जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जर्मन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट लेना जोहाना गर्के यांचा जन्म दि. २९ फेब्रुवारी १९८८ रोजी झाला.
लेना जोहाना गर्के एक जर्मन फॅशन मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट आहे. तिने जर्मनीच्या नेक्स्ट टॉपमॉडेलचा पहिला सीझन जिंकला आणि ऑस्ट्रियाच्या नेक्स्ट टॉपमॉडेलची ती होस्ट होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
पथेर पांचाली,अपराजितो,अपूर संसार,(‘अपू चित्रपटत्रयी’), अभिजन, चारुलता, शतरंज के खिलाडी आणि असे अनेक दर्जेदार चित्रपट देणारे सत्यजित रे. त्यांचा जन्म २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे झाला. सत्यजित रे यांना प्रेमाने "माणिकदा‘ असे ही म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक "माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते. सत्यजित रे यांनी कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, कलेच्या ओढीमुळे १९४० साली ते रवींद्रनाथ टागोरांच्या प्रेरणेने शांतिनिकेतन मध्ये दाखल झाले. नंदलाल बोस यांच्यासारख्या चित्रकार-कलातज्ञाचे तेथे मार्गदर्शन लाभल्यामुळे रे यांची अंगभूत कलासक्ती आणि सौंदर्यदृष्टी वृद्धिंगत होत गेली. तेथून बाहेर पडल्यावर १९४३च्या सुरुवातीला ‘डी. जे. केमर अँड कंपनी’ या ब्रिटिश जाहिरातसंस्थेत त्यांची वाणिज्य कलाकार म्हणून नेमणूक झाली. पुस्तकांची मुखपृष्ठे अत्यंत कलात्मक रीतीने सजविण्यात त्यांचा हातखंडा होता. नोकरीत असतानाच त्यांची चित्रपटाची रुची आणि व्यासंग वाढत गेला. रे त्यावेळी अनेक नियतकालिकांतून चित्रपटविषयक लेख लिहीत असत. १९४७ मध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ सुरू केली. १९५० मध्ये त्यांना कंपनीतर्फे उच्च शिक्षणाकरिता इंग्लंकडला पाठविण्यात आले. तेथील सहा महिन्यांच्या वास्तव्यात त्यांनी शेकडो उत्तमोत्तम चित्रपट पाहिले. मात्र त्यांना स्वतःचा चित्रपट काढण्याची प्रेरणा मिळाली, ती मुख्यत्वे डी सिका या दिग्दर्शकाच्या द बाय्सिकल थीफ या चित्रपटामुळे. १९५० मध्ये भारतात परतल्यावर त्यावेळी येथे वास्तव्य असलेल्या फ्रेंच दिग्दर्शक झां रन्वार यांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभले. तत्पूर्वी बिभूतिभूषण बंदोपाध्याय या सुप्रसिद्ध लेखकाच्या पथेर पांचाली या कथेने त्यांच्या मनात घर केले होतेच. त्याच कथेवर चित्रपट काढावा असे त्यांना इतक्या तीव्रतेने वाटू लागले, की बोटीतून हिंदुस्थानात परत येत असतानाच त्यांनी त्यावर चित्रपटकथा लिहायला सुरुवात केली होती. नोकरी सांभाळून फावल्या वेळात चित्रपट तयार करायचा असल्याने चित्रणकाळ अगोदरच लांबत गेला होता आणि पैशाचे सर्व प्रवाह आटले होते.
