(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुंबईला मुंबईच राहू द्या

    आपल्या राज्यकर्त्यांच्या, धोरणकर्त्यांच्या कल्पनाशत्त*ीचा विकास फारच कुंठित झाला आहे. कुठलाही नवा म्हणून जो विचार हे लोक समोर मांडतात मुळात ती कुठलीतरी उचलेगिरी असते. सध्या भारतात चिनी वस्तूंचा बराच बोलबाला आहे.

      February 4, 2007


  • बुद्धिवाद आणि सिद्धी ( एक निष्पक्ष वैचारिक मंथन )

    • प्रास्ताविक :
    • विसाव्‍या शतकात विज्ञानाने आश्चर्यकारक प्रगति केली आहे. काल ज्‍या गोष्‍टी अशक्‍य वाटत होत्‍या, त्‍या आज अस्तित्‍वात आलेल्‍या आहेत. याचाच अर्थ असा की, आज अशक्‍य वाटणार्‍या गोष्‍टी उद्या शक्‍य वाटूं लागतीलही, आज चमत्‍कार अथवा सिद्धी म्‍हणून गणल्‍या जाणार्‍या गोष्‍टींबद्दल कदाचित् उद्या वैद्यकीय स्‍पष्‍टीकरण सापडूंही शकेल.
    • अनेकदा दोन विरुद्ध बाजूच्या लोकांमध्ये वैचारिक वाद होत असतात. म्हणून, आपण याबद्दल निष्पक्ष विचार करण्याचा प्रयत्न करूं या.
    • पहिली बाजू :
    • काही शतकांपूर्वी लोकांना विमान म्‍हणजे एक कविकल्‍पना वाटणे साहजिकच होते, पण आता ती एक सामान्‍य आणि सर्वमान्‍य गोष्‍ट झाली आहे. ज्‍यूल्‍स व्‍हर्न ची, ‘फ्रॉम अऽर्थ टू दि मून’ या नांवाची एक सुरस कादंबरी होती. पण आज ‘चंद्रावर माणूस पोचणें’ ही एक सुरस कथा नसून सत्‍य घटना झालेली आहे. तसें प्रत्‍यक्षात घडतांना आपण पाहिलेलें आहे. ‘क्ष-किरण’, ‘इन्‍फ्रा- रेड किरण’, ‘मायक्रोवेव्‍हज्’ वगैरे अदृश्‍य लहरींमुळे शरीरावरील कातडीला अपाय न होता, आंतील अवयव दिसू शकतात , आंतील रोगही बरा होऊं शकतो. ही गोष्‍ट कांहीं शतकांपूर्वी चमत्‍कारात जमा झाली असती. एवढेंच काय, शंभरएक वर्षांपूर्वी जर कुणी म्‍हणाला असता की ‘माणसाची हुबेहूब जीवित प्रतिकृति कृत्रिमरीत्‍या तयार करणें शक्य आहे’, तर त्‍यावर किती लोकांनी विश्वास ठेवला असता ? परंतु तशी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. वैज्ञानिकांनी या क्रियेला ‘क्‍लॉनिंग’ असें नाव दिलेलें आहे. यावर गेली काहीं दशकें बरेंच संशोधन चालू आहे व क्‍लॉनिंगने ‘घडवलेले’ गिनीपिग्‍ज अस्तित्‍वातही आलेले आहेत.
    • आजही शरीरशास्‍त्रज्ञांना अथवा मानसशास्‍त्रज्ञांना मेंदूतील सर्व भागांचे कार्य समजलेलें नाही. माणूस त्‍याच्‍या मेंदूच्‍या क्षमतेच्‍या फक्‍त एक दशांशाचाच उपयोग करतो असे शास्‍त्रज्ञ म्‍हणतात. तर मग उरलेल्‍या नव्वद टक्‍के भागाचा उपयोग काय? आणि निरुपयोगी भाग उत्‍क्रांतीवादाच्‍या सिद्धान्‍ताप्रमाणे कालांतराने अस्तित्‍वातून गेला नसता काय ? हिप्‍नॉटिझम अथवा संमोहनविद्या, टेलीपथी, टेलीकायनेसिस या गोष्‍टींची उदाहरणे बरेचदा वाचनात येतात. कांहीं लोकांना त्‍यांचा प्रत्‍यक्ष अनुभवही आलेला आहे. पण अजून कोणीही त्‍याबद्दल सर्वमान्‍य व सिद्ध होऊ शकणारे स्‍पष्‍टीकरण देऊ शकलेले नाही. साधारण- विज्ञानाच्‍या कक्षेबाहेरील अशा प्रकारच्‍या, मेंदूशी संलग्‍न अभ्‍यासास ‘पॅरासायकॉलॉजी’ (परामानसशास्त्र) म्‍हणतात व त्‍याचा अभ्‍यास भारतात आणि पाश्चिमात्त्य देशातही सुरू आहे.
    • थोडक्‍यात काय, तर मानवाचें ज्ञान हें कधीच परिपूर्ण असूं शकत नाही , व अजूनही , विज्ञानाला अनाकलनीय अशा अनेक गोष्‍टी आहेत, हें मान्य करायला हवें.
    • दुसरी बाजू :
    • परंतु , अतींद्रीय शक्ति अथवा सिद्धी प्राप्‍त असल्‍याचा दावा करणारांनी हें ध्‍यानात ठेवायला हवें की आजच्‍या विज्ञानयुगात अंधश्रद्धेला जागा नाहीं . इथें परीक्षण आवश्‍यक आहे. त्‍यांना माहीत असल्‍यास, त्‍यांनी आपल्‍या शक्‍तीची उपपत्ती सांगायला हवी. विद्या दिल्‍याने वाढते, कंजूषपणामुळे, कोषात साठवून ठेवल्‍याने अंती तिचा नाश होतो. सिद्धी प्राप्‍त असणार्‍यांना किंवा तसा दावा करणार्‍यांना मानवजातीचें खरें हित साधायचें असेल तर त्‍यांनी स्‍वतः होऊन पुढाकार घेऊन याविषयी वैज्ञानिकांना सक्रिय मदत करायला हवी.
    • पण असें होत नाही. मागे डॉ. कोवूर यांनी एका सुविख्‍यात बाबांना दिलेले आव्‍हान त्‍यांनी स्‍वीकारलें नाही. प्रख्‍यात जादूगार पी. सी. सरकार यांचाही असाच अनुभव आहे. बाबांच्‍या आश्रमात ‘दर्शना’चा कार्यक्रम चालू असतांना, बाबांनी दाखवलेल्‍या चमत्‍कारासारखाच दुसरा ‘चमत्‍कार’ श्री. सरकार यांनी लागलीच तिथल्‍या तिथेच करून दाखवला. श्री. सरकार यांना तात्‍काळ आश्रमाबाहेर काढण्‍यात आले. ‘सिद्धी’ हा श्रद्धेचा विषय नाही, अभ्‍यासाचा विषय आहे, हें या आधुनिक सिद्धांना वा बाबांना कधी समजणार ? आणि तशा अभ्‍यासाला त्‍यांनी सक्रिय मदत न केल्‍यास, त्‍याला ‘बुवाबाजी’ असें बुद्धिवादी जर म्‍हणाले, तर त्‍यांना दोष कसा देता येईल ?
    • एक ‘क़ाबिले तारीफ़’ उदाहरण :

    वैज्ञानिक अभ्‍यासाला सक्रिय मदत करण्‍याचें हल्लीच्या काळातलें उदाहरण म्‍हणजे अमेरिकेचे माजी अध्‍यक्ष रेगन यांचें . रेगन यांना ‘अल्‍झायमर’ हा दुर्धर रोग झाला होता. या रोगाच्‍या प्रादुर्भावाबद्दल फारच थोडी माहिती जगास उपलब्‍ध आहे व रोगमुक्‍तीसाठी एकही रामबाण औषध नाही. अल्‍झायमर हा मेंदूचा रोग असल्‍यामुळे रोग्‍याची आकलनशक्ति कमी कमी होत जाते, मेंदूचे शरीरावरील नियंत्रणही कमी होत जाते. या रोगातून सुटण्‍याचा एकच उपाय आहे, आणि तो म्‍हणजे मृत्‍यू .

    पण रेगन यांनी आपल्‍याला हा रोग झाल्‍याचे लपवलें नाही. उलट त्‍यांनी तें जगासमोर उघड केले व स्‍वतःला या रोगाच्‍या अभ्‍यासासाठी डॉक्‍टरांपुढे उपलब्‍ध करून दिले. विज्ञानाची किती मोठी सेवा रेगन यांनी केली ! आजचे ‘बुवा’ किंवा ‘सिद्ध’ अशा अभ्‍यासाची संधी वैज्ञानिकांना कधी देणार ?

    • ‘सिद्दी म्हणजे बुबाबाजी’ , असें दर वेळी असेलच कां ? :

    मात्र, बुद्धिवादी लोकांनीही एक अभ्‍यास म्‍हणून हा विषय हाताळला पाहिजे. कांहीं ‘गुरु’, ‘बुवा’ व ‘स्‍वामी’ चमत्‍कारांच्‍या व सिद्धींच्‍या झगमगाटाने भोळ्या भक्‍तांची दिशाभूल करतही असतील. त्‍यांचें थोडा वेळ बाजूला ठेवूं. पण यूरी गेलर या इस्त्रायली व्‍यक्‍तीच्‍या ‘टेलिकायनेसिस’ शक्‍तीचे काय ? एडगर कायसी (Cayce) या अमेरिकन माणसाने संमोहनावस्‍थेत दिलेल्‍या ‘डेड सी स्क्रोलस्’ बद्दलच्‍या पूर्वसूचनांचे काय , ज्‍यानुसार नंतर खरोखरच कांहीं उपयुक्‍त माहिती उजेडात आली. टेलीपथी किंवा उत्‍स्‍फूर्तपणे भविष्‍यकथन करणार्‍या व्‍यक्‍तींची उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो. त्‍यातली कित्‍येक तर साधीसाधी माणसे असतात. त्‍यांना व्‍यक्तिशः कुठलाही धनलाभ होत नाही. ते कुठलेही मठ वा पंथ स्‍थापत नाहीत. मग तिथें बुवाबाजीचा प्रश्न कुठें येतो ?

    • माझा स्वत:चा एक अनुभव :

    माझ्या स्वत:च्या ओळखीच्‍या एक वृद्ध आजीबाई पुण्‍याला रहात असत. त्‍यांना काहीतरी आगळी अशी ‘शक्ती’ प्राप्‍त आहे असे अनेक परिचित सांगत. बाई संसारी होत्‍या. या शक्तीपासून कसलाही व्‍यक्तिगत लाभ त्‍यांनी होऊ दिला नाही. आर्थिक लाभ तर दूरच, पण त्‍यांनी आपल्या शक्तीचें कसलेही भांडवल केलें नाही, स्‍तोम माजवलें नाही. स्‍वतःच्‍या सिद्धीचा त्‍यांनी कधी उल्‍लेखही केला नाही. ‘ते म्‍हणतात’ अशा शब्‍दांनी सुरुवात करून त्‍या काय तें सांगत. ‘ते’ म्‍हणजे त्‍या वृद्ध बाईंचे दिवंगत गुरु. अशी कुठलीही वेळ ठरवलेली नव्हती ( उदा. , गुरुवार संध्याकाळीं ) , की ज्या वेळी बाईंना भेटायला येऊन लोक त्यांना कांहीं प्रश्न विचारताहेत, पायाशी फूल-नारळ वगैरे ठेवताहेत . छे: ! त्या आजी तर कुणालाही असें भेटतच नसत. अगदी जवळच्या परिचितांनाच त्या काय तें सांगत असत, अन् तेंही आधी ठरवून असें नव्हेंच . आपण प्रश्न विचारायचेच नाहींत. पण अगदी अचानक, उत्स्फूर्तपणें त्यांना जें कांहीं सुचे, व त्या तें सांगत .

    त्‍या आजींच्‍या सिद्धीचा मला स्‍वतःला एकदा नव्‍हे तर दोन वेळा अनुभव आलेला आहे. पण त्‍यामागील वैज्ञानिक स्पष्‍टीकरण मात्र मला माहीत नाही. जर इतर कुणी मला अशा प्रकारचा अनुभव सांगितला असता, तर त्यावर विश्वास ठेवणें मला स्वत:लाही जड गेलें असतें. असा अनुभव फक्त ‘प्रत्‍यक्षप्रमाण’ च्‍या सूत्राप्रमाणेंच पटूं शकतो.

    • एक शक्यता , एक आशा :

    मी अंधश्रद्ध नाहीं, रूढिवादी नाहीं. कसलीही अंधश्रद्धा न बाळगतां, मला असें वाटतें की अशा प्रकारच्या कांहीं शक्‍ती माणसाच्‍या मेंदूत सुप्‍त स्थितीत असतात आणि फक्‍त काही व्‍यक्‍तींच्‍या ठिकाणीच त्‍या जागृत होत असतात. त्‍यांचा पद्धतशीर अभ्‍यास झाला , व त्‍यांचें रहस्‍य थोडें जरी उलगडलें तर , न जाणो, त्‍यातून मानवाच्‍या प्रगतीसाठी कांहीं नवीन सूत्र सापडूंही शकेल.

    • एक विचार : ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक :

    अखेरीस एक विचार मांडावासा वाटतो, आणि तो म्‍हणजे, ‘खरा महात्‍मा’ व एखादा ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यातील फरक.

    आज अनेक लोक ‘बुवाबाजी’ करत आहेत ही गोष्‍ट नाकबूल करता येणार नाही. अंधश्रद्धेचे उच्‍चाटन झालेले नाही व तथाकथित ‘बुवा’ वा ‘स्‍वामी’ त्‍याचा फायदा घेतात, हे स्‍वाभाविकच आहे. म्‍हणून ‘खरा महात्‍मा’ व ‘ढोंगी बुवा’ यांच्‍यात फरक करायला एकच कसोटी लावायला हवी. अतींद्रिय शक्ति अथवा सिद्धि किंवा चमत्‍कार, ही ती कसोटी नव्‍हेच ! ती कसोटी आहे ‘प्रत्‍यक्ष आचरण’ . ज्‍या व्‍यक्ती स्‍वतःच्‍या सुखदुःखाची पर्वा न करता, निःस्‍वार्थ बुद्धीनें निरलसपणें परहितासाठी झटतात, तेच खरे महात्‍मे ; मग ते चमत्‍कार दाखवोत वा न दाखवोत, त्‍यांना सिद्धी प्राप्‍त असो वा नसो. आणि जे खर्‍याखोट्या चमत्‍कारांनी लोकांना भुलवून स्‍वतःची तुंबडी भरतात, ते बुवाबाजी करतात, असेंच म्‍हणायला हवें . समजा, त्‍यांच्‍या अतींद्रिय शक्‍ती पुढेमागे अगदी सिद्ध झाल्याच , तरीही ते ढोंगी बुवाच !

    • भारतात ‘टॉलरन्स्’ तसेंच ‘सत्यान्वेषण’ यांची दीर्घकालीन परंपरा आहे. त्या मार्गानें, ‘ओपन-माइंडेड्’ बुद्धिवादी व इतर विचारवंत हंसाप्रमाणें नीरक्षीरविवेक वापरून, हा फरक जाणून घेऊ शकतील अशी आशा करावी कां ?

    + + +

    [ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०७.१९७६.

    बदल : दि. १५.०२.२०१८ ]

    + + +

    - सुभाष स. नाईक Subhash S. Naik
    मुंबई.
    M- 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com , www.snaehalatanaik.com

      February 19, 2018


  • स्वातंत्र्य दिवस

    म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.

      August 15, 2020


  • पाठदुखी

    पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. पाठदुखी व कंबरदुखीचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो, दुखण्याची तीव्रता कमी अधिक असली तरी पाठदुखी सर्वांना माहिती असते. तसे पाहिले तर पाठदुखी हे एक लक्षण आहे, शरीरातल्या बिघाडाचे सूचक चिन्ह आहे. हा बिघाड क्वचित गंभीर स्वरूपाचाही असू शकतो. अर्थातच पाठदुखीवर फक्‍त वेदना कमी करणे इतका मर्यादित स्वरूपाचा उपचार करणे अयोग्य ठरते, तर नेमके कारण काय आहे हे शोधून त्यानुसार नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. पाठीचा कणा हा संपूर्ण शरीराचा भरभक्कम आधार असतो. वाकणे, उठणे, बसणे, वळणे, चालणे अशा बहुतेक सर्वच क्रिया करताना आपण पाठीच्या कण्याचा वापर करत असतो. मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागामध्ये बारा, कंबरेमध्ये पाच मणके असतात, माकडहाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेल्या स्थितीत असतात व त्याच्याही खाली तीन ते पाच मणके
    जुळलेल्या स्थितीत असणारा कॉसिक्‍स म्हणून कण्याचा शेवटचा भाग असतो. अशा प्रकारे कवटीपासून ते बैठकीच्या भागापर्यंत हे सर्व मणके एकावर एक रचलेल्या स्थितीत असतात. दोन मणक्‍यांमध्ये जणू रबरापासून बनविल्यासारखी चकती असते, जिला "डिस्क (गादी)' असे म्हटले जाते. या मधल्या चकतीमुळेच कणा वाकू शकतो, वळू शकतो. या शिवाय या सर्व मणक्‍यांना व चकत्यांना धरून ठेवणारे अनेक संधिबंधने, स्नायू असतात. या कण्यामध्ये मज्जारज्जूचे स्थान असते. अतिशय महत्त्वाच्या व नाजूक मज्जारज्जूला पाठीचा कणा चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम करत असतो. पाठदुखीचे कारण पाठदुखी असे म्हटले जाते तेव्हा हे दुखणे पाठीच्या कोणत्याही भागात उद्भवलेले असू शकते, तसेच पाठीच्या कण्यातील कुठल्याही संरचनेतील बिघाडाशी संबंधित असू शकते. उदा. पाठीच्या हाडांमधली ताकद कमी झाली तरी पाठ दुखू शकते. इतर हाडे ठिसूळ होतात त्याप्रमाणे मणके ठिसूळ होऊ लागले तरी पाठ दुखू शकते, कण्याला बांधून ठेवणाऱ्या संधिबंधनांना दुखापत झाली तरी पाठ दुखू शकते, कण्याला आधार देणारे स्नायू जखडू लागले तरी पाठदुखी सुरू होऊ शकते. दोन मणक्‍यांमधल्या चकतीची झीज झाली किंवा काही कारणाने ती स्वस्थानातून थोडी जरी निसटली आणि याचा दाब नसेवर आला तरी तीव्र स्वरूपाची पाठदुखी निर्माण होऊ शकते. याशिवाय स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील अशक्‍तता पाठदुखीला कारण ठरू शकते. अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अतिरक्‍तस्राव होणे हेसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देऊ शकते. स्त्रीप्रजननसंस्थेत कुठेही सूज असली, जंतुसंसर्ग असला तरी त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी उद्भवू शकते. अर्थात अशा वेळी फक्‍त पाठीवर नाही तर आतील दोषावर नेमके उपचार करणे आवश्‍यक असते. वाढत्या वयानुसारही पाठ-कंबरदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, संगणकावर रोज 10-12 तास काम हीसुद्धा पाठदुखीची कारणे होत. फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे, जड वस्तू उचलणे, ओढणे हीसुद्धा पाठदुखीला आमंत्रण देणारी असतात. बिघडलेला वातदोष आयुर्वेदानुसार विचार केला तर पाठदुखी, कंबरदुखी ही वातदोषातील बिघाडाशी संबंधित तक्रार होय. पाठीतील लवचिकता कमी होणे, उठता-बसताना आधाराची गरज भासणे, पाठ जखडणे, पाठीत चमक भरणे वगैरे सर्व तक्रारी वातदोषाशी संबंधित असतात आणि म्हणूनच सहसा पाठदुखी बरोबरीने वाताची इतर लक्षणेही उदा. गुडघेदुखी, मलावष्टंभ, गॅसेस, त्वचा कोरडी पडणे, अशक्‍तपणा जाणवणे, पाय दुखणे, नेहमीच्या हालचाली करताना सहजपणा न राहणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे वगैरे त्रास जाणवू लागतात. म्हणूनच पाठदुखी, कंबरदुखीवर उपचार करताना वाढलेल्या, बिघडलेल्या वातदोषाला संतुलित करणे, झीज झालेली असल्यास ती भरून काढणे आणि ज्या कारणामुळे पाठदुखी सुरू झाली असेल ते कारण दूर करणे अशा प्रकारे योजना करणे आवश्‍यक असते. पाठ दुखायला लागली, की विश्रांती घ्यावीशी वाटते हा सर्वांचा अनुभव असतो आणि सहसा यामुळे बरेही वाटते. मात्र, फार तीव्र स्वरूपाची पाठदुखी असेल, अगदी साध्या हालचाली करणेही अवघड होत असेल तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक असते. विशेषतः वेदना पाठीतून सुरू होऊन पायांच्या टोकापर्यंत पोचत असतील, श्‍वासोच्छ्वास करताना त्रास होत असेल, छातीत दुखत असले तर तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे इष्ट होय; परंतु अशी परिस्थिती येऊ नये यासाठी दक्ष राहणेच इष्ट. प्रतिबंधात्मक उपाय संपूर्ण शरीराचा आधार असणाऱ्या पाठीच्या कण्याची सुरवातीपासून काळजी घेतली तर पाठदुखी-कंबरदुखीला प्रतिबंध तर होतोच, पण एकंदर चेतासंस्थेचे आरोग्य व्यवस्थित राहायला मदत मिळते. वातदोष संतुलित राहावा, पाठीच्या कण्यातील हाडे व सांधे तसेच आतील मज्जारज्जू यांचे पोषण व्हावे यादृष्टीने पुढील उपचार करता येतात. मान व पाठीला तेल लावणे. वाताला संतुलित ठेवण्यासाठी, सांध्यांची लवचिकता कायम ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय होय. स्वतःहून किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी खालून वर या दिशेने पाठीच्या कण्याला तेल उदा. संतुलन कुंडलिनी तेल लावता येते. नस्य - रोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात घरचे साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकणे. विशेषतः हे मानेच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त असते. तसेच मेरुदंडाला ताकद देण्यासाठी साहायक असते. रोजच्या रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे. वाताच्या असंतुलनामुळे पोट साफ होत नाही आणि पोट साफ झाले नाही तर त्यामुळे वात अजूनच बिघडतो. अर्थातच या दुष्ट चक्राचा पाठीच्या कण्यावरही दुष्परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे चांगले. आवश्‍यकतेनुसार अविपत्तिकर चूर्ण, त्रिफळा, सॅनकूलसारखे चूर्ण घेता येते. आहारात वातशामक, कफपोषक पदार्थांचा समावेश असणे - किमान चार-पाच चमचे घरचे साजूक तूप रोजच्या आहारात ठेवणे, रोज कपभर ताजे सकस दूध पिणे, दुधात खारकेची एक चमचा पूड टाकणे, बरोबरीने शतावरी कल्प, चैतन्य कल्प घेणे हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे हितकारक ठरते. मज्जापोषक, अस्थिपोषक पदार्थांचे सेवन करणे - खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, बदाम, च्यवनप्राश, मॅरोसॅनसारखे रसायन रोज घेणे हे मणके, मेरुदंड अशा दोघांच्या आरोग्यासाठी चांगले असते. मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे - पाठीचा कणा आणि मानसिक ताण यांचा खूप जवळचा संबंध असतो. ताणामुळे कण्याजवळील पेशी कडक झाल्या तर त्यामुळे पाठीच्या कण्याची लवचिकता कमी होते, पर्यायाने मानेचे व पाठीचे त्रास होण्याची शक्‍यता वाढते. मानसिक ताण आला तरी तो कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे, संगीत ऐकणे, ॐकार गुंजन यांसारखे उपाय करता येतात. पाठीच्या कण्याचे आरोग्य टिकवायचे असेल तर त्यासाठी अजून एक उत्तम उपाय म्हणजे नियमित व्यायाम. यामध्ये सर्वप्रथम येते ते चालणे. रोज 30 मिनिटे नियमित चालल्यास पाठीच्या मणक्‍यांची, मणक्‍यांमधील गादीसारख्या डिस्कची लवचिकता नीट राहते, त्यामुळे मान-पाठीचे त्रास कमी होण्यास प्रतिबंध होतो. याखेरीज ताडासन, अर्धशलभासन, स्कंध चक्र, मार्जारासन, संतुलन क्रियायोगातील स्थैर्य, समर्पण, विस्तारण ही आसनेही मानेच्या-पाठीच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. मानेचे सोपे व्यायाम, उदा. ताठ बसून मान हलकेच मागे नेणे, पुढे आणणे, डावी-उजवीकडे फिरविणे, खांद्यांच्या बाजूला शक्‍य तेवढी वाकवणे, पुन्हा सरळ करणे या प्रकारचे व्यायाम करता येतात. बैठे काम असणाऱ्यांनी, विशेषतः संगणकावर काम करावे लागणाऱ्यांना तर हे व्यायाम खुर्चीत बसल्या बसल्यासुद्धा करता येतात. प्राणायाम, दीर्घश्‍वसन किंवा या दोघांचा एकत्रित परिणाम देणारे ॐकार गुंजनसुद्धा पाठीच्या कण्यासाठी उत्कृष्ट उपाय होय. या उपायांनी हवेतील प्राणशक्‍ती अधिक प्रमाणात मिळू शकते व ती मेंदू, मेरुदंड यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्यावश्‍यक असते. प्राणशक्‍तीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात झाला की वेदना, जखडणे, अवघडणे यांसारख्या तक्रारींना वाव मिळत नाही, उलट रक्‍ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होण्यास मदत मिळते. रोज किमान 10-15 मिनिटे यासाठी काढली तर पाठीच्या कण्यासंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होऊ शकेल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 25, 2017


  • जात म्हणजे काय? ….. बदलता दृष्टीकोन

    तुमचा वंश, तुमचं कुळ यालाच तुमची ‘जात’ असं म्हटलं जातं. जी जात नाही ती ‘जात’ असंही म्हणतात. भारतात, जातीसंस्था ही फार पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. वर्ण आणि जाती या संकल्पना, वास्तविक चांगल्या अुद्देशानं समाजात रूढ झाल्या. जन्मत:च तुम्ही आपल्या बरोबर जे जे गुणावगुण घेअून येता ते तुमचं ‘जात’ (तुमची ‘जात’ नव्हे). जन या संस्कृत क्रियापदापासून जनन, जनता, जन्म, जात हे शब्द आले आहेत.

      February 25, 2018


  • प्रत्येक वाक्यात किती अर्थ दडलेला आहे.

    माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .. चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा. जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. कारण औषध जरी कडू असलं. तरी ते आपल्या फायद्याचे असते.

      March 9, 2020


  • महागाईचा ससेमीरा

    आज देशात सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळा आहे आणि त्याची झळ प्रत्येक कुटुंबाला बसतेच पण त्यात जास्त त्रास सहन करावा लागतो त्या कुटुंबातील स्त्रीला आणि मग बाजारातील वस्तूंचे भाव कडाडलेले बघितले की साहजिकच तिच्या कपाळाला आठ्या पडतात. 

      November 21, 2013


  • तुमचं मन सचिन तेंडुलकरसारखं खेळतं का

    भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
    कबीर म्हणतो,
    मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
    जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
    …मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.

      March 21, 2026


  • डॉ. वसंत गोवारीकर

    डॉ. वसंत रणछोडदास गोवारीकर यांचा जन्म १९३३ साली कोल्हापूरला झाला. कोल्हापूरला ते एमएस्सी करून त्यांनी लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएचडीची पदवी प्राप्त करून घेतली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनच्या एटॉमिक एनर्जी व एव्हिएशनमध्ये काम केले.

      October 7, 2023


  • श्रीहरी स्तुति – १४

    या ब्रह्मज्ञानी साधकाची अवस्था कशी असते? ते विशद करताना आचार्य श्री पुढे म्हणतात…

      November 2, 2020