लेखसंग्रह

भारतातील दहशतवादी हल्ले आणि सौदी अरेबियातून मदत

Category:

 

सौदी अरेबियातून पकडून आणण्यात आलेल्या झबीउद्दिन अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्या कारवायांबाबत प्रसारमाध्यमं भरभरून माहिती देत आहेत. वृत्तवाहिन्यांवर चर्चेची गुर्‍हाळं चालू आहेत. हा सगळा तपशील तपासयंत्रणाच पुरवत आहेत, हे उघड आहे. असा हा तपशील प्रसिद्ध झाल्यानं, आपण किती मोठं घबाड पकडून आणलं आहे, असा दावा भारताच्या गुप्तहेर संघटना करतात व  तसं ठसविण्यासाठीही असा तपशील प्रसारमाध्यमांना पुरवला जात आहे.

  June 13, 2016


लेखसंग्रह

दारूगोळा सुरक्षा यंत्रणेत लाल फितीमुळे अडथळे

Category:

 

विदर्भातल्या पुलगावमधल्या सेंट्रल ॲम्युनिशन डेपो (केंद्रीय दारूगोळा भांडार, सीएडी) मध्ये ३१ मेला मोठा स्फोट होऊन आगीचा डोंब उसळला. हा भारतातला सगळ्यात मोठा आणि आशियातला दुसऱ्या क्रमांकाचा डेपो होय. बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टॅंक शेल्स, हॅंड ग्रेनेड्‌स, भूसुरुंग, ब्रह्मोस व इतर विद्‌ध्वंसक क्षेपणास्त्रं आणि इतर अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटाच्या निमित्ताने एकूणच दारुगोळा सुरक्षा यंत्रणेबाबत घेतलेला एक आढावा…

  June 7, 2016


लेखसंग्रह

सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या दीनवाण्या आयुष्याचे काय ?

Category:

 

जम्मु काश्मीर राज्यामधील हंडवारा शहरात असलेले लष्कराचे तीन बंकर हटविण्यात आले. हंडवाडा येथील स्थानिक नागरिकांनी हे बंकर हटविण्यात यावेत, अशी मागणी केली होती. मात्र या बंकरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याची भूमिका लष्करातर्फे घेण्यात आली होती. स्थानिक नागरिकांनी बंकरच्या दिशेने जोरदार दगडफेकही केली होती.

  May 18, 2016


लेखसंग्रह

श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व

Category:

 

श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना त्यांच्या लढायांचे सुत्र अभ्यासण्यासारखे आहे. बाजीराव हे अतिशय युद्धकुशल सेनापती होते. युद्धातील त्यांचे डावपेच चाकोरीबाह्य होते.

  May 9, 2016


‘मेक इन इंडिया’ आणि भारतीय सेनादलाचे आधुनिकीकरण
लेखसंग्रह

‘मेक इन इंडिया’ आणि भारतीय सेनादलाचे आधुनिकीकरण

Category:

 

१४ एप्रिलला मणिपूरच्या तामेंगलोंग जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 21 पॅराचे मेजर अमित देसवाल शहीद झाले आहेत. झेलियांगग्राँग युनायटेड फ्रंटच्या (झेडयूएफ) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेजर अमित देसवाल यांना वीरमरण आलं.

  April 20, 2016


लेखसंग्रह

पाकव्याप्त काश्मीरात चिनी लष्कराच्या हालचाली

Category:

 

गेल्या वर्षी तंगधार परिसरात चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या होत्या. आता पाकव्याप्त काश्मीरच्या नौगाम क्षेत्रात त्या वाढल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमध्ये विकासासाठी प्रकल्प उभे करण्याची योजना आखली आहे व हे काम चीनला दिले आहे. या प्रकल्पांच्या कामासाठी व संरक्षणासाठीही सुमारे 30-50,000 हजार चिनी सैन्य या प्रदेशात आहे. या प्रदेशातील रस्त्यांची, धरणांची व इतर बांधकामे म्हणजे भारतासाठी सामरिक दृष्टीने धोकेदायक आहे.

  April 20, 2016


लेखसंग्रह

बजेटमध्ये संरक्षण क्षेत्राला काय मिळाले ?

Category:

 

आज भारतीय संरक्षणक्षेत्रापुढे असणारी आव्हाने, शेजारील राष्ट्रांचा धोका, त्यांची युद्धसज्जता, संरक्षणक्षेत्रावर या देशांनी वाढवत नेलेला खर्च, त्यातुलनेने आपल्याकडे असणारी शस्रास्रांची उणीव, मागे पडत गेलेले आधुनिकीकरण, शस्रास्र आयातीवर होणारा प्रचंड खर्च, त्यामुळे वाढत जाणारी आर्थिक तूट ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची गरज होती. मात्र प्रत्यक्षात संरक्षणक्षेत्राच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही.

  March 22, 2016


लेखसंग्रह

भारत-नेपाळ संबंध सुधारण्याच्या मार्गावर

Category:

 

पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या या भेटीत भारत आणि नेपाळ दरम्यान सात करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. भारताने पूर्वी आश्‍वासन दिल्यानुसार, १४ जिल्ह्यांत उद्ध्वस्त झालेल्या ५० हजार घरांच्या पुनर्निर्माणासाठी शंभर दशलक्ष डॉलर्स; आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी ५० दशलक्ष डॉलर्स देण्यात येणार आहेत. भूकंपानंतर भारताने तराई भागात आधीच ८७ किलोमीटरचे नवे रस्ते बांधले होते, आता ५१८ कि. मी. लांब रस्त्यांचे निर्माण भारत करून देणार आहे; तसेच नेपाळला जोडणारे आणखी दोन महामार्ग निर्माण करण्यात येणार आहेत.

  March 8, 2016


लेखसंग्रह

भारतीय आंतरराष्ट्रीय नौसंचलन २०१६ : ‘महासागरातून एकात्मता’

Category:

 

भारतीय सैन्यदलाचे सरसेनाध्यक्ष या नात्याने राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ नौसंचलन आयोजित करण्याचा पायंडा स्वातंत्र्यानंतर पडला. 6 ते 8 फेब्रुवारी 2016 दरम्यान विशाखापट्टणमच्या समुद्रतटावर अशा दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नौसेना संचलनाचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या नौसंचलनांपेक्षा हे अधिक भव्य आणि विराट होते.

  February 23, 2016


लेखसंग्रह

बांगलादेशी घुसखोरी – भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका

Category:

 

१९४४ सालचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेलनी आपल्या ‘व्हॉइसराईज जरनल’ या पुस्तकामध्ये लिहिले होते की “आसामचे मुख्यमंत्री मोहम्मद सदाउल्ला खान हे मोठय़ा प्रमाणात बंगालींची घुसखोरी आसाममध्ये करण्याचा आणि पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न करत होते”. वायव्य भारतात मुस्लिमबहुसंख्य राज्य असावे ही कल्पना मुस्लिम लीगचे अध्यक्ष महम्मद इक्बाल ह्यांनी १९३० मध्ये मांडली.

  January 18, 2016