(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • स. पां देशपांडे

    देशपांडे, स. पां.

    शिक्षक चांगला असेल तर गणितही रंजक करता येते. प्राध्यापक स. पां. देशपांडे हे अशी किमया साधलेले हाडाचे गणित शिक्षक होते. त्यांच्या निधनाने आंतरराष्ट्रीय गणित वर्षांत गणितावर प्रेम करणारे एक उमदे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांचा जन्म शिरवळ (जि. सातारा) इथला, शालेय शिक्षणानंतर ते पुण्यात आले. गणित विषयात एमएस्सी केल्यावर त्यांनी दोन वर्षे स. प. महाविद्यालयात फिजिक्स डेमोनस्ट्रेटर म्हणून काम केले.
    नंतर ते गरवारे महाविद्यालयात दोन वर्षे गणित शिकवत. मुंबईत व्हीजेटीआय संस्थेत १९५७ ते १९६२ या काळात गणिताचे अध्यापन केल्यावर १९६२ मध्ये ते मफतलाल पॉलिटेक्निक या संस्थेत गणित विभागप्रमुख झाले. १९९० पर्यंत म्हणजे २८ वर्षे त्यांनी तेथे गणिताचे अध्यापन केले. ‘मॅथेमेटिक्स फॉर पॉलिटेक्निक स्टुडंट्स’ हे पहिले पुस्तक त्यांनी लिहिले, ते पन्नास वर्षे वापरात आहे, त्याच्या ३५ आवृत्त्या निघाल्या आहेत. १९६४ मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदविकेच्या दुसऱ्या वर्गासाठी पुस्तक लिहिले ते ४७ वर्षे वापरात आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ‘वर्कशॉप कॅलक्युलेशन’ हे पुस्तक त्यांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून लिहिले. गणित विषय खरेतर अनेकांना आवडत नाही; पण तो सोपा करून शिकवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. गणित लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी ‘रँग्लरचे ग्लॅमर’, ‘संख्यादर्शन’, ‘संख्याशास्त्राचे किमयागार’, ‘गणितानंदी कापरेकर’ अशी वेगळ्या धाटणीची पुस्तकेही सामान्यांसाठी लिहिली. अलीकडेच त्यांनी नॅशनल बुक ट्रस्टसाठी ‘कन्सेप्ट ऑफ झीरो’ हे पुस्तक लिहिले असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गेली साठ वर्षे त्यांनी एखाद्या व्रतस्थ ऋषीप्रमाणे गणितविद्या विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी गणितावर २५० लेख लिहिले. पन्नासच्या वर भाषणे दिली. रेडिओवरही त्यांनी गणितातील गमतीजमती उलगडून दाखवल्या. त्यामुळेच २००९ मध्ये मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यांना मानद सदस्यत्व दिले होते. एक प्रकारे त्यांनी गणित पत्रकारिता हा एक नवीन विषय त्यांच्या खास शैलीत हाताळला. महाराष्ट्र भाषा संचालनालयाच्या गणित परिभाषाकोशात त्यांनी लेखन केले होते. इतरही कोश वाङ्मयासाठी त्यांनी योगदान दिले.

  • महान गायक मोहम्मद रफी

    मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अजरामर महाराष्ट्र गीताचे लेखक राजा बढे

    राजा बढे हे संपादक, चित्रपट अभिनेते, गद्य लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक असले तरी त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. शाहीर साबळे यांनी तर त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे अजरामर ‘ महाराष्ट्र गीत ‘ गायले.

  • अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

    ‘हमने जिना सीख लिया ‘या हिंदी चित्रपटाद्वारे २००७ मध्ये सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला. २०१० मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

  • निलिमा भालचंद्र कढे

    ठाणे स्कुल ऑफ आर्टच्या प्राचार्य, चित्रकार व नृत्यांगना निलिमा भालचंद्र कढे म्हणजे ठाणे शहराला अभिमान असणारे कलाकार व्यक्तिमत्व त्यांनी सर जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून कलाक्षेत्रातील शिक्षण घेतलं. कला, वाणिज्य, विज्ञान, मेडिकल, इंजिनियरिंग, एम.बी.ए. इत्यादी सर्व शिक्षण शाखांची सोय उपलब्ध असलेल्या ठाणे शहरात चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्याची मात्र सोय नव्हती.

  • पं. महादेवशास्त्री जोशी

    पं. महादेवशास्त्री जोशी हे “संस्कृतिकोश”कार म्हणून ओळखले जातात. धर्म, संस्कृती आणि समाजविषयक अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे.

    जन्म :
    मृत्यू : ११ डिसेंबर १९९२

    #mss, 11 December 1992,
    Joshi, (Pt) Mahadevshastri

  • आशालता वाबगावकर

    आशालता वाबगावकर यांच्या नाट्य कारकिर्दीला ६१ वर्षे पुर्ण झाली. २८ नोव्हेंबर १९५७ रोजी आशालता वाबगावकर नाट्य कारकीर्द सुरवात झाली. आशालता नाईक हे आशालता वाबगांवकर यांचे माहेरचे नाव.

    ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून मा.आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे गोपीनाथ सावकार हे दिग्दर्शक होते. रेवतीच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध चालू झाला. काहींची भाषा योग्य नव्हती, काहींना रेवतीचे सौंदर्य नव्हते, तर काहींना गाण्याचे अंग नव्हते. मुंबई आकाशवाणीवर त्या काळी कोकणी विभागात असणारे विष्णू नाईक यांनी आशालता नाईक या मुलीचे नाव सुचवले. आकाशवाणीवर त्यांनी या मुलीची भाषा ऐकली होती. गाणेही ऐकले होते.
    घरात स्कर्ट घालणारी ही षोडशवर्षा मुलगी साडी नेसून चाचणीला आली आणि एकही प्रश्न न विचारता प्रसाद सावकारांनी तिची निवड केली. सर्व जण अवाक झाले. सावकारांना विचारताच ते म्हणाले, ‘तिचा नाकाचा शेंडा फार बोलका आहे. ही मुलगी रंगभूमीवर नाव काढील.’ त्यांची निवड योग्य ठरली. संस्थेने स्पर्धेत सादर केलेल्या ‘सं. संशयकल्लोळ’, ‘सं. शारदा’ व ‘सं. मृच्छकटीक’ या तिन्ही नाटकांत अनुक्रमे रेवती, शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठी दर वर्षी आशाताईंना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी साकार केलेल्या भूमिका अद्यापि लोकांच्या स्मरणातून गेलेल्या नाहीत. पं. गोविंदराव अग्नींनी त्यांची सर्व गाणी पारंपरिक पद्धतीने बसवली होती. त्यांची वसंत सेनेची भूमिका पाहूनच प्रा. वसंतराव कानेटकरांनी ‘हीच माझी मत्स्यगंधा,’ असे उद्गार काढले होते. म्हणून आजही मा.आशालता वाबगावकर या आपल्या दोन्ही गुरूंचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात.

    नाट्यस्पर्धांतून बक्षिसे मिळविणारी आशालता सर्वार्थाने रसिकांच्या मनात कायमची जाऊन बसली, ती मत्स्यगंधेच्या भूमिकेने. या नाटकात संवादाबरोबरच संगीताची परीक्षा तिला प्रेक्षकांसमोर द्यायची होती. जितेंद्र अभिषेकी या नव्या दमाच्या कल्पक संगीत दिग्दर्शकाचेही ते पहिलेच नाटक. त्यामुळे एक वेगळा तणाव आशाच्या मनावर येणे स्वाभाविक होते. अभिषेकींनी आपल्या कौशल्याने आशाच्या गळ्यात चपखल बसतील, अशा चाली अलगदपणे तिच्या गळ्यात उतरवल्या. आशानेही परिश्रमपूर्वक या चालींचे सोने केले. कुठलीही भूमिका साकारताना त्यासाठी अपार कष्ट घेण्याची त्यांची तयारी होती. म्हणूनच ‘भावबंधन’ नाटकात चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम) व प्रसाद सावकार (प्रभाकर) यांसारख्या मुरलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर आपल्याला लतिकेची भूमिका करावी लागणार आहे, हे समजल्यावर त्यांनी, ज्यांचा ठसा या भूमिकेवर आजही पडलेला आहे, त्या मा. नरेश यांना आपल्या घरी येऊन तालीम देण्याची विनंती केली. मा. नरेश यांनी प्रकृती अस्वस्थ असूनसुद्धा पंधरा दिवस आशाताईंच्या घरी राहून त्यांना या भूमिकेचे बारकावे समजावून दिले होते. दुर्दैवाने अल्पावधीतच त्यांचे निधन झाल्यामुळे मा. नरेश त्यांचा प्रयोग मात्र पाहू शकले नाहीत.

    पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार्या् नाटकात एखादी भूमिका साकार करणे हे जितके कठीण असते, त्याहीपेक्षा पूर्वी रंगभूमीवर येऊन गेलेल्या व प्रेक्षकांच्या मनात स्थिर होऊन राहिलेल्या, दुसर्याय कलाकाराने साकारलेल्या भूमिका करणे हे अति अवघड असते; कारण प्रेक्षकांच्या नजरेसमोर तरळत असलेल्या पूर्वीच्या अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कौशल्याचा प्रभाव स्वत:च्या भूमिकेने पुसून टाकणे हे आव्हान असते व ते पेलण्यासाठी धाडस लागते, जबर आत्मविश्वारस लागतो. आशाताईंनी हे आव्हान अनेक वेळा यशस्वीरीत्या पेललेले आहे. यात ‘रायगडाला जेव्हा जाग येते’मधील येसूबाई (सुधा करमरकर), ‘गारंबीचा बापू’मधील राधा (उषा किरण), ‘गुंतता हृदय हे’मधील कल्याणी (पद्मा चव्हाण) आणि ‘भाऊबंदकी’ नाटकात त्यांनी आनंदीबाईची भूमिका केली होती. ही भूमिका आधी दुर्गाबाई खोटे करीत असत. दाजी भाटवडेकर (राघोबादादा), मा. दत्ताराम (रामशास्त्री) अशा कसलेल्या अनुभवी कलाकारांबरोबर काम करणे सोपी गोष्ट नव्हती. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांनी आशाताईंना आनंदीबाईच्या स्वभावाचे कंगोरे समजावून सांगितले होते, मार्गदर्शन केले होते. आनंदीबाई ही राजकारण कोळून प्यालेली, आपल्या सौंदर्यावर आपला नवरा पूर्णपणे भाळलेला आहे हे जाणणारी, महत्त्वाकांक्षी स्त्री. ‘या नाटकात डोळ्यांचा आणि शब्दांचा उपयोग करा, शब्द प्रेक्षकांच्या उरी घुसले पाहिजेत,’ असा कानमंत्र दाते यांनी आशाताईंना दिला होता.

    एका प्रवेशात नारायणरावांची गारद्यांच्या हातून हत्या होताना आनंदीबाई पाहते आणि लगेच बाकी सर्वांच्या समोर त्यांचे प्रेत पाहून रडवेली होते, असा क्षणात मुद्राभिनय बदलण्याचा प्रसंग होता. सातार्यायला या प्रसंगानंतर त्यांच्यावर प्रेक्षकांतून चप्पल फेकली. त्या क्षणभर नर्व्हस झाल्या. भाषण आठवेना. रामशास्त्रीच्या भूमिकेतील मा. दत्ताराम जवळच उभे होते. ते म्हणाले, ‘मुली, ही तुझ्या अभिनयाला दिलेली दाद आहे. पुढचं वाक्य बोल.’ या व अशा भूमिकांमुळे आशा आणि आव्हान हे रंगभूमीवरचे समीकरणच झालेले असावे.

    दि गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा, अभिजात, मुंबई मराठी साहित्य संघ, माउली प्रॉडक्शन्स व आय.एन.टी. अशा सहा संस्थांमधून त्यांनी जवळजवळ पन्नासहून अधिक नाटकांचे हजारो प्रयोग केले. चंद्रलेखा या संस्थेत त्यांनी सर्वाधिक नाटके केली. ‘घरात फुलला पारिजात’मध्ये चंद्रलेखा, ‘आश्च.र्य नंबर दहा’मध्ये विमला, ‘विदूषक’मध्ये अंजली, ‘गरुडझेप’मधील सत्तरी ओलांडलेली राजमाता जिजाबाई आणि ‘वार्यायवरची वरात’मधली तारस्वरात कन्नड भाषेचे हेल काढून बोलणारी कडवेकर मामी अशा भिन्नभिन्न स्वभावाच्या भूमिकांमधून आशाताईंनी आपले नाट्यनैपुण्य प्रकर्षाने प्रगट केलेले आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात खुद्द पु.लं.च्या बरोबर काम करायला मिळणे हा त्या आपल्या आयुष्यातील भाग्ययोग मानतात.

    ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला बँडेज केले होते. असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे हालचाली करणे कठीण झाले होते. शंभरावा प्रयोग रद्द करणे योग्य नसल्यामुळे त्या तशाही परिस्थितीत भूमिका करण्यासाठी तयार झाल्या. प्रयोग सुरू होण्याअगोदर त्यांनी ही परिस्थिती प्रेक्षकांना समजावून सांगितली.

    आपली भूमिका नेहमीप्रमाणे होऊ शकत नसल्यामुळे ज्यांना पैसे परत पाहिजेत, त्यांना ते देण्याची संस्थेने तयारी दाखविली; पण एकाही प्रेक्षकाने पैसे परत घेतले नाहीत. प्रेक्षकांचा असा विश्वाोस क्वचितच एखाद्या कलाकाराच्या नशिबात असतो. हा विश्वास त्या कलाकाराच्या निष्ठेला असतो, कष्टांना असतो व प्रामाणिकपणाला असतो. आशाताईंच्या नसानसात ही निष्ठा, हे कष्ट व हा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो.

    दूरदर्शनवर आशाताईंनी एका कोकणी नाटकात भाग घेतला होता. त्यातील त्यांचा अभिनय बघून नामांकित चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी त्यांच्याबद्दल चौकशी केली. त्यांचे ‘गुंतता हृदय हे’ हे नाटक पाहिले आणि ‘अपने पराये’ या आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका दिली. अमोल पालेकर, गिरीश कार्नाड यांच्यासारख्या चित्रपटसृष्टीत मुरलेल्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना पदार्पणातच मिळाली होती. त्यांनी चित्रपट तंत्राची मुळाक्षरे बासुदांसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली गिरवल्यामुळे नंतर केलेल्या जवळजवळ दोनशेहून अधिक हिंदी व पन्नासहून अधिक मराठी चित्रपटांचा प्रवास सोपा झाला. आशाताई कधी स्तुतीने भाळल्या नाहीत किंवा निंदेने चळल्या नाहीत. रंगभूमीवर किंवा चित्रपटात डोळ्यांत पाणी आणण्यासाठी त्यांना कधी ग्लिसरीनचा वापर करावा लागला नाही, असे त्या अभिमानाने सांगतात. स्टेजवर नुसते रूप असून भागत नाही. आपण बोललेले शब्द प्रेक्षकांच्या मनाला गोड वाटले पाहिजेत. चेहरा बोलला पाहिजे. भूमिकेशी एकरूप व तन्मय झाले म्हणजे प्रेक्षक तुमचा अभिनय स्वीकारतात. प्रेक्षक हुशार असतात. त्यांना अस्सल व नक्कल यांतला फरक लगेच समजतो. याच प्रेक्षकांनी आपला अभिनय गोड मानून घेतला आणि आपल्याला उदंड प्रेम दिले, याबद्दल त्या त्यांचे ऋणही व्यक्त करतात. आशालता वाबगांवकर ह्यानी गायलेली अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, गर्द सभोतीं रानसाजणी तू तर चाफेकळी, व जन्म दिला मज त्यांनी, तव भास अंतरा झाला मन रमता मोहना ही गाणी गाजली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ डॉ अजय वैद्य

  • पॉपस्टार रेमो फर्नांडिस

    ‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ मे १९५३ रोजी झाला.

    रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या 'ओ मेरी मुन्नी' या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास 'प्यार तो होना ही था' या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास 'बॉम्बे' चित्रपटात रेमोने गायलेल्या 'हम्मा, हम्मा' या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या 'ये है जलवा' या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, इतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. रेमो फर्नांडिस यांचा पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते.

    घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून 'रॉक अराउंड द क्लॉक' नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. 'बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस' या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स -- एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू 'लेट्स रॉक' हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने 'बिट फोर' नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो.

    गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस, आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये 'ईंडियन हिप्पी' बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय. मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. 'घर की मुर्गी दाल बराबर' या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?

    गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरगुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड इजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. 'गोवन क्रेझी' नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.

    सन १९८६ पंतप्रधान राजीव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने 'हॅलो राजीव गांधी' हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना 'ड्युड, बडी' अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल. रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.
    बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जिगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं.

    १९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'हम्मा हम्मा' हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.
    या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. दिग्दर्शक अनुराग कश्यकप दिग्दर्शित ‘बॉंबे वेलवेट‘ चित्रपटातून रेमो फर्नांडिस याने अभिनय केला आहे. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या आपल्या जन्मभुमी बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणि हिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / गौरांग प्रभु

  • रोशन – कलात्मक संगीतकार

    आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. “कव्वाली” हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना “बांध” घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे.

  • हेमंत मोने

    भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांनी जुनी मोजमापे, चलन आणि परिमाणे ही बदलली. तसेच भारताचे एक राष्ट्रीय कॅलेंडर ही १९५७ साली अस्तित्वात आले.