सुप्रसिद्ध समाजसेविका ताराबाई मोडक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘ वेडेपणा ’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला.