लेखसंग्रह

पांडुरंग शास्त्रीं आठवलेंचा एक विचार

Category:

 

स्वाध्याय परिवार… मॅगसेसे, टेम्पल्टन, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पद्मविभूषण पुरस्कार. असंख्य कार्यकर्त्यांचं पाठबळ.
पांडुरंग शास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल लिहावं तितकं कमीच आहे !!
त्यांच्या नंतर आजही असंख्य राबते हात देशभर काम करत आहेत.
त्यांचे विचार हा संपूर्ण भारतवर्षाला जोडणारा एक धागा आहे.
पांडुरंग शास्त्री ह्यांच्या विचारात काय बळ आहे? त्यांचे विचार कोणती किमया करू शकतात ?
विनय नावाच्या एका तरुणाचा हा किस्सा आहे. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा गप्पा मारता मारता म्हणाला,
” दादा, मी बोटीवर पोर्टर म्हणून काम करतो. बोट जगभर फिरते. त्यामुळे अनेक महिन्यांनी घरी येतो.

लेखसंग्रह

प्रॉब्लेम आहे ? मग त्यावर हसा

Category:

 

असा कोणता माणूस नाही ज्याला प्रॉब्लेम नाही, आणि असा कोणताही प्रॉब्लेम नाही जो सुटत नाही….
नाही, नाही…हे कोणत्याही ज्योतिषाचं किंवा काउन्सेलरच वाक्य नाही. कारण प्रॉब्लेम सुटतो की नाही, माहित नाही. पण त्याच्याकडे तटस्थपणे पाहून थोडा वेळ हसू शकता.
एक माणूस सिनेमा थिएटरमध्ये मोठी पगडी घालून बसला होता. मागच्या माणसाला प्रॉब्लेम झाला. कारण सिनेमा दिसत नव्हता. त्याने प्रॉब्लेम कसा सोडवला पहा?
पुढे पगडी घालून बसलेल्या माणसाला सांगितलं. अधून मधून सिनेमात काय चाललं आहे मलाही सांगा!! पगडीवाल्याला त्या बोलण्याचा अर्थ काळला आणि त्याने पगडी काढली.

लेखसंग्रह

भारतातील पहिलं माहेरघर

Category:

 

माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?…स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.

लेखसंग्रह

तुम्हाला काय आहे… मुलगा? की रेसचा घोडा

Category:

 

आपण मुलांना खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी अनेक क्लासेस लावतो. ज्यामुळे मुले रेसमध्ये ढकलली जातात आणि रेसचा घोडा बनतात.
कसं ते सांगत आहेत निरेन आपटे.
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, “Tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?”

लेखसंग्रह

अमिताभचे वडील

Category:

 

प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन रोज सकाळी फिरायला जात असत. त्यांच्या रस्त्यात एक मोठा दगड पडलेला होता. हा दगड अनेकांच्या पायात येत होता. पण तो खूप मोठा आणि जड असल्यामुळे कोणीच हलवू शकत नसे. पण हरिवंशराय ह्यांनी तो स्वतःला जमेल तसा रोज थोडा थोडा हलवला आणि एक दिवस रस्त्याच्या कडेला नेला. वास्तविक त्यांचा मुलगा मेगास्टार होता. त्याला सांगून हा दगड हलवता आला असता. पण स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे हा हरिवंशराय ह्यांचा स्वभाव होता. त्यांच्या ह्याच कृतीचा त्यांच्या मुलावर प्रभाव पडला आणि तोही अथक प्रयत्न करून भारतातील सर्वात मोठा अभिनेता बनला. आपण ज्या अमिताभचा करिष्मा अनेक वर्षे पाहत आहोत, त्याच्या मागे हरिवंशराय ह्यांचीच प्रेरणा आहे. अमिताभ ह्याने अनेक मुलाखती, कार्यक्रमामधून तसं व्यक्तही केलं आहे.
म्हणून अमिताभ आणि हरिवंशराय ह्यांच्यातील नाते आजच्या फादर्स डे निमित्ताने जरूर पाहायला हवे.

लेखसंग्रह

अमिताभ ह्यांनी विचारलं

Category:

 

लोणचं वाला च बोलना हैं क्या ?”
अमिताभ बच्चन ह्यांची एखादी जाहिरात टीव्ही सुरु होते आणि ते शुद्ध मराठीमध्ये बोलत असतात. आपोआप मनात प्रश्न येतो त्यांना मराठी येत असेल काय ?
मराठीच नव्हे तर गुजराती, तामिळ, तेलगू आणि इतर अनेक भारतीय भाषांमध्ये ते बोलताना दिसतात. इतक्या भाषा ते बोलू शकतात का ?

लेखसंग्रह

पकडा पंढरीचा चोर

Category:

 

आषाढी आली. वारकरी पंढरपूरला निघाले. पण हा पंढरीचा चोर फक्त पंढरीत राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. बस त्याला पकडणारी नजर हवी. आजपर्यंत ह्या पंढरीच्या चोराला कोणी, कसे पकडले सांगत आहेत निरेन आपटे.