जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम गायक होते.
खरे तर दशरथ यांना पुजारी शास्त्रीय संगीतात पुढे वाटचाल करायची होती पण विधिलिखित काही वेगळेच होते. पुढे काही गोष्टी अशा घडल्या की ते भावगीतांकडे वळले आणि मग मराठी भावगीतांना एक अवीट गोडीचा गायक आणि उत्तम संगीतकार लाभला. गायक म्हणून त्यांना जास्त संधी मिळाली नाही तरी त्यांनी गायलेली सगळीच गाणी विलक्षण गाजली. त्यामानाने संगीतकार म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच भव्य झालेय. मा. दशरथ पुजारी ह्यांनी स्वत: गायलेली गाणी तशी खूपच कमी आहेत. वर सांगितलेले 'अशीच अमुची आई असती ' तसेच ' अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ' किंवा 'हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' हे भक्तिगीत काय, ही सगळी गाणी गाजलेली आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेली अवीट गोडीची आणि गाजलेली कैक गाणी सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा ह्यांनी गायलेली आहेत.
दशरथ पुजारी यानी आपल्या प्रदीर्घ संगीत कारकीर्दीत मंगेश पाडगावकर, रमेश आणावकर, शांताराम नांदगावकर, सुधांशु, योगेश्वीर अभ्यंकर, मधुकर जोशी यांसारख्या गीतकारांच्या गाण्यांना चाली बांधल्या. 'झिमझिम झरती श्रावणधारा', 'अशीच अमुची आई असती', 'चल ऊठ रे मुकुंदा', 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा', 'मृदुल करांनी छेडित तारा' इत्यादी गाणी त्यांच्या अतिशय गाजलेल्या गाण्यांपैकी आहेत. संगीत-संयोजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात मा. दशरथ पुजारी यांचे सहाय्यक होते. दशरथ पुजारी यांनी 'अजून त्या झुडपांच्या मागे' हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिले होते. कवी पी. सावळाराम हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना तसेच 'चतुरंग संगीत सन्मान ' पुरस्कार मिळाला होता. दशरथ पुजारी यांचे १३ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दशरथ पुजारी यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=1e1Pnb_v0co&list=PLfCW_Yd-eqbARk1Aa5-yi6OPFjYDLvA62&index=1
https://www.youtube.com/watch?v=oE7ol4Zvlyo
https://www.youtube.com/watch?v=-zV-It-mW9A
https://www.youtube.com/watch?v=ZUu6bM9ldWc
ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी पश्चिम पंजाबमधील लाहोर येथे झाला.
१९४९ मधे " कनीज" या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या "आसमान" या चित्रा द्वारा ओ.पीं.चे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट " बाज" व "छम छमा छम" हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा "आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत" असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट " आरपार" ओपीना बहाल केला. ओपींकडे काही " सांगितिक मागण्या" गुरूनी केल्या. नय्यर " आरपार" मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले.
ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य " फ़्युजनिस्ट " म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. ओपीं नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले. इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील " निराजनम " या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच. मुख्य म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो.
खरी ओपी नय्यर खासीयत दिसते ती काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़ि रवही दिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई या चित्रपटातून.
ओपी ना " रिदम किंग " या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जायचे. ओ.पी हे सार् पणे स्वता" ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो असे ते वारंवार म्हणत.
सिनेजगतात कॅडिलॉक ही गाडी फ़क्त ओ. पी. नय्यर व व्ही शांताराम यांचेकडेच होती.
ओ. पी. नय्यर यांचे २८ जानेवारी २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
अमोल बावडेकर हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत एक नावाजलेलं नाव आहे. अमोल बावडेकर हे अभिनेता आणि गायक म्हणून ह्या क्षेत्रात अतिशय प्रसिद्ध आहेत.
माधव गोडबोले हे एक सचोटीचे, कर्तव्यदक्ष, नियमानुसार काम करणारे सनदी अधिकारी होते.. पक्के सेक्युलर पण सनदशीर लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. गृहसचिव म्हणून निवृत्त व्हावे लागल्यावर ‘द अनफिनिश्ड इनिंग्ज ‘ हे त्यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तक चांगलेच गाजले.
सबनीस कुटुंब मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला.
पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली.
'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, त्यांची १८ नाटके व एकांकिका प्रसिध्द झाल्या, विप्छा माजी पुरी करा, कार्टी श देवी, घरोघरी हीच बोंब, निळावंती, म्हैस येता माझ्या घरा, सौजन्याची ऐशी तैशी, मेजर चंद्रकांत, अप्पाजींची सेक्रेटरी, हे ही दिवस जातील, प्रेक्षकांनी क्षमा करावी, घरमालक, यम हरला यम जिंकला. त्यांचे एकूण १२ कथा संग्रह प्रसिध्द झाले, बोका झाला संन्यासी, पसंद अपनी अपनी, गुदगुल्या, विनोद द्वादशी, परसूच्या पशुकथा, थापाड्या, खांदेपालट, पानदान, गारुड, पंगत, परवाळ, आलपड. त्यांची दोन पुस्तके, पहिलं `माझेश्वरी' दुसरं `सबनीशी`.
जयवंत दळवींच्या निवडक ठणठणपाळचे संपादन ही त्यांनी केलं. त्यांच्या दोन विनोदी नाटयकृतींना १९६३ व १९७२ सालचे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते काही काळ किशोर मासिकाचे संपादक होते. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंत सबनीस यांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. `खणखणपूरचा राजा' या वगनाट्यापासूनच दादा कोंडके, वसंत सबनीसांची जोडी जमली. आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला.
'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विच्छा माझी पुरी करा नाटक
https://www.youtube.com/watch?v=08xqwTnglME
(७ जानेवारी १७७५-१४ जानेवारी १८७५)
मराठी राज्याचा शेवटचा पेशवा राबबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा घार येथे जन्मला लहानपणी हा हुड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली, पण तो अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधीस जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला नाना फडवीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले. बाजीरावावर शिंदे होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने तैनाजी फौजेशी अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती असे दिसत नाही. इंग्रजाच्या साहयाने पटवर्धन रास्ते त्याने रचला पण इंग्रज वकिल एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजाविरूद्ध कटास सुरूवात झाली.
बाजीरावाने सातार्याला छत्रपतींचा व त्या पदाचा उघड उघड अपमान करून त्यावेळचे छत्रपती प्रतापसिंह यांस प्राय कैदेत टाकले या परिस्थितीचा फायदा घेऊन एल्फिन्स्टनने पेशव्यांशी लढाई करतांना छत्रपतीपदाची अवहेलना करणार्या पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे आहे असा पवित्रा घेतला. त्यामूळे मराठा मंडळावर योग्य तो परिणाम होऊन दुसरा बाजीराव एकाकी पडला आणि अष्टीच्या लढाईत त्याचा पराभव झाला १८१८ बापू गोखले प्राणपणाने लढला व धारातीर्थी पडला. पूढे इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रम्हावर्त येथे नेऊन ठेवले तेथेच तो पूढे मरण पावला.
दुसर्या बाजीरावामध्ये युद्ध कौशल्य वा धडाडी नव्हती सुरूवाती पासुन तो कारस्थानी व विषयलंपट होता. त्याने पुण्यास असताना सहालग्ने व पुढे ब्रम्हावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला, पण मूलगा लहानपणीच वारला. पेशवाई बुडाल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने धार्मिक कृत्यांत व्यतीत केले.
आपल्या १८ वर्षाच्या करीयर मध्ये त्यांनी एकूण ८५९ धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.
“गंधर्व भूषण” जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये “गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते.
महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
ऑक्टोबर १९२६
१९२६> मराठी व संस्कृतचे चिकित्सक अभ्यासक कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांचा जन्म. मम्मटाचा “काव्यप्रकाश” व अन्य विविध विषयांवरील ग्रंथांच्या संस्कृत संहिता त्यांनी मराठीत आणल्या, “मराठी व्याकरणाचा इतिहास”, “मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद” असे ग्रंथ लिहिले आणि अनेक ग्रंथांसाठी अभ्यासकीय योगदान दिले. जुलै २०१३ मध्ये ते निवर्तल्यावर त्यांच्या काही लिखाणाचे “वेचक डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ सुरु झाले आहे.
mss
Copyright © 2025 | Marathisrushti