(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टेबलटेनिस चॅम्पियन ममता प्रभू

    वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला.

  • शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा

    शॉटगन म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म ९ डिसेंबर १९४५ रोजी झाला. शत्रुघ्न सिन्हा हे बिहारच्या उच्च शिक्षित कुटुंबातील सदस्य आहेत. चारही बंधूंची नावे राम, भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण अशी आहेत. वडिलांची इच्छा नसतानाही ते पुण्याला आले होते. फिल्म्स & टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटची प्रवेश परीक्षा तो उत्तीर्ण झाला होते. या संस्थेत राजकपूर भेट द्यायला आले होते. भेटीचा कार्यक्रम उरकल्यावर जाताना त्यांनी शत्रूला त्याच्या मित्रांसह मुंबईला शुटींग पाहण्यासाठी बोलवले. ते तिथे जाऊन त्यांना भेटले. जुहूमधील मा.शत्रुघ्न यांच्या बंगल्याचे नावही ‘रामायण’ आहे. त्यांच्या मुलांची नावे लव आणि कुश आहेत.

    शत्रुघ्न सिन्हा यांनी १९६९ मध्ये `साजन’ चित्रपटाद्वारे सिनेमासृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यांनी आतापर्यंत २०० हिंदी चित्रपटांसह बंगाली आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले आहे. त्यांच्या सिनेमामधील अनेक डॉयलॉग आजही प्रसिद्ध आहेत. कालीचरण, विश्वनाथ, ब्लॅकमेल, दोस्ताना, शान आणि काला पथर हे त्यांची काही नावाजलेले सिनेमे आहेत. चित्रपटात काम केल्यानंतर सध्या ते राजकारणात कार्यरत असून सध्या बिहार तालुक्यात पाटणा साहिब क्षेत्राचे लोकसभेचे खासदार होते. अभिनेता म्हणून लोकप्रिय झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी राजकारणातही जगन्मैत्री टिकवण्याचा प्रयत्न केला. पत्रकार भारती प्रधान यांनी सुमारे सात वर्षांपर्यंत विविध शहरांमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांशी चर्चा करून शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवन, प्रेम आणि करिअरवर ‘एनिथिंग बट खामोश’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. शत्रुघ्न एका चित्रपटात आपल्या भारदस्त आवाजामध्ये ‘खामोश’ म्हणाले होते. तेव्हापासून ते विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जनतेच्या आग्रहाखातर ‘खामोश’ हा डायलॉग म्हणतात.

    सिनेस्टार काही प्रमाणात आपल्या प्रयत्नातून आणि काही प्रमाणात चाहत्यांच्या सहकार्याने स्वत:ची प्रतिमा तयार करतो. शत्रुघ्नसारख्या बडबड्या व्यक्तीच्या प्रतिमेसोबत ‘खामोश’ शब्द कसा काय जोडला गेला, हे कुणालाही कळालेले नाही. आपल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेल्या शत्रुघ्न आणि अमिताभ यांच्यात नंतर कटुता आली. त्यांनी यश जोहर यांचा पहिला चित्रपट ‘दोस्ताना’मध्ये एकत्र काम केले होते.

    शत्रुघ्न यांनी रिना रॉयसोबत प्रेमप्र करण गाजले होते, पण लग्न पूनम यांच्यासोबत केले. १९६८ मध्ये पूनम या मिस यंग इंडिया म्हणून निवडली गेल्या होत्या. पूनम यांनी जोधा-अकबर’मध्ये तिने बादशहाच्या आईची भूमिका अत्यंत विश्वासार्हतेने साकारली आहे. शत्रुघ्न यांचा स्वभाव बडबड्या असला, तरी पूनम शांत स्वभावाच्या म्हणून ओळखल्या जातात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

  • गायिका सावनी शेंडे

    सावनी शेंडेला स्वरांचा वारसा घरातूनच मिळाला आहे. तिचा जन्म १८ ऑगस्ट १९७९ रोजी झाला.आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या रूपाने गाण्याची शाळाच सावनीच्या घरी होती. कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या गायिका; तसेच संगीत नाटकाच्या पिढीतील उत्तम कलाकार होत्या.

    वडील डॉ. संजीव शेंडे यांनाही शोभा गुर्टू यांचे मार्गदर्शन लाभले. दादरा, ठुमरी अशा उपशास्त्रीय गायनात त्यांचा हातखंडा आहे. लहानपणी आजीचा आणि वडिलांचा रियाज कानावर पडल्याने हळूहळू तिचा कान गाण्यासाठी तयार होऊ लागला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणीच सावनीची क्षमता उमगल्यामुळे तिचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. त्यानंतर बाराव्या वर्षी तिला राष्ट्रपतींसमोर गाण्याची संधी मिळाली.

    सावनीने आजीकडून किराणा घराण्याचे, तर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, बंगळुरू यांसह देशभरात विविध ठिकाणी तिचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. सावनीने "कैरी' या मराठी चित्रपटासाठी पार्श्व गायन केले आहे. "सावली' चित्रपटासाठी सावनी यांना पुरस्कारदेखील मिळाला आहे. पं. जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा मेमोरिअल पुरस्कार अशा पुरस्कारांच्या सावनी मानकरी आहे.

    "झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी हिने गायले आहे. त्यासाठी तिला "रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे. "हृदय स्वर' हे सावनीचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात तिने स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:-इंटरनेट
    http://www.sawanishende.com/

  • पद्माकर शिवलकर

    शिवलकरांच्या २८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ते एकूण १२४ प्रथम दर्जाचे सामने खेळले. त्यांपैकी ४२ सामन्यांत, म्हणजे तीनपैकी एका सामन्यात त्यांनी एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला होता. पद्माकर शिवलकर यांना गाण्याचा छंद होता.

  • सॅक्सोफोनचे जादूगार मनोहारी सिंग

    मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.

    त्यांचा जन्म ८ मार्च १९३१ रोजी झाला.त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.

    १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सितारों से आगे’ या चित्रपटातील गाण्यांसाठी संगीतकार एस. डी. बर्मन यांनी मनोहारी सिंग यांना संधी दिली. ‘सट्टा बाजार’ चित्रपटातील ‘तुम्हे याद होगा’ या गाण्यातील त्यांचे सॅक्सोफोनवादन लोकप्रिय झाले होते. ‘सबसे बडा रुपैया’ आणि ‘चटपटी’ या दोन चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणूनही ते काम पाहत होते.

    शालिमार चित्रपटातील 'हम बेवफा हरगीज न थे', दाग चित्रपटातील 'मेरे दिल मे आज क्या है', मेरा साया चित्रपटातील 'तू जहॉं जहॉं चलेगा मेरा साया', कटी पतंगमधील 'ये शाम मस्तानी', मेरे जीवन साथीमधील 'ओ, मेरे दिल के चैन', शोरमधील 'एक प्यार का नगमा है' तसेच 'दर्या किनारे एक बंगला ग पोरी' अशा शेकडो गाण्यांना त्यांनी सॅक्सो फोनच्या सूरांचा साज चढविला. त्यामुळे त्या गाण्यांची लोकप्रियता वाढली.

    शंकर-जयकिशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत-पॅरेलाल आदी नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा नेपाळ सरकारने गौरव केला होता. मनोहारी सिंग यांचा ‘सॅक्स अपील’ नावाचा अल्बमही प्रकाशित झाला होता.

    मनोहारी सिंग यांचे १३ जुलै २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चित्रपट अभिनेत्री डिंपल कापडिया

    राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुल प्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी झाला. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषीकपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता."बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.

    १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली. "सागर" चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश", "द्रिष्टी", "लेकिन" आणि "रुदाली" या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला चित्रपटात महत्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है","प्यार मे ट्विस्ट, "फिर कभी", "तुम मिलो तो सही", "बिईँग सायरस","लक बाय चान्स","दबंग", "पटियाला हाऊस" आणि "कॉकटेल" मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • ज्येष्ठ चित्रकार आर.व्ही. ऊर्फ बाबा पाठक

    बडोद्याहून इ.स. १९४० मध्ये मुंबईत आल्यानंतर बॉम्बे आर्ट सोसायटी गॅलरीमध्ये बाबा पाठक यांनी भरविलेले प्रदर्शन खूप गाजले होते. हा काळ स्वातंत्र्यसमराचा होता. त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी पुण्यात आल्यावर स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. त्यांच्या अटकेचे वॉरंट निघाल्यावर बाबा काही वर्ष भूमिगत राहिले.

  • आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक

    मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.

  • अशोक रामचंद्र शिंदे

    श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता', `नवशक्ती', `सकाळ', `अर्थनीती', `युगधर्म' अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारदेखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या ६७ वर्षे जुन्या `दै. युगधर्म' या दैनिकाचे ते मुंबईचे ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातील `दै. देश', `दै. उद्याची खबर आज', `दै. विदर्भ पुकार' या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

    पूर्णवेळ पत्रकारिता करत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रातील वार्तांकनं तसेच लेखन केले आहे. व्यसनमुक्ती तसेच अवैध दारूचे धंदे, व्यसनापायी होणारी सामाजिक हानी, राजकारणात सत्शीलपणा येण्यासाठी आग्रही राहिलेले त्यांचे लेखन, विविध सामाजिक बाबी आदी विषयांवर त्यांनी गेल्या २३ वर्षांमध्ये नियमितपणे व सातत्याने लिखाण केले आहे. त्याच्या उपयोग महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक बातमीमागे त्याची वस्तुनिष्ठता तसेच त्याचा सापेक्षपणा ठळकपणे अधोरेखित होतो.

    अनेक चरित्रपर व मार्गदर्शनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कांची कामकोठी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबरोबरच अन्य कामिगरींमध्ये त्यांचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कृषी प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यास करून पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूकदेखील केलेली आहे. त्याची अनेक उदाहरणे आहे. आपल्या लिखाणातून राज्यातील असंख्य वाचकांवर शासनाच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांचे तसेच योजनांचे विवेचन विश्लेषणात्मक रुपाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या योजनांचे स्वरुप समजून त्याचा उपयोग कल्याणकारी कार्यासाठी करून घेण्यास हातभार लागला आहे. गेली पाच वर्षे सलगपणे ते विधिमंडळाच्या अधिवेशनांचे वार्तांकन करत असल्यामुळे शासकीय कामकाजांना त्यांनी वृत्तपत्राच्या माध्मयातून प्रसिद्धी देऊन जनमानसांपर्यंत शासनाचे विविध कार्य पोहचवले आहे.

    व्यसनमुक्तीच्या उपक्रमांना आपल्या लिखाणातून प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विविध विकास कामं, योजना यांच्याशी संबंधित माहिती, त्याच्यावरील विश्लेष्ण तसेच त्याच्या प्रचारासाठी सातत्याने त्यांच्याकडून होत असलेल्या लिखाणातून राज्याच्या विकासकार्यात त्यांचेदेखील भरीव योगदान काही प्रमाणात लाभत आहे.

    भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे साहित्य संमेलन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित केले. त्यालादेखील राज्यभरातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
    त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश आत्मचरित्रपर लिखाण असून त्यात राजकीय नेते शरद पवार, विक्रमराव सावरकर, पी. एस. लाड, उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर `लघुउद्योजकांच्या दुनियेत' हे त्यांचे पुस्तक तत्कालिक उद्योगमंत्री लिलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

    केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ, कुर्ला व श्रमिक पत्रकार संघटना असलेल्या भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०१७ या दिवशी पत्रकारितेतील उल्लेखनीय व समर्पित कार्याबद्दल व श्रमिक पत्रकार म्हणून २५ वर्षे कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांची परिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

    मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत त्यांना न्यायालयीन खटल्याच्या न्यायप्रक्रियेत पत्रकार व समाजसेवक म्हणून सहभागी करून घेतले जाते.

    कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात मोलाची भूमिका बजावली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या भव्य संमेलनाच्या आयोजनापासून ते संपूर्ण संमेलन पूर्ण होईपर्यंत प्रसिद्धी समिती प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    ऋजुता फाऊंडेशनचे ते विश्वस्त असून त्यांनी महिला साहित्यिकांचे राज्यव्यापी संमेलन दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केले. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड होत्या तसेच गिरीजा किर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध महिला साहित्यिका यात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनाचे नेटनेटके आयोजन अशोक शिंदे यांनी केले व संमेलन यशस्वी केले.

    स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथ संपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद तसेच ब्रेल लिपीत त्याचे रुपांतरण करण्याचा प्रकल्प त्यांनी एकट्यानी यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळ्म, आसामी, पंजाबी, उडिया या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे.

    माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहलेल्या `शिवसेना – काल, आज आणि उद्या' या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीसाठी संपादकीय स्तरावर सहकार्य केले असून तसा उल्लेख प्रकाशकांनी प्रस्ताविकेत केला आहे.

    राजहंस प्रकाशनच्या वतीने गाजत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संदीप वासलेकर लिखित `एका दिशेचा शोध' या पुस्तकाच्या संपादकीय प्रक्रिया त्यांचा सहभाग असून तसा उल्लेख लेखकाने आपल्या मनोगतात केला आहे.

    अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित आहेत. रामचंद्र प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या तसेच अर्थनीती मासिकाच्या वतीने त्यांनी लेख, निबंध स्पर्धा अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

    श्रमजीवी वर्गात त्यांचे व्यावसायिक कार्य येत असून त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासात अप्रत्यक्षपणे भरीव योगदान दिले आहे.

  • डॉ. मोहन आगाशे

    मोहन आगाशे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटात काम करणारे लोकप्रिय अभिनेते आहेत.