लेखसंग्रह

प्रा. एम. एम. शर्मा

Category:

 

१९३७ साली राजस्थानातल्या जोधपूर येथे जन्मलेले मनमोहन शर्मा जोधपूरच्या जसवंत महाविद्यालयातून बीएस्सी झाले. नंतर मुंबई विद्यापीठातून बीई व एमटेक या रसायन अभियांत्रिकीतील पदव्या घेतल्या. नंतर केंब्रिज येथून त्यांनी पीएच.डी. केली. त्यानंतर ते मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये अध्यापन करू लागले व पुढे या संस्थेत संचालक झाले.

लेखसंग्रह

गणपतीची व महाराष्ट्रीयांची आवड एकच नाट्य आणि राजकारण

Category:

 

गणेशोत्सव हा मराठी माणसाच्या चित्तसागराला आनंदाची भरती आणणारा महोत्सव आहे. गणेशोत्सवात मराठी माणूस शरीराने आणि मनानेही रंगून जातो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही गल्लीबोळात गणेशोत्सवाच्या १० दिवसांत उत्साहाला नुसते उधाण आलेले असते.

व्यक्ती-परिचय

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

Category:

 

भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र मिळाले. देशाने २६ जानेवारी १९५० साली नवीन संविधानाचा स्वीकार केला आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम करण्याचा बहुमान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना लाभला. ते १९६२ पर्यंत या पदावर होते.

लेखसंग्रह

उद्वाहक (लिफ्ट, एलेव्हेटर)

Category:

 

अलीकडच्या काळात निवासी इमारती, रुग्णालये व इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या इमारती या बहुमजली आहेत. त्यांचे जिने चढून हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याने वृद्धच काय पण तरुण माणसांचीही दमछाक होते.

लेखसंग्रह

डॉ. पॉल रत्नसामी

Category:

 

पॉल रत्नसामी यांचा जन्म चेन्नईला १९४२ साली झाला. चेन्नईच्या विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी. आणि पीएच.डी. केली. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांनी न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात संशोधन केले व पुढे बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रा. फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन केले. औद्योगिक उत्पादन करताना वापरावी लागणारी उत्प्रेरके (Catalyst) हा या दोन्ही ठिकाणच्या संशोधनाचा विषय होता.

कथा

10.25 बदलापूर फास्ट

Category:

 

बीपीटी कॉलनीतील चाळीवजा बिल्डिंग मध्ये लहान खोल्यांमध्ये मागील वर्षापर्यंत गणेशोत्सव साजरा करणारे राघव काका आणि त्यांचा पुतण्या विजय, यावर्षी दोघेच जण भायखळ्याहुन गणपतीची मुर्ती न्यायला आले होते. राघव काकांनी वीस वर्षांपुर्वी घरात दीड दिवसांचा गणपती आणायला सुरुवात केली होती. तेव्हापासून बीपीटी कॉलनीत त्यांच्या घरी त्यांचा मोठा भाऊ आणि लहान भाऊ सह कुटुंब दोन दिवसांसाठी येऊन राहत होते.

लेखसंग्रह

एअरबॅग

Category:

 

कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही त्याचे एक मोठे कारण आहे.

लेखसंग्रह

डॉ. के. वेंकटरामन (१९०१-१९८१)

Category:

 

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे पहिले भारतीय संचालक होते डॉ. के. वेंकटरामन! त्यांचा जन्म चेन्नईचा! तेथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून १९२३ साली ते रसायनशास्त्रात एम.ए. झाले. नंतर मॅन्चेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी आणि डीएससी केले. १९२७ साली ते भारतात परत आले आणि एक वर्ष बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फेलो म्हणून कार्यरत होते. १९२८ ते १९३४ या काळात ते लाहोरच्या ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकवत असत.

लेखसंग्रह

गणेशाची साडेतीन पीठे

Category:

 

वेदकालापूर्वी आणि सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी ॐकार गणेशाने शून्य मंडळात किंवा हवेच्या पोकळीत स्व-आनंदासाठी एक स्थळ निर्माण केले, ते क्षेत्र म्हणजे ‘स्वानंदपूर’ आणि आत्ताच्या काळातील ‘मोरगाव.’ सृष्टीनिर्मितीचे कार्य करून ॐकार या स्थळी येऊन राहिला.

लेखसंग्रह

इथिओपियातील देवराया

Category:

 

भारतातील देवस्थानांभोवती असणाऱ्या देवराया ही जैवविविधतेची केंद्रे आहेत. अनेक सजीवांचे वसतिस्थान असणाऱ्या अशा जागा जगात इतरत्रही काही ठिकाणी आढळतात. इथिओपियातल्या देवराया हे अशा देवरायांचेच एक उदाहरण. इथिओपियात जी थोडीफार वनसंपत्ती टिकून आहे, ती या देवरायांमुळेच. या देवराया टिकून राहाव्यात म्हणून इथिओपियात प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांची ही माहिती…