(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर

    मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी हैद्राबाद (दक्षिण) येथे झाला.

    भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू रामकृष्णबुवा वझे, भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.

    नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या.

    भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले.

    पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती.

    मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे. भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले. ५०च्या शतकात मरगळ आलेल्या मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

    ‘स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणी’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती त्यांनी रंगभूमीवर आणली. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला. नाटक नुसते आणले नाहीत तर ती गाजवून दाखवली.

    भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.

    १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली काही गीते
    https://www.youtube.com/watch?v=PQwQQzUI4hw

  • श्रीधर सुधीर फडके

    श्रीधर फडके हे ख्यातनाम मराठी संगीतकार आणि गायक आहेत. ख्यातनाम गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके आणि ख्यातनाम गायिका स्व. ललिता फडके यांचे ते सुपुत्र. श्रीधर फडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.

  • प्रा. रंगनाथ पठारे

    प्रा.रंगनाथ पठारे यांचे आजच्या मराठी साहित्यात अव्वल स्थान आहे. श्रेष्ठ दर्जाचे कादंबरीकार, कथाकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून गेली ४० वर्षे ते अविरतपणे योगदान देत आलेत. सुमारे चाळीस हून अधिक मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात.

  • गणेश वासुदेव मावळणकर

    गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.

  • इटालियन नाटककार व अभिनेते दारियो फो

    नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक विषयाची फार्सशी सांगड घालणारे इटालियन नाटककार दारियो फो यांनी इटालियन भाषेत लिहिलेल्या नाटकांचे अनुवाद व प्रयोग इंग्रजीसह मराठी, बंगाली, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम् आदी भारतीय भाषांतूनही झाले आहेत.

  • वॉलमार्ट’चे जनक सॅम वॉल्टन

    १९८० च्या सुमारास ‘वॉलमार्ट’चे २७६ मॉल्स अमेरिकेत उभे राहिले. पुढे तर त्यांनी वर्षाला १०० मॉल्स हे उद्दिष्ट ठेवेल आणि गाठलेही होते. आजच्या तारखेला वॉलमार्टचे जगभरात अकरा हजार तीनशे हून अधिक मॉल्स आहेत. १९८५ साली जगप्रसिद्ध नियतकालीक फोर्ब्जने जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणुन ‘सॅम वॉल्टन’ यांना घोषित केले होते.

  • सदाबहार गाण्यांचे संगीतकार हेमंत भोसले

    १९७० ते १९८५ या कालावधीत त्यांनी संगीतकार म्हणून संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा योगी, टॅक्सीी टॅक्सीन, बॅरिस्टर, तेरी मेरी कहानी, आया रंगीला सावन अशा काही हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. "शारद सुंदर चंदेरी राती‘, "बाळा माझ्या नीज ना‘, "मी ही अशी भोळी कशी गं‘, "जा जा जा रे नको बोलू‘ ही त्यांची मराठीतील गाजलेली गाणी आहेत.

    "शारद सुंदर चंदेरी राती‘ हे गाणे आशाताईंनी गायले आहे. संगीतकार म्हणून हेमंत भोसले यांनी आपली छाप चांगली उमटवली होती. आशा भोसले यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव व लता दिदींचे भाचा..हेमंत भोसले यांचे २८ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकी पिडीया

    हेमंत भोसले यांनी संगीत दिलेली काही गाणी
    मीही अशी भोळी कशी ग ?
    भोळी खुळी !
    मी लाजले, जे मना वाटले-
    ते राहिले माझ्या

  • बॉलिवूडची राणी, राणी मुखर्जी

    राणी मुखर्जीने करिअरची सुरुवात 'बियेर फूल' या बंगाली चित्रपटातून केली. यात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे१९९७ साली आलेल्या राजा की आयेगी बरात ह्या चित्रपटामधून राणीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी झाला.१९९८ साली आलेला आमिर खानसोबतचा गुलाम हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. त्याच वर्षी करण जोहरने आपल्या कुछ कुछ होता है ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खान व काजोलसोबत राणीला आघाडीची भूमिका दिली. ह्या चित्रपटाच्या यशामुळे राणी सुपरस्टार बनली. . यानंतर तिने 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'मुझसे दोस्ती करोगे', 'साथिया' यासारख्या हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. राणीने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या व तिला आजवर ७ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. 'नो वन किल जेसिका' या चित्रपटात तिने कणखर पत्रकाराची भूमिका साकारली.सावारिया' या चित्रपटात राणीने ग्लॅमरस भूमिका साकारली. कभी अलविदा ना कहना या चित्रपटात राणीने खूपच वेगळी भूमिका साकार केली. 'पहेली' या चित्रपटात राणी मुखर्जीने पारंपारिक मारवाडी महिलेची भूमिका सादर केली.'बंटी आणि बबली' या चित्रपटात 'ब्लॅक' या चित्रपटात राणीने अंध आणि मुक्या मुलीची भूमिका केली होती. 'वीर झारा' हा तिच्या करियर मधील उत्तम चित्रपट होता. राणी मुखर्जीने प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत २०१४ मध्ये विवाह केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    राणी मुखर्जीची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=_CGOTyBWlbw

  • मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर

    या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती.

  • आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर

    मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.