(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक

    बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.

  • एकनाथ शिंदे

    शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे.

  • पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

  • कार्टून्स ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी एक केन स्पिअर्स

    स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.

  • अनंत फंदी

    शंकाराचार्यांनी संध्येतील २४ नावे म्हणून दाखव, असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात.

  • दिनकर गांगल

    ग्रंथाली प्रकाशन हे साहित्याची जाण व चोखंदळपणा या दोन्ही बाबींसाठी मराठी भाषेतील एक अग्रेसर प्रकाशन समजले जाते. दिनकर गांगल यांचा, या प्रकाशनाला गरूड भरारी मारण्यास प्रवृत्त करण्यामागील सहभाग महत्वाचा व मोलाचा मानला जातो. या रत्नपारखी संपादकाने ग्रंथाली साठी अनेक तळागाळातील हौशी कवींना व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांचे विचार सुध्दा समृध्द केले.

    दिनकर गांगलांमुळे मराठी वाचकांना अनेक विचारगंगांमध्ये आपले हात धुवावयास मिळाले, व वेगवेगळ्या स्तरांतील तरूणांच्या महत्वाकांक्षा, स्वप्ने, विचार, मनिषा यांचे उत्कट दर्शन या निमीत्ताने साहित्यपटलावरती पाहावयास मिळाले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याला चतुरस्त्र विचार करणारा व अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारा संपादक लाभला हे विशेष!

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • गायिका सुषमा श्रेष्ठ

    आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेली ‘तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ व ‘क्या हुआ तेरा वादा’ खूपच गाजली होती.

  • पत्रकार, संपादक अरुण टिकेकर

    स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले.

  • मारुती माने

    १९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता.

  • अनंत गीते

    अनंत गंगाराम गीते हे एक राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. अनंत गीते हे २०१४ – २०१९ ह्या काळात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री होते , तसेच ऑगस्ट २००२ – मे २००४ पर्यंत ते केंद्रीय ऊर्जा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.