(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी !

    महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची प्रथा तशी खूप जुनी ! घरातील शुभकार्य,देवाचा सार्वजनिक उत्सव यापासून ते अगदी मृत व्यक्तीचे तेरावे अशा कारणांसाठी जेवणावळी होत असत.बरेचदा या जेवणावळी जातीनिहाय, कुटुंबनिहायसुद्धा असायच्या . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समाजातील जातीयता मोडण्यासाठी समाजातील सर्व जातींच्या लोकांबरोबर, पूर्वी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांच्या एकत्र जेवणावळीही केल्या.७०/ ८० वर्षांपूर्वी अशा जेवणावळीत भांड्यांचा आवाज, एकमेकांशी कुजबुज, यजमानांचा आवाज यापेक्षाही एक वेगळा आवाज हळूहळू घुमू लागला. जेवण सुरु असतांना देवाचे संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे सुरु झाले. एकावेळी ३०० / ४०० लोकांच्या पंगतीला ( माईकशिवाय ) स्पष्टपणे ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात असे श्लोक म्हणणे हे एक कसब होते. मग तर असे श्लोक म्हणण्याची जुगलबंदी सुरु होई. लग्नात मुलीकडच्या माणसांनी श्लोक म्हटल्यावर, मुलाकडे कुणीतरी आणखी चांगला / वेगळा श्लोक आणखी मोठ्याने म्हणत असे. नंतर या श्लोकात नर्म विनोदी प्रकारही आले.
    उदा. " गोविंद गोपाळ हे दोघे बंधू, जेवीत होते दहीभात लिंबू ।
    जेवता जेवता चमत्कार झाला, पानात उंदीर मुतून गेला ।।

    माझे काका कै. नरहरी भार्गव करंदीकर ( जन्म १९१७ ) हे एक पारंपारिक रचना अत्यंत खड्या आवाजात म्हणत असत. ४०० माणसांना त्यांचा प्रत्येक शब्द ऐकू जात असे. सर्व ज्येष्ठ मंडळींमध्ये त्यांचे " नरू " हे नाव फार प्रसिद्ध होते. लग्नात आमचा हा " नरू " जर मुलीच्या बाजूने म्हणणार असेल तर मुलीकडच्या मंडळींची कॉलर टाईट असायची. त्याकाळी सरकार दरबारी अर्ज करण्याची एक विशिष्ट भाषा असे. जेवणावळीतील अनेक पदार्थांची नवे गुंफून तयार केलेला हा अर्ज, तेव्हां लोकांना खूप आवडत असे. सुमारे ७० / ७५ वर्षांपूर्वीचा हा अर्ज, तत्कालीन अभिरुचीमध्ये मजेदार वाटत असे. माझ्या नरूकाकांना यासाठी चक्क " वन्स मोअर " ही मिळत असे.

    हा अर्ज मुद्दाम सर्वांसाठी देत आहे --
    मेहेरबान रावसाहेब श्रीखंडशास्त्री,केशरीभात, तालुके गुपचूप, जिल्हा जिलबी,यांचे हुजुरांस, अर्जदार शिरापुरी बिन करंज्या अनरसे, राहणार खाजा परगणा,तूप साजूक, यांचा विनयपूर्वक ऐसाजे. मौजे बासुंदी येथील बेसन लोकांनी दळ्याची चोरी केली. त्याची चौकशी मांडे साहेबांस करावयास सांगावी. तुमचे कोतवाल मेतकूटसाहेब यांस,चटणी सेशनी पाठवून, फेणीबाईस समन्स धाडून साक्षीकरीता वरचेवर येण्याचे करावे. मध्यंतरी तिळाची चटणी,ओल्या मिरच्यांचे तिखट,कोरड्या मिरच्या गडबड करू लागल्यास घिवर शिपायास चाबुकस्वाराचा पोशाख देऊन त्याचा बंदोबस्त करावयास सांगावे. त्याचे चवीस काही कमी झाल्यास मठठे साहेबांना साक्ष ठेवून,
    लाडूभट्टावर हल्ला करून उदरनिर्वाहाची केस पुरी करावी. मेहेरबानांस जाहीर व्हावे.

    सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
    -मकरंद करंदीकर.

  • संस्कार’ विकत घेता येत नाही

    सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील ‘संस्कार’ विकत घेता येत नाही..!

  • व्यक्ती पूजकांचा देश

    सतत १० वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला अपयशामुळे आलेली ग्लानी दूर होण्याची चिन्हे नाहीत यास एकमेव कारण म्हणजे काँग्रेस जवळ नेतृत्वाचे दुर्भिक्ष हेच आहे.काँग्रेस अजूनही नेहरू गांधी परिवारा ला पर्याय शोधण्याचे टाळत आहे.हीच खरी पक्षाची शोकांतिका आहे.

