अविस्मरणीय असतो.
November 1, 2017

नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले.
मन सहाजिकच भूतकाळात गेले. आई आजी कडे होत्या का एवढ्या साड्या आणि त्या ठेवायला मोठे वॉर्डरोब. घरात एक दोन कपाटं, त्यातले १-२ कप्पे मिळायचे. त्यात ५-६ नेहेमीचे कपडे,२-४ ठेवणीतले. त्यात नऊ रंगाचे कपडे मिळणं केवळ अशक्य. नवरात्रीतला भोंडला, सोसायटी/गल्लीतला रोजच्या कपड्यातला गरबा, अष्टमीला देवीचे दर्शन ह्या कशालाच पैसे लागत नसतं पण आनंद, भक्तीभाव, उत्साह हमखास असे.
July 3, 2025
इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत, भारतीयांच्या संवेदना नष्ट करणाऱ्या लॉर्ड मेकालेच्या कथित शिक्षण पद्धतीला केव्हा हद्दपार करणार आहोत ? जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून लढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कलंकाला केव्हा पुसणार आहोत ?
June 12, 2012
कांद्याच्या गरमागरम भज्यांबरोबर , तुम्ही कधी वाफाळता चहा घेतला आहे ?
हा काय प्रश्न झाला का ?
असं कुणालाही वाटेल .
आणि खरंच आहे ते .
पण मंडळी , आता त्यात सुधारणा करतो .
सभोवताली मायनस तापमान असताना , तलावाच्या पाण्यात हात घातल्यावर थंडपणामुळे बधिरता आलेली असताना , दातावर दात आपटत असताना , कुठल्याही वस्तूला हात लावल्यावर बर्फच हातात घेतल्याची भावना होत असताना , कांद्याची गरम भजी आणि वाफाळलेला चहा समोर आल्यावर काय होईल ?
सुटलं ना तोंडाला पाणी ?
थांबा मग जरा ...
श्रीनगरला उतरल्यानंतर शिकाऱ्यातून हाऊसबोटीत गेल्यानंतर , जणू एखाद्या पंचतारांकित राजवाड्यात गेल्यावर होणारं स्वागत अनुभवायला मिळालं तर ...?
आलिशान डायनिंग रूम , तेथील मंद दिवे , जुन्या काळातील डायनिंग टेबल , खुर्च्या , त्यावर नजाकतीने मांडून ठेवलेला भजी आणि चहाचा सरंजाम , अदबीनं सर्व्ह केलेल्या पदार्थांची कलात्मक डिश ...
क्या बात है !
असेच उद् गार तोंडून बाहेर पडतात न पडतात तोच ,
" आप हॉल मे भी बैठ सकते है , या फिर ऐतराज ना हो तो दिवाण ए खास , याने बाहर भी बैठ सकते हो . बाहर का नजारा भी शायद आपको पसंद आ जाएगा . "
अशी अदबशीर विनवणी ऐकल्यानंतर थेट बाहेरचा नजारा पाहण्याची इच्छा नाही झाली तरच नवल .
खरं सांगतो यार ...
बाहेरचं दृश्य बघितल्यावर भान हरपून गेलं .
बाहेर छानपैकी सजवलेला कलात्मक सोफा , सहासात जणांना आरामात बसता येईल अशी बैठक व्यवस्था , समोरचं शांत गहिरं पाणी , जवळच्या रस्त्यावरच्या दिव्यांचं पडलेलं प्रतिबिंब , सजवलेल्या हाऊसबोटी वरचं लायटिंग आणि त्यामुळं अंधारलेल्या वातावरणात निर्माण झालेले सप्तरंग ...
आम्ही सगळे मूक झालो होतो .
नंदनवनात आल्याची जाणीव पुन्हा पुन्हा होत होती .
आणि आम्ही सगळ्यांनी नव्या काळाला अनुसरून फोटोसेशन करून घेतलं.
हातातला चहा थंड झाल्याची जाणीव म्हाताऱ्या मालकानं करून दिली , तेव्हा आम्ही भानावर आलो .
" मैं फिरसे आप के लिये चाय लाता हूं ."
तो पाठी वळून किचनकडे गेला .
आणि पुन्हा एकदा गरम कांदा भजी आणि चहा असं सेशन झालं .
कधी नव्हे इतका दोन मोठाले कप भरून चहा घेतला .
