व्यक्ती-परिचय

मनोरमा वागळे

Category:

 

मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नटांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही. आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरुन हसायला लावलंय. पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवतेय, अगदी सर्वच माध्यमांमध्ये.

व्यक्ती-परिचय

मनोहर लेले

Category:

 

इ-पुस्तकात लेले यांनी तुलसीदासांच साहित्य श्राव्य माध्यमातही उबलब्ध करून दिले आहे. या शिवाय तुलसीदासांच्या दोह्यांचे अर्थ वाचकांसाठी सुस्पष्ट करून दिला आहे.

व्यक्ती-परिचय

मदन तळदेवकर

Category:

 

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इंजिनीयरिंगच्या क्षेत्रात संशोधन करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्याची तळमळ अभावानेच दिसते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठीच उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण ठाण्यात खोपट परिसरात राहणारा मदन तळदेवकर त्यास अपवाद ठरावा.

व्यक्ती-परिचय

मनोहर श्याम जोशी

Category:

 

भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

ममता सपकाळ

Category:

 

ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.

व्यक्ती-परिचय

मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

Category:

 

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.

व्यक्ती-परिचय

मयुरेश शिर्के

Category:

 

मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

व्यक्ती-परिचय

मल्हारराव होळकर

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

व्यक्ती-परिचय

मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

Category:

 

’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले.