(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पोळा

    हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त होते.

    -श्री करंदीकर गुरुजी

      September 14, 2023


  • शेवटचा राजयोगी गेला..

    काल मनोहर पर्रीकर गेले. उभा देश हळहळला. ते ज्या पक्षाचे नेते होते, त्या पक्षाला पर्रीकरांचं जाणं म्हणजे ‘पक्षा’चं मोठं नुकसान झालं असं वाटणं अगदी सहाजिक आहे. ते ज्या पक्षांचे नव्हते, त्यांना ‘राजकारणा’चं मोठं नुकसान झाल्यासारखं वाटलं. त्याहीपेक्षा अचंबित करणारी गोष्ट म्हणजे, ज्यांचा राजकारणाशी फक्त निवडणुकांपुरताच संबंध येतो,

      March 18, 2019


  • बाळक्रीडा अभंग क्र.१५

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      August 26, 2018


  • लोकशाहीचे पसायदान

    भारत सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि एव्हिडन्स ऍक्ट मध्ये बदल करून स्वातंत्र्याचे स्वराज्यात रूपांतर करण्याची पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. आता आपण ज्ञानेश्वर माऊलींना त्यांनी मागितलेले पसायदान देण्याची मानसिक आणि कायदेशीर तयारी सुरू केलेली आहे असे मला वाटते. ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान हे नागरीकांनी भारत सरकार कडून पूर्ण करून घेण्याच्या नागरी आधिकारांची आणि सुविधांची शॉर्टलिस्टच आहे.

      August 27, 2023


  • हिंदुस्तान एअरक्राफ्ट – भारतातली पहिली विमान उत्पादक कंपनी

    भारत लवकरच स्वतंत्र होईल आणि भारताला जागतिक व आर्थिक घडामोडीत निश्चित महत्वाचे स्थान मिळेल, असा दृढविश्वास असलेले उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी डिसेंबर, १९४० मध्ये त्यावेळच्या म्हैसूर संस्थानच्या सहाय्याने हिंदुस्तान एअरक्राफ्ट ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली. २३ डिसेंबर, १९४० रोजी नोंदणी झालेली ही संस्था केवळ चार कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली.

      June 27, 2023


  • दादर टी. टी. आणि मांजरं

    दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे.

      May 16, 2017


  • स्पीड गन

    रस्त्यांवर अनेक अपघात हे वाहनांच्या अतिवेगाने होत असतात, त्यामुळे अशा वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी खरे तर स्पीड गन लावणे हा चांगला उपाय आहे.

      October 11, 2023


  • मौनव्रती सिद्धेश्वर जलाशय !

    जलाशयासमोर गेले की तेथील शांतता मनात झिरपू लागते. दिवसभराचे कोलाहल मागे टाकीत तलावाशी संयत संवाद बरा वाटतो. मन स्थिर व्हायला शब्दांची गरज भासत नाही. तेथील संवादही अंतर्यामीच्या मौनात विरून जातात आणि स्वच्छ,नितळ वाटायला लागतं.

      January 12, 2023


  • सैनिकांवर हृदयशस्‍त्रक्रिया करणारे डॉ. ड्वाईट हार्केन

    दुसर्‍या महायुद्धाच्‍या काळात बॉम्‍बस्‍फोटात श्रापलेनचे तुकडे हृदयात घुसून सैनिक जखमी होत व त्‍यातच त्‍यांना प्राण गमवावे लागत. डॉ. हार्केन यांनी अशा सैनिकांच्‍या हृदयावर शस्‍त्रक्रिया करून त्‍यांचे प्राण वाचविण्‍यात यश मिळविले. त्‍यांनी सुमारे १३० सैनिकांवर अशा प्रकारे शस्‍त्रक्रिया केल्‍या. यातील सर्वात उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे ह्या सर्व १३० शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍या. यामुळे त्‍यांचे नाव सर्वतोमुखी झाले.

      February 9, 2019


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सोळा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे बावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    पदार्थ उघडा ठेवू नये
    तयार झालेला पदार्थ उघडा ठेवल्यास, भूमार्गाने येणारे झुरळ मुंगीआदि गण, आकाशमार्गाने येणारे किटक, डास, घरमाशी, कोळी इ. उपद्रवी जीव अन्न पदार्थात जाऊ शकतात. आणि अन्न विषमय होऊ शकते. किंवा उंदीर, पाल आदि जीवांची विष्ठा अन्नामधे पडू शकते. हे लक्षात असावे. नाहीतर दूषिविषाला (प्राण्यापासून निर्माण होणारा जंतुसंसर्ग, म्हणजे दूषीविष.) सामोरे जावे लागते. म्हणून आई ओरडायची. पदार्थ उघडा ठेवू नये. त्यावर झाकण घालून ठेवावे.

    दुधावर फुंकर घालू नये
    दुधावरची साय बाजूला करण्यासाठी पातेल्यातील दुधावर फुंकर घालू नये. साय बाजूला करताना त्यावर तोंडातील लाळ, थुंकी उडण्याची शंका असते. पुनः जन्तु संसर्ग होण्याची शक्यता वाढते. म्हणून साय चमच्याने बाजूला करावी. यात गैर काय आहे? आजच्या भाषेत आपल्या हायजिनसाठी हे आवश्यक वाटते.

    पिंपात तांब्या बुडवू नये.
    तांब्याच्या तळाला लागलेला कचरा, माती पिंपात जाण्याची शक्यता असते. पिंपातील सगळेच पाणी फुकट जाऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन ही सूचना असते.

    पातेलं खरडून वाढू नये
    ज्याला मॅनर्स म्हणतात, त्यातील हा एक प्रकार आहे. पातेलं खरडून वाढताना रिकाम्या पातेल्याचा जो आवाज येतो, तो जेवणा ऱ्या च्या मनात संभ्रम निर्माण करतो, पातेल्यातील जिन्नस संपला असेल तर आपण आणखी मागायला नको, असे त्याला वाटून जेवणारा, अर्धपोटी उठू शकतो, त्याचा "अन्नदाता सुखी भव" हा आशीर्वाद मिळण्यासाठी पातेलं खरडण्याचा आवाज वाढताना होऊ नये.

    काही जणांना वाटेल काय हे एवढी साधी गोष्ट कळत नाही का आम्हाला? एवढे बुद्धु आहोत का ? पण काही वेळा साध्या गोष्टी मागील मर्मच लक्षात येत नसते, त्या कोणी एका शास्त्रज्ञाने म्हणे, मोठ्या मांजराला घरातून बाहेर जाण्यासाठी एक भोक आणि लहान पिल्लांना बाहेर जाण्यासाठी वेगळे लहान भोक ठेवले होते म्हणे !

    मुलांचे चालीने चालावे
    मुलांचे बोलीने बोलावे
    तैसे जनास सिकवावे
    हळूहळू
    असे समर्थ देखील म्हणतात.

    ताटाच्या बाहेर सांडू नये
    भूतदया असावीच, त्यांच्यासाठी चार शीते ताटाबाहेर काढूनही ठेवावीत, पण आपण जेवत असताना अन्न ताटाबाहेर पडत तर नाही ना याची काळजी देखील घ्यावी. अन्नाचा एकही कण वाया जाऊ न द्यावा. ताटाबाहेरच नव्हे तर ताटात देखील अन्न टाकू नये. जेवढे हवे तेवढेच वाढून घ्यावे. हावरटपणाने वाढून घेऊन, नंतर ताटात टाकणे आईला पसंत नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ११.०८.२०१७

      August 11, 2017