सौभाग्यवती डोळ्याच्या एका कोपऱ्यातून पहात होती , कारण घरी दोन चमचे चहा , इतकंच माझं चहा घेण्याचं प्रमाण होतं , आणि आज मी चहा घेण्याचा कहर केला होता .
जाने भी दो यारो ...
अशी उन्मनी अवस्था घरी कुठे अनुभवायला मिळते ?
मग सगळी हाऊस बोट म्हाताऱ्या मालकाच्या तोंडून ऐकत पाहू लागलो .
एकेक पुराण्या वस्तू पाहताना , हाऊसबोटीची अंतर्गत रचना पाहताना , थकायला झालं .
राहण्याची इतकी उत्तम व्यवस्था , कमर्शियल असूनही घरगुती संवादाचा आणि वागण्याचा दिलेला टच ...
सारंच विलोभनीय होतं .
सगळं अनपेक्षित होतं .
आणि तरीही...
काश्मीर मधली परिस्थिती...
भूतकाळ...
वर्तमानकाळ...
तिथल्या निसर्गसौंदर्याला लागणारे गालबोट ...
विसरता येत नव्हते .
--रात्री अचानक केव्हातरी जाग आली .
थंडी आणखी वाढली होती . बंदिस्त बेडरूममध्ये खूपच जाणवत होती .
मी मोबाईल मध्ये पाहिले .
रात्रीचे तीन वाजले होते .
काय वाटलं कुणास ठाऊक .
मी रुमचं दार उघडून बाहेर आलो .
टपून बसल्यासारख्या असणाऱ्या थंडीने झडप घातली .
मी आणखी काकडलो .
हाऊसबोटीचं दार उघडून बाहेर आलो .
पाचच मिनिटात परत रूममध्ये आलो .
सुरक्षित जागी .
पण बाहेर पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर तसंच होतं .
त्या पाच मिनिटात , कडाक्याच्या थंडीत सैनिकांची एक गाडी गस्त घालण्यासाठी फिरत होती .
थंडीची तमा न बाळगता .
जिभेचे लाड न पुरवता .
गरम चहाची अपेक्षाही न ठेवता .
केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठी !
काश्मीरचं अस्तित्व टिकवण्यासाठी .
- मी पुन्हा अंतर्मुख झालो .
तिन्हीसांजेला घेतलेल्या चहाची चव आता पूर्ण विसरायला झाली होती .
( क्रमशः)
- श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
----------------------------------------
लेखमाला आवडल्यास नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही .
May 2, 2023
नेहाच्या लग्नाला पंचवीस वर्षे होऊन गेली. न्याहारीकरिता एक दिवस तिने शिरा केला. शिरा करता करता तिच्या मनात विचार आला, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत आपण सर्वांना गरम गरम शिरा दिला आणि स्वतः मात्र खरवडीसह उरलेला शिराच खाल्ला. आज गरम गरम शिरा आपण घ्यायचा आणि उरलेला शिरा व खरवड नवर्याला द्यायची.’’ कारण तिला खरवड मुळीच आवडत नसे. शिरा खाता खाता नवरा तिला म्हणाला, ‘‘आज खरा आनंद येतोय. लहानपणापासून खरवड मला खूप आवडते. आम्ही त्याकरिता भांडायचो. पण, खरवड नेहमी तूच घ्यायची. तुलाही आवडत असल्यामुळे मी कधी मागितली नाही.’’ बायकोच्या डोळ्यांत नकळत पाणी आले. प्रसंग खूपच साधा. आपण आपल्या दृष्टिकोनातून विचार करत असतो. पण, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते.
एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा, विचार करण्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा असतो... अनेकदा तो आपल्या अनुभवामुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे बनलेला असतो... त्यावर माणसे ठाम असतात... खरे तर त्यात बदल करण्याची गरज असते... विभिन्न दृष्टिकोनातून पाहायला शिकले पाहिजे... म्हणजे मग तो विकसित होतो... जाणिवा व्यापक आणि समृद्ध होतात... ‘माणूस’ समजणे सोपे जाते...
दृष्टिकोन म्हणजे नकाशा. तोच चुकीचा असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकत नाही... एकच ध्येय असलेली माणसेही वेगवेगळ्या चुकीच्या ठिकाणी पोहोचतात, याचे कारण म्हणजे चुकीचे नकाशे... अर्थात चुकीचे दृष्टिकोन....
म्हणूनच ‘नजर बदलेगी, तो नजारें बदलेंगे’ असे म्हणतात.
-- Amit Sonar
July 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti