(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व्ही शांताराम

    शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला.

  • विष्णु नारायण भातखंडे

    शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व व स्वरलिपीचे जनक

  • मराठी नाट्य अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक दत्ता भट

    “सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.

  • महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

    महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबई येथे झाला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे, आई स्व.मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.

    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उध्दव यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.

    उद्धव ठाकरे जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.

    उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे २००२ च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले.

    २००३ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आणि २००४ मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
    उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी पाटणकर यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत.

    आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवा सेनाप्रमुख असून २०१९ च्या निवडणुकीत ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

    महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या २०११ मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.

    शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणार्याा शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.

    ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण केले. विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी केली. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश संपादन केले आहे. आता तर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे, तसेच शिवसेनेने राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळविले आहे.

    उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि आता राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.

    उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सहकार्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्राला विविध आघाड्यांवर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लाभले आहे.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रेमानंद गज्वी

    प्रेमानंद गज्वी हे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद गज्वी यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं.

  • भारतातील पहिले इलेक्ट्रिक गिटार वादक व्हॅन शिप्ले

    व्हॅन शिप्ले एक महान वादक व संगीतकार होते. त्यांनी १५०० हून अधिक चित्रपटां मध्ये गाणी वाजवली होती. ५० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा बरसात चित्रपटाच्या यशाने त्यांचे नाव एचएमव्ही या रेकॉर्डिंग कंपनीच्या चित्रपटातील गाण्यांच्या इंस्ट्रुमेंटल आवृत्त्यांचे रेकॉर्डिंग करणारे ते पहिले होते. एचएमव्हीने त्यांना वैयक्तिक वादक म्हणून साइन केले. त्यांचे पहिला रेकॉर्ड गिटारवर सादर केलेला तुम भी भूल दो (जुगनू)चे गाणे होते.

  • भावगीत गायिका मालती पांडे बर्वे

    ‘खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.

  • ना. धों. ताम्हनकर

    आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या.

  • जयंत श्रीधर एरंडे

    (जन्म १९४५)
    एम.एस्सी. (भौतिकी)
    निवृत्त उपमहासंचालक - प्रसार भारती,

    आकाशवाणी कार्यक्रम निर्मिती, वर्तमानपत्रे-मासिके यात लेख, पुस्तक, लेखन, परिसंवाद-मेळावे यांचे आयोजन,

    साई दर्शन, ए-२०४, रामबाग, स्वामी विवेकानंद रस्ता,
    बोरिवली(प.), मुंबई ४०००९२, फोन : २८०५९५४२

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

  • ख्यातनाम शास्त्रीय संगीतकार व गायक के. जे. येसूदास

    गोरी तेरा गांव बड़ा प्यारा', 'सुरमई अखियों में', 'दिल के टुकड़े-टुकड़े करके', 'जानेमन-जानेमन तेरे दो नयन', 'चांद जैसे मुखड़े पे', ‘निसा गमा पनी सारे गा’ या सारखी अप्रतीम गाणी देणारे येसुदास यांचे वडील मल्याळम शास्त्रीय संगीतकार होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी झाला. त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, वयाच्या सात वयाच्या वर्षी कोची स्थानिक स्पर्धा भाग घेतला तेव्हा सुवर्णपदक जिंकले. सुरवातीचे संगीत प्रशिक्षण त्यांनी R.L.V. संगीत Thrippunithura अकादमी येथे केले. मा.येसुदास गाण्याची निवड फारच विचार पूर्वक करीत असतात. सध्याच्या पध्दतीची गाणी त्यांना आवडत नाहीत. १९७० च्या पासून येसूदास हिंदी गाणी गात आहेत. मा.येसूदास यांनी १४ भाषेत जवळजवळ आज पर्यत ४५००० गाणी गायली आहेत. त्यांनी मल्याळम, तामिळ आणि हिंदी मध्ये पण गायली आहेत. ते मल्याळम चित्रपट उद्योगात जास्त प्रसिद्ध आहेत. पहिले हिंदी गाणे गायन सुरु केले तो चित्रपट जय जवान जय किसान होता, पण पहिला प्रदर्शित चित्रपट छोटी छोटीसी बात होता. मा.येसूदास यांनी अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्या साठी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी याच्या समावेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्याचा एक मुलगा विजय येसूदास, हा गीतकार आहे. मा.येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व तो प्राप्त करणारे ते देशातील एकमेव गायक आहेत. मा.येसुदास हे फक्त गायक नसून दक्षिण भारतीय भाषेत 'वडाक्कुम नाथम', 'मधुचंद्र लेखा' और 'पट्टनाथिल सुंदरन' असे निर्माता म्हणून चित्रपट बनवले आहेत. भारतीय संगीतात मोलाचे योगदान दिल्याने केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम 'स्वाती पुरस्कारम' हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. २००२ मध्ये भारत सरकारने 'पद्म भूषण' देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    काही येसूदास यांची गाणी
    जब दीप जले आना
    तु जो मेरे सूर मे
    सुरमई अखीयो से
    माना के तुम
    गोरी तेरा गाव बडा प्यारा
    निसा गमा पनी सारे गा
    मराठी गाणी येसूदास यांची
    दूर दूर जाऊ या
    वेली वेली उमले कळी