(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मृदुला बर्वे

    पौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी www.oPandit.com च्या संचालिका 

  • सुधाकर तोरणे

    सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.

  • प्रसिद्ध अभिनेते सदाशिव अमरापूरकर

    शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती तशी नाटकांचीपण आवड होती. ते उत्तम लेग स्पिनर होते , उत्तम फलंदाजही होते. कॉलजमध्ये गेल्यावर त्यांना वाटले कॉलजमध्येपण क्रिकेट खेळता येईल. परंतु त्यावेळी त्यांना नाटकांच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यात त्यांना बक्षीस मिळाले. त्याच्या मते त्यांच्या आयुष्यात हाच एक टर्नीग पॉईंट ठरला की ते क्रिकेटकडून अभिनयाकडे वळले. डिग्री मिळण्याच्या आधीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत त्यांनी सुमारे १५० एकांकिकांमधून काम केले ५० च्या वर नाटके केली.

  • अशोक नागपुरे

    माणूस रंगांकडे जसा ओढला जातो, तितके शक्यतो रेखाटनाचे अप्रूप नसते. परंतु याच रेखाटनामध्ये एखाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्याइतके सामर्थ्य असते. नाशिकचे अशोक नागपुरे हे व्यक्तिमत्व जगभरात त्यांच्या रेखाटनासाठी प्रसिद्ध झाले. त्यांनी तयार केलेल्या २ हजार ७०० चौरस फुटांच्या पेन्सिल रेखाटनाची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसनेही घेतली.

    केल्याने रेखाटन

  • जनार्दन वासुदेव आगासकर

    जनार्दन वासुदेव आगासकर हे कायद्यांचे भाषांतरकार आणि मुंबई हायकोर्टाचे पहिले नेटिव्ह न्यायाधीश होते.

    “दर्पण या वृत्तपत्रात ते काही काळ होते.

    १८ जुलै १८९४ रोजी त्यांचे निधन झाले.

    Janardan Vasudeo Agaskar

  • वसंत रांजणे

    वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजीला खेळपट्ट्या अनुकूल असण्याच्या काळात अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून ख्यातनाम असलेले रांजणे यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. रांजणे यांनी १९५६-५७ च्या मोसमात रणजी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी सौराष्ट्राविरुद्ध एकाच डावात ३५ धावांमध्ये हॅटट्रिकसह नऊ बळी घेतले. द्रुतमध्यमगती गोलंदाज असलेल्या रांजणे यांनी या सामन्यात केवळ ७१ धावांमध्ये १३ बळी घेतले.

  • संगीतकार चित्रगुप्त

    अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.

    काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम ह्य़ा साऊथच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन लता, रफी, आशा, तलत, मुकेश व मन्नाडे इ. गायकांकडून सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमा मिळाले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट त्यांना मिळाला नाही. अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या गाण्यावर अतिशय खूश होते. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत. अगदी भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर नायिका कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी ह्य़ा होत्या. खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. ८२८ गाणी दिली. त्यातील लता मंगेशकर (२४८), महंमद रफी (२६०), आशा भोसले (२३२) यांच्याकडून गाऊन घेतली. त्यांनी एकूण ६९ चित्रपटाना संगीत दिले. मा.चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून अतिशय सुंदर गाणी लिहून घेतली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्याचा वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य. रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व ह्य़ा कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले "दो दिल धडक रहे है और आवाज एक है" असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले "देखो मौसम क्या बहार है" अथवा "तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो" हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगीतात रोमँटीझम दिसतो. मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत चित्रगुप्त संगीतकार म्हणून जान ओतली होती. ‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेले. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ मा.चित्रगुप्त यांच्या अशा एका पेक्षा एक रचनांनी रसिकांना वेडे केले होते. हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले. चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद हे सुद्धा नावाजलेले संगीतकार आहेत. चित्रगुप्त यांचे १४ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • दिलीप माजगावकर

    राजहंस प्रकाशनाचे संपादक अशी ओळख व ख्याती असलेल्या दिलीप माजगावकर यांनी माणूस हे साप्ताहिक वाचकप्रिय केले होते.

    राजहंस प्रकाशनाने अनेक लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्यकृती प्रकाशित केल्या आहेत.

  • आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू श्री. रविशंकरजी

    जीवन म्हणजे काय, ते कशा पद्धतीने जगले पाहिजे. स्वतःमधील ईंश्वर ओळखा व आनंदी जीवन जगा हा संदेश अखिल मानव जातीला देणारे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आध्यात्मिक गुरू श्री. रविशंकरजी यांचा जन्म १३ मे १९५६ रोजी झाला.
    एक मानवतावादी नेता, अध्यात्मिक गुरु आणि शांतीचे दूत म्हणून श्री श्री रवी शंकर यांची ख्याती जगभरात आहे. तणावमुक्त व हिंसामुक्त समाजाचे हे त्यांचं स्वप्न आह. हे स्वप्न साकार होत आहे ते दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरे आणि सेवा कार्यांमारफत. परिणामी, जगातील करोडो लोक एकत्रित नांदत आहेत.

    चार वर्षाचे असताना ते श्रीमद्भगवद्गीता तोंडपाठ म्हणून दाखवू शकत आणि ते अनेकदा ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत. त्यांचे पहिले गुरु होते सुधाकर चतुर्वेदी, ज्यांनी महात्मा गांधी यांच्याबरोबर खूप वर्षे काम केले. त्यांच्याकडे वेद साहित्य आणि भौतिकशास्त्र अशा दोन्ही पदव्या आहेत . श्री श्री रवी शंकर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा इथे असताना दहा दिवसांच्या मौनात होते. ह्या काळातच सुदर्शन क्रिया, एक शक्तिशाली श्वसन तंत्र, याचा जन्म झाला. कालांतराने सुदर्शन क्रिया ही दि आर्ट ऑफ लिविंगच्या शिबिरांचे मुख्य गुणवैशिष्ट्य बनली. श्री श्री रवी शंकर यांनी आंतरराष्ट्रीय, नफा न कमावणारी, शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था म्हणून दि आर्ट ऑफ लिविंगची स्थापना केली. या संस्थेचे शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व-विकास कार्यक्रम हे तणाव निर्मुलनासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी लागणारी प्रभावी तंत्र शिकवतात. केवळ एका प्रकारच्या जनसमुदायाला आवाहन न करता हे कार्यक्रम जगभरात आणि समाजाच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरले आहेत.

    १९९७ साली त्यांनी इंटरनॅशनल (आंतरराष्ट्रीय) असोसिएशन (संस्था) फॉर हुमन (मानवतावादी) व्हॅल्यूज (मुल्ये) (आय.ए.एच.व्ही) ही संस्थासुद्धा प्रस्थापित केली. याचे मुख्य कारण होते ते म्हणजे दीर्घकालीन असे विकासाचे उपक्रम राबवणे व दि आर्ट ऑफ लिविंगबरोबर समन्वय साधून संघर्ष निवारण करणे. भारत, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका इथे गावागावातून या दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते युद्धपातळीवर दीर्घकालीन विकास-कामे हाती घेत आहेत. ४०,२१२ गावांमध्ये संस्थेचे काम सुरु आहेत. एक नावाजलेले मानवतावादी नेता म्हणून श्री श्री रविशंकर यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्या प्रेरणेने नैसर्गिक आपत्तीग्रस्त, अतिरेकी हल्ल्यात आणि युद्धात बचावलेले, उपेक्षित आणि सतत संघर्षात भरडल्या जाणा-या जमातीतील मुले अशा विविध परिस्थितीतील लोकांना दिलासा देण्याचे काम चालू आहे.त्यांच्या संदेशाच्या ताकदीने अध्यात्मावर आधारित एक सेवा कार्याची लाट समस्त कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. जगभर हे कार्यकर्ते आणीबाणीच्या परिस्थितीत या उपक्रमांना पुढे नेत आहेत.
    एक अध्यात्मिक गुरु म्हणून श्री श्री रवी शंकर यांनी योग आणि ध्यान या परंपरांना पुनरुज्जीवीत केले आहे आणि २१व्य शतकाला शोभेल अश्या प्रकारे जागासमोर ठेवले आहे. प्राचीन ज्ञानाला पुनरुज्जीवन देण्याच्या पलीकडे जाऊन, श्री श्री रवी शंकर यांनी वैयक्तिक आणि सामाजिक परिवर्तनाची नवीन तंत्रे निर्माण केली आहेत. यात समावेश आहे तो सुदर्शन क्रिया या तंत्राचा ज्याने तणावापासून मुक्ती मिळवण्यात आणि आंतरिक उर्जेचे स्रोत्र शोधण्यात आणि दैनंदिन जीवनात शांती मिळवण्यात करोडो लोकांना मदत केली आहे. ३१ वर्षांच्या अल्पावधीतच त्यांच्या कार्यक्रमांनी आणि त्यांच्या पुढाकाराने सुरु झालेल्या उपक्रमांनी १५२ देशांमध्ये जवळजवळ ३७ करोड लोकांचे आयुष्य पालटले आहे.
    जागतिक स्तरावर संघर्ष निवारण व हिंसामुक्तीचा प्रसार जगभरातील सार्वजनिक व्यासपीठे आणि सभांद्वारे केला जातो.

    शांती हे एकच उद्देश्य असलेले एक तटस्थ व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणूनच युद्धग्रस्त भागातील लोकांच्या आशांचे प्रतिनिधित्व श्री श्री करतात. इराक, आयव्हरी कोस्ट, काश्मीर आणि बिहार येथे विरोधी पक्षांना वाटाघाटी करण्यास एकत्र आणण्याचे काम त्यांनी केले असल्यामुळे त्यांना खास मान्यता मिळाली आहे. (भारतातील कर्नाटक सरकारने) कृष्णदेव राय याच्या राज्याभिषेकाच्या ५००व्या तिथी निमित्त त्यांना स्वागत समितीचे अध्यक्ष नियुक्त केले होते. (भारतातील जम्मू आणि काश्मीर सरकारने) त्यांना अमरनाथ मंदिराच्या बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्त केले होते. विविध उपक्रम आणि भाषणांतून श्री श्री रवी शंकर हे सातत्याने मानवी मूल्यांचे प्रबलीकरण करण्यावर जोर देतात. मानवतावाद ही आपली सर्वप्रथम ओळख आहे याची जाणीव करून देतात. सर्वधर्मसमभाव वृद्धिगत करणे आणि बहु-सांस्कृतिक शिक्षणाकरिता ते साद घालीत आहेत कारण धर्मांधतेवर हाच उपाय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज महत्वाच्या ठिकाणी कायमची शांतता प्रस्थापित झाली आहे. त्यांच्या कामामुळे जगभरातील करोडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. वंश, राष्ट्रीयता आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन “वासुदैव कुटुंबकम” स्थापित करण्याची प्रेरणा जगभर देत आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • केरो लक्ष्मण छत्रे

    (१८२५-१८८४)

    जन्म-१६ मे १८२५
    मुळ नाव - विनायक लक्ष्मण
    महाराष्ट्राचे आद्य गणिती व अर्वाचीन भास्कराचार्य, गणिततज्ञ व खगोल शास्त्रज्ञ,
    १८४० साली वयाच्या १५ व्या वर्षी कुलाबा वेधशाळेतील या म्हणून नेमणुक.
    १८५९ डेक्कन मधे कायमची नौकरी, ३ वेळा हंगामी प्रिन्सीपल म्हणून नेमणूक.
    १९६२ साली अंकगणिताचे पहिले पुस्तक
    १८६५ शुध्द निरयन पंचांग सुरू, टिळक पंचागचे मुळ प्रर्वतक