oldsite
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमाजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती.
केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरी पाटील
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेसरी टूर्स ची पहिली सहल राजस्थानला गेली होती. ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च गध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील व झेलम चौबळ या त्यांच्या कन्या होत. २०१३ मध्ये केसरी टूर्स मधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपली कंपनी वीणा वर्ल्ड स्थापन केली. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला ISO 9001-2000 आणि OHSAS18000-2007 ही प्रमाणपत्रे मिळाली होती. ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळवणारी केरारी ही जगातील पहीलीच पर्यटन कंपनी होती.
क्रांतिवीर देशभक्त भार्गव महादेव उर्फ बाबा फाटक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव शिंदे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteराजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.
क्रांतिकारक मंगल पांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. “मर्दहो, उठा !” अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, “आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!”
केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteनागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते.