वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्याचे बहुवर्षायू २-८ फुट उंचीचे क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली असतात.ह्याचे मुळ औषधी मध्ये वापरतात तर ह्याच्या पानांची भाजी करतात.हि भाजी अत्यंत पथ्यकर व रुचकर लागते.
हि पाने सुध्दा औषधी गुणांची असल्याने घरगुती उपचारात वापरतात.हि चवीला कडू तिखट असते व थंड गुणाची असल्याने शरीरातील तिन्ही दोष कमी करते.
हि भाजी शक्यतो कोवळी असतानाच करावी जुन पाने वापरू नये व हि भाजी नीट निवडूनच करावी कारण पानांच्या खाली बारीक अळ्यांचे बस्तान असण्याची दाट शक्यता असते.
चला आता हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जखम भरून येण्यास भारंगीच्या पानांचा लेप जखमेवर लावावा.
२)सर्दी खोकल्या मध्ये भारंगीची पाने+ सुंठ+ मिरी+गुळ घालून काढा करावा व प्यावा.
३)भारंगीची भाजी शिजवून त्याचे पाणी प्यायले असता पोटातील कृमिंचा नाश होतो.
४)तापामध्ये भारंगीची व गुळवेलीची पाने एकत्र शिजवून काढा करावा व तो मध घालून घ्यावा.
५)अंगाचा दाह होत असल्यास भारंगीच्या पानांची चटणी वाटून तिचा लेप तळहातावर व पायांवर करावा.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास जुलाब होतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते.हे २-३ फुट लांब असते हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात.त्यातील पांढरी पुनर्नवा हि प्रामुख्याने भाजी करीता वापरतात.हि भाजी पथ्यकर असली तरी देखील ब-याच प्रमाणात उपेक्षित आहे.म्हणुनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.
हि भाजी पावसाळयात भरपूर वाढते.अाणी हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत.पांढरी वसुची भाजी अथवा घेटुळी हि चवीला तिखट,कडू,तुरट,व गोड असते.हि उष्ण गुणाची असते व शरीरातील वात,पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.
हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)व्रणातील स्त्राव कमी करायला वसुच्या पानांचा रस काढुन तिचा लेप लावावा.
२)सुज आली असल्यास पुनर्नवा+देवदारू+सुंठ+वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.
३)कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.
४)पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमीत काही दिवस घ्यावा.
५)कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महीना घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.
६)घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते व त्वचेवरील लव देखील गळू लागते त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.
हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघ्वी होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.
ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.
पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.
चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:
१)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.
२)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.
३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.
४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.
५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.
ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्या सर्वांच्या परिचयाची आणि ब-याचं मंडळीच्या आवडीची हि हिरवीगार भाजी.ताजी टवटवीत असताना दिसते देखील सुरेख नाही का?
आपण ह्याचे बरेच पदार्थ खाण्या करीता बनवतो.पालक पनीर तर ब-याच जणांच्या आवडीचे,आलूपालक,पालकाची भजी,पालकाचे सूप,पालकाची शेव इ.
पण हाच पालक काही आजारांमध्ये आपण घरचा वैद्य म्हणून देखील वापरू शकतो बरे का!
पालकाचे लहान हातभर उंचीचे क्षुप असते.आणी ह्याची पाने भाजीसाठी वापरतात.हा चवीला गोड,कडू व थंड असतो.त्यामुळे तो शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहूयात ना!
१)ज्या आजारांत ताप येतो जसे घसा फुलणे,फुफ्फूसांत कफ भरणे,श्वासनलिकेस सुज येणे ह्यात ह्याच्या पंचांगाचा काढा वापरतात.
२)१/४ कप पालकाच्या पंचांगाचा रस+४ चमचे ब्राम्हीचा रस+ १ चमचा साखर हे मिश्रण रोजरात्री जेवल्यावर साधारण २ १/२ तासांनी व झोपायच्या पुर्वी १/२ तास नियमीत घेतल्यास मानसिक थकवा कमी होतो व बुध्दीची धारणा शक्ती वाढते.
३)घशात जळजळ होत असल्यास पालकाच्या पानांच्या रसांच्या गुळण्या कराव्यात.
४)खोकला येऊन कफसुटत नसल्यास पालकाच्या पानांचा चहा १ कप+१ चमचा मेथी पूड+१/२ चमचा मध हे मिश्रण काही दिवस घ्यावे.
५)ज्यांना वारंवार चमचमीत खाऊन शरीरात पित्त वाढते आणी अंगाचा दाह,हातपायांची जळजळ,पोटात आग होणे अशा तक्रारी होतात त्यांनी १/४ कप पालकरस + शहाळ्याचे पाणी १/२ कप हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावे फायदा होतो.
पालकाच्या अतिवापराने युरीकअॅसीड वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात.
हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे वाटले.
हिचे वर्षायू उग्र गंधयुक्त क्षुप असते.
हि चवीला तिखट,व उष्ण असते म्हणूनच शरीरातील कफ व वात दोष कमी करते.
जशी खायला हि लज्जतदार लागते तशीच हि आपण घरगुती उपचारांमध्ये देखील हिचा उत्तम वापर करू शकतो.
चला तर मग पहायचे ना हिचे औषधी उपयोग:
१)गजकर्णा मध्ये टाकळ्याच्या रस कडुनिंबाच्या पाल्याचा रस एकत्र मिसळून त्यांवर लावावे.
२)अंगावर पांढरे डाग पडत असल्यास व खाज येत असेल तर टाकळ्याची भाजी व भाजणीची भाकरी खावी.
३)त्वचा तेजवान व मुलायम दिसायला टाकळ्याच्या पाल्याचा रस बेसनात मिसळून नियमितपणे चेह-यांवर लावावा.
४)खरूजेवर रोगग्रस्त भागावर टाकळ्याचा रस चोळावा व नवीन पाल्याची चटणी तिथे बांधावी.ती सोडल्यावर त्या भागावर हळदपूड चोळावी चांगला फायदा होतो.
५)गळू फूटण्यासाठी टाकळ्याचा पाला वाटून केलेली चटणी बारीक वाटून त्याची गोळा गळूवर ठेवावी व दर बारा तासांनी हि गोळी बदलावी.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.
हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.
आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.
१)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.
२)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.
३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.
५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.
कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.
जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
१)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
२)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.
३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.
४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.
६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.
कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.
हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया.
१)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.
२)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना कमी होतात.
३)मोठ्या व्यक्तिंना क्रुमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.
४)लघ्वी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे+धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.
५)घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.
हि भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार,रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ओवाच्या पानांची बेसनाचे पीठ लावून केलेला कुरकुरीत भजी चटकदार लागतात.तसा ह्याचा विशेष वापर पालेभाजी म्हणून जेवणात होत नाही.तरी देखील ह्याच्या विशिष्ट गंधामुळे व त्यात असणा-या औषधी तत्वांमुळे आजीबाईंच्या औषधी बटव्यात हिचे महत्त्वाचे स्थान आहे.
ओव्यांची पाने खण्डाकार,मऊ,लवयुक्त व जाड असतात.जणू खरेखुरे वेलवेटचेच पान?.ह्याचे १-३ फूट उंचीचे क्षूप असते.
चवीला तिखट,कडू व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील कफ व वातदोष कमी करते व पित्त वाढवते.
ह्या पानांचा उपयोग काढ्यात,पोट दुखीत रस घ्यायला करतात.तसेच ह्याचे अनेक औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:
१)संधिवातावर पानांचा रस सांध्यांना चोळावा.
२)तोंडास दुर्गंध येणे व चव नसणे ह्यात ओव्यांची पाने चावून लाळ थुंकावी.
३)खरूजेवर ओव्यांची पाने वाटून लावावी.
४)जेवणानंतर सुस्ती येणे,छातीत जडपणा वाटणे,अपचन,ह्यात ओवा पाने+कोथिंबीर +खोबरे+आले यांची चटणी जेवणात ठेवावी.
५)पोट दुखी व क्रुमी ह्यात ओव्याच्या पानांचा रस १ चमचा गरम पाण्यासोबत घ्यावे.
ओव्याची पाने जास्त प्रमाणात खाल्ल्यास पित्त वाढते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आपण मसालेवर्गाची संपूर्ण माहीती पाहिली आता आपण वळूयात ब-याच मंडळींना न आवडणारा खाद्य गट म्हणजेच पालेभाज्या.
हा विषय घेणार हे एकूनच ब-याच मंडळींनी नाकं मुरडली असणार ह्यात शंकाच नाही.
लहान मुलांना देखील फारशी न आवडणारी आणी आयुर्वेद देखील सांगतो ८ दिवसातून फक्त एक ते दोन वेळेसच हि खावी.
ह्या पालेभाज्या देखील औषधी गुणधर्मयुक्त असतात बरेका त्यामुळे आजपासून आपण काही दिवस किचन क्लीनीक मंध्ये भाजीची मोहीम राभविणार आहोत बरे का!
आता सुरूवात करायची ना? चला तर मग पहिली भाजी पाहूयात.
पालेभाजी - आंबट चुका
हि भाजी प्रामुख्याने देशावर उगवते.ह्याचे झाड हातभर उंच असते.पाने कोमल असतात. चवीला आंबट असते.हि उष्ण असते त्यामुळे शरीरात वात कमी करते आणि कफ पित्त वाढवते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया:
१)पानांचा लेप गांधीलमाशीचा दंश झालेल्या भागी व सुजेवर करावा.
२)अपचना मध्ये जेवणाआधी तासभर चुका भाजी,आले,कोथिंबीर व कांदा घालून सूप करावे व ते प्यावे.
३)तोंड कोरडे पडणे,तोंडास चव नसणे,मुख दुर्गंधी ,दांतदुखी मध्ये चुक्याच्या रसाने गुळण्या कराव्यात.
४)चुका रस १ चमचा + कांद्याचा रस १ चमचा हे मिश्रण चामखीळांवर लावावे फायदा होतो.
५)गजकरणावर चुक्याच्या पानांचा रस लावावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti