अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 19 – बिना दास

Category:

 

बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले.

लेखसंग्रह

1 – रेल्वेची ‘मंडळी’ आणि विविध व्यवस्था – परिचय

Category:

 

रेल्वेचा इतिहास, रेल्वेचा प्रवास, या प्रवासात भेटलेली वेगवेगळी स्टेशन्स, या गोष्टी रेल्वेप्रेमींच्या आयुष्यातली जागा ‘सुंदर आठवणी’ म्हणून आपसुक व्यापून राहतात. या प्रवासादरम्यान, देशभर, अगदी कानाकोपऱ्यांत पसरलेल्या, रेल्वेच्या महाकाय जाळ्यामागच्या व्यवस्थेविषयीचं कुतूहलही मनात नकळत जागं होतं.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 18 – भीकाजी कामा

Category:

 

२२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीत झालेल्या दुसऱ्या समाजवादी काँग्रेस अधिवेशनात कामा ह्यांनी भाग घेतला. मानवी हक्क, समानता आणि स्वातंत्र्य ह्या मुद्यावर उपस्थित लोकांना त्यांनी भारताकडे पाहायला प्रेरित केले. भारताचा स्वातंत्र्य हा हक्क आहे हे उपस्थितांना जाणवून दिले. ह्याच अधिवेशनात त्यांनी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. आत्ताचा तिरंगा हा मॅडम कामा आणि इतर उपलब्ध डिझाईनचे तिरंग्याचे सुधारित रूप आहे.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 17 – अवंतीकाबाई गोखले

Category:

 

पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 16 – तारा राणी श्रीवास्तव

Category:

 

१२ ऑगस्ट १९४२ भारत-छोडो आंदोलनाचे पडसाद देशभरातून उमटत होते. ताराराणी आणि त्यांचे पती श्री फुलेंदू बाबू ह्यांनी हेच औचित्य साधून एक पद-यात्रा काढायचे ठरवले. सीवान पोलीस चौकीवर तिरंगा फडकणे हा उद्देश ठेऊन. ह्या अश्या पदयात्रांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज सुरू केला. त्यानेही गावातली लोकं मागे सरली नाही, तेव्हा पोलिसांनी ह्या सगळ्या निःशस्त्र लोकांवर गोळ्या झाडायला सुरवात केली. फुलेंदू बाबू आणि ताराराणी आघाडी सांभाळत होते. फुलेंदू बाबूंना गोळी लागली. आपल्याच साडीचा तुकडा जखमेला तात्पुरता बांधून तारा राणींनी आपली यात्रा परत सुरू केली.

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 15 – झाशीची राणी

Category:

 

मे १८५७ ला मेरठ मधून संग्रामला सुरवात झाली. झाशी अजूनतरी शांत होते. राणी लक्ष्मीबाईंनी आपले सैन्य उभे करायला सुरुवात केली. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करून, स्त्री शक्तीला जागृत केले, त्यांना आणि इतर बांधवांना धैर्य दिले. झाशी सदैव स्वतंत्र राहील ह्याचे आश्वासन सुद्धा दिले. जुनमहिन्यात संग्रामच्या झळा झाशीपर्यंत पोचल्या. आधी शेजारी राज्य ओरछा आणि दातीया राज्याकडून आक्रमण आणि मग ब्रिटिश सैन्याचे आक्रमण. शेजारी राज्यांना पराभूत करून राणी इंग्रजांविरुद्ध च्या लढाईसाठी सज्ज झाल्या. त्यावेळी राणीने आपल्या सैन्याला, लोकांना सांगितले, ‘आपण युद्धाला सज्ज आहोत, जर जिंकलो तर विजयाचा आनंदोत्सव साजरा करू आणि जर हरलो तर आपल्याला आत्मिक आनंद नक्कीच मिळेल की आपण शरणागती पत्करली नाही.’

अवर्गिकृत

भारतमातेच्या वीरांगना – 14 – राणी चेन्नमा

Category:

 

राणी चेन्नमा आणि त्यांच्या सैन्याने ह्या हल्ल्याचे जोरदार प्रतिउत्तर दिले. इंग्रजांना नुसतीच हार पत्करावी नाही लागली तर त्यांचे मोठे अधिकारी मारले गेले, त्याचबरोबर दोन इंग्रज अधिकाऱ्यांना युद्धबंदी बनवले गेले. इंग्रज अधिकारी कॅपलीन ह्यांच्याशी तहात हे बंदी सोडले गेले की युद्ध समाप्त होईल आणि कित्तूर स्वतंत्र राहील.