जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
व. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स , पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे , त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात.
साहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.
(७ जानेवारी १७७५-१४ जानेवारी १८७५)
मराठी राज्याचा शेवटचा पेशवा राबबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा घार येथे जन्मला लहानपणी हा हुड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली, पण तो अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधीस जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला नाना फडवीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले. बाजीरावावर शिंदे होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने तैनाजी फौजेशी अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती असे दिसत नाही. इंग्रजाच्या साहयाने पटवर्धन रास्ते त्याने रचला पण इंग्रज वकिल एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजाविरूद्ध कटास सुरूवात झाली.
बाजीरावाने सातार्याला छत्रपतींचा व त्या पदाचा उघड उघड अपमान करून त्यावेळचे छत्रपती प्रतापसिंह यांस प्राय कैदेत टाकले या परिस्थितीचा फायदा घेऊन एल्फिन्स्टनने पेशव्यांशी लढाई करतांना छत्रपतीपदाची अवहेलना करणार्या पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे आहे असा पवित्रा घेतला. त्यामूळे मराठा मंडळावर योग्य तो परिणाम होऊन दुसरा बाजीराव एकाकी पडला आणि अष्टीच्या लढाईत त्याचा पराभव झाला १८१८ बापू गोखले प्राणपणाने लढला व धारातीर्थी पडला. पूढे इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रम्हावर्त येथे नेऊन ठेवले तेथेच तो पूढे मरण पावला.
दुसर्या बाजीरावामध्ये युद्ध कौशल्य वा धडाडी नव्हती सुरूवाती पासुन तो कारस्थानी व विषयलंपट होता. त्याने पुण्यास असताना सहालग्ने व पुढे ब्रम्हावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला, पण मूलगा लहानपणीच वारला. पेशवाई बुडाल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने धार्मिक कृत्यांत व्यतीत केले.
गुंटूरमध्ये २३ एप्रिल १९३८ रोजी जन्माला आलेल्या एस.जानकी यांनी वयाच्या १९ वर्षांपासून गाण्यातील कारकीर्दीला सुरुवात केली. एस. जानकी या गेल्या साठ वर्षापासून गात आहे. जानकी यांना दक्षिण भारताची 'सुर कोकिळा म्हणतात. जानकी यांना दक्षिण भारतातील गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. आंध्र प्रदेशच्या त्यांनी आजवर तामीळ, कन्नड, तेलगु मल्याळी या भाषांमध्ये वीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
जानकी यांना गायनासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जानकी यांना गायनासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. पाच दशकांच्या गायनाच्या कारर्कीदीत सरकारने पुरस्कार देण्यास बराच उशीर केल्याने आपण हा पुरस्कार नाकारत आहोत असे मा.जानकी यांनी म्हटले आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले.
मोठमोठ्या गवयांकडून रियाज घेतल्यामुळे पं. वालावलकर हार्मोनियम वादनात एवढे पारंगत झाले की श्रोत्यांना त्यांच्या हार्मोनियम वादनाची भुरळ पडायची. बेळगावच्या एका कार्यक्रमात त्यांनी कुमार गंधर्वांना ऐनवेळी साथ केली होती. तो कार्यक्रम एवढा रंगला की कार्यक्रम संपल्यावर खुद्द कुमारजींनी पं. वालावलकरांना ‘असे षड्ज-पंचम मला कुणी दिले नाहीत’ अशी पावती दिली होती.
मराठी रंगभूमीचा तो सोनेरी काळ सोन्याचा करणाऱ्या ज्योत्स्नाबाई भोळे ह्यांचा मला स्नेहार्द्र सहवास लाभला, पुण्याच्या आपटे रोडवरील स्वरवंदना ह्या त्यांच्या निवासस्थानी माझे जाणे होते ! आजही त्यांची गाणी रेडिओवर जेव्हां ऐकू येतात, तेव्हां कान आपोआप तिकडे वळतात !
त्यांचे चिरंजीव श्रीमान सुहास भोळे हे माझ्या वडिलांचे, पुण्यातील भांडारकर रोडवरील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या चिंचोरे गुरुजींचे तेव्हाचे विद्यार्थी होते. माझे वडील सुहास भोळे ह्यांची शिकवणी घ्यायला स्वरवंदनामध्ये जायचे. त्या अनेक आठवणी ज्योत्स्नाबाई ह्यांच्या मनात शेवटपर्यंत जाग्या होत्या. गप्पांच्या ओघात, त्या मला सगळ्या आठवणी सांगायच्या. मुलाच्या शिकवणीच्या वेळी, घरात, गाणं, नाटक, ह्याविषयी कसलीही चर्चा चालायची नाही, तंबोरा, पेटी ह्याचे आवाजही नसायचे. त्यां नेहेमी म्हणायच्या, "उपेंद्र, तुझे वडील, चिंचोरे गुरुजी पक्के हाडाचे शिक्षक होते, त्याकाळी आमचे कुलवधू नाटक खूप जोरात होते, खूप दौरे व्हायचे. पुण्यातल्या प्रत्येक प्रयोगाला आम्ही गुरुजींना आमंत्रण द्यायचो, पण ते म्हणायचे, "अहो, मी शिक्षक आहे, शिकवणे एवढेच माझे काम आहे, नाटकाला कसा येऊ?" हं, एकदा मात्र, नगरला आमचा प्रयोग होता, तेव्हां चिंचोरे गुरुजी, त्यांचे गावी नगरमध्ये होते, त्यादिवशी मात्र, गुरुजी प्रयोगाला आवर्जून आले, इतकंच काय, प्रयोग संपल्यावर, विंगेत येऊन चिंचोरे गुरुजींनी आमचं कौतुकही केलं" !
मी त्यांना एकदा म्हणालो, "अहो, आपले चिरंजीव सुहास, स्कॉलरशिप परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर, आपण माझ्या वडिलांना चांदीच्या भांड्यातून पेढे दिले होते, ते चांदीचे भांडे आजही आमच्या घरी उपयोगात येते, विशेष म्हणजे दरवर्षी गुढी उभारतांना काठीवर आपण दिलेले ते चांदीचे भांडे ठेवले जाते आणि त्याभोवती रेशमी वस्त्र नेसवले जाते"! मी सांगितलेली ती आठवण ऐकून ज्योत्स्नाबाई पुन्हा जुन्या आठवणीत शिरल्या !
ज्योत्स्नाबाई ह्यांचे जावई ब्रिगेडियर विजय खांडेकर हे सुद्धा माझ्या वडिलांचे विद्यार्थी, मला त्यांचाही सहवास मिळाला होता, हे माझे अहोभाग्य !
मा. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार ज्योत्स्नाबाई ह्यांना जाहीर झाला, त्यादिवशीही आमची गप्पांची मैफल त्यांचे घरी वरच्या मजल्यावरजमली होती !
आज अकरा मे, वंदनीय ज्योत्स्नाबाईंची आज जयंती आहे, त्यांचे पवित्र स्मरण कायम मनात आहे, "बोला अमृत बोला" गाणं म्हणणाऱ्या ज्योत्स्नाबाई नेहेमीच अमृतमय बोलायच्या,
-- उपेंद्र चिंचोरे
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. त्यांचा जन्म २ जुलै १८८० रोजी झाला. संगीताची आवड बालपणापासूनच त्यांना होती. १८९५ मध्ये किर्लोस्कर संगीत मंडळीत प्रवेश करून अवघ्या पंधराव्या वर्षी गणपतरावांनी आपली रंगभूमीवरील कारकीर्द सुरू केली. संगीत नाटकातून भूमिका करताना त्यांनी संगीत सौभद्रमध्ये कृष्ण, संगीत शारदा मध्ये कांचनभट,मूकनायकात विक्रांत तर संगीत मानापमानात लक्ष्मीधर इत्यादींच्या भूमिका केल्या. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडल्यानंतर गोविदराव टेंबे व बालगंधर्व ह्यांच्याबरोबर गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून त्यांनी केलेल्या भूमिकांमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. एकच प्याला मध्ये सुधाकर, मानापमानातील लक्ष्मीधर, मृच्छकटिक मधील शकार, विद्याहरण मधील शिष्यवर, संशयकल्लोळमधील फाल्गुनराव या त्यांच्या प्रमुख भूमिका खूपच गाजल्या. त्यांच्या या उत्कृष्ट भूमिकांमुळे त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. जे करायचे ते चांगलेच, उठावदार, समरसून करायचे अशा भूमिकेतून बोडसांनी संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना ’वन्समोअर’ मिळवले. रंगभूमीवरील आणि रंगभूमीमागील आपल्या जीवन पटाचे दर्शन गणपतराव बोडसांनी माझी भूमिका या आपल्या आत्मचरित्रातून घडविले आहे. मराठी कलावंताने लिहिलेले हे पहिलेच आत्मचरित्र आहे. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झाले. मा. गणपतराव बोडस यांचे २३ डिसेंबर १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समाजाच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक त्याग करणाऱ्या, अतुलनीय धैर्य दाखविणाऱ्या, कठीण प्रसंगांना धाडसानं सामोरे जाणाऱ्या देशोदेशीच्या नागरिकांना ब्रिटीश महाराणीच्या नावाचा नागरी सन्मान देऊन गौरविण्याची प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली, त्याला आता जवळपास ९५ वर्षे होत आली आहेत. तेव्हाचे ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या नावाने १९१७ साली ही प्रथा सुरू केली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
यंदा यातला एक सन्मान मुंबईकर जॉन पिंटो यांना जाहीर झाला आहे. ज्ञात-अज्ञात मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे काम करणारी एक व्यवस्था ख्रिश्चन समाजामध्ये अस्तित्वात आहे. अंडरटेकर या नावाने ती परिचित आहे. जॉन पिंटो हे अशा प्रकारचं अंडरटेकिंगचे काम करणारे ख्रिश्चन समाजातलं एक समाजोन्मुख व्यक्तिमत्व. ९२-९३ सालातल्या दंगलकाळात अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठेच काम जॉन पिंटोंवर येऊन पडले, जे त्यांनी मनोभावे स्वीकारले आणि हातावेगळेही केले. जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या या सेवा उपक्रमाचे नाव.
बाबरी पतनानंतर मुंबई शहरातल्या भीषण दंगलीत हकनाक मारल्या गेलेल्या असंख्य निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे वा त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वाचे काम जॉन पिंटोंनी केले. संचारबंदी असण्याच्या त्या काळात ऑफिस उघडे ठेवण्याची आणि या अशा कामासाठी जीव धोक्यात घालून फिरण्याची मुभा पोलिसांनी दिली होती, ती फक्त त्यांच्याच संस्थेला.
पिंटो आणि त्यांची पत्नी एडना यांनी हा सेवा व्यवसाय सुरू केला तो जेकब सर्कलमधल्या एका अगदी छोटेखानी जागेत, तोही १९८१ च्या सुमारास. त्यांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे याबरोबरच मृतदेहाचे पावित्र्य राखत तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे काम पिंटोंची कंपनी करत असते. तीस वर्षांत भारतीय नागरिकांबरोबरच देशविदेशातील ज्या पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू भारतात घडले, त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम पिंटोंनी केले आहे. या व्यक्तींनी भारतात येताना आणलेलं सामान त्या मृतदेहांबरोबर पाठवणे शक्य नसते. अशा असंख्य व्यक्तींच्या सामानाची गाठोडी आजही पिंटोंच्या कार्यालयात निगुतीनं रचून ठेवली आहेत.
१५-१५, १६-१६ र्वष होऊनही त्यातल्या काही सामानाची विल्हेवाट अद्यापही पिंटोंनी लावलेली नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई महानगरावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मूठभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच शे-दीडशे निरपराध नागरिकांचे बळी घेतले. पिंटोंच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे जे काम केले ते अतुलनीयच होते. जवळजवळ ९५ टक्के मृतदेह एकटय़ा जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं उचलले. त्यातले काही परदेशी पाठवावे लागले. काहींची अवस्था इतकी भीषण होती, की ते तसेच्या तसे पाठवणं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना वाढवणे होते.
पिंटोंच्या सहकाऱ्यांना ती भीषणता घालवण्यासाठी काम करावे लागले. तब्बल पाच दिवस त्यांचे काम अथकपणे सुरू होते. ते मृतदेह ओळख पटविण्याजोग्या अवस्थेला आणून ठेवणे हे सोपे नव्हते. त्या कामाची दखल ब्रिटीश हायकमिशनने तर घेतलीच, पण अन्य अनेक देशांनीही त्या कामाचे मनमोकळे कौतुक केले. ज्या प्रकारचे काम पिंटो करतात, त्याच प्रकारचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्था वा यंत्रणा जगभर आहेत. अब्दुल सत्तार एढी यांचे एढी फाऊंडेशन पाकिस्तानमध्ये तसेच काम करते.
ब्रिटनच्या महाराणीनं दिलेल्या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ सन्मानाने त्या कामाला जगन्मान्यता मिळाली आहे, त्या कामाचा बहुमान झाला आहे. आता गरज आहे ती उशीरा का होईना भारत सरकारनं त्याची दखल घेण्याची. पिंटोंनी सन्मानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे.
आज मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांची पुण्यतिथी
जन्म:- २० जानेवारी १८९८
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मा.मास्टर कृष्णराव.
त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण मा.बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.
गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम मा. कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना मा.कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.
नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली.
मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या.
संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.
अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत.
वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा मास्टर कृष्णराव यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- ग्लोबल मराठी / विकिपिडीया
Copyright © 2025 | Marathisrushti