(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चित्रपट व नाट्य अभिनेत्री रसिका जोशी

    रसिका जोशी यांच्या नागमंडल, व्हाईट लिली आणि नाइट रायडर यांसारख्या नाटकांमधील भूमिका विशेष गाजल्या. प्रपंच या मराठी दूरचित्रवाणी मालिकेतील त्यांची भूमिका गाजली. तसेच मराठीत खबरदार, यंदा कर्तव्य आहे, अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या.

  • माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू

    इंग्रजांच्या जोखडातून भारताची मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू अशी त्यांची प्रमुख ओळख आहे. अनेक चळवळीतील त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला.

  • शिरीष कारळे

    शिरीष कारळे

    २७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांची छायाचित्रण क्षेत्रातील हुकुमत सांगून जातो. जे.जे. कलामहाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते आणि गेली २७ वर्षांत त्यांनी काळाप्रमाणेच पुढे पुढे जात आपला छायाचित्रण क्षेत्रातला आलेख उंचावला आहे. त्यांचं नाव शिरीष कारळे!

  • महेश कोठारे

    महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.

    महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.

    कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

    महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

    महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

    अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही अव्वल कामगिरी करुन मराठी रसिकांना खिळवून ठेवणारे चित्रपट निर्माण करणारे महेश कोठारे हे एक प्रमुख मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अभिनितदिग्दर्शीत केलेले धूमधडाका, दे दणादण, धडाकेबाज इ. चित्रपट अजूनही रसिकांच्या मनात रुंची घालतात.

  • अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे उद्योजक – प्रदीप ताम्हाणे

    अत्यंत मृदू आवाज, मवाळ प्रकृतीचे प्रदीप ताम्हाणे भारतीयत्वाने पेटून उठले आणि स्वत: मधील कणखर भारतीयाचे जगाला दर्शन घडवित पावडर कोटींगमधील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची निर्मिती केली. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहे. प्रदीप ताम्हाणेंसारखे देशभक्त उद्योजक हे खऱ्या अर्थाने भारताचं नाव समृद्ध करत आहेत. अशा या मराठमोळ्या उद्योजकाच्या महान कार्यास मानाचा मुजरा आणि खुप खुप शुभेच्छा…!!

  • आस्ताद काळे

    आस्ताद काळे

    आस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.

  • प्रमिला दातार

    प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले.

  • धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके

    भारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा – या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्‍या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके.

  • वसंत वासुदेव परांजपे

    वसंत वासुदेव परांजपे हे भारताचे चीनमधील माजी राजदूत होते. भारत आणि चीन यांच्यात अगदी जवळीकीचे संबंध असायला हवेत, असे परांजपे यांना वाटत असे, त्यासाठी ते त्यांच्या मार्गाने प्रयत्नही करत असत. चीनमध्ये त्यांचा मित्रवर्ग आणि चाहतावर्ग मोठा होता.

    चीनमध्ये ते चिनी भाषा शिकायच्या उद्देशाने गेले आणि ती शिकून होताच त्यांना परराष्ट्र सेवेत घेण्यात आले. परराष्ट्र सेवेत त्यांना आधी चीनचाच विभाग सांभाळण्यास सांगण्यात आले. त्यानंतर लगेचच त्यांना चीनमध्ये काम करायची संधी मिळाली. त्यांची निवड पंडित नेहरूंनी केली होती. ते १९७४ ते १९७८ या काळात ते इथियोपियामध्ये राजदूत होते. १९७८ ते १९८२ या काळात दक्षिण कोरियामध्ये त्यांची राजदूतपदी नियुक्ती झाली. भारतीय परराष्ट्रसेवेतून ते १९८२ मध्ये सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते कधीच स्वस्थ बसले नाहीत. त्यांचा चीनविषयीचा अभ्यास चालूच राहिला.

    भारतात परतल्यावर ते गुरूवर्य रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. परांजपे हे फर्ग्यूसन महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्यांनी मॅट्रिकमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली होती. बी.ए.ला त्यांनी भाऊ दाजी लाड शिष्यवृत्ती मिळवली. १९४७ ते १९५० या काळात चीनमधले शिक्षणही त्यांनी चिनी शिष्यवृत्तीवर केले.

    परांजपे यांचे चिनी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांचा चीनविषयक गाढा अभ्यास पाहून भलेभले राजकारणी आणि परराष्ट्र सेवेतील अधिकारी थक्क होऊन जात. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्या विद्वत्तेचे चाहते होते. पंडित नेहरू यांच्या चीन भेटीच्या वेळी परांजपे हे त्यांचे दुभाषा प्रतिनिधी होते. चीनचे तेव्हाचे पंतप्रधान झाऊ एन लाय यांच्याशी नेहरू यांनी केलेल्या सर्व राजकीय चर्चेचे ते नुसते साक्षीदारच नव्हते तर त्या चर्चेतले उत्कृष्ट संवादकही होते.

    १९५४ मध्ये माओ झेडाँग यांच्यातल्या चर्चेचेही ते संवादक होते. १९६० मध्ये नेहरू आणि झाऊ यांच्यात यांगून, नवी दिल्ली आणि बीजिंगमध्ये झालेल्या चर्चेत त्यांचा दुभाषा या नात्याने सहभाग होता. बांडुंगमध्ये पार पडलेल्या शिखर परिषदेला नेहरूंनी आपल्याबरोबर परांजपे यांना घेतले होते.

    परांजपे यांना चिनी भाषेतही वेगळ्या नावाने ओळखले जात होते. ‘बै चुनहुई’ या नावाने ते परिचितांमध्ये ओळखले जात. पन्नासच्या दशकात जेव्हा ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या घोषणेचे दिवस होते तेव्हा चीनमध्ये काम करायला मिळणे हाही त्यांच्या दृष्टीने मोठा योग होता.

    त्यांच्याविषयी ‘हिंदू’ दैनिकात लिहिताना सुजन चिनॉय यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चिनॉय हे तेव्हा भारताच्या परराष्ट्र खात्यात चिनी विभागाचे सहसचिव म्हणून काम पाहात होते.

    त्यांचा वेषही अगदी साधा असे. साधा खादीचा अध्र्या बाह्यांचा शर्ट, विजार आणि पायात स्पोर्ट्स् शूज!. ते पुणे शहरात वयोवृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या ‘अथश्री’ प्रकल्पातले पहिले रहिवासी. तिथेही ते साधेपणानेच राहायचे, असे डॉ. विश्वास मेहेंदळे सांगतात.

    नेहरू काळापासून परांजपे यांचे चालू असलेले चीनविषयक प्रेम अगदी अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होईपर्यंत चालूच होते. राजीव गांधी पंतप्रधानपदी आले तेव्हा त्यांचाही बीजिंगचा दौरा निश्चित झाला. डिसेंबर १९८८ मध्ये त्यांच्याबरोबर दुभाषा म्हणून कोण जाऊ शकेल याविषयी चर्चा सुरू झाली तेव्हा परराष्ट्र कचेरीत पुन्हा एकदा परांजपे यांचेच नाव घेतले गेले. राजीव गांधींच्या दौऱ्यातही त्यांचा समावेश झाला.

    गेल्या वीस वर्षांमध्ये चीन बराच बदलला असल्याचे मत परांजपे यांनी आपल्या नोंदींमध्ये केले आहे. चीन बदलला म्हणजे त्याचे आणि भारताचे संबंधही सुधारतील, असे भाकीत त्यांनी केले होते. १९८७ ते १९९१ या काळात चीनमध्ये राजदूतपदी सी.व्ही. रंगनाथन होते. ते लिहितात की, चीनमध्ये आपले आगमन होण्यापूर्वी तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी पी. एन. हक्सर आणि परांजपे यांना चीनमध्ये पाठवले होते. हक्सर हे राजीव गांधी यांचे खास दूत होते. रंगनाथन पोहोचले त्याच दिवशी त्यांना प्रा. वू शियाओफिंग यांनी मेजवानीसाठी पाचारण केले. शियाओफिंग हे बीजिंग विद्यापीठात संस्कृत शिकवायचे. ते परांजपे यांचे खास मित्र. त्या प्रसंगी त्यांनी कालिदासाचे मेघदूत आपल्याला मुखोद्गत असल्याचे दाखवून सर्वाना चकित केले होते. परांजपे यांना मात्र ते नवीन नव्हते. त्यांच्या मित्रपरिवारात ‘रामचरितमानस’चे चिनी भाषेत रूपांतर करणारे प्रा. जी. शियालिन, इंदिरा गांधी यांचे शांतिनिकेतनमधले सहाध्यायी प्रा. जिंग दिंगहान यांचाही समावेश होता. त्यांच्या चीनविषयीच्या ज्ञानाने प्रत्येकजणच भारावून गेल्याचे पाहायला मिळायचे.

    ८ एप्रिल २०१० रोजी त्यांचे निधन झाले.

    (संदर्भ : भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांची माहिती, लोकसत्ता मधील व्यक्तिवेध सदर.)

  • मुग्धा चिटणीस

    मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले.