जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.
त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्या आणि शंभरावर कथा लिहिल्या.
चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची चाहूल, जिंदगी, तृष्णा ही प्रकाशित कादंबर्यांची काही नावे.
Madhav Rajaram Kanitkar
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते.
आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.
दक्षिणेतील देव' अशी ओळख असलेले रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे झाला. रजनीकांत यांचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटूंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव आणि आई जीजाबाई गायकवाड आहे. गायकवाड कुंटुंबीयांच्या चार अपत्यांपैकी सर्वात लहान रजनीकांत. रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले.
सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, 'अपूर्व रागंगल' या तामिळ सिनेमाद्वारे रजनीकांत यांनी आपल्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा केला होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी रजनीकांत बंगळूरमध्ये एस.टी. कंडक्टर म्हणून काम करत होते.
रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.
रजनीकांत अभिनयाबरोबरच आपल्या डॅशिंग स्टाईल आणि स्टंट्साठी ओळखले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण रजनीकांत यांचे चाहते आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या या सुपरस्टारने 'अंधा कानून' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पण साऊथ इंडस्ट्रीप्रमाणे हिंदी सिनेमात रजनी यांचा पाहिजे तसा करिष्मा चाललाच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यानी आपले लक्ष्य दाक्षिणात्य सिनेमांवर केंद्रीत केले. तीन वर्षांपूर्वी आलेल्या 'शिवाजी, द बॉस' आणि 'रोबोट' या दोन्ही सिनेमांतून हिंदी चाहत्यांनीही रजनीकांतला डोक्यावर घेतले. आणि ते केवळ साऊथचेच नाही तर संपूर्ण भारताचे सुपरस्टार असल्याचे शिक्कामोर्तब झाले.
२००७ साली रिलीज झालेल्या 'शिवाजी' या सिनेमासाठी रजनी यांना तब्बल २६ कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले होते. आशियात जॅकी चॅननंतर एवढे मोठे मानधन मिळवणारे रजनीकांत एकमेव आहेत. खास गोष्ट म्हणजे हा सिनेमा इंग्लड आणि साऊथ आफ्रिकेत बॉक्स ऑफिसवर रिलीज होणाऱ्या टॉप १० सिनेमांपैकी एक होता.
रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’ आहे. ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४० % एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात शिवाजी या चित्रपटासाठी त्यांनी रक्कम घेतली होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले. आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये. आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत. एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.
तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. रजनीकांत यांना आजवर चार वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. लता रंगाचारी यांच्या बरोबर रजनीकांत यांचा विवाह झाला आहे. लता रंगाचारी या तामिळ असून चेन्नईत त्यांचा जन्म झाला. लता यांनी चेन्नईतून इंग्रजी साहित्यात मास्टर डिग्री प्राप्त केली आहे. चेन्नईतील वुमन कॉलेजमध्ये शिकत असताना कॉलेज मॅगझिनसाठी लता यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. हीच रजनीकांत आणि लता यांची पहिली भेट होती. त्यानंतर १९८१ मध्ये तिरुपती येथे त्यांनी लग्न केले.
लता ८० च्या दशकामध्ये गायिका म्हणून हिंदी सिनेमांशी जोडलेल्या होत्या. त्या गायिकेसोबतच निर्मात्यासुद्धा आहे. याशिवाय त्या 'द आश्रम' या शाळेच्या संचालिका आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सौंदर्या आणि ऐश्वर्या ही त्यांची नावे आहेत. ऐश्वर्या हिचे लग्न दाक्षिणात्य अभिनेता धनूषसोबत झाले आहे. तर सौंदर्याचे लग्न व्यावसायिक असलेल्या अश्विन रामकुमारसोबत झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती.
सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.
१९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्म १५ एप्रिल १८९३ रोजी झाला.
इतिहास संशोधक आणि चरित्रकार हाच नरहर रघुनाथ फाटक यांचा महाराष्ट्राला परिचय. न. र. फाटकांचा कोकणातील कमोद या गावाचे फाटकांचे घराणे. तेथून त्यांचे पूर्वज पुणे जिल्ह्यातील भोर संस्थानातील जांभळी या गावी आले. भोर संस्थानात त्यांचे आजोबा कारभारी होते. तर सरकारी नोकरीमुळे वडिलांचे वास्तव्य उत्तर भारतात होते. त्यामुळे न. र. फाटकांचे शिक्षण उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाले.
१९१५ मध्ये ते बी. ए. झाले. त्यावेळेस त्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या आणि पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. त्यांची वाङ्मयीन कारकीर्द मुंबईच्या ‘इंदूप्रकाश या दैनिकात वृत्तपत्र संपादन करण्यापासून झाली. नंतर नवाकाळ मध्येही त्यांनी काम केले. महिला विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्ययन केले आणि त्यानंतर रुईया महाविद्यालयात ते शिकवू लागले.
प्रचलित विचार प्रवाहाविरूद्ध मत मांडून वाद निर्माण करणे हे त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणाचे वैशिष्ट्य ‘अंतर्भेदी’ या टोपणनावाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली. फाटकांनी चरित्रपर लेखनाला सुरुवात केली ती ‘न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे’ या ग्रंथापासून. त्यानंतर ‘अर्वाचीन महाराष्ट्रातील सहा थोर पुरुष’, ‘ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी’, ‘श्री एकनाथ ः वाङ्मय आणि कार्य’ ही संतचरित्रे तर लोकमान्य, आदर्श भारत सेवक, नाट्याचार्य कृ. प्र. खाडिलकर यांची चरित्रे ही फाटकांनी लिहिली. त्यांचा पिड खरा तर इतिहासकाराचा. त्यांच्यासमोर गिबनचा आदर्श होता. त्यामुळे त्या व्यक्तीचे तिच्या काळाशी नाते असते ह्या जाणिवेने फाटकांनी ही चरित्रे लिहिली आहेत. न. र. फाटक हे जसे स्वतंत्र प्रज्ञेचे समीक्षक होते तसेच ते इतिहासाचे दृष्टी ठेवून इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेण रे विचारवंत, भाष्यकार होते. त्यावरून फाटकांच्या वैचारिक आणि बौद्धिक पातळीची जाणीव होते. न. र. फाटक यांचे २१ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी अमेरिकेच्याच काय; पण महिला टेनिसविश्वात नवा अध्याय लिहिला. झोपडीवजा घर ते काही मिलियन डॉलरमधील कमाई असा त्यांचा प्रवास आजही सर्वांना अचंबित करून सोडणारा आहे. जगभरातील महिला टेनिसपटूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे.
रिचर्ड विल्मस कृष्णवर्णीय. प्रगत अमेरिकेत सर्व प्रकारची अवहेलना सहन करून जगणारा. प्रसंगी चोऱ्या करणारा आणि जगणारा. त्याची ओरेन्सशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर. दोघेही गरिबीचे चटके सोसत मोठे झालेले. ओरेन्स तर तीन मुलांची आई. नवऱ्यापासून विभक्त झालेली. रिचर्ड दूरचित्रवाणी वाहिन्यांवर टेनिस बघतो. तेथील बक्षिसांची रक्कम पाहून अवाक् होतो. ओरेन्सला म्हणतो, आपल्याला आणखी दोन अपत्ये हवी आहेत. मी, दोघांना विश्वविजेते घडवेन. मी उत्तम प्लॅनर आहे... त्याने बाजारात जाऊन टेनिसची काही जुनी पुस्तकेही विकत घेतली. दोघांनीही टेनिसचा अभ्यास सुरू केला.
व्हीनसचा जन्म 17 जून 1980 चा. पुढील वर्षी सेरेनाचा. वयाच्या चौथ्या वर्षापासून रिचर्डने या दोघींच्या हाती रॅकेट सोपविली. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांचे तीन खोल्यांचे झोपडीवजा घर. सारा परिसर गुंडगिरीने व्यापलेला. गोळीबार, हाणामाऱ्या, खून असे प्रकार नित्याचे. गुन्हेगारीच्या या चिखलात विल्यम्स नेटाने दोन कमळे फुलवित होता. कृष्णवर्णीय आणि गोरे अशा संघर्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी. तासन् तास सराव सुरू असायचा. प्रशिक्षक नव्हता. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सामने, काही सामन्यांच्या कॅसेट, मिळेल ती रॅकेट, अनवाणी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अशा आयुधांवर जग जिंकण्याचा हा प्रवास सुरू झाला.
वयाच्या साडेचार वर्षापासून दोघींनी स्पर्धात्मक टेनिस खेळायला सुरवात केली. पुढील पाच वर्षांत दोघींनी अमेरिकेतील ज्युनिअर गटाच्या सर्व स्पर्धा जिंकल्या. दोघींचे वडीलच प्रशिक्षक. त्यांनी दोघींना अतिशय आक्रमक घडविले. फक्त "जिंका‘ हाच कानमंत्र दोघींना दिला. दोघीही उंचीने ताडमाड होत्या. व्हीनस तर वयाच्या अकराव्या वर्षीच सहा फूट उंचीची झाली होती. तिची उंचीच तिला प्रतिस्पर्धांवर मात करण्यासाठी मोठी मदत करीत होती. दोघींचा सर्व्हिसचा भन्नाट वेग पाहूनच दोघी टेनिसमधील आश्चर्य आहेत, असा गवगवा अमेरिकेत झाला होता आणि घडलेही तसेच. दोघीही आपला आक्रमक खेळ, वेगवान सर्व्हिस, दीर्घ व्हॉलीज करण्याची क्षमता यांवर जागतिक विजेत्या झाल्या. टेनिसच्या सम्राज्ञी झाल्या. ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या दोघी बहिणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. पैसा आणि प्रसिद्धीने पायाशी लोळण घेतली. दोघीही अनेक सामन्यांतून आमने-सामने आल्या. एकमेकींविरोधात खेळतानाही त्यांनी आपल्यातील जिगर कायम ठेवली.
सेरेना म्हणते, ""व्हीनस माझी आदर्श आहे. तिची प्रगती मला सतत प्रोत्साहित करते. तिचा पराभव मला चुकांमधून खूप काही शिकवून देतो. मी तिचा हात धरूनच मोठी झाले. माझे वडील आणि ती माझे पहिले गुरू आहेत.‘‘
व्हीनस एका मुलाखतीत म्हणते, ""आमच्या प्रसिद्धीनंतर आमच्या वागणुकीत फरक पडला नव्हता; पण माध्यमातून उलटसुलट बातम्या येतात. आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही. माझ्या कुटुंबाला माहीत आहे, की आम्ही कशा आहोत. अशा अफवा नंतर वाहूनही जातात आणि आता तसेच होते आहे.‘‘
टेनिसशिवाय इंटेरिअर डिझाइनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्हीनसने स्वतःची कंपनी उघडली आहे. त्याशिवाय तिने अभिनयाचा शौक अनेक मालिकांमधून पूर्ण करून घेतला आहे. ती म्हणते, ""मी टेनिसस्टार झाले नसते तर मोठी अभिनेत्री झाले असते. नाटक माझ्या अंगातच आहे.‘‘
सेरेना विल्यम्स अधिक धार्मिक आहे. त्या संदर्भातील वाचन हा तिचा आवडीचा विषय आहे.
-- दीपक गायकवाड
Copyright © 2025 | Marathisrushti