वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

रेल्वेची चाकं व्यवस्थितपणे, विनासायास फिरत जातील अशा 'दोन समांतर रेषेत असलेल्या; कठीण, तरीही गुळगुळीत अशा; सलग व लांबच लांब लोखंडी पट्टया' म्हणजे रेल्वेचा 'ट्रॅक.' तो व्यवस्थित व सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक धोकादायक अडचणींवर मात करावी लागते आणि तो बनविण्यासाठी कल्पनेबाहेर खर्च येतो. आजच्या जमान्यात रेल्वेची बांधणी ही बाब अतिशय सहजपणे गृहीत धरली जाते, त्यामुळे त्याकडे आवर्जून फारसं लक्षही दिलं जात नाही; पण, १५० वर्षांपूर्वी भारतात या लोखंडी सडका उभारण्यास सुरुवात झाली तेव्हा मात्र बहुसंख्य लोकांचे डोळे विस्फारले गेले होते. प्रथम हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे असा जनसमज होता. 'डब्यांची गाडी या सडकेवरून जाताना बाजूच्या घरांवर कोसळेल' या भीतीने त्याविरुद्ध अनेक तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. या गैरसमजांचं निराकरण करणं हे एक मोठं कामच होऊन बसलं होतं व याकरता सरकारकडे अनेक शिष्टमंडळं कैफियत मांडण्यासाठी गेली होती.
लोखंडी सडकांआधी, म्हणजेच रेल्वेयुग येण्याच्या आधी रोमन राज्यात लाकडी फळ्यांचा रुळांसारखा वापर करून, जड सामान एका गावातून दुसऱ्या गावात हलविलं जात असे. १५ व्या शतकात युरोपमध्ये लाकडी अथवा दगडी किंवा विटांच्या समांतर पट्ट्यांवरून घोडे, गाढवं जोडलेल्या छोट्या गाडीचे डबे खेचून नेले जात असत. त्यांना 'ट्रेनवेज्' किंवा 'वॅगनवेज्' असे म्हणत. १७ व्या शतकापासून या लाकडी व इतर मार्गाऐवजी लोखंडी पट्ट्या वापरण्यास सुरुवात झाली होती.
हे रूळ जमिनीला घट्टपणे धरून राहावेत याकरता अनेक प्रयोग करण्यात आले. या प्रयोगांदरम्यान खूप समस्यांना तोंड द्यावं लागलं. नंतर त्यावर बरंच संशोधन झालं व सुरळीत वाहतुकीसाठी आवश्यक अशा लोखंडी सडका तयार झाल्या. मात्र आजही त्यात सुधारणा होतच आहेत.
भारतीय रेल्वेबांधणीत, रुळांच्या मध्यात ठरावीक अंतरावर रुळांना काटकोनात राहतील अशा लाकडी फळ्या (Sleepers) बसविण्यात आल्या. रशियन रेल्वेमार्गावर तेथील रुळांच्या खालच्या बाजूस रुळांबरोबर पुढे जाणारे स्लीपर्स आहेत. भारतात ते लाकडाचे, ओतीव लोखंडाचे किंवा सिमेंटचे आहेत. रुळांच्या बाजूंनी टाकलेल्या खडीमुळे ज्याला Ballast म्हणतात त्या खडी व स्लीपर्सच्या आधारानं रूळ जमिनीला घट्ट पकडून राहतात. रेल्वेरुळांच्या लोखंडात मँगेनिज धातूचं प्रमाण जास्त असल्यानं त्यांना बळकटी येते.
जुन्या पद्धतीचे रूळ 'बुल-हेडेड' असत, तर सध्या नेहमीचे वापरात असलेले रूळ ‘फ्लॅट फोटेड' या प्रकारात मोडतात.
साधारणपणे मुख्य मार्गावर रुळाची लांबी ४२ फूट, तर बाजूनं येणाऱ्या उपमार्गावरील रुळाची लांबी ३० फूट असते. ज्या लोखंडी पट्टीने दोन रूळ एकमेकांना जोडले जातात तिला फिशप्लेट म्हणतात. या फिशप्लेटस् रुळाच्या आतील व बाहेरील अशा रीतीने दोन्ही बाजूंना फिशबोल्ट्सने पक्क्या केलेल्या असतात. त्याकरता खास छिद्रांची सोय असते. दोन रुळांच्या जोडणीदरम्यान मध्यात थोडी मोकळी जागा सोडलेली असते, कारण तीव्र उन्हाळ्यात व थंडीत रूळ प्रसरण किंवा आकुंचन पावतात. घातपातीकृत्यात याच फिशप्लेट्स काढून आजही गाडी घसरवली जाते. आजकाल बऱ्याच ठिकाणी रूळ एकमेकांना वेल्डिंग करून जोडले जातात. विशेषत: नदी व खोऱ्यांमधील मोठमोठे पूल, तसंच घाटातील, अवघड वळणांच्या जागी ही काळजी घेतली जाते.
भारतामध्ये रुळांसाठी तीन प्रकारच्या गेज पद्धती आहेत. दोन समांतर रुळांमधील अंतरानुसार ती पद्धत ओळखली जाते. ब्रॉड गेज रुळांमधील अंतर ५ फूट ६ इंच, मीटर गेजचे ३ फूट ३ इंच व नॅरो गेजमध्ये हेच अंतर २ फूट ५ इंच आहे. जगातील प्रत्येक देशात रुळांमधील ही अंतरं वेगवेगळी असतात. सन १९५० मध्ये भारतातील या तीन प्रकारच्या गेज पद्धतीप्रमाणे रुळांच्या लांबीचे आकडे पुढीलप्रमाणे होते.
रुळांचं वजनाचं कोष्टक हे त्या रुळाच्या लांबीच्या प्रमाणात ठरवलं जातं. एक यार्ड (तीन फूट) लांबीसाठी ब्रॉड गेजच्या रुळाचं वजन ९० पौंड, तर मीटर गेजसाठी तेवढ्याच लांबीसाठी ते वजन ५० ते ६० पौंड असतं.
या सर्व रेल्वेमार्गांची सतत देखरेख करण्याचं काम गुंतागुंतीचं असतं. उदाहरणार्थ, स्लीपर्स सारखे बदलणं, सांध्यांच्या फिशप्लेटस्चं तेलपाणी पाहणं, खडी बदलणं हे काम करत असताना रुळाला कुठे तडा गेल्याचं आढळून आल्यास गँगमन धोक्याचा सिग्नल देतो. आजकाल मोबाईलमार्फत एस.एम.एस. करून धोक्याची बरोबर जागा कळविली जाते. आता ‘वायरलेस सेन्सर सिक्युरिटी सिस्टिम'च्या मदतीनं रुळांना पडलेले तडे शोधले जातात.
सुरुवातीला ताशी २० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांच्या रेल्वेमार्गांवर आता ताशी १६० कि.मी. वेगाने जाण्याची क्षमता असलेल्या गाड्या जाऊ शकतील या दृष्टीने रुळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
जगभरातील सर्व देशांतील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ७.७० लाख मैल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीला तीस प्रदक्षिणा घालता येतील इतकी अवाढव्य रुळांमधील अंतर सांगणारं कोष्टक
नॅरो मेज-२ फूट
नॅरो गेज - २ फूट ५ इंच
मीटर गेज - ३ फूट ३/ इंच
स्टॅन्डर्ड गेज - ४ फूट ५/, इंच
ब्रॉड गेज - ५ फूट ६ इंच
आहे. तसंच, जगभरात रेल्वेगाड्या ६२०० दक्षलक्ष मैल धावतात. हे अंतर सूर्यापासून प्लेटो या ग्रहापर्यंत असणाऱ्या अंतराच्या तोडीचं आहे.
औद्योगिक व आर्थिक क्रांतीचा अभूतपूर्व मिलाफ जगभरच्या या रेल्वे रुळांनी घडविला आहे आणि त्यातही जगामधील सर्वांत प्रभावी औद्योगिक संकुल म्हणून भारतीय रेल्वेनं अग्रस्थानी जे मानाचं स्थान पटकावलं आहे, ते तर आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पदच आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
हिमांशू रॉय यांच्या निधनानंतर बॉम्बे टोकीज फुटली शशधर मुखर्जी व अशोककुमार त्यातून बाहेर पडले.तरी देविका डगमगली नाही सहायक दिग्दर्शक अमिया चक्रवर्तीला घेऊन चित्रपट काढले १९४५ साली “ज्वारभाटा” काढला. त्यावेळी चक्रवर्तीने “युसुफ खान”नावाच्या एका फळविक्याला आणले. देविका म्हणाली हे नाव चालणार नाही म्हणून त्याचे दिलीपकुमार असे बारसे केले.
साराह कॉनर आणि भविष्यकाळात परग्रहावरुन येणाऱ्या आक्रमणाविरुद्ध मानवी वंशाच्या लढ्याचा नेता म्हणून उदयाला येणार असणारा तिचा जॉन कॉनर हा टिनेजर मुलगा यांची ही कथा.

