(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अभिराम भडकमकर

    पछाडलेला या चित्रपटा मध्ये “समीर” ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.

  • सेन्सॉर बोर्डच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले

    केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका अपर्णा मोहिले यांचा जन्म ६ ऑगस्ट रोजी झाला.
    अपर्णा मोहिले हे सुपरिचित नाव आहे. मॅट्रिकला बोर्डामध्ये मुलींमधून पहिल्या आलेल्या ह्या हुशार विद्यार्थीनीने पुढे बी.ए., एम.ए. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवले. अपर्णा मोहिले या १९६५ बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकारी बनल्या.त्यांची पहिली निवड इंडीयन पोस्टल सर्व्हीस मध्ये झाली. अशा प्रकारची निवड होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला अधिकारी होत्या. पोष्टातील अनेक महत्वाची पदे त्यांनी भूषवली. चीफ पोस्ट मास्तर जनरल, पोस्टल सर्व्हीस डायरेक्टर, पोष्टल सर्व्हीसेस बोर्ड मेंबर अशा महत्वाच्या पदांवर काम करून त्यांनी ठसा उमटविला.

    भारत स्वतंत्र झाल्यावर मात्र माहिती आणि प्रसारण मंत्र्याच्या अधिकारात १९५१ साली चित्रपट परीक्षण बोर्डाचे काम चालू झाले.कायम चर्चेत आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बोर्ड अशी याची ख्याती आहे. या बोर्डावर अनेक मान्यवर येवून गेले. बऱ्या वाईट प्रमाणात सर्वांच्या कारकिर्दीत काही कटू गोड घटना घडल्या. अलीकडे कलावंताची या बोर्डाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक कली जाते पण पूर्वी आय ए एस श्रेणीचा अधिकारी तिथे असायचा. हे अधिकारी मग डॆप्युटेशन वर काही कालावधीसाठी तिथे जायचे. चित्रपट, नाटक, संगीत याची अपर्णा मोहिले यांना पहिलेपासूनच आवड होती. त्या संस्कृत, मराठी आणि इंग्रजी या तीनही विषयात विद्या पारंगत होते. काही काळ त्यांनी इंग्रजी या विषयाचे नागपूर च्या महाविद्यालयात अध्ययन केले होते.

    साहित्यिक , सांस्कृतिक आवड होतीच. त्यामुळे त्यांनी पदाकरीता डॆप्युटेशन वर जाण्याची विनंती कली. आणि लगेच त्यांची विनंती मान्य होवून सी बी एफ सी वर रिजनल ऑफिसर म्हणून नेमणूक झाली. त्यावेळी त्यांच्या सोबत या क्षेत्रातील अनेक नामवंत होते. विजया मेहता, वंदना विटणकर,शांता शेळके होत्या. १९७८ ते १९८३ या पाच वर्षाच्या कालावधीत अपर्णा मोहिले या प्रशासकीय अधिकारी या बोर्डावर होत्या. पाच वर्ष इतका मोठा काळ इतर कोणत्याही अधिकाऱ्याला या पदावर रहाता आले नाही पण अपर्णा मोहिले मात्र तब्बल साडेपाच वर्ष या पदावर होत्या.

    अपर्णा मोहिले १९८२-१९८३ या काळात त्या फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षा होत्या. तसेच १९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३१ ऑगस्ट २००२ ला त्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या. एकदा अपर्णा मोहिले यांना प्रश्न विचारला गेला की पोस्टासारख्या रूक्ष खात्यात कशा काय रूळल्या? यावर त्यांचे उत्तर होते " पोष्ट खाते रूक्ष मुळीच नाही उलट ते भावनासंपन्न आणि रसाळ आहे!’ निवृत्तीनंतर त्या पुण्यातच रहातात.

    साहित्य, संगीत याची आवड असलेल्या अपर्णा मोहिले यांनी ‘संसार आणि सेन्सॉर (ललित)’ , ‘त्रिदल (नाटिकासंग्रह)’ , ‘शब्दपुष्पांजली (कवितासंग्रह)’ आणि ‘सेन्सॉर जीवनसार आणि मी (आत्मचरित्रपर)’ ही पुस्तके लिहिली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गुरुनाथ कुलकर्णी

    साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता.

  • प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

    प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत. प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत.

  • बॉलीवूडचा विनोदी अभिनेता देवेन वर्मा

    बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला

    देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.

    हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.

    देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

    त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.

    देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • काजोल

    काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.

  • रवी कदम

    कदम, रवी

    महाधिवक्ता या महत्वाच्या घटनात्मक पदाची जबाबदारी राज्य शासनाची उच्च न्यायालयात बाजू मांडणे एवढीच नसते. न्यायप्रक्रियेस साह्य, न्यायमित्र, कायदेशीर तरतुदी आणि सत्य बाजू न्यायालयासमोर परखडपणे सादर करणे, या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात.

    शासनाची धोरणे व निर्णयांची न्यायालयात पाठराखण करीत असताना महाधिवक्ता म्हणून सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचीही जबाबदारी असते. महाधिवक्ता रवी कदम यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक अडचणींना तोंड देत अतिशय कसोशीने हे सारे निभावून नेले. मुंबई उच्च न्यायालयातील महाधिवक्ता हे पद एच. एम. सिरवई यांच्यासारख्या ज्येष्ठ व नामांकित घटनातज्ज्ञाने १९७४ मध्ये तब्बल १७ वर्षे भूषविले. त्यांच्यानंतर सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा सन्मान कदम यांना मिळाला. कदम प्रसिध्दीमाध्यमांपासून नेहमी दूरच राहिले. ते आपल्या वर्तणुकीने किंवा वक्तव्याने कधीही वादग्रस्त ठरले नाहीत. बेधडक विधाने करणे त्यांच्या स्वभावातच नाही. मुख्यमंत्री बदलल्यावर महाधिवक्त्याने राजीनामा देण्याची प्रथा आहे. पण कदम यांनी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. प्रथेनुसार त्यांनी राजीनामा दिला तरी नवीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांची जबाबदारी कायम ठेवली. त्यांनी या पदाचा कधीही राजकीय वापर होऊ दिला नाही. साधनशुचिता जपण्यासाठी त्यांनी शासकीय निवासस्थानही स्वीकारले नाही. कदम हे मुंबई विद्यापीठात १९८२ मध्ये एलएलबीला सर्वप्रथम आले होते. ट्रेडमार्क, पेटंट प्रकरणे हाताळण्यात त्यांचा लौकिक. गिरणजमिनींचा वाद, एन्रॉन, वनजमीन, डान्सबार बंदी, मुख्यमंत्र्यांविरुध्दची निवडणूक याचिका आदी प्रकरणांमध्ये त्यांनी शासनाची बाजू भक्कमपणे मांडली व निकाल शासनाच्या बाजूने लागले. बँकांच्या कर्जवसुलीच्या कायद्यासंदर्भातही (सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्ट) त्यांनी काम केले. विधिमंडळाला हक्कभंग प्रकरणात सा केले. तब्बल ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यावर आता सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा कदम यांचा मनोदय आहे.

  • यंदाचा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर

    भारत सरकारतर्फे संगीत क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा तानसेन पुरस्कार पंडित उल्हास कशाळकर यांना जाहीर झाला आहे.
    त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी पांढरकवडा नागपूर येथे झाला.

    पंडित उल्हास कशाळकर यांची ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत आहे. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिल नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

    उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी इ.स. १९८३ ते १९९० चे दरम्यान काम केले. इ.स. १९९३ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय टी सी संगीत संशोधन अकादमीत आचार्य पद स्वीकारले व आजवर ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत.
    त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये ते सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी कवी, गीतकार, ना.धों. महानोर

    महानोरांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली. मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा ‘साहित्यिक’ प्राध्यापकांकडून महानोरांना भरपूर प्रोत्साहन मिळालं, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले.

    ना. धों. महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकाचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत, त्यातल्या वेदना-संवेदना आहेत. महानोरांची उत्कट अभिव्यक्ती रोमँटिक-भावनिक वळणाने जाते. महानोरांनी गद्य लेखनही भरपूर केलं आहे. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह असं विविधांगी ललित लेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु.ल.’ या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील ही मोठी व्यक्तिमत्त्वं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, महानोरांचं पहिलं प्रेम कवितेवरच आहे. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितेत त्यांचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. त्यांचे ११ कवितासंग्रह व ‘अजिंठा’ हे खंडकाव्य प्रकाशित आहे. ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत.

    महानोरांचं लोकसाहित्याबद्दल प्रचंड प्रेम व जिव्हाळा आहे. या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं व लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय महाराष्ट्राला घडवला आहे. यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ‘वही’ हा मराठवाड्यात लोकप्रिय असलेला लोकगीतांचा प्रकार. महानोरांनी लिहिलेल्या ‘वह्या’ त्यांच्या ‘वही’ या संग्रहात आहेत.
    ‘चांद केवड्याची रात आलीया सामोरा
    राजा माझ्या अंबाड्याला बांधाया गजरा’
    अशी भावुक, मधाळ शब्दकळा लाभलेल्या ‘वही’चं राजस रूप असं आहे,
    ‘राजसा... जवळि जरा बसा
    जीव हा पिसा तुम्हाविण बाऽईऽ
    कोणता करू शिणगार सांगा तरि काऽही!’

    विलक्षण लयकारी लाभलेल्या या कवीने मुक्तछंदही भरपूर लिहिला आहे. ‘प्रार्थना दयाघना’ मुक्तछंदात आहे, ‘अजिंठा’तली गिल-पारूची कथा मुख्यत्वाने मुक्तछंदात आहे आणि ‘तिची कहाणी’सुद्धा. महानोरांच्या कवितेचे असे विविध पैलू आहेत. १९७८ साली ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य झाले. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • लोकगायक प्रल्हाद शिंदे

    २०१७ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या ‘दशक्रिया’ या चित्रपटातील त्यांची भूमिका होती. सोबतच देवाशप्पथ खोटे सांगेन, चष्मे बहाद्दर, गलगले निघाले, सत्य सावित्री, सत्यवान, सातबारा कसा बदलला, आयपीएल-इंडियन प्रेमाचा लफडा, आर्त आदी गाजलेल्या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.