योगायोगाने पश्चिम बंगालचे तेव्हाचे मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांनी चित्रपटाची कलात्मक मांडणी पाहून त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी बंगाल सरकार आपल्या अंगावर घेईल, असे घोषित केले. त्यामुळेच ३-४ वर्षे रखडलेला चित्रपट १९५५ साली एकदाचा पुरा झाला. त्याच वर्षी न्यूयॉर्कची ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ ही प्रसिद्ध संस्था भारतीय कलेचे प्रदर्शन भरविणार होती. संस्थेच्या रे यांना परिचित असलेल्या एका प्रतिनिधीने चित्रपटाचा काही भाग तत्पूर्वी पहिलाही होता. अचानक न्यूयॉर्कहून चित्रपट दाखविण्याबद्दल मागणी आली. अशी अमोल संधी दवडू नये म्हणून रात्रंदिवस मेहनत करून चित्रपटाचे सर्व संस्कार पुरे करण्यात आले आणि पथेर पांचालीचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्कमध्ये झाले. त्यानंतर सु. दोन महिन्यांनी चित्रपट भारतात, म्हणजे कलकत्त्यात दाखविण्यात आला. पथेर पांचालीच्या न्यूयॉर्कच्या प्रदर्शनामुळे अनेक दूरगामी फायदे झाले. तज्ञांना तो चित्रपट इतका आवडला, की तेथील एक प्रसिद्ध वितरक एडवर्ड हॅरिसन यांनी १९५६ च्या कॅन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखविण्याची व्यवस्था केली. पथेर पांचाली मधील वास्तवता व कलात्मकता पाहून तेथील परीक्षक भारावून गेले आणि ‘मानवतेचा अत्युत्कृष्ट आलेख’ अशी त्यांनी चित्रपटाची एकमुखी शिफारस केली. कॅनखेरीज अनेक देशांत पथेर पांचालीला पारितोषिके मिळाली आणि सत्यजित रे यांना या पहिल्याच चित्रपटाने दिगंत कीर्ती मिळवून दिली. पथेर पांचाली या कथामालिकेत पुढे त्यांनी अपराजितो (१९५६) व अपूर संसार (१९५९) हे आणखी दोन सलग चित्रपट निर्माण केले. ही ‘अपू चित्रपटत्रयी’ विशेष मान्यता पावली. त्यांची पटकथा पुस्तकरूपात उपलब्ध आहे (द अपू ट्रिलॉजी, इं. भा. शंपा बॅनर्जी, १९८५). दरम्यान रे यांनी परश पथर (१९५७) आणि जलसाघर (१९५९) हे दोन चित्रपट तयार केले. त्यांचा देवी हा चित्रपट (१९६०) बंगालच्या सरंजामदारी परंपरेच्या पार्श्वभूमीवर होता. या पहिल्या सहा चित्रपटांना पं. रवि शंकर, विलायतखाँ, अली अकबर खाँ असे नामवंत संगीत दिग्दर्शक लाभले होते. नंतरच्या सर्व चित्रपटांना मात्र स्वतःच उत्तम जाणकार असलेल्या सत्यजित रे यांनी संगीत दिले आहे. १९५५ ते १९८५ या तीन दशकांत रे यांनी पंचवीस चित्रपट व काही अनुबोधपट निर्माण केले. रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक अनुबोधपट त्यांनी १९६१ मध्ये तयार केला.
शिवाय टागोरांच्या कथेवरील तीन कन्या हा चित्रपटही त्याच वर्षी निर्माण केला. त्यानंतर कांचनजंगा व अभिजान (१९६२), महानगर (१९६३), टागोरांच्या कथेवरील चारुलता (१९६४), कापुरुष ओ महापुरुष (१९६५) आणि नायक (१९६६) इ. उत्तमोत्तम चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. चिडियाखाना (१९६७) व गोपी ग्याने बाघा ब्याने (१९६८) हे त्यांनी खास मुलांसाठी तयार केलेले चित्रपट होत. अरण्येर दिन रात्री व प्रतिद्वंदी (१९७०), सीमाबद्ध (१९७१) आणि दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील, १९४३ च्या मानवनिर्मित दुष्काळाचे चित्रण करणारा अशनी संकेत (१९७३) हे त्यांचे नंतरचे चित्रपट. सोनार केल्ला हा आणखी एक बाल-चित्रपट त्यांनी १९७४ साली काढला. १९७५ ते १९८५ या दशकातील रे यांचे चित्रपट म्हणजे जनअरण्य (१९७५), शतरंज के खिलाडी (१९७७), स्वतःच लिहिलेल्या गुप्तहेर कथेवर आधारित जय बाबा फेलुनाथ (१९७८), हीरक राजर देशे (१९८०) आणि अनेक वर्षे मनात घोळत असलेल्या टागोर कथेवरील घरे बैरे (१९८४). मा.सत्यजित रे हे चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत होत. साहित्य, चित्रकला, संगीत, रेखन, छायाचित्रण अशा विविध कलाक्षेत्रांत त्यांनी विपुल निर्मिती केली. चित्रपटाप्रमाणेच साहित्याचीही उत्कृष्ट जाण असल्याने संदेश या नियतकालिकाचे पुनरुज्जीकवन करून त्यांनी आपले आजोबा आणि वडील यांचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला आहे. तसेच त्यांनी स्वतःही विपुल कथावाङ्मय निर्माण केले आहे. त्यांचे अवर फिल्म्स देअर फिल्म्स (१९७६) हे पुस्तकही चित्रपटसमीक्षेत मोलाची भर घालणारे आहे. चित्रपटक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर या विविध कला-संस्कारांचे संमिश्र प्रतिबिंब त्यांच्या चित्रणशैलीवर पडणे स्वाभाविक होते.
पडद्यावरील आकृतिबंधाची रचना, प्रमाणबद्धता, दृश्यप्रकार, चित्रणकोन, अवकाशीय खोली, रंगसंगती, त्याचबरोबर बाह्य प्रतिमा व संगीत, कॅमेऱ्याची आशयानुरूप हालचाल, त्याद्वारे साधली जाणारी पोषक लय व तीच लय दृढ करणारे संकलन, नैसर्गिक ध्वनींचा केलेला मार्मिक उपयोग असे घटक रेंच्या चित्रपटात क्षणोक्षणी दृग्गोचर होतात. त्यासाठी त्यांचे चित्रपट एकदा पाहून पूर्णपणे आस्वादले जाऊ शकत नाहीत. कारण चित्रपट वेगाने पुढेपुढे सरकतो. प्रथम पहात असताना त्यांच्या इतर बारकाव्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते. विशेषतः पथेर पांचाली या त्यांच्या पहिल्या कलाकृतीत साधी साधी दृश्ये केवळ रचनात्मकतेमुळे दृष्टीला सुखावणारी वाटतात. रे यांचे मोठेपण केवळ दर्जेदार कथावस्तू पडद्यावर पेश करण्यात नसून, ते भारतीय कथाशय चित्रपट-माध्यमाच्या सर्व घटकांच्या योग्य, कलात्मक संयोगातून प्रेक्षकाप्रत पोचविण्याच्या त्यांच्या प्रभावी शैलीतून सिद्ध झाले आहे. रे यांनी १९५९ पासून आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवाचे ज्यूरी म्हणून अनेक देशांत काम केले होते. त्यांना अनेक मानसन्मान लाभले होते, रामॉन मागसायसाय पारितोषिक, ‘ब्रिटिश फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज्’तर्फे गेल्या अर्धशतकातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून सन्मान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट मा.सत्यजित रे यांना मिळाला होता. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सत्यजित रे यांचा गौरव केला होता. फ्रान्स राष्ट्रातर्फे ‘लीजन ऑफ ऑनर’ हा सर्वोच्च बहुमानाचा किताब रे यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मीत्तरां यांच्या हस्ते कलकत्ता येथे देण्यात आला. अनेक देशांतील चित्रपटविषयक पारितोषिके आणि मानसन्मान सातत्याने तीस वर्षे मिळविणारा सत्यजित रे यांच्यासारखा भारतीय कलावंत तसा दुर्मिळच म्हणावा लागेल. आगंतुक हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.या अवलियाच्या कामाचा गौरव १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कार पुरस्कार देऊन करण्यात आला. सत्यजीत रे हे ऑस्कार मिळवणारे एकमेव भारतीय दिग्दर्शक होते. सत्यजित रे यांचे यांचे २३ एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
२००० साली प्रदर्शित झालेल्या रिफ्यूजी या सिनेमातून करिना कपूरने आपल्या सिने करिअरची सुरुवात केली. करिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅमिली असलेल्या कपूर परिवाराशी संबंधित आहे. कपूर परिवाराचे भारतीय सिनेमाशी ८५ वर्षापासूनचे जुने नाते आहे.
दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले.‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला.
‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. त्यांना ठाऊक नाही. खांब बघितल्यानंतर एक तंगडी वर करून घाण करणाऱ्या कुत्र्यांविषयी कविवर्य सुरेश भट म्हणतात, ‘जुना कुत्रा असो वा नवा कुत्रा, शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे.’ मला नेहमीच किंव वाटते. कारण मी रात्री अपरात्री फिरत असतो. पण असा प्रसंग माझ्यावर कधी गुदरला नाही. या कुत्र्यांकडे आपण नेहमी भूतदयेच्या दृष्टीकोनातून पाहणे हा आपला मानवी धर्म आहे. आपण या भटक्या कुत्र्याविषयी जाणून आहात. उष्ट्या खरकट्यां अन्नाच्या ढिगात स्वत:साठी अन्न शोधीत असतात. खाण्यालायक असेल ते खातात व न खाण्यासारखे देखील खातात. पण हा उद्योग करीत असताना त्या ढिगाऱ्यातून अन्य गोष्टी बाहेर फेकल्या जातात.अस्ताव्यस्त कचरा होतो. घाण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. एकट्या माणसावर धावून जाणारी कुत्री, गाड्याच्या मागे भुंकत पळणारी कुत्री, काही कुटुंब काबिल्यासह फिरणारी, तर टोळीने फिरणारी कुत्री.... यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा कोठे तरी बंदोबस्त व्हावा या दृष्टीने आज तरी प्रयत्नांची गरज आहे. एकूणच श्वान प्रेम आणि त्यांच्याविषयीचा कळवळा या गोष्टी कितीही खऱ्या असल्यातरी आपल्याला त्यांच्या दहशतीपासून दूर राहणे किंवा त्यांच्यावर काही उपाय करण्याची वेळ आली आहे.
वाघ आणि मांजर यात ज्याप्रमाणे साम्य आढळते त्याप्रमाणे लांडगे आणि कुत्रा यामध्ये साम्य आढळत आले आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. आपल्या धन्याची, घराची शेताची राखण आदि इमानेइतबारे सेवा करीत असतो. वेळेला स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचे प्राण वाचवितो. त्यामुळे काही मंडळीना भन्नाट प्रेम असते. ते नियंत्रणात असतात. स्वच्छ ठेवले जातात. वेळोवेळी डॉक्टर तपासतात. कुणाला घेतलेला चावा, गुरगुरणे मालकाला मात्र आपल्या बाब्या चिडला असं वाटत असतं. तर त्याने दुसऱ्याच्या जागेत जाऊन केलेली घाण आणि त्यातून उद्भवलेला तंटा... मालकाने म्हणावे ‘ह्यांना मुक्या जनावरांविषयी प्रेमच नाही.’ गमतीची एक गोष्ट आपणापुढे व्यक्त करू इच्छितो की, एका पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सिनेमात यापुढे ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ ‘कुत्ते की मौत मार दुंगा’ कुत्ते की औलाद’ अशी कुत्र्याची बदनारे संवाद उच्चारण्यास कायद्याने मनाई करावी आणि पालन न करणारावर ATROCITY अंतर्गत कारवाई करावी. ते पुढे असेही लिहितात ‘ कुत्ता मेरा साथी’ असे कुत्र्याचे महती सांगणारे चित्रपट काढेल त्याला ५०% अनुदान द्यावे. जसे वर्षातून विविध दिवस साजरे केले जातात त्याप्रमाणे भटका कुत्रा दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा. हे वाचून आम्ही धन्य झालो.
जानेवारी २०१४ मध्ये ह्युमन सोसायटी इंटरनँशनल या स्वयंसेवी संस्थेने ‘हाय-टेक’ साधनाचा वापर करीत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यात असे आढळले की, मुंबईत दर १३० माणसामागे एक भटका कुत्रा आहे. मुंबई एकूण ९५१७२ भटकी कुत्री वावरत आहेत त्यापैकी ६६ हजार ही रस्त्यावर आहेत तर २९ हजार गल्लीबोळात बस्तान ठोकून आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २००७ -०८ साली ४९ हजार भटकी कुत्री होती. आज दुप्पट झाली आहेत. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करूनही दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि त्याबरोबर त्यांचा वाढलेला उपद्रव चिंता करण्यासारखा आहे. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री जयराज फाटक यांनी सिंगापूर धर्तीवर भटके कुत्रे दिसताक्षणी ठार करा , असा आग्रह धरला होता. पण विधी खात्याने तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचे आव्हान पेलणे कठीण जाईल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे हा विषय अर्ध्यातच थांबला. घरी येणाऱ्या दैनिकात दररोज एकतरी भटक्या कुत्र्याची बातमी असते. मध्यंतरी एका खाजगी वाहनचालकाने गाडीखाली कुत्र्याला चिरडले म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. वर्तमानपत्रात कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही तर माणूस कुत्र्याला चावला, ही मजेशीर बातमी वूत्तपत्र उचलून धरतात. कारण तसे प्रशिक्षण दिलेले असते. गमतीची गोष्ट सांगायची झाली तर दहिसर कांदरपाडा येथून २४० क्रमांकाची बस लिंक रोडच्या दिशेने निघाली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहनचालक अर्जुन खरात याने बसचा वेग वाढविला होता. अचानक एक भटका कुत्रा धावत बसखाली आला. ब्रेक करकचून दाबला गेला. त्यामुळे प्रवाशी हादऱ्याने दचकले, काही उभे राहिले. काही उत्साही मंडळी खाली उतरली. तो भटका कुत्र्याची अखेरची धडपड सुरु होती. वाहनचालक नम्रपणे गाडीत बसा म्हणून विनवीत होता. पण प्रवाश्यांपैकी एकाने पावा संघटनेच्या कार्यकर्त्याला फोन लावला. अल्पावधीत संघटनेचा कार्यकर्ता हजर झाला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिचारा अर्जुन खरात यांना निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक झाली. पण ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात आली नाही की यावर विशेष विचारमंथन झाले नाही. इतकी दहशत भटक्या कुत्र्यांची पसरलेली आहे. हाड म्हणायला देखील नागरिक घाबरू लागले आहेत. दररोज श्वानदंशामुळे माणसेही मरत असतात. दर मिनिटाला एक अपघात होतो तर दर तीन मिनिटांनी एकजण मृत्युमुखी पडत असतो. रेल्वेच्या रुळावर दररोज दहाबारा जणांना मृत्यू येतो. त्याबद्दल कुणी फारसे दु:ख व्यक्त करीत नाही. एखाद्या माणसाने भटक्या कुत्र्यावर केलेला जीवघेणा हल्ला याबाबतीत आपण विचारमंथन का घडवून आणायचे. अंगावर धावून आलेल्या, चावा घेतलेल्या कुत्र्याला चोप देण्याचा स्व:सरक्षणात्मक अधिकार मानवाला असायला हवेत, याविषयावर चर्चा घडविली पाहिजे.
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा तरी कसा....! यांच्या दहशतीला लगाम घालणार कोण...? उपद्रवी कुत्र्यांपासून संरक्षण देणार तरी कोण....? भारतीय लोकशाहीत हे तरी आजमितीला कठीण होऊन बसले आहे. प्राणीमित्र संघटना याला कडाडून विरोध करतील. विचार करा भविष्यात या भटक्या कुत्र्याची दहशत वाढण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. श्वानप्रेमी माझ्या लेखाविषयी गरळ ओकतील पण मी भटक्या आणि उपद्रवी कुत्र्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इंजिनीयरिंगच्या क्षेत्रात संशोधन करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्याची तळमळ अभावानेच दिसते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठीच उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण ठाण्यात खोपट परिसरात राहणारा मदन तळदेवकर त्यास अपवाद ठरावा.
ठाण्यातील पत्रकार या नात्याने श्रीया शिंदे यांनी एक नविन उपक्रम सुरु करुन ठाण्यातील माता आणि बालकांचे छायाचित्रण केले व ह्या छायाचित्रणाला नवीन दिशा केली आहे.
गोगटे कुटुंब मूळचे बेळगावचे. रावसाहेब गोगटे यांचे वडील त्या काळातील एल.एम.अँड एस. डॉक्टर होते. गंमत म्हणजे बुद्धिवान असणाऱ्या रावसाहेबांच्या वडिलांनी आपली डॉक्टरकी सोडून एक पिठाची गिरणी सुरू केली. हे फारच थोड्या लोकांना माहीत असेल. आजही ती गिरणी छोट्या स्वरूपात चालू आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti