अव्यक्त असलेला उलटा वटवृक्ष
Category:
लेखसंग्रहत्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत
December 22, 2010
Category:
लेखसंग्रहत्यासाठी इस्कॉनचे संस्थापकाचार्य कृष्णकृपामूर्ती श्रीमद् ए. सी. भक्तीवेदांत प्रभुपाद यांची अध्यात्मावरील अनेक ग्रंथ अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत
December 22, 2010
Category:
अवर्गिकृतअलीकडे विविध पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऐन दिवाळीत दूध आणि खव्यातील मोठ्या प्रमाणावरील भेसळ उघड झाल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे भेसळ करणार्यांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी या मागणीने जोर धरला. वास्तविक अशा कारवाईसाठी भेसळयुक्त पदार्थाच्या तपासणीचा अहवाल महत्त्वाचा ठरतो. असे असताना राज्यातील 11 अन्न तपासणी प्रयोगशाळा रिक्त पदे न भरल्याने बंद असल्याचे उघड झाले आहे.
December 21, 2010
Category:
अवर्गिकृतकारकिर्दीबद्दलच्या महत्त्वाकांक्षेमुळे बरेचदा स्त्रिया कौटुंबिक सुखाशी तडजोड करतात. गर्भावस्था आणि बाळंतपण यासाठी आता मोठ्या शहरांमधील उच्चपदस्थ महिलांकडे वेळ राहिलेला नाही. त्यामुळे आजकाल बरीच जोडपी बाळाला जन्म न देण्याचा निर्णय घेतात. नवी जबाबदारी अंगावर घेऊन कारकिर्दीशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. जोडीदाराबरोबर स्वतंत्र आयुष्य जगण्याकडे त्यांचा कल असतो.
December 21, 2010
Category:
लेखसंग्रहरग्बी हा खेळ पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. या खेळात शक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. हा खेळ हळूहळू भारतातही रुजत असून राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमधून गुणी खेळाडू पुढे येत आहेत. अनेक बाबतीत अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य राखणार्या या खेळासाठी शक्ती, कौशल्ये आणि चापल्य यांचा त्रिवेणी संगम आवश्यक असतो. आदित्य पागे या उदयोन्मुख रग्बी खेळाडूकडून समोर आलेली माहिती.
December 21, 2010
Category:
अवर्गिकृतव्यथा वार्धक्याची
नको नको ते लाजिरवाणे जगणे आता आम्हाला
अर्थही नसतो असल्या भेकड दुबळ्या जीवनाला
दुखणे खुपणे चालू असते त्याची कटकट सगळ्यांना
असुनी अडचण सदा वाटते घरच्या सर्वही लोकांना
गरजे पुरते जवळी येतील ठाऊक आहे आम्हाला
प्रेमाचा तिथ शब्दही नसतो वा मायेचा ओलावा
आम्ही भुकेले प्रेमासाठी नातवंडे ती भूक पुरविती
अंधारातील प्रकाश तारे उजळविति जीवन गगनाला
अनिल आपटे
December 21, 2010
Category:
अवर्गिकृतआजकाल प्रत्येक कॉम्पुटर वापरणार्या व्यक्तीला सुरक्षित व अभेद्य पासवर्ड कसा तयार करावा? असा जटील प्रश्न नेहमी पडत असतो. तसं ते काही कठीण काम नाही, पण असा पासवर्ड बनविण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी मात्र अवश्य घेतली पाहिजे.
December 21, 2010
Category:
अवर्गिकृतहे कोठून येतात, त्यांच्यार ही वेळ कोणामुळे आली, त्यांची तस्करी कोण करते, असे सारे प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत असून समाज शिक्षणाअभावी केवळ स्वार्थापायी लहान मुलांची तस्करी करणार्या या लोकांमुळे सामाजिक स्वास्थ्य खराब होत आहे.
December 20, 2010
Category:
लेखसंग्रहमराठी भाषा आमुची मायबोली – म्हणजे मातृभाषा. लहान मुलं जन्मल्यापासून आईजवळच असते. तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषा प्रत्येक प्रांताची निराळी. ती तेथील लोकांची होते आणि ती आवडते. आपली मराठी भाषा संस्कृत भाषेतून आली. तशा भारतातल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासून निर्माण झाल्या. आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी तिच दर बारा कोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतात. तिचे हेल वेगळे होतात. मराठी भाषेतसुद्धा असे वेगळे प्रकार होतात. कोकणातली कोकणी, घाटावरची म्हणजे देशावरची वेगळी, घाटी भाषा वेगळी, वऱ्हाडी भाषा वेगळी मध्यप्रांतांतली, मध्यप्रदेशातही हिंदी मिश्रित आणि गोव्याकडील कोकणी वेगळी असते.
मराठी भाषा लवचिक आहे थोड्या थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे.
खेड्यापाड्यातली रांगडी आणि अशुद्ध, अपभ्रंश असलेली भाषा असते. कशीही असो ति मराठीच म्हणून मराठी माणसाला आवडते.
आपल्या भाषेचा आपल्याला आभिमान असतो. पण अलिकडे आपल्या तरुण मंडळीला इंग्रजी भाषेचे जास्त आकर्षण! त्यात त्यांचा दोष नाही. कारण त्यांचं महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होत असतं. पदव्या मिळवून तरुन मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते. साहजिकच त्या भाषेचे संस्कार घडत असतात. त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्यप्राप्ती भारतातील लोकांपेक्षा जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना तिकडेच रहाणे सुखाचे होते. त्यांचे संसार तिथेच होतात. त्यांच्या मुलांन मराठी येत नाही, ती तिथलीच होतात. सर्वचजण नाही पण काही तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे त्या मुलांची ‘मायबोली’ तिकडची होते. हा विषय जरा वेगळा असला तरी मराठी भाषेवर, रहाणीवर, आचार विचारांव्र खूपच फरक होता. त्यांचं शिक्षणही तिकडेच होते. त्यामुळे मराठीचा त्यांना ग्रंथ, माहितीवार्ता नाही. संस्कारही तिथलेच, असे तिकडे राहिल्यामुळे होते. पण भारतात राहणाऱ्या तरुणांना आपल्य भाषेचा अभिमान नाही आणि त्यांना स्वतःच कौतुकही वाटते तेव्हा तुम्ही शिकून मोठे व्हा. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलत तरी हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या. महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे.आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयावर लेखन झाले आहे. शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणणारे स्वातंत्रसूर्य सावरकरांची आठवण ठेवा. मातृभाषेचा उदोउदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. एक व्हा संघटित व्हा.
December 19, 2010
Category:
अवर्गिकृतBahujananche Shradhasthan- Dr. Babasaheb Ambedkar
December 18, 2010
Category:
अवर्गिकृतमी माझा मराठा – चारोळी संग्रह ( अप्रकाशित )माझ्या वाचक मित्रांसाठी उपलब्ध करुन देत आहे या चारोळ्यातून व्यक्त होणारे विचार माझे व्यक्तिगत आहेत ते कोणावर लाद्ण्याचा माझा प्रयास अजिबातच नाही याची वाचकांनी क्रुपया नोंद घ्यावी !
December 18, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti