(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • केबिन सिग्नलतंत्रज्ञ

    सिग्नल व्यवस्था अखंड सुरळीत ठेवण्याचं काम केबीन सिग्नलतंत्रज्ञ करतात. रेल्वेचे रुळ, त्यांतील सांधे खेचण्याचा हलणारा दांडा, बॉक्स, विद्युतप्रवाह या सर्वांचा समन्वय झाला, की सिग्नल लागतो. मध्ये एखादा छोटासा खडा जरी आला, तरी यंत्रणा बिघडते. हा बिघाड तत्परतेने शोधणारे रेल्वे कर्मचारी केबिनमध्ये सतत सतर्क असतात. प्रत्येक केबिनची कामाची हद्द २२ कि.मी. किंवा त्याहून जास्त किलोमीटर एवढी असते.

    केबिनमध्ये भल्या मोठ्या पॅनेलवर अनेक लाल, पिवळ्या, हिरव्या दिव्यांची उघडझाप होत असते. ती बटणं दाबून रेल्वेचे सांधे बदलून, येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग मोकळा केला जातो. पुणे स्टेशनच्या बाहेरील आउटर सिग्नल केबीनजवळून दहा वर्षांपूर्वी ५०० गाड्या व इंजिनांची ये-जा होत असे, आज २००० गाड्यांच्या व इंजिनांच्या हालचाली होत असतात. यांतील बरीच वाहतूक रात्री १२ ते पहाटे ५ यामधील काळात असते. हे सर्व बघण्यासाठी ओणव्यानं, वाकून काम करावं लागे. त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना पाठीच्या दुखण्यांनी ग्रासलं. आता ही सर्व कामं इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतात. कोणतीही गाडी स्टेशनात शिरताना वा स्टेशनातून बाहेर पडतानाची संपूर्ण जबाबदारी या केबिन कर्मचाऱ्यांची असते. अत्यंत जोखमीचं असं हे काम डोळ्यांत तेल घालून करावं लागतं.

    भारतभर पसरलेले १.१५ लाख किलोमीटर अंतराचे रेल्वेमार्ग, ७५०० ते ८००० रेल्वेस्टेशनं व प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या १४,३०० गाड्या, हा सर्व व्याप व्यवस्थितरीत्या सांभाळण्याचं अजस्र काम रेल्वेचे हे सर्व कर्मचारी जोखमीने पार पाडतात.

    शंभर वर्षांपूर्वी 'रस्कीन बाँड' हा प्रसिद्ध ब्रिटिश लेखक भारतात रेल्वेनं फिरला. भारतीय रेल्वे यंत्रणेच्या तो इतक्या प्रेमात पडला, की तो भारतातच स्थायिक झाला. त्यानं भारतीय गँगमन, के बिनमन, पॉईंटमन यांच्या प्रामाणिकपणा, चिकाटी या गुणांवर व अथक काम करण्याच्या जिद्दीवर अनेक कथा लिहिल्या. भारतीय रेल्वेच्या या साऱ्या दर्जेदार व्यवस्थेची ही संवेदनापूर्ण पावतीच आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • गझलचा बादशाह – मदन मोहन

    मला तर वाटते कि मदन मोहन यांनी लताच्या आवाजाचा जितका सुंदर उपयोग करून घेतला तितका इतर संगीतकारांनी फार कमी करून घेतला.”कदर जाने ना “ हे गाणे ऐकून तर बेगम अख्तर सुद्धा चकित झाल्या फारसे शास्त्रीय संगीताचे ज्ञान नसून कसे रागदारीवर गाणे केले.

  • खळखळू हसणारा अवलिया पडद्याआड गेला

    मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

  • लेव्हल क्रॉसिंग गेटस (रेल्वे फाटक)

    भारतीय रेल्वेचं जाळं हे शहरं, गावं, खेडी यांना छेदत जातं. रेल्वेमार्गांच्या दुतर्फा वसाहती असतात. या वसाहतींतील रहिवाशांना दोन्ही बाजूंनी जाता-येताना रेल्वेमार्ग ओलांडावाच लागतो.

    भारतात अशा लेव्हल क्रॉसिंगच्या ३२,६९४ जागा असून, त्यांतील १७,८४१ ठिकाणी रेल्वेचा कर्मचारी २४ तास हजर राहून राखण करतो; परंतु १४,८५३ क्रॉसिंगच्या जागांवर कोणीही कर्मचारी नेमलेला नसल्यामुळे मार्ग असे नेहमीच सर्वांसाठी खुले असतात.

    जिथे रेल्वेचे कर्मचारी नेमलेले असतात, अशा रेल्वे लेव्हलक्रॉसिंगच्या तीन प्रकारच्या श्रेणी ठरविण्यात आल्या आहेत. त्या क्रॉसिंगच्या ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा आकडा व त्याच्या प्रमाणात तेथून जा-ये करणाऱ्या इतर वाहनांच्या संख्येवर या श्रेणी आधारित असतात.

    ट्रेन व्हेईकल युनिट (टी.व्ही.यू.) हे एक परिमाण ठरविलेलं आहे. मोटार, लॉरी, बैलगाडी, टांगा हे एक युनिट, तर दोन चाकी सर्व वाहनांना अर्धा युनिट असं परिमाण धरलं जातं. या हिशोबाप्रमाणे,

    श्रेणी A साठी ३० ते ५०,००० टी.व्ही. युनिट

    श्रेणी B साठी २० ते ३०,००० टी.व्ही. युनिट

    श्रेणी C साठी B श्रेणीखालील कोणतेही टी.व्ही. युनिट असं परिमाण धरलं जातं.

    वरील तीनही श्रेणींच्या लेव्हलक्रॉसिंगची इंटरलॉकिंग ऑटोमॅटिक गेट्स गाडीच्या वेळेशी जुळवलेली असतात. त्यावर गेटमनचं नियंत्रण असतं. काही छोट्या गावांजवळील लेव्हलक्रॉसिंगगेटच्याजवळ रेल्वे कर्मचारी असतो. गेट उघडणं, बंद ठेवणं याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली असते. येथे काही वेळा या कर्मचाऱ्यांना दबावाखाली आणून किंवा पैशांची लालूच दाखवून बळजबरीने गेट उघडण्यासाठी भाग पाडलं जातं व परिणामी भीषण अपघातांना आमंत्रण दिलं जातं. दुर्दैवानं, अशी अनेक उदाहरणं घडलेली आहेत.

    लेव्हलक्रॉसिंगगेटवर कोणीही जबाबदार कर्मचारी नसणं ही भारतीय रेल्वे पुढे फार मोठी बिकट समस्या आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. खेड्यातील जनतेत याबाबतची जागृती व्हावी यासाठी उद्बोधनाचे कार्यक्रम सतत राबविले जाणं गरजेचं आहे. लेव्हल क्रॉसिंगजवळून गाडी नेताना शिट्टीचा अखंड वापर करावा अशा सूचना इंजिन ड्रायव्हर्सना दिलेल्या आहेत.

    लेव्हलक्रॉसिंगचेदरवाजे सौरऊर्जेवर उघडण्याची सोय काही ठिकाणी करण्यात .

    आली आहे. काही जागी भुयारी मार्ग केले जात आहेत. केरळमधील अलापुसा जिल्ह्यात आता एकही लेव्हल क्रॉसिंग विना कर्मचारी नाही. प्रगतीचं हे एक फार मोठं द्योतक आहे. लेव्हलक्रॉसिंगच्यागेटवरील जबाबदार रेल्वे कर्मचाऱ्यास डोळ्यांत तेल घालून मार्गावर लक्ष ठेवावं लागतं.

    २०१३ साली बांद्रा-डेहराहून एक्सप्रेस या गाडीच्या तीन डब्यांना लागलेली आग ही प्रथम एका लेव्हलक्रॉसिंगवरील कर्मचाऱ्याच्याच लक्षात आली. त्यानं त्वरित जवळील स्टेशनमास्तरशी फोनवरून संपर्क साधला, लगेचच तेथून इंजिनड्रायव्हरला सूचना मिळाल्या व गाडी ताबडतोब थांबवली गेली.

    लेव्हलक्रॉसिंगवरील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अतिशय मोठा अनर्थ टळला.

    लेव्हलक्रॉसिंगवरचे सजग कर्मचारी, रेल्वे लेव्हलक्रॉसिंग गेट, लेव्हल क्रॉसिंग हा रेल्वे वाहतुकीतला अनन्यसाधारण महत्त्वाचा असा भाग आहे.

    लेव्हलक्रॉसिंगगेटस (नवी योजना)

    २०१२ ते २०१७ या ५ वर्षांच्या योजनेबाबत आज जे काम सुरू आहे, त्यानुसार ९,८०८ कर्मचारीविरहित लेव्हल क्रॉसिंग्ज बंद करून तेथे कर्मचारी व अद्ययावत यंत्रणा उभारली जाईल. या प्रत्येक लेव्हल क्रॉसिंगमागे ४.४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे ४४ टक्क्यांनी अपघात कमी होण्याची शक्यता आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

    गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.)

  • रेल्वे ट्रॅक (लोखंडी सडक)

    रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा 'दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया' म्हणजे रेल्वेचा 'ट्रॅक.' तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं लक्षही दिलं जात नाही; पण, १५० वर्षांपूर्वी भारतात या लोखंडी सडका उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा मात्र बहुसंख्य लोकांचे डोळे विस्फारले गेले होते. प्रथम हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे असा जनसमज होता. 'डब्यांची गाडी या सडकेवरून जाताना बाजूच्या घरांवर कोसळेल' या भीतीने त्याविरुद्ध अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. या गैरसमजांचं निराकरण करणं हे एक मोठं कामच होऊन बसलं होतं व याकरता सरकारकडे अनेक शिष्टमंडळं कैफियत मांडण्यासाठी गेली होती.

    लोखंडी सडकांआधी, म्हणजेच रेल्वेयुग येण्याच्या आधी रोमन राज्यात लाकडी फळ्यांचा रुळांसारखा वापर करून, जड सामान एका गावातून दुसऱ्या गावात हलविलं जात असे. १५ व्या शतकात युरोपमध्ये लाकडी अथवा दगडी किंवा विटांच्या समांतर पट्ट्यांवरून घोडे, गाढवं जोडलेल्या छोट्या गाडीचे डबे खेचून नेले जात असत. त्यांना 'ट्रेनवेज्' किंवा 'वॅगनवेज्' असे म्हणत. १७ व्या शतकापासून या लाकडी व इतर मार्गाऐवजी लोखंडी पट्ट्या वापरण्यास सुरुवात झाली होती.

    हे रूळ जमिनीला घट्टपणे धरून राहावेत याकरता अनेक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांदरम्यान खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. नंतर त्यावर बरंच संशोधन झालं व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक अशा लोखंडी सडका तयार झाल्या. मात्र आजही त्यात सुधारणा होतच आहेत.

    भारतीय रेल्वेबांधणीत, रुळांच्या मध्यात ठरावीक अंतरावर रुळांना काटकोनात राहतील अशा लाकडी फळ्या (Sleepers) बसविण्यात आल्या. रशियन रेल्वेमार्गावर तेथील रुळांच्या खालच्या बाजूस रुळांबरोबर पुढे जाणारे स्लीपर्स आहेत. भारतात ते लाकडाचे, ओतीव लोखंडाचे किंवा सिमेंटचे आहेत. रुळांच्या बाजूंनी टाकलेल्या खडीमुळे ज्याला Ballast म्हणतात त्या खडी व स्लीपर्सच्या आधारानं रूळ जमिनीला घट्ट पकडून राहतात. रेल्वेरुळांच्या लोखंडात मँगेनिज धातूचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांना बळकटी येते.

    जुन्या पद्धतीचे रूळ 'बुल-हेडेड' असत, तर सध्या नेहमीचे वापरात असलेले रूळ ‘फ्लॅट फोटेड' या प्रकारात मोडतात.

    साधारणपणे मुख्य मार्गावर रुळाची लांबी ४२ फूट, तर बाजूनं येणाऱ्या उपमार्गावरील रुळाची लांबी ३० फूट असते. ज्या लोखंडी पट्टीने दोन रूळ एकमेकांना जोडले जातात तिला फिशप्लेट म्हणतात. या फिशप्लेटस् रुळाच्या आतील व बाहेरील अशा रीतीने दोन्ही बाजूंना फिशबोल्ट्सने पक्क्या केलेल्या असतात. त्याकरता खास छिद्रांची सोय असते. दोन रुळांच्या जोडणीदरम्यान मध्यात थोडी मोकळी जागा सोडलेली असते, कारण तीव्र उन्हाळ्यात व थंडीत रूळ प्रसरण किंवा आकुंचन पावतात. घातपातीकृत्यात याच फिशप्लेट्स काढून आजही गाडी घसरवली जाते. आजकाल बऱ्याच ठिकाणी रूळ एकमेकांना वेल्डिंग करून जोडले जातात. विशेषत: नदी व खोऱ्यांमधील मोठमोठे पूल, तसंच घाटातील, अवघड वळणांच्या जागी ही काळजी घेतली जाते.

    भारतामध्ये रुळांसाठी तीन प्रकारच्या गेज पद्धती आहेत. दोन समांतर रुळांमधील अंतरानुसार ती पद्धत ओळखली जाते. ब्रॉड गेज रुळांमधील अंतर ५ फूट ६ इंच, मीटर गेजचे ३ फूट ३ इंच व नॅरो गेजमध्ये हेच अंतर २ फूट ५ इंच आहे. जगातील प्रत्येक देशात रुळांमधील ही अंतरं वेगवेगळी असतात. सन १९५० मध्ये भारतातील या तीन प्रकारच्या गेज पद्धतीप्रमाणे रुळांच्या लांबीचे आकडे पुढीलप्रमाणे होते.

    • ब्रॉड गेज - १६,००० मैल
    • मीटर गेज- १३,००० मैल
    • नॅरो गेज - ३,००० मैल

    रुळांचं वजनाचं कोष्टक हे त्या रुळाच्या लांबीच्या प्रमाणात ठरवलं जातं. एक यार्ड (तीन फूट) लांबीसाठी ब्रॉड गेजच्या रुळाचं वजन ९० पौंड, तर मीटर गेजसाठी तेवढ्याच लांबीसाठी ते वजन ५० ते ६० पौंड असतं.

    या सर्व रेल्वेमार्गांची सतत देखरेख करण्याचं काम गुंतागुंतीचं असतं. उदाहरणार्थ, स्लीपर्स सारखे बदलणं, सांध्यांच्या फिशप्लेटस्चं तेलपाणी पाहणं, खडी बदलणं हे काम करत असताना रुळाला कुठे तडा गेल्याचं आढळून आल्यास गँगमन धोक्याचा सिग्नल देतो. आजकाल मोबाईलमार्फत एस.एम.एस. करून धोक्याची बरोबर जागा कळविली जाते. आता ‘वायरलेस सेन्सर सिक्युरिटी सिस्टिम'च्या मदतीनं रुळांना पडलेले तडे शोधले जातात.

    सुरुवातीला ताशी २० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या रेल्वेमार्गांवर आता ताशी १६० कि.मी. वेगाने जाण्याची क्षमता असलेल्या गाड्या जाऊ शकतील या दृष्टीने रुळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

    जगभरातील सर्व देशांतील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ७.७० लाख मैल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला तीस प्रदक्षिणा घालता येतील इतकी अवाढव्य रुळांमधील अंतर सांगणारं कोष्टक

    नॅरो मेज-२ फूट

    नॅरो गेज - २ फूट ५ इंच

    मीटर गेज - ३ फूट ३/ इंच

    स्टॅन्डर्ड गेज - ४ फूट ५/, इंच

    ब्रॉड गेज - ५ फूट ६ इंच

    आहे. तसंच, जगभरात रेल्वेगाड्या ६२०० दक्षलक्ष मैल धावतात. हे अंतर सूर्यापासून प्लेटो या ग्रहापर्यंत असणाऱ्या अंतराच्या तोडीचं आहे.

    औद्योगिक व आर्थिक क्रांतीचा अभूतपूर्व मिलाफ जगभरच्या या रेल्वे रुळांनी घडविला आहे आणि त्यातही जगामधील सर्वांत प्रभावी औद्योगिक संकुल म्हणून भारतीय रेल्वेनं अग्रस्थानी जे मानाचं स्थान पटकावलं आहे, ते तर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पदच आहे.

    -डॉ. अविनाश वैद्य

  • बॉम्बे टॉकीजची राणी – देविका राणी

    हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.

  • टर्मिनेटर २ – जजमेंटल डे

    साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा.

  • तब्बुचे ‘ते’ तीन रोल

    नव्वदच्या दशकाच्या शेवटी एक मस्त हॉलीवूडपट आला होता.
    'What Women Want?' नावाचा.
    पाहिलाय तुम्ही? हेलेन हंट...? मेल गिब्सन..?
    अरे..नाही पाहिला?
    नो प्रॉब्लेम..!!
    केदार शिंदेंचा 'अगबाई अरेच्चा' पाहिलाय ना? हां...येस्स..
    तर, अगबाई अरेच्चा आणि What Women Want एकाच थिमवर होते. अर्थात कथा आणि ट्रिटमेंट पूर्ण वेगळी होती.
    दोन्हीत एकच विषय हाताळला होता..
    'बायकांना आयुष्यात नक्की काय हवं असतं...
    आणि ते जर एखाद्या पुरुषाला कळू लागलं तर...?
    त्याला बायकांचे विचार ऐकूच येउ लागले तर...?'

    ह्या चित्रपटाचा उल्लेख इथे एवढ्यासाठीच की महिला दिना निमीत्त 'ओ वुमनिया' साठी काय लिहावे असे विचार करताना मला हाच विचार मनात आला. स्त्रिया कधी कधी एका विशीष्ट unpredictable पद्धतीने वागतात ते का वागतात? स्त्रीयांच्या अंतरमनाचा एका uncommon पद्धतीने वेध घेणारे अलिकडे बनलेले सिनेमे कोणते? त्यावर जसा विचार करु लागलो तसे मला जाणवले 'अरे...फार दूर जायची गरज नाहीये..'
    एकाच अभिनेत्रीने साकारलेल्या तीन भूमिकांमधे मला हा समान धागा सापडला.
    ती अभिनेत्री म्हणजे तब्बु..!!

    अगदी खरं सांगायचं तर तब्बु माझी फेवरेट हिरोईन वगैरे नाहीये.
    पण या तीन सिनेमातल्या तिच्या भूमिकांचा मी मोठा चाहता आहे.
    ते का हेच मी या तीन सिनेमांच्या अनुषंगाने मांडणार आहे.
    चला तर त्या तीन भूमिका कोणत्या ते पाहूत.

    टेक १. मकबूल:

    निम्मी..

    मुंबईच्या अंडरवर्ल्डवर राज करणाऱ्या म्हाताऱ्या जहांगीर खान उर्फ अब्बाजीच्या मनावर राज करणारी त्याची रखेल, निम्मी.
    जहांगिरच्या मुलासारखा असणाऱ्या,त्याच्याकडेच वाढलेल्या मकबुल मियांच्या, प्रेमात बुडालेली निम्मी..
    जहांगिरने आपल्याला घरातच आसरा दिलाय पण आपल्याला बिवी चा दर्जा दिला नाही म्हणून मनोमन तडफडणारी निम्मी..
    जहांगिरला उद्या आपल्यापेक्षा चांगली स्त्री मनात भरली तर तो आपल्याला खड्यासरशी दूर सारेल हे जाणून असलेली निम्मी.
    निम्मीला हे असे आयुष्य नकोय. तिला आपला मान हवाय...
    तिला सत्ता हवीय..निर्णय घेण्याची ताकत हवीय.
    तिच्या प्रेमात असलेल्या मकबूलला मग ती आपला मोहरा बनवते.
    आधी आडून आडून आणि मग उघडपणे मकबूलची महत्वाकांक्षेला हवा देत अब्बाजी विरुद्ध जायला कचरणाऱ्या मकबूलला अब्बाजीलाच संपवून टाकायला तयार करते.

    मकबूल अब्बाजीला संपवतो व आपल्या सत्तेच्या विरुद्ध जाउ शकणाऱ्या इतर सहकाऱ्यांचा काटा काढतो. मकबूल आता अंडरवर्लडचा बादशाह होतो.
    पण शेवटी निम्मीने केलेल्या कर्माची टोचणी तिला निट जगू देत नाही. पोटात वाढणारे बाळ मकबूलचे की अब्बाजीचे या प्रश्नाने तिची तगमग होत राहते. आपल्याच शय्येला, दग्याने, अब्बाजीची मृत्युशय्या करताना चेहऱ्यावर उडालेले रक्त तिला उठता बसता दिसू लागते. तिच्या बाळाच्या जन्मानंतरही अब्बाजीचे काल्पनिक भूत तिची पाठ सोडत नाही. इकडे ज्या मकबूलला आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षेपोटी तिने सग्या सोयऱ्यांशी दुश्मनी घ्यायला लावली ते लोक एकत्र येतात आणि मकबूलचा डाव उधळून लावतात. शेवटी निम्मीच मकबूलच्या विनाशास कारण ठरते.

    का केलं तिने असे...? काय मिळाले तिला हे करुन ?
    हे असे प्रश्न शेवटी अनुत्तरीत राहतात.
    खरे तर मकबूल हा शेक्सपिअरच्या 'मॅकबेथ' वर आधारीत सिनेमा.
    इंग्रजी साहित्य विश्वात 'लेडी मॅकबेथ' हे पात्र प्रचंड महत्वाकांक्षी स्त्रीचे प्रारुप समजले जाते. इथे निम्मी ही 'लेडी मॅकबेथ' म्हणून आपल्यासमोर येते..पण दिग्दर्शक विशाल भारद्वाजने एका भारतीय स्त्रीचे प्रेम,समर्पण, अभिमान, व्देष, पश्चाताप हे सर्व रंग
    निम्मीमधे इतक्या सुंदरपणे मिसळलेत की निम्मी ही भारतीय सिनेमामधल्या काही सर्वोत्तम व्यक्तीरेखांमधे गणली जावी अशी झाली आहे. तिला समजून घेणे अशक्य नाही पण अवघड नक्कीच.. काय बरोबर ना?

    टेक २. दृष्यम

    आय.जी. मीरा देशमुख

    मीराचे व्यक्तीमत्व हे दुभागलेले आहे..
    एकीकडे ती एका राज्याची पोलीस प्रमुख..
    दुसरीकडे एका वयात येणाऱ्या मुलाची हळवी आई..
    एकुलता एक मुलगा..आईबापाने लाडाने वाढवलेला..
    त्यामुळेच वहावलेला हा तीचा मुलगा..
    काही चुकीचे काम करतो..व त्यामुळे मारला जातो..
    पण पूर्ण पोलीस यंत्रणा वापरुनही तो सापडत नाही..
    एका कालावधीनंतर तो कायमचा गेलाय ही भावना बळावते..
    मीरा एक कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी असली तरी एक आईही आहेच ना..
    मुलगा कायमचा हरवलाय हे कळल्यावर ती उन्मळून पडते..
    पण मग ज्यांनी तो हिरावून घेतलाय असा संशय आहे त्या कुटुंबाच्या ती पाठीमागे लागते...
    जंग जंग पछाडते...साम दाम दंड भेद सर्व वापरते..
    उद्देश हाच..की खूनी सापडायला हवा आणि मुलाचे प्रेत मिळायला हवे. त्या कुटुंबाला गुन्हा कबूल करयला लावण्यासाठी ती त्यांच्यावर टोकाची, अगदी अतिरेकी जबरदस्ती करते. त्या कुटूंबावर आत्यंतिक दबाव टाकताना मीरा त्या कुटुंबातल्या त्या दोन लहान मुलींनाही सोडत नाही.

    मीरा..एक आई..जी आपल्या मुलासाठी व्याकुळ आहे..पण तरीही त्याच्याच वयाच्या मुलीवर ती स्वतः हात उगारते..मारझोड करते. कोवळ्या वयाच्या मुलीला आपला सहकारी लाथ मारायला जातो तरी ती आडवत नाही...

    हे असे कसे शक्य आहे..? मीरा इतकी निष्ठुर, निर्दयी कशी वागू शकते? आपल्या पोलीसी खाक्या आणि एक सहृदयी आई यांची गल्लत कशी होउ देते? असे प्रश्न पडतात.

    दृश्यमच्या पहिल्या भागाच्या शेवटी हरुन, थकून, पार कोलमडून गेलेली हिच मीरा आता दुसऱ्या भागात पुन्हा नागिनी प्रमाणे चवताळून त्याच कुटूंबाच्या पुन्हा मागे लागते.

    एक स्त्री म्हणून बदलत जाणारी मीराची ही रुपे खरे की हा एक आभास, एक दृष्यम..? की शेवटी एक सिनेमॅटीक इलेमेंट फक्त?
    नाही..मीरा देशमुखला समजून घेणंही इतक सोप नाहीये..
    मला तरी असं वाटतं...
    आणि तुम्हाला..?

    टेक ३- अंधाधुन

    सिमी सिन्हा

    खरे तर सिमीच्या आयुष्यात इतके मोठे वादळ यायची गरजच नव्हती. पण ते येतं..आणि तिच्या आयुष्याची ऐशी की तैशी होते.
    "त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम, देवौ ना जानाति कुतो मनुष्यः"
    असे संस्कृत श्लोक खूप प्रचलीत आहे. (याचा अर्थ स्त्रीला समजून घेणं..तिचे चरित्र समजून घेणं हे मनुष्य तर सोडा, देवांनाही शक्य नाही)
    आता हे कोणी generalize करायला गेले तर सर्व स्त्री वर्ग त्याला थोडेच सोडेल..? चांगलं फोडून काढेल ना. पण सिमीच्या कॅरॅक्टरला हा श्लोक अगदी बरोबर समर्पक बसतो.

    आणि पुन्हा फिरुन आपण लेखाच्या सुरवातीच्या प्रश्नावर येतो तो म्हणजे 'What women want?'.
    सिमी सिन्हाचे अंधाधुन मधले हे पात्र उलगडताना मला राहून राहून हाच प्रश्न पडतो..ती असे का वागली?
    छान प्रेम करणारा पती...तोही पुर्वाश्रमीचा हँडसम फिल्म ॲ‍क्टर..
    रहायाला सुंदर लोकॅलिटीतला आलिशान फ्लॅट..
    हाय सोसायटीमधे उठबस..
    ना मुलांचे झेंगाट मागे ..ना कसल्या liabilities..
    एक सावत्र मुलगी..तिही दूर राहते..
    असे सर्व असताना..
    आपल्या पतीला फसवत ती आपल्या प्रेमीला घरी बोलवत असते..
    आपल्या लग्नाच्या वाढदिवशी देखील ती व्यभिचारात गुंग असते..
    अचानक घरी येउन तिला तिचा पती रंगेहाथ पकडतो..
    आणि तिचा इन्स्पेक्टर प्रियकर तिच्या नवऱ्याला सरळ शुट करतो...
    सामान्य भारतीय स्त्री अशा परिस्थितीत भेदरुन जाइल..
    panic होईल..
    पण सिमी अतिशय थंडपणे सर्व परिस्थिती सांभाळते..
    इतक्या थंडपणे..की सिनेमा पाहताना आपण जागेवर फ्रीज होतो..

    (तो प्रसंग आठवा जेंव्हा ती अंध आकाशच्या घरी येते तेंव्हा अचानक तो भितीदायक मास्क तोंडावर चढवते. छातीचा ठोकाच चुकला माझा तो प्रसंग पाहताना).

    सिमी ज्या थंडपणे काही गोष्टी करते तो तिचा थंडपणा खरंच थिजवणारा आहे. ती पुढे आता काय करणार आहे हा विचार करुन आपल्याला एसी मधेही घाम फुटतो. तिच्या प्रत्येक नवीन मुव्हला आपण मनात दाद देतो. कारण शेवटी Antagonist ताकतवर असेल तर Protagonist चा विजय अधिक सुखावणारा असतो..नाही का?

    खरे तर या तिन्ही भूमिकांमधे सर्वात जटील, complex भूमिका ही सिमीचीच असावी...सतत रंग बदलणारी..सतत सतर्क असणारी..शत्रुवर बाजी पलटवणारी.. तुम्हालाही ती तशी वाटते का?

    तर अशी ह्या तब्बूच्या तीन भूमीका.
    तीन पूर्णपणे वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका.
    तितक्याच ताकतीने तब्बूने त्या निभावल्या आहेत.
    इतक्या.. की आज त्या तीन भूमिकांमधे तुम्ही इतर कोणाचाच विचार करु शकत नाही..
    म्हणून तर तब्बू माझी 'आवडती अभिनेत्री' आहे..
    जरी ती माझी 'फेवरेट हिरोइन' नसली तरी..
    दोन्हीत फरक आहे...
    ओह वुमनिया..!!
    पटतय ना..?

    -- सुनिल गोबुरे.

  • युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग ३

    स्वित्झर्लंडला जाणारी पुढील गाडी लिऑन या दुसऱ्या स्टेशनवरून सुटणारी असल्याने संध्याकाळच्या भर गर्दीत ट्यूबनं पॅरिस नॉर्ड येथून सर्व मोठ्या बॅग्ज नेण्यासाठी महा कसरत करावी लागली. मुंबईत याबाबतीत विचार करणंसुद्धा शक्य नाही, परंतु या देशात गाडीतून उतरणं फारच सोपं होतं. लिऑन स्टेशनला अनेक प्लॅटफॉर्मूस, त्यातही इन्डिकेटरवरील गाड्यांची नावं फ्रेंच भाषेत असल्याने आम्हाला ती नीटपणे वाचता येत नव्हती. प्लॅटफॉर्मवर भरपूर गर्दी, शेवटी पॅरिस-जिनिव्हा गाडीचा प्लॅटफॉर्म मिळाला. या गाडीला युरोपातील अनेक देशाच्या महत्त्वाच्या शहरांचे डबे लागलेले होते. त्यातील एका डब्यावर पाटी होती जिनोवा. हे तर इटलीतील प्रसिद्ध नाव. परंतु आमची वाट वेगळी होती. त्यामुळे पुन्हा पुन्हा खात्री करून जिनिव्हा ह्या स्वित्झर्लंडमधील महत्त्वाच्या ठिकाणी जाणाऱ्या जिनोव्हा या डब्यात अखेरीस स्थानापन्न झालो. अशा गाड्यांत बसताना फार काळजी घ्यावी लागते, कारण मध्यरात्री तुमचा डबा अलगदपणे बाजूला केला जातो व दुसऱ्या गाडीला जोडला जातो. सकाळी उठाल आणि बघाल तर दुसऱ्याच देशात असाल. गाडीला जरी गर्दी होती, तरी आमचा रुबाब होता. आम्ही फर्स्टक्लासचे पास होल्डर, त्यामुळे डबा प्रशस्त. अगदी पाय पसरून झोपण्यासारखी मऊ मऊ सीट. गाडी सुसाट वेगाने रात्रभर पळत होती, तरी पण मध्यरात्री उठवून व्हिसा मात्र बघितला जात होता. त्या व्हिसावरील छप्पा बरोबर नसेल तर तुमची खैर नाही!

    सकाळी जाग आली आणि स्वच्छ काचेच्या भव्य खिडकीतून स्वित्झर्लंडच्या स्वर्गभूमीचं दर्शन झाले. हिरव्यागार वेगळ्या वेगळ्या छटांमुळे मोहून टाकणाऱ्या पर्वतरांगा. त्यांच्यावरील हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झाल्यावर मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचू लागली. स्वित्झर्लंडमधील प्रवेशच एका निसर्गरम्य प्रदेशात आल्याची जाणीव करून देत होता. गाडीचा वेग जरी तुफान वाटला, तरी पोटातील पाणी जरासुद्धा हलत नव्हतं. जिनिव्हा स्टेशन कोणालाही प्रेमात पाडणारं आहे. स्टेशनवर उतरताच सुरेल संगीताचे मंद सूर कानांवर पडत होते. आता पुढील चार दिवस येथून सुटणाऱ्या गाड्यांमधून संपूर्ण स्वित्झर्लंडची सहल होणार होती.

    युरोपमधील रेल्वे प्रवासाची एक गंमत म्हणजे वाटेत येणारं स्टेशन फार मोठं असेल, तर प्रशस्त प्लॅटफॉर्मवर गाडी शिरते आणि लगेचच पुढचं इंजिन सुटतं आणि दुसऱ्या बाजूस नवीन इंजिन लागतं. गाडीचा प्रवास आता विरुद्ध दिशेने होतो. विशेष म्हणजे हे सर्व सव्यापसव्य वॉकी टॉकीवर काही मिनिटांत पुरं होतं. प्रवाशांची एकंदर संख्या तुलनेनं फारच कमी असते व तेथील डब्यांचे दरवाजे बंद करण्यासाठी कर्मचारी असतात. ती व्यवस्था पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. रेल्वेने संपूर्ण स्वित्झर्लंड पाहण्याचं नियोजन आम्ही मुंबईतच केलं होतं. त्याबरहुकूम त्या त्या गाड्या मिळत होत्या. आमचा सखोल अभ्यास कामी आला होता. दिवसाचे १५/१५ तास आम्ही गाडीतून प्रवास करून रात्री झोपण्यापुरते 'पेन्शॉन' मध्ये राहत होतो. वयस्कर जोडपी आपल्या घरांतील एखादी खोली प्रवाशांना उपलब्ध करून देत असतात. त्या जागांना 'पेन्शॉन' म्हणतात.

    आमच्या रेल्वेप्रवासनियोजनात स्वित्झर्लंडला सर्वांत जास्त महत्त्व होतं. या देशातला पहिला मोठा प्रवास जिनिव्हा-स्पिटझ-धुन सरोवर-बर्न- जिनिव्हा रेल्वे ते बोट-ते रेल्वे असा तब्बल पाच तासांचा होता. त्यातही तो युरेल पासमधील नियमात बसणारा असल्यामुळे पैशांची कटकट नव्हती. हा मार्ग म्हणजे निसर्गाच्या विविध रूपांची सतत बदलणारी उधळण होती. आकाशाला भिडणारी आल्प्स पर्वताची हिमशिखरं, संथ, नितळ-निळ्या पाण्याची विशाल सरोवरं, क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, त्यांत बांधलेली आखीव-रेखीव टुमदार घरं, मध्यातून जाणारे मातकट रंगाचे सुरेख रस्ते, घरासमोरील गॅलऱ्यांत गच्च भरलेली फुलझाडं, शेतांत चहूबाजूंनी पाणी उडविणारे पंप, कुरणांत चरणारी धष्टपुष्ट गाईगुरे आणि औषधाला सुद्धा न आढळणारी इतकी कमी माणसे, असा निसर्गसौंदर्याचा बदलता अखंड चलतपट गाडीसोबत पळत होता. डब्याच्या उत्तम काचेच्या मोठ्या आकाराच्या खिडकीतून तहानभूक विसरावयास लावणारा हा निसर्गाचा नजारा पुढे सतत ४ दिवस नेत्रांना सुखवत होता. धुन सरोवराच्या बोटीला वरती मोकळा डेक व इतर अद्ययावत सोयी होत्या. वर स्वच्छ निळं आकाश, मध्येच पांढऱ्या ढगांचे पुंजके, आसमंतात पसरलेली नीरव शांतता... तासभरात निसर्गाच्या या गूढरम्य रूपानं मन विस्मयचकित झालं. मी माझा नव्हतोच. एका नेत्रसुखद दुनियेतील हा प्रवास कधीच संपू नये असं वाटत होतं. या परिसराचं सौंदर्य पाहून हरखून गेलेल्या एका प्रसिद्ध लेखकाने असं लिहून ठेवलं आहे, की 'हा सर्व प्रवास जर तुमचे मन मोहून टाकू शकला नाही तर यापेक्षा अप्रतिम, अद्वितीय दृश्य तुम्हाला जगात दुसरीकडे कुठेही पाहावयास मिळणार नाही; तेव्हा धुन सरोवर पाहून तुम्हाला मनःशांती मिळाली नसेल, तर तुम्ही तुमच्या प्रवासात घेतलेल्या सामानाची वळकटी बांधा व मुकाट्याने आपल्या घरची वाट धरा. हाच एक उपाय आहे.' खरोखरच या स्वप्ननगरीतून पाऊल निघता निघत नाही.

    माऊंट पिलॅटस् हे ७८०० फूट उंचवरील बर्फाच्छादित छान पठार आहे. येथे जाणारी कॉगव्हिल सिंगल कम्पार्टमेंट रेल्वे म्हणजे रेल्वेबांधणी तंत्रज्ञानाचा एक अफलातून आविष्कार आहे. ४०० फूट उंचीवरून सुरू होणारी ही गाडी ७८०० फुटांवर २३ ते ४५ अंश ग्रेडियन्टमध्ये उभीच्या उभी वर आकाशाला भिडत आपला प्रवास ४५ मिनिटांत पुरा करते. गाडीची चाकं रुळांना घट्टपणे पकडू शकतील अशा प्रकारची रुळांची वेगळ्याच पद्धतीची रचना आहे. प्रवासात मधूनच पावसाची सर येत होती. बर्फाचे भुरभुरते कण, मध्येच दाट धुकं, दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाडी, त्यामधून गाईंच्या गळ्यांत बांधलेल्या घंटांचा किणकिण असा मनाला आल्हाद देणारा नाद... आणि आता अगदी एक क्षणात कुशल नर्तकीसारखी आपली गाडी अर्धवर्तुळाकार फिरते, थबकते; आपण पटकन तिच्यामधून उतरतो व तीच गाडी परतीच्या प्रवासाला सज्ज होते. वर पठारावर प्रचंड गार वारे वाहत असतात. बर्फ व धुक्यात प्रवासी दिसतही नाहीत असा भोवताल असतो. थोड्याच वेळाच परतीचा प्रवास चालू होतो. हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास कायमचा स्मृतीत राहणार याची निश्चिती असते.

    या देशातील रेल्वेचं जाळं हे युरोपमधील सर्वांत उत्तम दर्जाचं आहे. असंख्य गाड्या धावत असतात. त्यामुळे कुठेही प्रतीक्षा करावी लागत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे या देशातील अगदी कानाकोपऱ्यापासून ते हिमशिखरांपर्यंत सर्वत्र जाण्यासाठी गाड्यांची सोय आहे. काही मार्गांवरील बोगदे ५-५ मैलांचे असून, गाड्यांचा वेग ताशी १५० मैलांपर्यंत आहे. रेल्वेप्रेमिकांनी एकदा तरी स्विस रेल्वे अनुभवायलाच हवी.

    -- डॉ. अविनाश वैद्य