व्यक्ती-परिचय

दिनकर पाटील

Category:

 

मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.

व्यक्ती-परिचय

दिलीप कुलकर्णी

Category:

 

दिलीप कुलकर्णी हे मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. एक दिग्दर्शक म्हणून ते चिकित्सक वृत्तीचे होतेच, पण त्याहीपेक्षा अजातशत्रू, सौजन्यमय व्यक्ती होते.

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी
व्यक्ती-परिचय

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

Category:

 

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे मराठी कवी व साहित्य समीक्षक आहेत. दभि कुलकर्णी या संक्षिप्त नावाने ते प्रसिद्ध आहेत. पुणे येथे २०१० साली झालेल्या ८३व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते.

व्यक्ती-परिचय

दत्ताराम मारुती मिरासदार

Category:

 

मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला.

व्यक्ती-परिचय

दादासाहेब लिमये

Category:

 

बडबड नको कृती हवी’ ही म्हण तर आपल्या सर्वांना परिचीत आहेच. परंतु ही म्हण दुरदूरच्या आदिवासी पाड्यांच्या नसानसांत भिनवून, व शिक्षणाचे सार्मथ्यशाली वारे खेड्यापाड्यांमधील आदिवासी लोकांपर्यंत पोहचवून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे असामान्य कार्य तपस्वी केशव गोविंद तथा दादासाहेब लिमये यांनी पाली येथे केले.

व्यक्ती-परिचय

दादाजी खोब्रागडे

Category:

 

घरी अठराविश्वे दारिद्य असलेल्या दादाजी खोब्रागडे या कृषी संशोधकाने अवघ्या दीड एकर शेतीत तांदळाची तब्बल नऊ वाणे विकसित केली आहेत. त्यांच्या या संशोधनाकडे राज्य सरकारने पाठ फिरवली असली तरी जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने या कृषी संशोधकाची दखल घेतली आहे. फोर्ब्सने जगभरातील ग्रामीण उद्योजकांची एक यादी प्रसिद्ध केली आहे, त्यात चंदपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या आडवळणाच्या गावात राहणार्‍या दादाजी खोब्रागडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.