जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
रघुनाथ दामोदर सबनीस, हे वसंत सबनीस यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ऐ मेरे वतन के लोगो, आधा है चंद्रमा रात आधी अशी अजरामर गाणी देणारे संगीतकार सी. रामचंद्र तथा रामचंद्र चितळीकर यांचा अनमोल ठेवा बेळगावमध्ये जपला जात आहे. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१८ रोजी झाला. अनेक अवीट गाणी संगीतबद्ध करण्यासाठी सी. रामचंद्र यांनी वापरलेली संवादिनी बेळगावातील लोकमान्य रंगमंदिर या नाट्यगृहामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. पुण्यातील पी. एस. नानिवडेकर यांचा सी. रामचंद्र यांच्याशी व्यक्तिगत स्नेह होता. त्यामुळे सी. रामचंद्र यांच्या पश्चात त्यांची संवादिनी नानिवडेकर यांच्याकडे होती. ती संवादिनी जतन केली जावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी ही संवादिनी जतन करण्याबाबत रसिक रंजन या संस्थेला विचारले. संस्थेनेही तशी तयारी दर्शवल्याने दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संवादिनी संस्थेकडे सुपूर्द केली. आता ही संवादिनी दुरुस्त करून लोकमान्य रंगमंदिर नाट्यगृहात ठेवण्यात आली आहे. बेळगावचे रसिकाग्रणी रावसाहेब तथा कृष्णराव हरिहर, पु. ल. देशपांडे व सी. रामचंद्र यांची जवळची मैत्री होती. त्यांच्या गप्पा तेव्हाच्या रिझ थिएटरमधील खोलीत व्हायच्या. आता रिझ थिएटर किरण ठाकूर यांच्या लोकमान्य संस्थेने घेतले आहे. या संस्थेच्या माध्यमातून रसिक रंजन हा उपक्रम चालवला जातो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
या अनोख्या कार रेसिंगच्या प्रकारात पहिल्यांदाच ३४ संघांनी आपल्या गाड्या उतरवल्या, त्यापैकी २५ कार हे फ्रान्सच्याच होते.सहा कार इटलीहून आणि तीन कार जर्मनीहून आल्या होत्या. गोर्डन बेनेट कप बंद झाल्याच्या निषेधार्थ ब्रिटनने यावर बहिष्कार टाकला. अशा प्रकारे, ती तीन देशांमधील स्पर्धा बनली. या कार्यक्रमात प्रवेशासाठी २०० पौंड फी ठेवली गेली होती आणि सर्व खर्च अंदाजे दहा हजार पौंड झाला होता. या शर्यतीत भाग घेण्यासाठी, ड्रायव्हरसह कारच्या वजनाची स्थिती १००० किलोपेक्षा जास्त नसावी ही अट होती.
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर’ झाले.
नृत्याचार्य राजकुमार केतकर हे ज्येष्ठ कथ्थक नृत्यकार आणि पुरुषप्रधान कथ्थक नर्तक प्रचारक आहेत. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एन.सी.पी.ए.) चे प्रचारक.
पेण तालुक्यात सर्वत्र अण्णा मोकाशी या नावाने ओळखले जाणारे हे गृहस्थ म्हणजे पेणचे सार्वजनिक काकाच म्हणावयास हरकत नाही.
१९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं.
बिहारमध्ये आलेल्या भयानक पुराने असंख्य नागरिकांचे जीवन उध्वस्त झाल्यामुळे व्यथित झालेल्या एका मुलीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा ध्यास घेतला. स्वतःच पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून एका संगीत मैफलीचे आयोजन केले. या संगीत मैफलीत येण्याचे अनेक मान्यवर गायक तसेच वादकांनी मान्य केले होते. मात्र ऐनवेळी त्यांच्यापैकी कोणीच फिरकले नाही. मात्र ही मुलगी मुळीच विचलित झाली नाही. या संगीत मैफलीत तिने स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी अवघे सात वर्षे असलेल्या त्या मुलीने तब्बल सहा तास एकटीने गाऊन ती संगीत मैफल साजरी केली व पूरग्रस्तांसाठी निधी जमविला. या जिद्दी मुलीचे नाव होते बेगम अख्यर. मोठेपणी गझलसप्राज्ञी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. बेगम अखर मुळच्या कोलकात्याच्या. लहानपणापासून त्यांना सुगम संगीताची खूप आवड होती. त्यांना शास्त्रीय संगीताची फारशी आवड नव्हती. तरीही पतियाळाचे उस्ताद आत्ता अहमदखान यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे रितसर धडे घेतले. मात्र पुढे त्यांनी गझल, भजन, सुमरी, दादरा आदी प्रकारांमध्येच जास्त रुची दाखवून त्यात प्रभुत्व मिळविले. मिर्झा गालिब व जिगर भोरादाबादी हे त्यांचे आवडते कवी. त्यांच्या अनेक गझलांना बेगम अस्त्ररनी स्वत: संगीत दिले तसेच स्वतः गाऊन अनेक गझला लोकप्रिय केल्या. गझलगायकीमुळेत्या केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, अफगाणिस्तानातही त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. आदरातिथ्य करण्याच्या त्यांच्या लखनवी पद्धतीमुळे त्या आजही असंख्य रसिकांच्या स्मृतीमध्ये आहेत.
