जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला.
"शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. "शोले'प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका'बुनियाद'चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
समाजाच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक त्याग करणाऱ्या, अतुलनीय धैर्य दाखविणाऱ्या, कठीण प्रसंगांना धाडसानं सामोरे जाणाऱ्या देशोदेशीच्या नागरिकांना ब्रिटीश महाराणीच्या नावाचा नागरी सन्मान देऊन गौरविण्याची प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली, त्याला आता जवळपास ९५ वर्षे होत आली आहेत. तेव्हाचे ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या नावाने १९१७ साली ही प्रथा सुरू केली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
यंदा यातला एक सन्मान मुंबईकर जॉन पिंटो यांना जाहीर झाला आहे. ज्ञात-अज्ञात मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे काम करणारी एक व्यवस्था ख्रिश्चन समाजामध्ये अस्तित्वात आहे. अंडरटेकर या नावाने ती परिचित आहे. जॉन पिंटो हे अशा प्रकारचं अंडरटेकिंगचे काम करणारे ख्रिश्चन समाजातलं एक समाजोन्मुख व्यक्तिमत्व. ९२-९३ सालातल्या दंगलकाळात अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठेच काम जॉन पिंटोंवर येऊन पडले, जे त्यांनी मनोभावे स्वीकारले आणि हातावेगळेही केले. जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या या सेवा उपक्रमाचे नाव.
बाबरी पतनानंतर मुंबई शहरातल्या भीषण दंगलीत हकनाक मारल्या गेलेल्या असंख्य निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे वा त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वाचे काम जॉन पिंटोंनी केले. संचारबंदी असण्याच्या त्या काळात ऑफिस उघडे ठेवण्याची आणि या अशा कामासाठी जीव धोक्यात घालून फिरण्याची मुभा पोलिसांनी दिली होती, ती फक्त त्यांच्याच संस्थेला.
पिंटो आणि त्यांची पत्नी एडना यांनी हा सेवा व्यवसाय सुरू केला तो जेकब सर्कलमधल्या एका अगदी छोटेखानी जागेत, तोही १९८१ च्या सुमारास. त्यांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे याबरोबरच मृतदेहाचे पावित्र्य राखत तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे काम पिंटोंची कंपनी करत असते. तीस वर्षांत भारतीय नागरिकांबरोबरच देशविदेशातील ज्या पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू भारतात घडले, त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम पिंटोंनी केले आहे. या व्यक्तींनी भारतात येताना आणलेलं सामान त्या मृतदेहांबरोबर पाठवणे शक्य नसते. अशा असंख्य व्यक्तींच्या सामानाची गाठोडी आजही पिंटोंच्या कार्यालयात निगुतीनं रचून ठेवली आहेत.
१५-१५, १६-१६ र्वष होऊनही त्यातल्या काही सामानाची विल्हेवाट अद्यापही पिंटोंनी लावलेली नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई महानगरावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मूठभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच शे-दीडशे निरपराध नागरिकांचे बळी घेतले. पिंटोंच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे जे काम केले ते अतुलनीयच होते. जवळजवळ ९५ टक्के मृतदेह एकटय़ा जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं उचलले. त्यातले काही परदेशी पाठवावे लागले. काहींची अवस्था इतकी भीषण होती, की ते तसेच्या तसे पाठवणं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना वाढवणे होते.
पिंटोंच्या सहकाऱ्यांना ती भीषणता घालवण्यासाठी काम करावे लागले. तब्बल पाच दिवस त्यांचे काम अथकपणे सुरू होते. ते मृतदेह ओळख पटविण्याजोग्या अवस्थेला आणून ठेवणे हे सोपे नव्हते. त्या कामाची दखल ब्रिटीश हायकमिशनने तर घेतलीच, पण अन्य अनेक देशांनीही त्या कामाचे मनमोकळे कौतुक केले. ज्या प्रकारचे काम पिंटो करतात, त्याच प्रकारचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्था वा यंत्रणा जगभर आहेत. अब्दुल सत्तार एढी यांचे एढी फाऊंडेशन पाकिस्तानमध्ये तसेच काम करते.
ब्रिटनच्या महाराणीनं दिलेल्या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ सन्मानाने त्या कामाला जगन्मान्यता मिळाली आहे, त्या कामाचा बहुमान झाला आहे. आता गरज आहे ती उशीरा का होईना भारत सरकारनं त्याची दखल घेण्याची. पिंटोंनी सन्मानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे.
माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.
मोहन आपटे हे खगोल अभ्यासक व मराठीतले विज्ञान कथा लेखक आहेत. खगोलशास्त्र या विषयावर त्यांची अनेक भाषणे होत असतात.
मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली आहे.
अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
बबन प्रभू हे मराठी रंगभूमीवरील एक अभिनेता आणि नाटककार होते. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
बंडखोर लेखिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खंदी पुरस्कर्ती अशी ओळख असलेल्या नयनतारा सहगल यांचा जन्म १० मे १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील बॅरिस्टर रणजित सीताराम पंडित.
प्रख्यात मराठी उद्योगपती
कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता.
Copyright © 2025 | Marathisrushti