(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे

    जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली.

  • न जाणलेले भगतसिंह….

    २३ मार्च १९३१ हा शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.. ज्या ऐतिहासिक दिवशी भगत सिंह ,सुखदेव आणि राजगुरु हे तिघे वीर पुरुष हसत हसत, भारतासाठी फासावर चढून शहीद झाले. त्या काळी कितीतरी जवान वीरांनी क्रांतिकारी होण्याचा निर्णय घेऊन कायमचा घराला राम राम केला असणार आणि त्याची दखलही आपल्या इतिहासाने घेतली नसेल.

  • पंजाबी साहित्यिक  कर्तारसिंग दुग्गल

    कर्तारसिंग दुग्गल हे पंजाबी, उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषांमध्ये लिहिणारे मोठे कवी, कथाकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फाळणीच्या, तसंच आणीबाणीच्या काळातल्या पंजाब संबंधी लेखन केलं आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे.

  • ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

    १९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.

  • (डॉ.) आ. ह. साळुंखे

    स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच लागते. कोल्हापूर येथे या आठवडय़ात त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू पुरस्कारामुळे त्यांच्या वैचारिक प्रवासाला एक प्रागतिक अधिष्ठान लाभले आहे. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले.

    सांगली जिल्हय़ात खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले. आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, तर त्यांच्या विचारांची आणि त्यासाठी झालेल्या सामाजिक प्रवासाची त्यांना अगदी लहान वयातच ओढ लागलेली होती. संत तुकारामांच्या बंडखोर विचारांना समाजाने कसे अलगद उचलले आणि त्यांच्या बंडखोरीलाही कशी समाजमान्यता मिळाली, याचा अनुभव डॉ. आ. ह. साळुंखे यांना लहान वयातच आला.

    भारतीय संस्कृतीबद्दलची जिज्ञासा पुरी करण्यासाठी केवळ समाजविज्ञानाच्या अंगाने जाता कामा नये, त्यासाठी साहित्याची उपासना महत्त्वाची आहे, याचे भान ठेवत, साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठात बी.ए.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना संस्कृत विषय ‘स्पेशल’ला घेतला होता. या परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले. एम. ए. च्या परीक्षेतही त्यांनी संस्कृत आणि मराठी या विषयांत स्वतंत्ररीत्या प्रावीण्य मिळवले. संस्कृत आवडीचा विषय असल्याने ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच.डी. ही संपादन केली. शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता या नात्याने डॉ. साळुंखे यांनी संस्कृत आणि मराठी भाषेच्या अध्यापनाच्या क्षेत्रात बत्तीस वर्षे केलेली उल्लेखनीय कामगिरी जेवढी महत्त्वाची तेवढीच, कदाचित काकणभर सरस असलेली त्यांची ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्राला पहिल्यापासूनच नवनव्या विचारांचे आकर्षण राहिलेले आहे.

    वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला. संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी यांच्यासारख्या आधुनिकतेला स्पर्श करणाऱ्या विचारवंत संतपरंपरेनंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर अशी एक वैचारिक परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आणि तिच्यावर पालनपोषण झालेले अनेक विचारवंत त्या विचारांमध्ये स्वत:ची भर घालून नवा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न करत असतात. डॉ. साळुंखे यांचे या क्षेत्रातील कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. समाजाला विचारप्रवृत्त करून योग्य त्या मार्गापर्यंत नेण्यासाठी सातत्याने समाजाचा आणि त्यातील आडव्या-उभ्या धाग्यांच्या विणीचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये डॉ. साळुंखे यांचे नाव यासाठीच घ्यावे लागते.

    ‘गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र- गौतम बुद्ध’, ‘बळीवंश’, ‘तुळशीचे लग्न : एक समीक्षा’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘धर्म की धर्मापलीकडे’, ‘म. फुले आणि धर्म’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ अशी त्यांच्या ग्रंथांची शीर्षके जरी पाहिली, तरीही त्यांच्या वैचारिक क्षेत्रातील विस्तृत कामगिरीचा अंदाज येतो. तीसहून अधिक संख्येने प्रकाशित झालेली त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक घडामोडींच्या इतिहासाचा आढावाच आहे. आपण चळवळीतराहावे आणि त्यातून समाजप्रबोधन करावे, अशी ऊर्मी डॉ. साळुंखे यांनाही होणे स्वाभाविक होते.

    धर्माच्या ऐतिहासिक गरजेपेक्षा वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळेच शिवधर्म या नवीन विचारांची उकल करण्याची आवश्यकता त्यांना भासली. प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याची साक्षेपी मांडणी करणाऱ्या आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या एका अप्रतिम ललित लेखनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. पती-पत्नीच्या सहजीवनातील अतिशय तरल आणि भावुक नात्यांचा त्यांनी केलेला उलगडा म्हणजे त्यांच्या साहित्यिक उंचीचा एक आगळा नमुना आहे. डॉ. साळुंखे यांच्या वैचारिक प्रवासाला शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या मौलिक कार्याची दखल सर्व सामाजिक प्रवाहांतील जाणत्यांनी घेणे तितकेच गरजेचे आहे.

  • मराठमोळे चित्रकार वासुदेव गायतोंडे

    इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्यात कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.

  • तबल्याचे जादूगार उस्ताद अल्लारक्खा खान

    वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्ला रक्खा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.

    झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. उस्ताद अल्ला रक्खा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी चित्रपट अभिनेते गणपत पाटील

    तमाशापटांतील ’नाच्या’च्या भूमिकांमधील अभिनयाबद्दल ते ओळखले जात. त्यांचा जन्म १९१९ रोजी कोल्हापुर येथे झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.

    दरम्यान राजा गोसावी यांच्याशी मा.पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले. त्या सुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली. चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले. गणपत पाटील यांच्या जीवनावर आधारीत नटरंग हा चित्रपट खूप गाजला. गणपत पाटील यांचे २३ मार्च २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

    सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही.

    मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात. सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला.

    विदर्भातील अमरावती या शहरात १५ एप्रिल १९३२ रोजी सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता.

    सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती. हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे मा.सुरेश भट असे वर्णन मा.सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला. सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. मा.सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश भट नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8

    रंग माझा वेगळा
    https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ

  • मंगेश पाडगावकर

    ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘शुक्रतारा मंद वारा’ यासारख्या एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचे गीतकार, ज्येष्ठ कवी. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीचे एकत्रित काव्यवाचनाचे कार्यक्रम प्रचंड गाजले. त्यांनी अनेक कार्यक्रमांमधून आपल्या कविता सादर करून रसिकांचे मन जिंकले. प्रेम म्हणजे प्रेम असंत, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं, ही त्यांची कविता तरुनांना भुरळ घालून गेली.