जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला कलेची दीर्घ संस्कृती आहे. या संस्कृतीचे वारसदार म्हणजे पळशीकर, बहुळकर, हुसे, गायतोंडे, भास्कर कुलकर्णी यांसारखे सरस चित्रकार होय.
आपल्या भारत देशाने जगाला अनेक गणितज्ञ आणि खगोल वैद्यानिक दिले आहेत. अश्या थोर असामी पैकी एक आहेत डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ तर आहेतच पण उत्तम लेखकही आहेत. त्यांनी फक्त विज्ञान विषयावर गंभीर पुस्तकेच नाही लिहिली तर विज्ञानाची छटा असलेल्या कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या आहेत. जयंत विष्णू नारळीकर यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
पिटसबर्ग काही मराठी तरूणांनी मराठी अस्मिता, बाणा, व हितसंबंध जोपासण्यासाठी व सर्व मराठी कलावंताना, प्रतिभावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी मंडळाची स्थापना केली. गिरीष ठक्कर हे या मराठी मंडळाचे अध्यक्ष.
हिरो' सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना 'हिरो ' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लाँच केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी होते. जॅकी श्रॉफ यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जॅकी श्रॉफ यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा 'हीरो' होता. मात्र त्यापूर्वी त्यांनी 'स्वामी दादा' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
१९८३ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात जॅकी देव आनंद यांच्यासह झळकले होते. जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांनी हिंदीसह तब्बल आठ भाषांमध्ये काम केले. त्यांनी बंगाली, तेलगु, मल्याळम, कन्नड, मराठी, तामिळ, पंजाबी आणि उडिया या सिनेमांत अभिनय केला आहे. ऐंशीच्या दशकात त्यांनी आयशा दत्तसह लग्न केले. जॅकी श्रॉफ यांना आपल्या फिल्मी करिअरमध्ये तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी स्पेशल ऑनर ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. 'रंगीला' या सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी आमिर खानसोबत काम केले होते. त्यानंतर तब्बल १७ वर्षांनी 'धूम ३' या सिनेमात जॅकी आणि आमिर यांनी एकत्र काम केले. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या पत्नीसह मिळून एक मीडिया कंपनी सुरु केली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या.
अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे .
पंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत.
राजाभाऊ नातू म्हणजे ‘कलोपासक’चे चिटणीस आणि पुरुषोत्तम स्पर्धेचे सर्वेसर्वा. एक उत्तम दिग्दर्शक आणि नेपथ्यकार असा त्यांचा लौकिक होता.
ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल.
माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti