वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लिली सरगयू हि दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर होती . तिने डबल एजंट म्हणून महत्वाची भूमिका बजावली.
आधी आपण डबल एजंट म्हणजे काय समजून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
ती “ ट्रेजर” या नावाने प्रसिद्ध होती. तिचा जन्म रशियातील सेंट पिटसबर्ग गावी २४ जानेवारी १९१२ रोजी झाला. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीच्या वेळी त्यांचे कुटुंबाने फ्रांसला पलायन केले. तिचे शिक्षण पॅरिस येथे झाले. ती पत्रकारीतेत पारंगत होती. तिचे इंग्रजी फ्रेंच व जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.तिला १९३७ मध्ये जर्मनीद्वारे गुप्तहेर खात्यात भरती होण्याविषयी विचारले होते पण तिने नकार दिला. पण फ्रान्सच्या पडवानंतर तिने जर्मनीला गुप्तहेर खात्यात काम करण्यास होकार दिला.
मेजर एमील किलमनने तिला शिक्षण दिले. १९४३ ला ती आपल्या लाडक्या कुत्र्याला घेऊन स्पेनला गेली. तिने लगेच इंग्लंडच्या मादरीद येथील m15 या गुप्तहेर संघटनेशी संपर्क केला. आपण जर्मन गुप्तहेर असल्याचे सांगून इंग्लंडसाठी गुप्तहेर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. ती मागणी मान्य होऊन तिला लगेच इंग्लंडला रवाना केले. लिलि ला “treasure” नाव देण्यात आले व बऱ्याच अधिकाऱ्याबरोबर कामाची संधि दिली. तिने डबल एजंट संबंधी आपल्या अमेरिकन मित्राला सांगितले.
१९४४च्या मेमध्ये तिला बातमी समजली की तिच्या आवडत्या कुत्र्याचे निधन झाले. यावर तिला प्रचंड राग आला. तिने m15ला कळवले की तिच्याकडे काही गुपिते आहेत. तिने त्यातील काही फोडली.त्यावर तातडीने बैठक बोलावण्यात आली. पण तीला m15 मध्ये काम करू देण्यात आले. ती जर्मनीला खोट्या बातम्या पुरवत राहिली. नंतर तिला संघटनेतून काढून टाकण्यात आले. इंग्लंडचे काही संदेश जर्मनीच्या एगनीमा यंत्राने पकडले १९४४ च्या शेवटी ती फ्रांसला परतली व फ्रेंच वूमन आर्मी सर्विस मध्ये काम करू लागली. ती रशियन भाषेची दुभाषी म्हणून काम करू लागली. १९४६ मध्ये तिने मेजर जॉन बारटन कॉलीन याच्याशी पॅरिसमध्ये लग्न केले. ते सोलोन येथे स्थायिक झाले.
१७ मे १९५० रोजी तिचे किडणीच्या आजाराने निधन झाले.
--रवींद्र शरद वाळिंबे
आम्ही हुबळीला होतो तेव्हां मी चौथीत होते.,त्यावेळी शाळेत नुकताच गाण्याचा क्लास सुरु झाला होता..पण पाचवीपासून ,त्यामुळे मला सामील होता आलं नाही. एक मोडक नावाचे शिक्षक होते..मी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत त्यांना जाऊन भेटले आणि मला पेटी शिकवाल का म्हणून विचारले होते..ते ” हो..हो” म्हणाले , पण जेव्हां मी पिच्छा सोडला नाही तेव्हां त्यांनी मला ” सा रे ग म…” वाजवून कोणतं बोट कुठे ठेवायचं वगैरे सांगितलं.
माझी अत्यंत आवडती टू व्हिलर .पाच फुटापेक्षाही कमी उंची असलेल्यांसाठी एक वरदानच, दोन्ही पाय जमिनीला टेकवू देणारी गाडी.
स्कंदाने त्यांना अभय दिले ऋषि, इंद्रादिनी त्याला इंद्रपद स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा स्कंदाने नम्रपणे त्याला नकार दिला. इंद्राने सेनापती पद स्विकारण्यास सांगितले तेव्हा स्कंद नम्रपणे म्हणाला – दानवांच्या नाशासाठी, देवांच्या कार्यसिद्धीसाठी, गोब्राह्मण यांचे हितासाठी मी हे सेनापती पद स्विकारतो. तेव्हापासून हा देवांचा सेनापती झाला. वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कथांमुळे याचे उत्सवाचे महिने सुद्धा निरनिराळे येतात.
धायरी पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळाआहे. इव्हान आलीच यांनी युरोप मध्ये डी-स्कुलींग ही चळवळ सुरू केली होती.स्कूल मध्ये जे आपण कप्पे केलेत विषयांचे असो वर्गांचे असो वयांचे असो स्कूल ड्रेसचे असो यांच्या पलीकडचं जे आहे ते सर्व डीस्कुलींग मध्ये येतं.
गणपतीसाठी चांदीची,तांब्या-पितळेची भांडी उजळवत होते. माझ्या अत्यंत आवडीचा उद्योग! हळू हळू सगळी पुटं जाऊन लखलखीत झालेली भांडी देव्हाऱ्याचा नूरच पालटतात. ती उजळवत असताना मन पस्तीस एक वर्ष मागे गेलं.
फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते.
तिच्या कवितांमध्ये केवळ एका विशिष्ट भागाचे, भाषेचे वा स्थानिक प्रश्नांचे प्रतिबिंब पडलेले नाही; तर त्यामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच १९९६ सालचा साहित्यविषयक नोबेल पुरस्कार तिला मिळाला. या पोलिश कवयित्रीचे नाव होते विस्लावा सिम्बोर्सका. तिला नोबेल पुरस्कार बहाल करताना स्वीडिश अकादमीने म्हटले की सिम्होर्सका यांच्या कविता मानवी जीवनातील सत्याच्या इतिहासाबरोबरच जैविक संदर्भाच्या बाबतीतही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत.
तक्षशिला हे भारतातली व जगातील प्राचीन विद्यापीठापैकी एक विद्यापीठ होते. त्याकाळात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, हे समजून येते. या विद्यापीठाचा काळ सुमारे १००० वर्ष ख्रिस्तपूर्व ते इसवि ५०० मानला जातो.
“कुणाला दोन शब्द शहाणपणाचे,उपदेशाचे सांगायला कोणी गेले की, ” तू ते सांगू नको.मला सगळं माहीतच आहे;” असे जास्तीत जास्त अशिक्षित, अनपढ, गवार, मुर्ख व बिनडोक लोकं म्हणतात. याचे कारण त्यांची क्ष्रवणशक्ती, ग्रहणशक्ती विकसित झालेली नसते. काही सुशिक्षीत, क्ष्रिंमत, अधिकारी, कर्मचारी व व्यवसायी लोकं ऐकून घेण्याच्या, मनस्थितीत नसतात.विशेषत: त्यांच्या उणीवांवर,दोष-दुर्गुणांवर बोट ठेवलेले खपवून घेत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti