— विवेक पटाईत
दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते. गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या. एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार?
Copyright © 2025 | Marathisrushti