  • माटोळी – फळे व भाज्यांची गणपतीपुढे आरास

    मुंबईत माटोळी पाहायला मिळणे हेच दुर्मिळ आहे. गोव्यामध्ये माटोळीच्या स्पर्धा घेतल्या जातात. एकेका माटोळीला ४०० किंवा त्याहूनही अधिक फळे- भाज्या बांधल्या जातात.

  • टाइम्स’ संस्थेच्या मानांकनात पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल

    टाइम्स हायर एज्युकेशन' या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करणा-या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2017-18 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही.

    देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स ही संस्था पहिल्या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर पहिल्या अडीचशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही.

    ‘टाइम्स’ या संस्थेकडून दरवर्षी देशातील शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करून मानांकन जाहीर केले जाते. या मानांकनाला जागतिक पातळीवर मोठे महत्त्व आहे. यावर्षी संस्थेने 77 देशांमधील विविध संस्थांचा अभ्यास करून मंगळवारी जागतिक क्रमवारी जाहीर केली. या यादीत आॅक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. तर 27 देशांतील किमान एका विद्यापीठाचा समावेश पहिल्या 200मध्ये आहे. मात्र, भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश पहिल्या अडीचशेमध्ये होवू शकलेला नाही.

    एक हजार संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील केवळ 42 संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या 300 संस्थांमध्ये व देशात पहिल्या स्थानावर बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स या संस्थेचा क्रमांक लागला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि रुरकी येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ टेक्नॉलॉजी या संस्थांना स्थान मिळाले आहे.

    देशात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संयुक्तपणे सातवा क्रमांक पटकावला असून पारंपारिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. मागील वर्षी हे विद्यापीठ आठव्या क्रमांकावर होते. यंदा विद्यापीठाने कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठाला मागे टाकले आहे. जागतिक पातळीवर पुणे विद्यापीठ 601 ते 800 या क्रमावारीत आहे. या क्रमवारीत देशातील एकूण 11 विद्यापीठांचा समावेश आहे. मागील वर्षीही याच क्रमवारीत विद्यापीठाला स्थान मिळाले होते.

    यंदा विद्यापीठाला एकूण 30.6 गुण मिळाले असून, एकूण कामगिरीचा विचार करता विद्यापीठाच्या गुणांकनात यंदा काहीशी सुधारणा झाली आहे. आशियाई देशांमध्ये विद्यापीठ 161 ते 170 या क्रमवारीत असून ब्रिक्स व विकसनशील देशांच्या यादीत 143वे स्थान मिळाले आहे. पुणे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही पारंपरिक विद्यापीठ तसेच इतर शैक्षणिक संस्थांचा जगातील पहिल्या एक हजार संस्थांमध्ये समावेश होऊ शकलेला नाही.

    अध्यापनात चौथ्या स्थानी-

    संशोधनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे राहिले असले तरी अध्यापनात मात्र विद्यापीठाने देशात चौथे स्थान मिळविले आहे. तर पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात अव्वल ठरले आहे. अध्यापनात विद्यापीठाला 38.9 गुण मिळाले असून मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुधारणा झाली आहे. आयआयएस (बंगळुरू), आयआयटी मुंबई व दिल्ली पाठोपाठ विद्यापीठाचा क्रमांक लागतो. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन, उद्योगांशी सांगड याबाबतीतही विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे.

    संशोधनात तळाला-

    सावित्रीबाई फुले विद्यापीठाने एकुण कामगिरीत देशात सातवा क्रमांक मिळविला असला तरी संशोधनात मात्र हे विद्यापीठ तळाला गेले आहे. देशात संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ 41व्या क्रमांकावर घसरले आहे. ‘टाइम्स’ने दिलेल्या गुणांकनामध्ये मागील दोन वर्षात जवळपास निम्म्याने घट झाली आहे. यावर्षी विद्यापीठाला केवळ 7.2 गुण मिळाले आहेत.

    देशातील संस्थांची क्रमवारी ( टाइम्स क्रमवारी)-

    १. इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स, बंगळुरू (251-300)

    २. आयआयटी, मुंबई (351-400)

    ३. आयआयटी, दिल्ली (501-600)

    ४. आयआयटी, कानपूर

    ५. आयआयटी, खरगपूर

    ६. आयआयटी, रुरकी

    ७. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (601 ते 800)

  • जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी ( भाग २ )

    महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची खूप जुनी प्रथा आणि जेवण सुरु असतांना देवाचे आणि सुसंगत विषयांवरील संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे, त्यातील वैविध्य याबद्दल मी या आधीच्या भागात लिहिलेले आपण वाचले असेलच. तेथे म्हटला जाणारा अर्ज आपण पहिला तशी एक निमंत्रण पत्रिका ( त्यावेळी कुंकुम पत्रिका, कुंकोत्री, कंकोत्री इत्यादी म्हटले जाई ) देखील असायची. चि. सौ. कां. जिलेबीबाई हिचा शुभविवाह चि. मठ्ठेराव यांचेशी .... इत्यादी मजकूर असे.

    महाराष्ट्राचे महाकवी, आधुनिक वाल्मिकी कै. ग. दि. माडगूळकर यांनी जेवणातील ५० हुन अधिक पदार्थ आणि भाज्यांचा उल्लेख करून एक कविता रचली होती. त्यांनी वापरलेली विशेषणेही खासच आहेत. अनेक कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता उत्तम उच्चारांसह तोंडपाठ म्हणत असत . ही कविता खाली देत आहे.
    -मकरंद करंदीकर.

    ।। काय वाढले पानावरती ।।

    काय वाढले पानावरती,
    ऐकून घ्यावा थाट संप्रती,
    धवल लवण हे पुढे वाढले,
    मेतकूट मग पिवळे सजले
    आले लोणचे बहु मुरलेले,
    आणि लिंबू रसरसलेले,
    किसून आवळे मधुर केले,
    कृष्णा काठचे वांगे आणले,
    खमंग त्याचे भरित केले,
    निरनिराळे चटके नटले,
    चटण्यांचे बहु नवे मासले,
    संमेलनची त्यांचे भरले,
    मिरची खोबरे ती सह ओले,
    तीळ भाजूनी त्यात वाटले,
    कवठ गुळाचे मिलन झाले,
    पंचामृत त्या जवळी आले,
    वास तयांचे हवेत भरले,
    अंतरी अण्णा अधीर जाहले!
    भिजल्या डाळी नंतर आल्या,
    काही वाटल्या काही मोकळ्या,
    काही वाटुन सुरेख तळल्या,
    कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
    शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
    मुळा कोवळा मिरच्या ओल्या,
    केळी कापून चकल्या केल्या,
    चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
    एकरूप त्या दह्यात झाल्या,
    भाज्या आल्या आळू-घोसाळी,
    रान कारली वांगी काळी,
    सुरण तोंडली आणि पडवळी,
    चुका चाकवत मेथी कवळी,
    चंदन बटवा भेंडी कवळी,
    फणस कोवळा हिरवी केळी,
    काजुगरांची गोडी निराळी,
    दुधी भोपळा आणि रताळी,
    किती प्रकारे वेगवेगळी,
    फेण्या, पापड्या आणि सांडगे,
    कुणी आणुनी वाढी वेगे,
    गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
    खिरी तयांच्या शोभत होत्या,
    शेवयांच्या खिरी वाटल्या,
    आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
    सार गोडसे रातंब्याचे,
    भरले प्याले मधुर कढीचे,
    कणीदार बहू तूप सुगंधी,
    भात वाढण्या थोडा अवधी ....

    .... महाकवी ग दि माडगुळकर.

  • संक्रांतीचा “संग्राह्य” तिळगुळ !

    मकरसंक्रांतीला पूर्वी अनेकजण शुभेच्छा पत्रे पाठवीत असत.त्याला “भेटकार्ड” म्हटले जाई. वर एखादे फुलाचे चित्र, आत हलव्याचे ८ / १० दाणे असलेले कागदी पाकीट आणि ” तिळगुळ घ्या, गोड बोला. मकरसंक्रांतीचे अभिष्टचिंतन !” असा मोजकाच मजकूर असे. आता ते जवळपास बंदच झाले आहे.

  • विद्वत्ता आणि श्रमाला पर्याय नाही !

    श्री सुनील देवधर यांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड सुद्धा उत्तम होती हे वेळो वेळी सिद्ध झाले आहे.यास काही किरकोळ अपवाद असू शकतात पण अपवादानी नियम सिद्ध होतो हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे .पण नियमातील अपवादा ची संख्या वाढली तर मात्र गोंधळ होतो.

  • गणपतीसाठी काही खास वस्तू आणि सजावट

    आमच्या दीड दिवसाच्या गणपतीसाठी पूर्वी मी खूप मोठी सजावट करीत असे. शेकडो मंडळी आवर्जून भेट देत असत. पण आता अशी सजावट वयोमानानुसार शक्य होत नाही. तरीही गणेशोत्सव आला की आतली उर्मी मला शांत बसूही देत नाही. मग थोडीशी सजावट करतोच !

  • आता १०० रुपयांचे नाणे

    रिझर्व्ह बँकेने २०००, ५००, २०० आणि ५० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता लवकरच १०० रुपयांचं नाणं चलनात आणण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.

    १०० आणि ५ रुपयांची नवी नाणी लवकरच चलनात आणली जातील, असे रिझर्व्ह बँकेने एका पत्रकात नमूद केले आहे. सध्या १, २, ५ आणि १० रुपयांची नाणी चलनात असून १०० रुपयाचं नाणं सध्याच्या चलनातील सर्वात मोठं नाणं ठरणार आहे.

    अर्थमंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील एकेकाळचे सुपरस्टार डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे. १९७७ पासून ते १९८७ पर्यंत एम. जी. रामचंद्रन यांनी तीनवेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भुषविले होते. एआयएडीएमके पक्षाची स्थापना त्यांनीच केली होती. रामचंद्रन यांनीच जयललिता यांना राजकारणात आणलं होतं.