अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २३ – शांताबाई नारायणराव सावरकर

Category:

 

शांताबाईंनी सावरकर घरात सगळ्यांचे मृत्यू पाहिले. गांधींवधा नंतर झालेला अतोनात छळ सोसला. त्यात डॉ जखमी झाले आणि त्या आजारपणा नंतर उठलेच नाहीत. ह्या खचल्या नाहीत. थोरल्याबाई, बाबाराव, माई, तात्या सगळयांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. मुलांना एकत्र बांधून ठेवले.

लेखसंग्रह

लता’

Category:

 

खचाखच भरलेल्या लोकल मधे.. घुसमटलेल्या श्वासात व घामेजल्या अंगानी उभे, प्रवास नामक नरकवास सहन करत असतो आम्ही तेंव्हा अनाहुतपणे वाजतो कोणा अगांतुकाचा फोन अन त्या गर्दीला चिरत आमच्यापर्यंत येतो तुझा स्वर “ओ पालनहारे, निर्गुण और न्यारे.. तुमरे बिन हमरा कौनो नाही..” चेह-यावर त्या स्थितीतही एक अस्फुट स्मित येते..
शेजारचा दाढीवालाही ओळख नसताना हसतो..
पुढचा प्रवास सुखकर होतो..

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २२ – कॅप्टन लक्ष्मी सहगल

Category:

 

सिंगापूर मध्ये अनेक भारतीय क्रांतिकारी कार्यरत होते. १९४२ साली ब्रिटिशांनी सिंगापूरवरचा आपला ताबा सोडला, जपान कडे सिंगापूर परत आले. त्यावेळी तिथल्या जखमी सैनिकांना वैद्यकीय उपचार करण्याचे काम डॉ लक्ष्मी ह्यांनी केले.

लेखसंग्रह

डोंगरात भटकणाऱ्या गिर्यारोहकानी उभारले डोंगरातील ज्ञानमंदिर

Category:

 

अवघड मार्ग आणि अनवट वाटांवरुन द-याखो-यात भटकणारऱ्या गिर्यारोहकानी गिर्यारोहणाबरोरच आपली समाजसेवेची आवड जोपासत महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्रीवाडीत इमारती विना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या इमारतीचा आसरा दिला आहे.

लेखसंग्रह

रेल्वे स्टेशनमास्तर

Category:

 

रेल्वे व्यवस्थापनात स्टेशनमास्तर हे एक महत्त्वाचं आणि जबाबदार पद असतं. मुख्य स्टेशनावरून प्रवासीगाड्या सुटतात किंवा तिथे थांबून पुढील प्रवासाला निघतात; या संपूर्ण काळात स्टेशनवर जे काही घडतं त्या सर्व घटनाक्रमांची संपूर्ण जबाबदारी तेथील सर्वेसर्वा-अधिकारपदावर असलेल्या स्टेशनमास्तरची असते.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २१ – डॉ उषा मेहता

Category:

 

१४ ऑगस्ट १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काँग्रेस गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले. त्याची सुरवात उषाजींच्या आवाजाने झाली, ‘हा काँग्रेस रेडिओ आहे ४२.३४ मिटर्स भारतातून’. ह्या वरून गांधीजींचे विचार, इतर मोठ्या नेत्यांचे विचार, देशभक्ती पर गाणे, कविता इत्यादी प्रसारित केले जायचे. इंग्रजांच्या तावडीतुन बचाविण्यासाठी हे आपल्या रेडीओची जागा जवळपास रोज बदलायचे. एवढी काळजी घेऊनसुद्धा इंग्रजांच्या हाती हे प्रकरण लागले. १२ नोव्हेम्बर १९४२ साली उषाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली आणि ४ वर्ष सश्रम कारावास दिला गेला.

लेखसंग्रह

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

Category:

 

‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – २० – बसंती देवी

Category:

 

पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला.