जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य दोघांमध्ये उच्चारलं गेलं नव्हतं. त्यामुळे मौनात दोघं ती टेकडी चढले आणि उतरले. खिशात पैसे बेताचे असले तरी मग आइस्क्रीम खायचं ठरलं. नंतर टॅक्सीने तिला घरी सोडायचं, असाही बेत ठरला. दोघांनाही उगाच हसू येत होतं आतल्या आत, एकमेकांकडे पाहताना मात्र चेहरा गंभीर, पण डोळे ‘देई वचन तुला’ असं सांगत होते. शेवटी त्याने तिला लग्नाचं विचारलं.. तेव्हा काही सेकंदांसाठी तिच्या घशात आइस्क्रीम अडकलं तरी ‘मला आवडेल’ एवढंच वाक्य बाहेर पडलं; पण पुढचं वाक्य कसं उच्चारायचं हे त्या २०/२१ वर्षांच्या मुलीला कळत नव्हतं. त्यानेच त्या पणला पुस्ती जोडली.. ‘लग्न केल्यावर नाटक सोडायचं नाहीस तू.’ बस्स, हेच तर हवं होतं. आता सुटकेच्या भावनेने तिला हसू फुटलं. कसाटा आइस्क्रीम महाग असल्याने पैसे संपले. मग टॅक्सी कुठली, बसच्या रांगेत उभं राहावं लागलं.. पुढची दोन वर्ष ते असे छान प्रियकर-प्रेयसीची भूमिका जगत होते. १९६० मध्ये सुलभा कामेरकर या सुलभा देशपांडे झाल्या आणि पुढे हे दाम्पत्य विलक्षण पद्धतीने शेवट पर्यत नाटक जगले..
अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..
त्यांचा मुलगा निनाद ३/४ वर्षांचा होईपर्यंत सुलभाताई नाटक सोडून घरीच रमल्या. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये, ‘रंगायन’मध्ये मात्र जात राहिल्या, कारण नाटकाचं वातावरण. त्याच इमारतीत अल्काझींची थिएटर युनिट ही हिंदी नाटकवाल्याची संस्था. सत्यदेव दुबे ती सांभाळत. ते अरविंदचे मित्र. एकदा ते अडचणीत होते. त्यांनी अरविंदला गळ घातली आणि अरविंदनी सुलभाताईंना. ‘कलकत्ता फेस्टिव्हल’मध्ये थिएटर युनिटचं नाटक सादर होणार होतं- ‘अंधायुग’. त्यातली मूळ गांधारी आजारी पडली होती. फेस्टिव्हल चार दिवसांवर आला होता. ती गांधारी (हिंदीत) सुलभाताईंनी उभी करावी म्हणून अरविंद सुलभाताईंना सांगत बसले, ‘‘रंगभूमीची तुझ्याकडून कलावंत म्हणून अपेक्षा आहे, तू हे चॅलेंज स्वीकार. आपला विश्वास आपल्यावर बसणं आवश्यक आहे. आर्टिस्ट जितका टेन्शनमध्ये तितकंच त्याचं काम चांगलं होतं. वगैरे वगैरे.’’ सुलभाताई सांगतात, ‘‘असं जगावेगळं अभिनयाचं तंत्र अरविंद मला सांगत होता आणि शेवटी मी गांधारीची भूमिका करायला तयार झाले. चार दिवस हिंदी उच्चारांसह कसून तालीम केली.’’
आणि नेमका निनाद आजारी पडला; पण अरविंदनी ताईंना गळ घातलीच, ‘‘कलकत्त्याची तयारी कर. प्रेस्टिज शो आहे. रंगभूमीची प्रतिष्ठा राखली पाहिजे.’’ सत्यदेव दुबे न्यायलाही आले, त्यांनी सुलभाताईंची बॅग घेतली. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. सुलभाताई एका मुलाखतीत म्हणतात, ‘‘तापानं फणफणलेल्या निनादने हे पाहिलं. नंतर दोन वर्ष तो दुबेंशी बोलत नव्हता.’’ ‘अंधायुग’मध्ये तेव्हा अमरीश पुरी, राजेश खन्ना हे हिंदी थिएटरचे कलावंत होते. कोलकात्याला पोचताच सुलभाताईंना तार मिळाली- ‘निनादचा ताप उतरला.’ त्या म्हणतात, ‘‘त्या दिवशी माझी गांधारीची भूमिका इतकी छान झाली की शेवटचा, कृष्णाला गांधारी शाप देते तो सीन आठवला की, अजूनही अंगावर शहारे उभे राहतात.’’
विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद देशपांडे त्या काळात दिग्दर्शित करीत होते. तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. ‘‘आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्याला कळून चालत नाही तर करणाऱ्या कलाकाराला ते सांगता आलं पाहिजे. या दिग्दर्शनाच्या मुख्य सूत्राचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. अजूनही माझा तो धडा पूर्ण झालेला नाही,’’ असं सुलभाताई नमूद केलं आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नाटक. त्या आधी सुलभाताई बऱ्याच नाटकांत कामं करीत होत्याच; पण अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केलं. एक दिवस रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. ‘शांतता..’चे प्रयोग या संस्थेतर्फे चालू राहिले. ज्या छबिलदास शाळेत सुलभाताई शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका होत्या. तिथेच ‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला. तीच छबिलदास चळवळ. रंगायननंतर ‘शांतता..’चे प्रयोग ‘आविष्कार’च्या वतीने चालू ठेवायचं ठरलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘गृहिणी सचिव’ अशीही भूमिका (प्रयोग चालू ठेवायचा) माझ्यावर येऊन पडली.’’
अरविंद यांनी या नाटकाबद्दल एका ठिकाणी लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडिस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचं तिचं स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअॅलिस्टिक पातळीवर येतं. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’’
अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.
अरविंद देशपांडे यांचे ३ जानेवारी १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/मधुवंती सप्रे
देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता.
अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
“मुसलमानी आमदानीत भारतीय संगीत” हे त्यांनी अभ्यासान्ती लिहिलेले पुस्तक, तर “भारतीय सैन्याची परंपरा” (मूळ लेखक धर्मपाल), “स्वातंत्र्याचा लढा” (बिपिनचंद्र त्रिपाठी), “भारतीय वाद्ये” (चैतन्यदेव) आदी पुस्तके त्यांनी अनुवादित केली.
कोल्हापूरजवळ वाढलेला एक तरुण केमिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतो, नंतर मिशिगन विद्यापीठात पीएचडी करतो आणि आता अमेरिकेच्या वाइडनर विद्यापीठात स्मृतिभ्रंशावरील संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतो. “अल्झायमर असोसिएशन” ची शिष्यवृत्ती मिळालेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. सचिन पाटील यांची अमेरिकेत स्वत:ची प्रयोगशाळाही आहे.
स्मृतीचे तल्लख रसायन
हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.
आगरकरांच्या लेखन कौशल्यासंदर्भात टिळक म्हणतात, “देशी वर्तमानपत्रास हल्ली जर काही महत्त्व आले असले तर ते बऱ्याच अंशी आगरकर यांच्या विद्वत्तेचे व मार्मिकतेचे फल होय यात शंका नाही.“
व्हिक्टर चेनोमिर्दिन हे रशियामध्ये आणि रशियन भाषा बोलल्या जाणाऱ्या देशांमध्ये ओळखले जायचे ते त्यांच्या भाषेच्या बेधडक वापरामुळे! त्या भाषेचे व्याकरण, त्याची सुबोधता आणि त्याची शैली या सर्वांना ओलांडून ते बोलत राहायचे. बऱ्याचदा अनाकलनीय वाटणारे, कानावर सहसा न पडणारे असे शब्दप्रयोग ते वापरत, त्यामुळे ते आता काय बोलणार, असा प्रश्न पडे. तथापि ते लोकप्रिय बनले ते त्यांच्याकडे असणाऱ्या कनवाळू आणि मानवतावादी दृष्टिकोनामुळे! कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर ते रशियाचे पंतप्रधान बनले. बोरिस येल्त्सिन रशियाचे अध्यक्ष बनले आणि चेर्नोमिर्दिन त्यांच्यासमवेत काम करायला लागले. नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेकडून खुल्या अर्थव्यवस्थेकडे रशियाला घेऊन जाण्याची किमया साधली म्हणून त्यांची आता इतिहासात नोंद होईल. 'आम्हाला अधिक चांगले काही करायचे होते, पण ते नेहमीसारखेच झाले, ' असे ते नेहमी म्हणत. त्यामुळे त्यांनाही 'नेहमीसारखेच' ओळखले जात असे. व्हिक्टर चेर्नोमिर्दिन हे एका मजुराच्या घरात १९३८मध्ये जन्माला आले. त्यांना पाच भावंडे होती. त्यांनी आपले शालेय शिक्षण १९५७ मध्ये पूर्ण केले. ऑर्कमध्ये एका तेलाच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये ते पाच वर्षे राबले. त्यानंतर त्यांनी क्युबिशेव्ह इन्स्टिट्यूटमध्ये नाव दाखल केले.
प्रवेश परीक्षेत त्यांना अतिशय बेताचे गुण मिळाले. गणिताच्या चाचणीत तर ते अनुत्तीर्ण झाले. त्यांची परीक्षा इंडस्ट्रियल पुन्हा घेण्यात आली. त्यात त्यांना 'सी ग्रेड' मिळाली. १९७२ मध्ये ' त्यांनी पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून पत्रव्यवहाराद्वारे आपला अभ्यासक्रम पुरा केला. १९६७ ते १९७३ या दरम्यान त्यांनी ऑर्कमध्ये असतानाच रशियन कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यात लक्ष घालायला सुरुवात केली. ओरेनबर्गमध्ये त्यांना नैसर्गिक वायूच्या शुद्धीकरण प्रकल्पामध्ये संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. १९७८ ते १९८२ या काळात अवजड उद्योगात त्यांना नियुक्त करण्यात आले.
१९८२ मध्ये सोव्हिएत युनियनच्या मंत्रिमंडळामध्ये ते नैसर्गिक वायू खात्याचे उपमंत्री तर १९८५ ते १९८९ या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली या उद्योगाचे सरकारीकरण करण्यात संचालकपदावर आले. १९९१च्या उत्तरार्धात सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा 'गॅझप्रॉम' या सरकारी कंपनीच्या असणाऱ्या चेर्नोमिर्दिन यांना नव्या रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी पंतप्रधानपदी नियुक्त केले.
१९९० च्या दशकामध्ये 'गॅझप्रॉम' ही कंपनी सोव्हिएत युनियनच्या चेर्नोमिर्दिन अर्थकारणाचा कणा मानली जात होती. तथापि याच दशकामध्ये ही कंपनी अपेक्षेला उतरू शकली नाही. मात्र ती २००० मध्ये सर्वाधिक नैसर्गिक वायूचे उत्खनन करणारी कंपनी बनली. १९९५ च्या एप्रिलमध्ये त्यांनी आपला एक स्वतंत्र गट 'अवर होम-रशिया' या नावाने सुरू केला. त्यानंतर लगेचच म्हणजे जूनमध्ये शामिल बसायेव्ह या दहशतवाद्याने बुदियोनोव्हस्की येथे पंधराशे जणांना ओलीस ठेवले तेव्हा त्याच्याबरोबरची बोलणी यांनीच केली.
चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतरच्या समझोत्यापायी रशियन सरकारने चेचेन्यामध्ये हाती घेतलेली लष्करी कारवाई थोपवावी लागली. बोरिस येल्त्सिन यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा ते २३ तासांसाठी रशियाच्या अध्यक्षपदीही होते. १९९८ मध्ये वानक बडतर्फ केले जाईपर्यंत ते पंतप्रधानपदी होते. त्याच वर्षी रशिया भयानक आर्थिक संकटात सापडला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना येल्त्सिन यांनी पुन्हा पंतप्रधानपदी नियुक्त केले. त्यांना आपला उत्तराधिकारी म्हणूनही त्यांनी घोषित केले, पण 'ड्यूमा'ने त्यांची ही निवड दोनदा फेटाळून लावली.
तिसऱ्यांदा ती फेटाळली गेली असती तर 'ड्यूमा'लाच विसर्जित करावे लागले असते. तो धोका न पत्करता येल्त्सिन यांनी येव्हगेनी प्रिमाकोव्ह यांना पंतप्रधानपदावर नियुक्त केले. जून २००१ मध्ये व्लादिमिर पुतिन जेव्हा रशियाचे अध्यक्ष झाले तेव्हा चेर्नोमिर्दिन यांना युक्रेनमध्ये रशियाच्या राजदूतपदी नियुक्त करण्यात आले होते. युक्रेनबरोबर रशियाचा वाद इरेला पेटला तेव्हा चेर्नोमिर्दिन यांनी युक्रेनबरोबर चर्चाच होऊ शकणार नाही असे जाहीर केले. त्या वेळी युक्रेनने चेर्नोमिर्दिन यांना 'अनावश्यक व्यक्तिमत्त्व' असे जाहीर करायची तयारी चालवली होती. अखेरीस चेर्नोमिर्दिन यांना माघार घेणे भाग पडले. ११ जून २००९ रोजी चेर्नोमिर्दिन यांना रशियन अध्यक्ष दमित्री मेदवेदेव यांनी अध्यक्षांचे खास सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.
चेर्नोमिर्दिन यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
प्रसिद्ध बंगाली व हिंदी अभिनेत्री सुमिता संन्याल यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ रोजी दार्जिलिंग येथे झाला. सुमिता संन्याल यांचे खरे नाव मंजुळा संन्याल होते. पण पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःचे नाव सुचारिता असे ठेवले. पण फिल्ममेकर कनक मुखोपाध्याय यांनी तिचे नाव सुमिता केले. त्यांनी १९६० साली बंगाली चित्रपट 'खोका बाबुर प्रत्याबर्तन'द्वारे चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. १९७० मध्ये 'सगीना महतो' चित्रपटात तिने दिलीप कुमार यांच्याबरोबर काम केले होते.
सुमिता संन्याल यांनी ४०हून अधिक बंगाली भाषेतील सिनेमे केले. तर हिंदीमध्ये त्यांनी गुड्डी, मेरे अपने, आशीर्वाद, कुहेली या सिनेमांमध्ये काम केले होते. तसेच काही हिंदी नाटक-मालिकांतही त्यांनी काम केले होते. १९७१ मध्ये आलेल्या 'आनंद' या सिनेमात सुमिता यांनी अमिताभ बच्चन यांची प्रेयसी रेणू ही भूमिका साकारली होती. आनंद’च्या लोकप्रियतेच्या काळात पंचविशी नुकतीच ओलांडलेल्या या सोज्वळ अभिनेत्रीने तिच्या अभिनय आणि रूपाने त्या जमान्यातील तरुणाईला अक्षरश: वेड लावले. सुमिता संन्याल यांनी एडिटर सुबोध रॉय यांच्याशी लग्न केले होते. सुमिता संन्याल यांचे ९ जुलै २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुमिता संन्याल यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.
इक था बचपन
https://www.youtube.com/watch?v=rqGZDkAO_8M
ना जिया लागे ना
https://www.youtube.com/watch?v=VG5YgmHANUI
ना जिया लागे ना बंगाली मध्ये गाणे
https://www.youtube.com/watch?v=cbfTaMTTdHA
झिर झिर बरसे सावनी आखियां
https://www.youtube.com/watch?v=QbwjZVo0dq0
पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
Copyright © 2025 | Marathisrushti