लेखसंग्रह

सागरी सुरक्षा आणि कोळी बांधव

Category:

 

भारताच्या समुद्रकिनार्‍यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्‍या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.

लेखसंग्रह

मिशन मैत्री : नियोजित, कार्यक्षम, शिस्तबद्ध ऑपरेशन

Category:

 

नेपाळची राजधानी काठमांडू येथे झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली आहे. सुमारे १० हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, हजारो इमारती, रस्ते, पूल, वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजिक सुविधा भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आहेत.

लेखसंग्रह

पॅरिस हल्ला आणि भारत

Category:

 

फ्रान्स हा एक आधुनिक विचार सरणीचा, व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणारा एक अतिशय सहिष्णूत देश मानला जातो. फ्रान्सची अती सहिष्णूताच या हल्ल्यांकरिता जबाबदार होती का? फ्रान्समध्ये धर्माला महत्त्व दिले जात नाही. तिथे ख्रिश्चानिटी हा सर्वांत मोठा धर्म असला तरीही तिथली चर्चेस सध्या ओसाड पडत चालली आहेत.

लेखसंग्रह

बांगलादेशात दहशतवादी हल्ला व त्याचा भारतावर परिणाम

Category:

 

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.

लेखसंग्रह

वांशिक संघर्षात होरपळणारा मणिपूर

Category:

 

मणिपूरमध्ये संयुक्त नागा परिषदेकडून ५२ दिवसांपासून आर्थिक नाकेबंदी सुरू असून, २३/१२/२०१६ ला कामजोंग जिल्ह्यातील  तीन सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली.मणिपूरमधील आर्थिक नाकाबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यसभा सदस्य आणि पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या बॉक्सर मेरी कोम यांनी केली आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या नाकाबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

लेखसंग्रह

सागरी सुरक्षेत गुणात्मक सुधारणांची गरज

Category:

 

१७ मे २०१५ला समुद्रात नौदलाच्या बोटीवरून खोल समुद्रामध्ये मच्छिमारांच्या बोटीवरील गोळीबारात सुशांत लुजी (२४) हा खलाशी जखमी झाला .त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘खरिस्ताएल’ या बोटीवरील मच्छिमार बेकायदेशिररित्या समुद्रात टाकलेली जाळी ओढण्याचे काम करीत होते.ओएनजीसी ओइल प्लॅट फॉर्म जवळ रात्रीच्या वेळेस प्रखर लाइट असल्यामुळे जास्त मासे मिळतात.सुरक्षा रक्षकांनी मच्छिमारांना हटकले. नंतर हवेत गोळीबार करण्यात आला.

लेखसंग्रह

सैनिकांना विसरू नका…

Category:

 

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या लष्कर-ए-तोयबा या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या सुमारे सात ते आठ दहशतवाद्यांचा मार्ग रोखून लष्करी जवानांनी त्यांना शरण येण्याचे आदेश दिल्यानंतर झडलेल्या भीषण चकमकीत, कर्नल संतोष महाडिक यांना वीरमरण आले. अन्य चार जवान जखमी झाले आहेत. ते मूळचे साताऱ्याचे होते. जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात १७/११/२०१५ला दहशतवाद्यांसोबत त्यांची चकमक झाली.

लेखसंग्रह

मणिपूर – हिंसाचाराने सर्वात ग्रस्त ईशान्येकडील राज्य

Category:

 

अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निव्रुत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकुल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

लेखसंग्रह

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौरा: भारत बांगलादेश संबंध नवीन वळणावर

Category:

 

मोदी सरकारने परराष्ट्र धोरणावर भर देऊन जागतिक संबंध सलोख्याचे व्हावेत, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. मोदींच्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौर्यामुळे जे वातावरण बांगलादेशमध्ये पाहावयास मिळाले, ते दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणारेच आहे.

लेखसंग्रह

भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना

Category:

 

सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्‍या देशातून येणार्‍या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू.