No Picture
साहित्य - ललित

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे

Category:

 

दरबारात कुत्रे नुसते भुंकायचे नाही तर कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. पण त्यांस काय माहित, अधिकांश घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे. आणि एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयनग्रहात चक्क ‘राणी’ वर भुंकले……

No Picture
साहित्य - ललित

समलैंगिकता एक विकृती

Category:

 

परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला “बिग बैंग” असे म्हणतात. त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव “एका पासून अनेक होण्याची” इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे ‘एका पासून अनेक होण्याची’ परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.

No Picture
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

क्षणिका / रात्र श्रावणी /मृगाचा पाऊस/ कोरडा समुद्र

Category:

 

[एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र प्रेमाचा गोड ओलावा आणणार तरी कुठून?]

No Picture
साहित्य - ललित

जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)

Category:

 

सदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही “डाग चांगले असतात” असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:

No Picture
साहित्य - ललित

समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे

Category:

 

बिजापुरचा सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला. आधी आदर-सत्कार नंतर …

No Picture
साहित्य - ललित

यमुना तीरे एक आठवण / (दिल्लीतली यमुना काल आणि आज)

Category:

 

दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते. गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या. एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार?

No Picture
साहित्य - ललित

काळी लक्ष्मी

Category:

 

काळ्या लक्ष्मीची आराधना करणारे हे राक्षसी उपासक आपल्या घरातील लक्ष्मी चोरतात व बाहेरची ड्रग व आतंकवाद रुपी पीडा घरात आणतात. काळ्या लक्ष्मीच्या बळावर रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्य करून कधी- कधी सत्ता ही प्राप्त करतात.

No Picture
साहित्य - ललित

निळे फुलपाखरू / एका फुलपाखराची गोष्ट / घरात घडलेली सत्य घटना

Category:

 

त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली – झाड व वेली दिसली नाहीत – पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला. एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून तो पुढच्या प्रवासासाठी निघून केला असता. जिवंत राहीला असता तर पुढच्या पिढी साठी अंडी घालण्यास परत इथआला असता. पण ते होण आता शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलले आणि बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन हात धुऊ लागलो. लेडी मेकबेथची आठवण आली. कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का? असा विचार मनात आला.

No Picture
साहित्य - ललित

ती आठवण, ते सूर आणि मी

Category:

 

क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस – सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नव वळण देते. निराश मनात आशेचा संचार करते. असाच एक अनुभव.

No Picture
साहित्य - ललित

विक्रमादित्य आणि न्याय देवता/ ऐकलेली कहाणी

Category:

 

आज आपल्या देशात भ्रष्टाचार माजलेला आहे. राज्यकर्ते पैश्यामागे धावताना दिसत आहे. प्रजेला न्याय मिळत नाही. त्या मुळे देशात अराजकता माजते आहे. प्रजा संभ्रमात आहे की कुणास वोट द्यावे, प्रत्येक झाडावर कावळाच बसलेला आहे. पण आजही न्याय पथावर चालणारे लोक आहेत. न्यायाचा बाजूनी लढनार्यास समर्थन देण ही काळाची गरज आहे. लहानपणी ऐकलेली विक्रमादित्याची कहाणी आठवली. आज आपल्याला विक्रमादित्या सारखा राजा पाहिजे……..