(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण

    नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’कादंबरीवर आधारित समीर सुर्वेला यांनी ‘जजमेंट’हा मराठी सिनेमा बनवला.

  • पंडित जितेंद्र अभिषेकी

    पंडितजी संस्कृत भाषेचे पदवीधर होते ते काही काळ आकाशवाणीवर होते. जेव्हा अनेक संगीतकार , वादक यांच्याशी त्यांचा परिचय झाला तेव्हा त्यांनी अनके ठिकाणी आकाशवाणीवर आणि अनके ठिकाणी कार्यक्रम केले. पुढे त्यांना भारत सरकारने आझम हुसेन खान शिष्यवृती दिली.

  • जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे कुरेशी

    गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे.

  • मन्ना डे

    मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.

    मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस" मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात.

    मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका "(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे" (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर "घन घन माला नभी "(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बॅम्बू "हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदीतील लेखक आणि पटकथाकार मनोहर श्याम जोशी

    मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार!
    मनोहर श्याम जोशी यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेर येथे झाला.

    भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची ‘कसप’ ही कादंबरी तर हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम प्रेमकथांमध्ये अग्रेसर मानली जाते. मनोहर श्याम जोशी यांच्या 'क्याप' कादंबरी करता २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हे राम, अप्पू राजा, पापा कहते है आणि भ्रष्टाचार यांसारख्या सिनेमांसाठी पटकथा-संवादही लिहिले आहेत.

    मनोहर श्याम जोशी यांचे ३० मार्च २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गोपाळ गणेश आगरकर

    बूद्धीप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक

  • सर्जन डॉ.नित्यानंद उर्फ नितु मांडके

    त्यांची काम करण्याची उरक व अचुकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले. डॉक्टर नितु मांडके हे अतिशय कार्यक्षम सेवातत्पर प्रसंगावधानी व सर्वच रूग्णांबद्दल समान आत्मीयता व तळमळ असलेले जणु देवदुतच होते. अनेक जणांना त्यांनी मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे.

  • मयुरेश शिर्के

    मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

  • संगीतकार जोडी अजय-अतुल (गोगावले)

    सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.

    या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो.

    त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्‍यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वार्‍याचे’ हे गाणं असो किंवा ‘जत्रा’मधली ‘कोंबडी’, तसंच ‘दे धक्का’, ‘साडे माडे तीन’, ‘उलाढाल’, 'नटरंग' ‘जोगवा’, ‘बेधुंद’, ‘एक डाव धोबी पछाड’, ‘सही रे सही’ किंवा ‘लोच्या झाला रे’ सारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, ‘झी मराठी’चे गौरवगीत… अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.

    सैराट मधील ‘याड लागले‘, "झिंगाट‘, "सैराट झालं जी‘, "आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच "याड‘ लावलं.

    मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहेत.

    अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे.जोगवा या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

    अजय गोगावलेचा (Ajay Gogavale) जन्म ११ सप्टेंबर १९७४ रोजी झाला.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा

    नरेंद्रभाई चुडासामा हे ‘नाना’ चुडासामा म्हणूनच पहिल्यापासून परिचित राहिले. त्यांचा जन्म १७ जून १९३३ रोजी झाला. नाना चुडासामा यांची ओळख आय लव्ह मुंबई, जायन्ट्स इंटरनॅशनल या एनजीओं एवढीच त्यांच्या मालकीच्या रेस्टॉरंटर लावलेल्या फलकांमुळेही होती. मुंबईच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर होता आणि त्यांच्या या रेस्टॉरंटध्येही त्याच वर्गाचा वावर होता. परंतु या फलकावर व्यक्त झालेल्या भावना मात्र सामान्य मुंबईकरांच्या असंत. त्यांचे वडिल मानसिंग चुडासामा हे एकेकाळी मुंबईचे पोलिस आयुक्त होते.

    ‘जेसीज’, ‘जायंटस इंटरनॅशनल’ या समाजभावी क्लबांमार्फत उभ्या केलेल्या कामांतूनच समाजापर्यंत पोहोचले. १९७२ मध्ये नानांच्या पुढाकाराने भारतभर ‘जायंट्स’तर्फे विविध सेवाकार्ये सुरू झाली आणि नाना चुडासामा हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यातील वंचितांपर्यंत पोहोचले. लातूर, उस्मानाबादचा भूकंप, कच्छ-भुजमधील प्रलयंकारी भूकंपानंतर कमीत कमी वेळेत या संघटनेने मदतकार्य सुरू केले. जायंटसच्या आजवरच्या वाटचालीत नानांनी विविध योजना सुरू केल्या.

    कुटुंब नियोजन, शैक्षणिक मोहिमा, जलसंवर्धनाचे प्रयोग, पर्यावरण रक्षण, नेत्रदान मोहिमा, अपंग साहाय्यता उपक्रम, बेटी बचाओ अभियान, अशा अनेक मोहिमांना नानांनी बळ दिले. स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार रोखले नाहीत, तर भविष्यात एक गंभीर सामाजिक समस्या उभी राहील, हे ओळखून नानांनी समाजाच्या विविध स्तरांतील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी एकत्र आणले. ज्या मुंबईत आपण राहतो, ते शहर आपले आहे, या शहराचे पर्यावरण जपले पाहिजे, याची जाणीव प्रत्येक मुंबईकराच्या मनात जागी करून देण्यासाठी नानांनी ‘आय लव्ह मुंबई’ नावाची चळवळ सुरू केली. ही चळवळ पुढे मुंबईच्या समाजजीवनाचे एक अविभाज्य अंग बनून गेली. या चळवळीच्या माध्यमातून मुंबईत अनेक सार्वजनिक शौचालये उभी राहिली.

    मुंबईच्या नगरपालपदाची सलग दोन वेळा धुरा सांभाळणारे नाना चुडासामा हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही सामाजिक स्तरातील व्यक्तीशी समान पातळीवरून मत्री साधण्याची नानांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. विविध क्षेत्रांतील नानांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून २००५ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविले.

    जुन्या मुंबईबद्दल प्रेम असणारे आणि मुंबईच्या नव्या स्वरूपाचे स्वागत करण्यास सदैव उत्सुक असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून नाना चुडासामा यांची ओळख होती. नाना चुडासामा यांचे निधन २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट