समाजाच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक त्याग करणाऱ्या, अतुलनीय धैर्य दाखविणाऱ्या, कठीण प्रसंगांना धाडसानं सामोरे जाणाऱ्या देशोदेशीच्या नागरिकांना ब्रिटीश महाराणीच्या नावाचा नागरी सन्मान देऊन गौरविण्याची प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली, त्याला आता जवळपास ९५ वर्षे होत आली आहेत. तेव्हाचे ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या नावाने १९१७ साली ही प्रथा सुरू केली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
यंदा यातला एक सन्मान मुंबईकर जॉन पिंटो यांना जाहीर झाला आहे. ज्ञात-अज्ञात मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे काम करणारी एक व्यवस्था ख्रिश्चन समाजामध्ये अस्तित्वात आहे. अंडरटेकर या नावाने ती परिचित आहे. जॉन पिंटो हे अशा प्रकारचं अंडरटेकिंगचे काम करणारे ख्रिश्चन समाजातलं एक समाजोन्मुख व्यक्तिमत्व. ९२-९३ सालातल्या दंगलकाळात अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठेच काम जॉन पिंटोंवर येऊन पडले, जे त्यांनी मनोभावे स्वीकारले आणि हातावेगळेही केले. जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या या सेवा उपक्रमाचे नाव.
बाबरी पतनानंतर मुंबई शहरातल्या भीषण दंगलीत हकनाक मारल्या गेलेल्या असंख्य निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे वा त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वाचे काम जॉन पिंटोंनी केले. संचारबंदी असण्याच्या त्या काळात ऑफिस उघडे ठेवण्याची आणि या अशा कामासाठी जीव धोक्यात घालून फिरण्याची मुभा पोलिसांनी दिली होती, ती फक्त त्यांच्याच संस्थेला.
पिंटो आणि त्यांची पत्नी एडना यांनी हा सेवा व्यवसाय सुरू केला तो जेकब सर्कलमधल्या एका अगदी छोटेखानी जागेत, तोही १९८१ च्या सुमारास. त्यांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे याबरोबरच मृतदेहाचे पावित्र्य राखत तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे काम पिंटोंची कंपनी करत असते. तीस वर्षांत भारतीय नागरिकांबरोबरच देशविदेशातील ज्या पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू भारतात घडले, त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम पिंटोंनी केले आहे. या व्यक्तींनी भारतात येताना आणलेलं सामान त्या मृतदेहांबरोबर पाठवणे शक्य नसते. अशा असंख्य व्यक्तींच्या सामानाची गाठोडी आजही पिंटोंच्या कार्यालयात निगुतीनं रचून ठेवली आहेत.
१५-१५, १६-१६ र्वष होऊनही त्यातल्या काही सामानाची विल्हेवाट अद्यापही पिंटोंनी लावलेली नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई महानगरावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मूठभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच शे-दीडशे निरपराध नागरिकांचे बळी घेतले. पिंटोंच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे जे काम केले ते अतुलनीयच होते. जवळजवळ ९५ टक्के मृतदेह एकटय़ा जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं उचलले. त्यातले काही परदेशी पाठवावे लागले. काहींची अवस्था इतकी भीषण होती, की ते तसेच्या तसे पाठवणं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना वाढवणे होते.
पिंटोंच्या सहकाऱ्यांना ती भीषणता घालवण्यासाठी काम करावे लागले. तब्बल पाच दिवस त्यांचे काम अथकपणे सुरू होते. ते मृतदेह ओळख पटविण्याजोग्या अवस्थेला आणून ठेवणे हे सोपे नव्हते. त्या कामाची दखल ब्रिटीश हायकमिशनने तर घेतलीच, पण अन्य अनेक देशांनीही त्या कामाचे मनमोकळे कौतुक केले. ज्या प्रकारचे काम पिंटो करतात, त्याच प्रकारचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्था वा यंत्रणा जगभर आहेत. अब्दुल सत्तार एढी यांचे एढी फाऊंडेशन पाकिस्तानमध्ये तसेच काम करते.
ब्रिटनच्या महाराणीनं दिलेल्या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ सन्मानाने त्या कामाला जगन्मान्यता मिळाली आहे, त्या कामाचा बहुमान झाला आहे. आता गरज आहे ती उशीरा का होईना भारत सरकारनं त्याची दखल घेण्याची. पिंटोंनी सन्मानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे.
समाजाच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक त्याग करणाऱ्या, अतुलनीय धैर्य दाखविणाऱ्या, कठीण प्रसंगांना धाडसानं सामोरे जाणाऱ्या देशोदेशीच्या नागरिकांना ब्रिटीश महाराणीच्या नावाचा नागरी सन्मान देऊन गौरविण्याची प्रथा ब्रिटनमध्ये सुरू झाली, त्याला आता जवळपास ९५ वर्षे होत आली आहेत. तेव्हाचे ब्रिटीश राजे पंचम जॉर्ज यांनी ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ या नावाने १९१७ साली ही प्रथा सुरू केली, जी आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे.
यंदा यातला एक सन्मान मुंबईकर जॉन पिंटो यांना जाहीर झाला आहे. ज्ञात-अज्ञात मृतदेहांवरील अंत्यसंस्काराचे काम करणारी एक व्यवस्था ख्रिश्चन समाजामध्ये अस्तित्वात आहे. अंडरटेकर या नावाने ती परिचित आहे. जॉन पिंटो हे अशा प्रकारचं अंडरटेकिंगचे काम करणारे ख्रिश्चन समाजातलं एक समाजोन्मुख व्यक्तिमत्व. ९२-९३ सालातल्या दंगलकाळात अज्ञात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे मोठेच काम जॉन पिंटोंवर येऊन पडले, जे त्यांनी मनोभावे स्वीकारले आणि हातावेगळेही केले. जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड हे त्यांच्या या सेवा उपक्रमाचे नाव.
बाबरी पतनानंतर मुंबई शहरातल्या भीषण दंगलीत हकनाक मारल्या गेलेल्या असंख्य निरपराध नागरिकांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे वा त्यावर अंत्यसंस्कार करण्याचे महत्वाचे काम जॉन पिंटोंनी केले. संचारबंदी असण्याच्या त्या काळात ऑफिस उघडे ठेवण्याची आणि या अशा कामासाठी जीव धोक्यात घालून फिरण्याची मुभा पोलिसांनी दिली होती, ती फक्त त्यांच्याच संस्थेला.
पिंटो आणि त्यांची पत्नी एडना यांनी हा सेवा व्यवसाय सुरू केला तो जेकब सर्कलमधल्या एका अगदी छोटेखानी जागेत, तोही १९८१ च्या सुमारास. त्यांनी या कामाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिलेच नाही. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना धीर देणे, त्यांचे सांत्वन करणे याबरोबरच मृतदेहाचे पावित्र्य राखत तो मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणे हे काम पिंटोंची कंपनी करत असते. तीस वर्षांत भारतीय नागरिकांबरोबरच देशविदेशातील ज्या पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू भारतात घडले, त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे अवघड काम पिंटोंनी केले आहे. या व्यक्तींनी भारतात येताना आणलेलं सामान त्या मृतदेहांबरोबर पाठवणे शक्य नसते. अशा असंख्य व्यक्तींच्या सामानाची गाठोडी आजही पिंटोंच्या कार्यालयात निगुतीनं रचून ठेवली आहेत.
१५-१५, १६-१६ र्वष होऊनही त्यातल्या काही सामानाची विल्हेवाट अद्यापही पिंटोंनी लावलेली नाही. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबई महानगरावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मूठभर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच शे-दीडशे निरपराध नागरिकांचे बळी घेतले. पिंटोंच्या सहकाऱ्यांनी ते मृतदेह बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्याचे जे काम केले ते अतुलनीयच होते. जवळजवळ ९५ टक्के मृतदेह एकटय़ा जॉन पिंटो इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडनं उचलले. त्यातले काही परदेशी पाठवावे लागले. काहींची अवस्था इतकी भीषण होती, की ते तसेच्या तसे पाठवणं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांच्या वेदना वाढवणे होते.
पिंटोंच्या सहकाऱ्यांना ती भीषणता घालवण्यासाठी काम करावे लागले. तब्बल पाच दिवस त्यांचे काम अथकपणे सुरू होते. ते मृतदेह ओळख पटविण्याजोग्या अवस्थेला आणून ठेवणे हे सोपे नव्हते. त्या कामाची दखल ब्रिटीश हायकमिशनने तर घेतलीच, पण अन्य अनेक देशांनीही त्या कामाचे मनमोकळे कौतुक केले. ज्या प्रकारचे काम पिंटो करतात, त्याच प्रकारचं काम करणाऱ्या सेवाभावी संस्था वा यंत्रणा जगभर आहेत. अब्दुल सत्तार एढी यांचे एढी फाऊंडेशन पाकिस्तानमध्ये तसेच काम करते.
ब्रिटनच्या महाराणीनं दिलेल्या ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ सन्मानाने त्या कामाला जगन्मान्यता मिळाली आहे, त्या कामाचा बहुमान झाला आहे. आता गरज आहे ती उशीरा का होईना भारत सरकारनं त्याची दखल घेण्याची. पिंटोंनी सन्मानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकी तीच भावना बोलून दाखवली आहे.