ज्या रेल्वेनं आपण प्रवास करणार, त्या गाडीचा प्रवासी डबा हा प्रवाशांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आज सुखसोयींनी युक्त डबे सर्वत्र उपलब्ध आहेत, पण सुरुवातीच्या काळातले रेल्वेचे डबे फारसे आरामदायी नव्हते. अगदी इंग्लंडमध्येदेखील सुरुवातीला रेल्वेचा प्रवास अतिशय खडतर असाच होता. थंड हवामान, लवकर पडणारा अंधार, त्यांतच डब्यातील सोयी अगदीच जुजबी होत्या. थंडीने प्रवासी गारठून जात. काही प्रवाशांजवळ मेणबत्त्या असत. त्या मिणमिणत्या उजेडात प्रवास करणं हे एक दिव्यच असे. प्रवास संपल्यावर हालअपेष्टांतून सुटका झाल्याचा आनंद प्रवासी अनुभवत.
भारतात रेल्वे प्रथम सुरू झाली तेव्हा आयताकृति लाकडी खोक्यांसारखे डबे चाकांवर बसविलेले असत. मधल्या भागात आडव्या, पाठ नसलेल्या लाकडी फळ्या बसण्यासाठी असत, काही डब्यांना छप्परही नसे; त्यामुळे ऊन, वारा, पाऊस, गारठून टाकणारी थंडी व गाडीला बसणारे प्रचंड धक्के हादरे, अशा दिव्यातून २४ ते ३६ तास प्रवास चाले. जवळजवळ पहिली ४० वर्षे तिसऱ्या वर्गाला स्वच्छतागृहांची सोय नव्हती. काही ठरवीक तासांनी उजाड प्रदेशात गाडी टॉयलेटसाठी थांबविण्यात येई. पुढे प्रवाशांची गर्दी इतकी वाढत चालली, की काही वेळा उघड्या ट्रकसारखे मालगाडीचे डबे प्रवाशांना नेण्या-आणण्यासाठी उपयोगात आणले गेले. काही गाड्यांना सन १८६२ मध्ये दोन मजली डबे जोडण्यात आले. असेच डबे मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस व बलसाड एक्सप्रेससाठी अगदी सन १९९० सालापर्यंत वापरले गेले. इ.स. १८७४ मध्ये तिसऱ्या वर्गाहून खालच्या दर्जाचे चौथ्या वर्गाचे डबे तयार करण्यात आले. या वर्गामध्ये बसण्यासाठी लाकडाचं फळकूटसुद्धा नसे. डब्यात खालीच उकिडवं बसून लोक प्रवास करीत. तरीही जनतेचं रेल्वेवरील प्रेम काकणभरही कमी झालं नव्हतं. पुढे सन १८८५ मध्ये टेकून बसता येईल असं बाक डब्यात आलं. चौथा वर्गच बाद झाला. पहिला, इंटर आणि तिसरा वर्ग अशी तीन वर्गात विभागणी झाली.
सन १९२२ मध्ये इंग्लंडमधून लोकल गाडीकरता स्टीलच्या सांगाड्याचे डबे आयात करण्यात आले. पहिल्या वर्गाचे डबे मात्र प्रथमपासूनच इतके अलिशान होते, की अशा त-हेचे डबे इंग्लंड अमेरिकेतील गाड्यांनासुद्धा नव्हते. अशा डब्यांमधून बडे इंग्लिश राज्यकर्ते सोबत अनेक नोकरांना दिमतीला घेऊन प्रवास करत असत. डब्याला उत्तम आडव्या खिडक्या असत. आडवं झोपून बाहेरचं सौंदर्य आरामात पाहत त्यांचा प्रवास सुखकर होई. उन्हाळ्यात वाळ्याचे पडदे व मधल्या स्टेशनवर बर्फाच्या लाद्या डब्यात चढविल्या जात असत.
पुढे सन १८७० पासून रात्रीच्या वेळी प्रवाशांबरोबर तेलाच्या चिमण्या असत. नंतरच्या काळात गॅस बत्त्यांची सोय करण्यात आली.
सन १९०२ मध्ये जोधपूरच्या महाराजांनी आपल्या संस्थानातील रेल्वेच्या डब्यात विजेच्या दिव्यांची सोय केली. १९०७ सालापासून भारतातील प्रमुख मार्गांवरील गाड्यांच्या डब्यात विजेचे दिवे चमकू लागले. १९४७ सालापासून स्टीलची चौकट डब्यांना दिली गेली. त्याला 'सिल्व्हर अॅरो' या नावानं संबोधलं जाऊ लागलं. एका डब्यातून दुसऱ्या डब्यात अंतर्गत जाण्यासाठी Vestibule म्हणजे दोन डब्यांना जोडणारे चिंचोळे मार्ग आल्याने गाडी चालू असताना एका डब्यातून पलीकडच्या दुसऱ्या डब्यात जाणं शक्य झालं. सन १९३६ मध्ये पहिले वातानुकूलीत डबे अति-महत्त्वाच्या गाड्यांना लावण्यास सुरुवात झाली. हे डबे म्हणजे फिरते महालच होते. हळूहळू अशा डब्यांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. परिणामी, रेल्वेने ३ टायर, २ टायर व फर्स्ट क्लास वातानुकूलित डबे लावण्याचा निर्णय घेतला. स्लीपर कोचनं तर इतकी क्रांती केली, की सामान्य माणूसही साध्या स्लीपर कोचनं प्रवास करू लागला.
'राजधानी', 'गरीब रथ', 'दुरांतो' यांसारख्या संपूर्ण वातानुकूलित डबे असलेल्या गाड्या सुरू झाल्या. ४ ते ५ तासांच्या प्रवासाकस्ता आरामात बसून जाता येईल अशा वातानुकूलित ‘शताब्दी', 'इंटरसिटी एक्सप्रेस' याही गाड्या आल्या. डब्यांची आकर्षक बांधणी व विविध रंगसंगती असलेल्या अनेक गाड्या दिमाखात धावू लागल्या.
-डॉ. अविनाश वैद्य
कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार होते.असे म्हणण्याचे कारण ते निर्मात्याला हवे आहे तसे देत असत.थोडक्यात ते बनिया वृत्तीचे होते.आणि स्वताला बनिया म्हणवून घेण्यात त्यांना कमीपणा वाटत नसे.
मैत्री ही फक्त गंमत मजा यासाठी न मर्यादीत रहाता, एकमेकांचा आधारवड बनू शकते, पडत्याला उभारी देउ शकते व एका ध्येयासाठी सर्वांना एकत्र आणू शकते याचे खूप सुंदर दर्शन या चित्रपटातून आपल्याला घडते. हा सिनेमा व्यवसायीक पातळीवर फार यशस्वी नसला तरी याने समिक्षक व चोखंदळ प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकली होती. फरहान (अभिनयात पदार्पण), अर्जून रामपाल, ल्यूक केनी आणि पूरब कोहली यांनी चारही मित्रांची केमिस्ट्री इतकी सुंदर दाखवलीय की हे चारजण खरेच कॉलेजपासून मित्र होते असे वाटत राहते. मैत्रीत आवडत्या गोष्टी एकत्र येउन करायला स्टेटस, वेळ व वयाचे बंधन नसते हे सिद्ध करणारा चित्रपट होता.

'मालगाडी वाहतूक' हे रेल्वेचं सर्वांत जास्त उत्पन्न असलेलं खातं आहे. सामानाच्या गरजेनुसार मालगाडीचे डबे तयार करणं हे महाजिकरीचं काम असतं. डबे बनवल्यानंतर प्रत्येक विभागाचे डबे एकाच मालगाडीला जोडले जातात व काही महिन्यानंतर त्यांची तांत्रिक क्षमता उत्तम साधण्यासाठी ते डबे पुन्हा आपापल्या विभागाकडे पाठविले जातात. मालगाडीचे डबे खालील गोष्टी वाहून नेत असतात:
आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत मालगाडीच्या डब्यांमधून होणाऱ्या वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा सिंहाचा वाटा आहे. भारतातील कारखान्यांतून व कार्यशाळांतून अशा डबे बांधणीचा वेग सातत्याने वाढतो आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले.
मला वाटते ‘उरी’ या सिनेमाने नव्या भारताने सर्जीकल स्ट्राइक्स करुन शत्रु राष्ट्रांच्या व त्यांनी पोसलेल्या दहशतावाद्यांच्या मनात धडकी भरवण्याचे व भिती बसवण्याचे जे काम केलय ते हुबेहुब या सिनेमात प्रतिबिंबीत केलय. ‘ये नया भारत है..ये घुसेगा भी और मारेगा भी..’ हे वाक्य भारतीय लष्कराने दोन सर्जिकल स्ट्राईक करुन अधोरेखित केलय. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी हा लेख लिहीताना मला हा पूर्णतया नव्या भारताचे प्रतिनिधित्व करणारा सिनेमा वाटतो.
प्रवासी रेल्वेमधील प्रत्येक डब्याला दोन्ही बाजूंना दोन अशी समोरासमोर एकूण चार स्वच्छतागृहे असतात. ती वेळोवेळी स्वच्छ ठेवणं, त्यांत व्यवस्थित पाणी पुरवठा करणं व दिवाबत्तीची सोय करणं, कडी कोयंडे तपासून दुरुस्त करून घेणं, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं; पण या महत्त्वाच्या कामात बऱ्याच वेळा निष्काळजीपणा आढळून येतो. त्यामुळे डब्यात शिरताना दाराजवळच येणारी तसंच प्लॅटफॉर्मवर येणारी दुर्गंधी ही एक फार गंभीर समस्या बनलेली आहे. सर्व स्वच्छतागृहे खालच्या बाजूनं उघडी असतात, त्यामुळे रेल्वेरुळांवर व त्यांच्या मधल्या भागात पडणारं मलमूत्रादि सांडपाणी हे आरोग्याच्या व पर्यावरणाच्या दृष्टीनं हानिकारक ठरत आहे. चीनसारख्या देशात गाडी स्टेशनात उभी असताना सर्व स्वच्छतागृहे बंद ठेवली जातात, त्यामुळे रेल्वेस्टेशनवर अजिबात घाण नसते.
स्वच्छतागृहांमधून रेल्वेरुळांवर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे रेल्वेचे रुळ गंजतात. या कारणामुळे रुळ बदलावे लागल्यानं रेल्वेला प्रतिवर्षी ३ कोटी, ५० लाखांपर्यंत खर्च येतो. डब्यांतील स्वच्छतागृहांमुळे होणारी आरोग्य आणि पर्यावरणाची हानी टाळावी व हा खर्च आटोक्यात यावा म्हणून बायोटॉयलेटसच्या वापराची सुरुवात झाली आहे. 'डिफेन्स रिसर्च डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन' (D.R.D.O.) यांनी नवीन पद्धतीची बायोटॉयलेट्स विकसित केली आहेत. Anaerobic Bacteria चा उपयोग करून बायोटॉयलेट्स (ग्रीन टॉयलेटस्) ही Biomethanation या पद्धतीनं तयार केलेली ही नवी टॉयलेटस् पर्यावरणाला शंभर टक्के अनुकूल आहेत. या प्रक्रियेमधून तयार होणारा वायू रंग व वासविरहित असून, थोड्या प्रमाणात पेट घेऊ शकतो. प्रत्येक टॉयलेटच्या खालील बाजूस ९०० लिटर सांडपाण्याचा साठा होऊ शकणारी टाकी असून, तिच्या वरच्या तोटीतून आत निर्माण झालेला वायू वातावरणात मिसळतो. आत जमा होणारी भुकटी मोठ्या स्टेशनवर टॅकच्या खालून काढण्याची सोय आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा वापरता येतं. अशी स्वच्छतागृहे तयार करण्याचा कारखाना ‘मोतीबाग, नागपूर' येथे आहे. ही स्वच्छतागृहे कपूरथळा (पंजाब) येथे डब्यांना विशिष्ट पद्धतीनं बसविली जातात. स्वच्छतागृहे बसविताना डब्याच्या रचनेत फार बदल करावे लागत नाहीत व संपूर्ण सुरक्षितता काटेकोरपणे सांभाळली जाते. अशा त-हेची स्वच्छतागृहे ग्वाल्हेर, वाराणसी, बुंदेलखंड एक्सप्रेस या गाड्यांना दोन वर्षांपूर्वी लावण्यात आलेली आहेत. ऑगस्ट २०१३ पर्यंत १४०० पेक्षा जास्त डब्यांमध्ये अशा प्रकारची स्वच्छतागृहे बसविली गेली आहेत, आणि २५,००० स्वच्छतागृहे तयार करण्याचं काम चालू आहे. वातावरण दुर्गंधीमुक्त व प्रदूषणमुक्त करण्याचा रेल्वेचा निर्धार आहे.
बायोटॉयलेट्स
यामध्ये वापरण्यात येणारे जंतू अंटार्क्टिकामधून आणलेले आहेत. Psychrophile नावाचे जंतू मनुष्याच्या विष्ठेच्या घन भागाचे विभाजन करतात आणि त्यामधून गंधविरहित वायू हवेत सोडण्यात येतो. (या गॅसचा बायोगॅस म्हणूनही उपयोग होतो.)
या संपूर्ण प्रक्रियेतून तयार होणारा मळीचा भाग खत म्हणून वापरता येईल व उरलेले निर्जंतुक झालेले पाणी टाकीत साठविले जाईल. या सर्व प्रक्रियेमुळे प्लॅटफॉर्मवर होणारी घाण नाहीशी होईल व रेल्वेचे रूळ सुरक्षित राहण्यास मदत होईल.
-डॉ. अविनाश वैद्य
Copyright © 2025 | Marathisrushti