(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • न्याययंत्रणेला भ्रष्ट्राचाराचा विळखा

    सर्व क्षेत्रात वाढत चाललेला भ्रष्ट्राचार चिताजनक ठरत आहे. भ्रष्ट्राचाराची पाळेमुळे खोलवर रुजल्यामुळे वरवरच्या उपायांनी तो आटोक्यात येण्यासारखा नाही. आजवर न्यायसंस्था भ्रष्ट्राचारापासून दूर होती. पण अलीकडेच याही क्षेत्रात भ्रष्ट्राचाराच्या घटना आढळल्याने खळबळ माजली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रकमेच्या अपहार करणार्‍या न्यायाधिशांवर काय कारवाई केली जाते याकडे सयार्‍यांचे लक्ष लागले आहे.

  • कापडी पिशव्या बनविणारा अनिरुध्द बचत गट

    आज अनेक कारणांमुळे पृथ्वी वरील पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. या दृष्टीकोनातून जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचा लाभ अनिरुध्द बचत गटाच्या महिलांनी घेतला. बाजारात प्लॉस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने ग्राहकांना कापडी पिशव्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा दृष्य विचार करुन या महिला काम करीत आहेत.

  • मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडविण्यासाठी संयुक्त समिती – गृहमंत्री

    मराठी चित्रपटांशी संबंधित वाद सोडवून धोरणात्मक निर्णयांसाठी शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

  • तुम्ही बदल घडवू शकता !

    नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतदानाचे महत्व सगळ्यांनी सांगूनही कित्येक लोक त्यापासून दूर राहिले. त्यातील काही लोक पूर्णपणे आत्मकेंद्रित होते हे गृहीत धरले तरी काही लोकांनी असा सूर काढला की काय करणार कोणीच लायक उमेदवार नव्हता म्हणून आम्हाला मतदान करता आले नाही. आता ही पळवाट म्हणून काढणारे किती व खरेच असा विचार करुन मत न देणारे किती हा संशोधनाचा विषय होईल. पण मग मत न देऊन तरी हा प्रश्न सुटणार आहे का? चांगले उमेदवार नाहित म्हणून मत द्यायचे नाही आणि मग पुन्हा लोकांशी देणे घेणे नसण्यार्‍या प्रतिनिधींकडे सत्ता सोपवायची हेच चालू ठेवायचे का? माझ्या ‘लढा किंवा झोप काढा ’ या लेखात म्हटल्याप्रमाणे हाही एक स्वातंत्र्यलढाच आहे. या लेखात आपण दुसर्‍या पर्यायाचा विचार करू.

  • सुलम (सूक्ष्म, लघु व मध्यम) उद्योगांतून तंत्रशिक्षण व रोजगाराच्या संधी ….

    १९९२ पासून जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेचे वारे वाहू लागल्यावर भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने शेतीप्रधानतेकडून उद्योगप्रधानतेकडे वाटचाल करू लागली आहे. आज भारतात शेती व्यवसायानंतर मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध करून देणारे दुसर्‍या क्रमांकावरील क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम ( “सुलम”- MSME )उद्योगक्षेत्र.

  • पहिले चुंबन : अविस्मरणीय क्षण

    जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक प्रियकराला आपल्या प्रेयसीचा व प्रेयसीला आपल्या प्रियकराचे पहिले चुंबन घेऊन आयुष्यातील अविस्मरणीय क्षण नोंदविण्याची इच्छा असते. परंतु, चुंबन कसे घेणार, या भीतीपोटी संधी येऊनही प्रेमीयुगल चुंबन घेण्याचे धाडस करत नाहीत…

  • संगणकाने वाढविला कष्टकरी महिलांचा आत्मविश्वास

    आजचे युग हे संगणक युग आहे. संगणक हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. सर्व क्षेत्रातील कामे संगणकामुळे अतितत्पर होऊ लागली आहेत.

  • फायदेशीर काय? धंद्याच्या सुरुवातीला भांडवल जास्त असणं का कमी असणं?

    एकदा एक युवक एका उद्योगपतीला भेटला आणि त्यांना म्हणाला ‘मला धंदा करायचा आहे. पण माझा खिसा रिकामा आहे मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे’.तो उद्योगपती त्याला म्हणाला, ‘तुझा खिसा रिकामा आहे याची तू चिंता करुच नकोस. तुझं डोकं अथवा हृदय रिकामं असेल तर तो मात्र चिंतेचा विषय ठरेल.

  • युगधर्म

    राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?

  • कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?

    अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.