No Picture
साहित्य - ललित

पुणे ते मुंबई – आगामी चित्रपटासाठी फॉर्म्युला

Category:

 

एका कल्पक दिग्दर्शकाने आपल्या आगामी चित्रपटासाठी पुढील फॉर्म्युला तयार केला आहे. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांना आवश्यक असा सर्व मसाला त्यात आहे. पुणे ते मुंबई या आगगाडीच्या एका प्रवासात हा बोलपट काढता येतो. या चित्रपटाचे कथानक व शूटिंग पुणे स्टेशनवर सुरू झाले असून बोरीबंदर स्टेशनवर ते संपले आहे.

No Picture
लेखसंग्रह

पुस्तक वाचून भटकंती

Category:

 

आकाशवाणीवर कथाकथन करण्याची पहिली संधी मला ललित लेखक रवींद्र पिंगे ह्यांनी दिली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,
“मी बिलिमोरिया नावाचं गाव ऐकलं आहे आणि ते गाव पाहावं अशी माझी इच्छा झाली आहे ”
पिंगे ह्यांनी अशी अनेक ठिकाणे पहिली आणि त्यावर विपुल लेखन केलं. बिलिमोरिया हे गाव गुजरात मध्ये आहे. पिंगे ह्यांनी सांगितल्यामुळे मलाही ते पाहायचं आहे. तूर्तास, गूगल अर्थवर जाऊन मी ते गाव पाहिलं आहे. प्रत्यक्षात केव्हा तरी पाहीनसुद्धा.
पिंगे ह्यांनी नर्मदेवर लिहिलं. नर्मदा परिक्रमेवर इतरांनी लिहिलेले लेख-पुस्तके वाचली. त्यामुळे एकदा नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे.

No Picture
लेखसंग्रह

आत्महत्या करण्याआधी

Category:

 

राजनने मनाचा निश्चय केला की आता आत्महत्या करून मोकळे व्हायचे. जगताना अपार दुःख भोगावं लागतंय. इतक्या अडचणी, इतके प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर एक सोपा उपाय आहे. आत्महत्या करून मोकळे व्हायचे. सगळ्यातून सुटायचे. धावत्या गाडीखाली शरीर झोकून द्यायचे की सगळे दुःख, यातना, प्रोबेल्म्स एका क्षणात संपून जातील.

No Picture
लेखसंग्रह

कलिंगडाचे डोहाळे

Category:

 

बदलापूर स्टेशनवरून सोनावणे घाईघाईत घरी निघाले. आता घरी पोहोचायला उशीर करून चालणार नव्हते. कारण पत्नी प्रेग्नंट होती. तिसरा महिना चालू होता. सोनावणे भराभर घरी पोहोचले. स्नान करून पत्नीसमोर निवांत बसले. चहा पिताना तिच्याशी गप्पा सुरु झाल्या.
पत्नी जुन्या आठवणीत रमून गेली. ती सांगू लागली ” आमच्या गावात नदी होती. माझे बाबा किनाऱ्यावर कलिंगड लावायचे. कलिंगडाला आम्ही दोरे बांधायचो. ते दोरे तोडून कलिंगड मोठं व्हायचं. मला आज खूप आठवण येतेय. असं वाटतं कलिंगड खावं ! “

No Picture
लेखसंग्रह

कोणी रायगडचा, कोणी तिरंग्याचा वेडा. करा थोडा वेडेपणा

Category:

 

रामाने श्री लंकेवर चढाई करण्यासाठी समुद्रावर सेतू बांधायचे ठरवले तेव्हा एका इवल्याश्या खारीने आपल्या तोंडातून त्यात वाळू भरण्याचे काम केले. ती फक्त मूठभर वाळू सेतूमध्ये भरू शकली. तिने संदेश दिला की प्रत्येकाने स्वतःच छोटं योगदान दिलं तरी सामूहिकपणे मोठं यश मिळवता येतं. वरवर पाहता खार वेडी वाटते. अशीच काही वेडी माणसे आहेत, जे स्वतःच इवलंसं योगदान देऊन देश घडवत आहेत. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

तुमचं मन सचिन तेंडुलकरसारखं खेळतं का

Category:

 

भारतात प्राचीन काळात सगळ्यात जास्त विचार झाला तो आपल्या मनाबद्दल. भगवतगीता हे त्याचं मोठं उदाहरण आहे. कबीरानेसुद्धा मानवी मनावर भाष्य केलं.
कबीर म्हणतो,
मन के मते न चलिये, मन के मते अनेक।
जो मन पर असवार है, सो साधु कोई एक।।
…मनाच्या मताने चालू नका. कारण त्याची मते अनेक आहेत. पण मन जर ताब्यात ठेवलं तर तुम्ही एक साधू बनून आनंदात राहू शकाल. मन ताब्यात कसं ठेवायचं सांगत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

सैनिकांची मावशी: अनुराधाताई

Category:

 

“मी तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात झाकून मला आणले जाईल!” अशी प्रतिज्ञा सैन्यातील जवान करतात आणि युद्धभूमीवर आपलं शौर्य दाखवतात. त्यांचं शौर्य घराघरात नेण्याचं काम ‘लक्ष्य’ फाऊंडेशन करत आहे आणि ह्या फाऊंडेशनची स्थापना केली आहे सौ. अनुराधा प्रभुदेसाई ह्यांनी. ह्याच अनुराधाताईंना भारताचा सैनिक मावशी नावाने ओळखतो. सैनिकांच्या मावशीचा आणि त्यांच्या कार्याचा वेध घेतला आहे निरेन आपटे ह्यांनी.

No Picture
लेखसंग्रह

मुरुडचे परब कुठे गेले

Category:

 

साधीभोळी माणसं ही सोलकढी किंवा पेढे असतात. काही दिवस टिकतात आणि नंतर आठवणी मनाच्या कोपऱ्यात ठेवून निघून जातात. अशा माणसांचा पत्ता नसतो, मोबाईल नंबर नसतो, त्यांचा ईमेल आयडी, फेसबुक प्रोफाइल नसतो. पण ते कुठे ना कुठे असतात. असेच एक आहे मुरूडचे परब. त्यांची ओळख करून देत आहेत निरेन आपटे.

No Picture
लेखसंग्रह

शेवटचे स्टेशन कुडाळ

Category:

 

जगप्रसिद्ध चित्रकार वॅन गॉगला शहरी जीवन मानवलं नाही. शेवटी तो एका शांत, निसर्गसंपन्न जागेत राहायला गेला. तिथे त्याने आयुष्याची शेवटची वर्षे काढली आणि त्यावेळी त्याने जी मोजकी चित्र चितारली ती जगभर गाजली. इतकी किंमत आली की त्या चित्रांचे स्मगलिंगही झाले.

No Picture
लेखसंग्रह

आईला अग्नी द्या. पैसे पाठवतो

Category:

 

माणूस जीवनभर धावपळ करतो, अमाप कष्ट करतो. खूप काही सोसतो. कशासाठी, तर शेवटचा दिवस गोड व्हावा !!
अंतिम विसावा घेताना सगळ्यांची सोबत असावी, मनात समाधान असावं.
पण धावपळ इतकी तीव्र झाली आहे की विसावा राहिलाच नाही. अंतिम विसाव्यालाही वेळ देता येत नाही. शेवटचा क्षण आला की नाही, हे पाहायलाही वेळ नाही.
एकदा पाली ते खोपोली प्रवास करत होतो. अचानक बस पंक्चर झाली. ड्राइवर साहेबांनी आंबा नदीच्या पुलावर बस उभी केली आणि सर्वाना खाली उतरवलं. आसपास दाट झाडी होती. आंबे, गुलमोहर, मुरबाडी साग उभे होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. लक्ष वेधून घेत होती ती फक्त एक पाटी- कृष्ण वृद्धाश्रम !
विचार केला, आपण खूप काही पाहायला जातो. हिमालय, सागर किनारे, वने, डोंगररांगा पाहायला निघतो, पण वृद्धाश्रम पाहायला कधी जात नाही.
आज तोही पाहू.