जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले. ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले .
श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.
शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे.
कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.
सायनाइडपेक्षा पाचशे पटींनी घातक असलेल्या 'सरीन' सारख्या वायूचा वापर करुन रासायनिक अस्त्रे बनवले जाण्याचा धोका जगाला भेडसावत आहे. या वायूचे अस्तित्व शोधणारे सेन्सर डॉ. एल.ए. पाटील यांनी विकसित केले. विशेष म्हणजे, हे संशोधन त्यांनी अमळनेरसारख्या छोट्या शहरातील एका छोट्याशा लॅबमध्ये केले. त्यांच्या या संशोधनामुळे सेन्सर शोधणार्या निवडक देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले.
डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख वाचा.
प.पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वर यांचे आजोबा प.पू. श्रीवक्रतुंड महाराज आणि वडील प.पू. श्रीधुंडिराज महाराज दोघेही अधिकारी सत्पुरुष होते. प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजाचे कृपाछत्र कवीश्वर घराण्यावर होते. प.पू. श्रीदत्तमहाराज यांचा जन्म झाल्यावर त्यांना मांडीवर घेवून स्वामी महाराजांनी सांगितले की या ‘बालकाच्या रुपात आजोबांनीच म्हणजे प.पू. श्रीवक्रतुंड महाराजांनी पुन्हा जन्म घेतला आहे
कधी ते कविता लिहितात. कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन...हे सगळे त्यांचे छंद असले तरी, या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडीत नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे.
शिकागोत उलगडला रुपेरीपट
पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना महा. पं. मदनमोहन मालवीय यांनी ‘आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?’ विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता.
खलनायिका, अभिनेत्री व रोल्स राइस गाडी विकत घेणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री नादिरा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला.
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं.
नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला.
‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले.
नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती.
हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=Eb_DlLQFP9k
वर्ष १९५७... वाईजवळच्या धोम गावातून पुण्यात आलेला एक शाळकरी मुलगा पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर रद्दी आणि काही जुनी पुस्तके घेऊन बसू लागला. त्यातूनच पंचवीस रूपये भाड्याने टपरी घेतली. पुढे जुन्या पुस्तकांच्या विक्रीबरोबरच नवी पुस्तकेही विकण्याचा उपक्रम त्याने सुरू केला. होताहोता पहिले पुस्तक प्रकाशित केले आणि ही वाटचाल तब्बल पन्नास वर्षे करीत तो आज आघाडीचा पुस्तक प्रकाशक व पुस्तक विक्रेता बनला आहे.
'उत्कर्ष प्रकाशन'च्या सुधाकर उर्फ सु. वा. जोशी यांची ही कहाणी. प्रकाशन जगतात “सु. वा” या नावाने प्रसिद्ध असलेल्या जोशी यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती, तसंच पुस्तकांवरील जिवापाड प्रेम याच्या जोरावर हा महाकाय पसारा उभारला. .
लक्ष्मी रस्त्यावरील हा संसार कालांतराने त्यानी डेक्कन परिसरात हलवला. त्यांची धडपड पाहून एका पुणेकराने त्यांना खोके भाड्याने दिले. पानशेतच्या पुरात मात्र त्याची दोन-तीन कपाटे भरलेली पुस्तके वाहून गेली. नंतर डेक्कन येथेच त्यांना कायमस्वरूपी जागा मिळाली.
१९७१ मध्ये पहिले पुस्तक प्रकाशित केले ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांचे “कोवळे दिवस”. पुस्तकांची त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे कवयित्री शांता शेळके, गंगाधर गाडगीळ, रविंद्र पिगे वगैर साहित्यिक नियमितपणे येत असत. त्यांचीही काही पुस्तके जोशींनी प्रकाशित केली.
सुनील गावसकरचे 'सनी डेज', गंगाधर गाडगीळ यांचे 'खडक आणि पाणी', व्यंकटेश माडगूळकरांचे ' काळं आई', वसंत पटवर्धनांचे 'आर्य' अशा अनेक गाजलेल्या पुस्तकाचा त्यात समावेश आहे.
आतापर्यंत त्यांनी तब्बल पंधराशे पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. सुमारे वीस लाख रुपयांची पुस्तके ते दरवर्षी विकतात.
-- मराठीसृष्टी टिम
Copyright © 2025 | Marathisrushti