भुपेश कुंभार हे भारताच्या गळ्यात सजणार्या तंत्रज्ञानाच्या माळेतील लकलकते मणी आहेत, व तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.
नाडकर्णी, सुरेशचंद्र
प्राणिशास्त्र हा आयुष्यभराचा अभ्यासाचा विषय. फक्त डॉक्टरेट मिळविण्याएवढाच या विषयाचा अभ्यास न करता ४० वर्षे विद्यार्थीप्रिय शिक्षक होण्याचे भाग्य लाभलेले डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी यांचे लौकिक जीवन मात्र त्यांच्या अन्य अनेक कलागुणांमुळे सतत नजरेसमोर राहिले.
क्रीडा, संगीत, साहित्य आणि विज्ञान अशा क्षेत्रांत चौफेरपणे वावरणाऱ्या नाडकर्णी सरांचे निधन त्यामुळेच चटका लावणारे ठरले आहे. फारसी आणि उर्दूमिश्रित स्वरोच्चाराने समोरच्यावर सहजपणे छाप पाडणारे नाडकर्णी जेव्हा हिंदीतून बोलायला लागत, तेव्हा ते बहुधा पेशावरचे असावेत, असा समज व्हायचा. गजल हा जसा त्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय, तसाच संगीत! बेगम अख्तर या त्यांच्या गुरू आणि त्यांची ठुमरी हा त्यांचा श्वास! अख्तरबाईंवर ते बोलायला लागले की, श्रोताच हरखून जायचा. त्या वेळी हे गृहस्थ ‘सर्प’ या विषयावर तपश्चर्या करीत होते, यावर कुणाचा कसा विश्वास बसणार? प्राणिशास्त्रावर डॉ. नाडकर्णी यांची १०-१२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत आणि क्रीडा ज्ञानकोशकार म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खो खो, कुस्ती, मल्लखांब, हॉकी, ब्रीज या खेळात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या नाडकर्णी सरांनी टेबल टेनिस या खेळात महाराष्ट्राचे नेतृत्वही केले होते. ज्ञानाची तहान भागली नाही म्हणजे जी तडफड होते, ती नाडकर्णी यांच्यामध्ये दिसत असे. वेगवेगळय़ा विषयांवर अक्षरश: प्रभुत्व असतानाही आणखी काही करण्याएवढी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून यायची, हे सगळय़ांना पडलेले कोडे असे. आकाशवाणीवर किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्व. सुरेशबाबू माने यांच्यावर कार्यक्रम व्हावा, यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला. मग अनेकांना भेटून त्यांचे ध्वनिमुद्रण मिळविले आणि एक सुरेख कार्यक्रम सादर केला.अशा कामांमध्ये त्यांना जो आनंद मिळत असे, तो त्यांच्यालेखी अवर्णनीय असे. बहुतेक सगळय़ा क्रीडाप्रकारांमध्ये पारंगत असल्याने आणि अनेक भाषांवरही प्रभुत्व असल्याने अशा सगळय़ा खेळांसाठी ते निवेदनआणि समीक्षा करीत असत. ‘उर्दू काव्यातील देशप्रेम’ अशा विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळवणाऱ्या नाडकर्णी सरांचे ‘गज़्ाल’ हे पुस्तक म्हणजे महत्त्वाचा संदर्भग्रंथ ठरला. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उर्दू मुशायरे आयोजित करण्याची त्यांची धडपड असे. या सगळय़ा व्यासंगावर मात म्हणून नाडकर्णी यांनी फलज्योतिष आणि हस्तसामुद्रिक याही विषयात विशेष अभ्यास केला. मानवाच्या पृथ्वीवरील उत्पत्तीसंबंधी नवीन शास्त्रीय विवेचन करणारे ‘पृथ्वीवर माणूस उपराच’ हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले. नॉस्ट्रेडेमस या भविष्यवेत्त्याची भविष्यवाणी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा खटाटोपही नाडकर्णी यांनी केला. इतक्या सगळय़ा विषयांचा पसारा आपल्या आयुष्याला बांधणारा हा माणूस गप्पांच्या मैफलीत बादशहा न होता, तरच नवल! पण माणसांच्या गराडय़ात राहूनही स्वत:चा व्यासंग सतत वाढवीत नेणारा संशोधक आणि अभ्यासक म्हणून आपले स्थान त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांच्या निधनाने या सगळय़ाच विषयांमध्ये नव्याने प्रवेशणाऱ्यांचा एक फार मोठा आधार गेला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti