जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हवाई छायाचित्रण या अनोख्या कलेत देशाच्या पटलावर स्वत:चं अढळ स्थान निर्माण करणारे गोपाळ मधुकर बोधे हे मूळचे सांगली जिल्ह्याचे. छंद म्हणून नव्हे, तर पोटापाण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षी हातात कॅमेरा घेतला.
न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत.
खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. जेष्ठ संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुम्बईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी ऑंखें. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नन्तरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले.
खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्युनन्तर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते. सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल. कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते.
कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते. संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : विकिपिडीया
ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द वृत्तपत्र वितरक व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या अरविंद दातार यांचं वितरण कार्य मुंबई ते बदलापूर, चर्चगेट ते विरार, कल्याण ते कसारा, भिवंडी, नवी मुंबई अश्या परिक्षेत्रांत आहे. आदित्य असोसिएट्सचे व अश्विनी पब्लिसिटीचे ते संचालक असून अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे
अरविंद दातार ह्यांचे वडिल अच्युत दातार हे वयाच्या १३व्या वर्षी आपले मुळगाव पनवेल तालुक्यातील वावंजेपाला येथून ठाणे शहरात उदरनिर्वाहासाठी आले. ते त.र.पुरोहित यांच्याकडे वृत्तपत्र वाटण्यासाठी नोकरीला लागले. त्यांची इनामदारी व कामकाज पाहून पुरोहित यांनी त्यांचा व्यवसाय अच्युत दातार यांच्याकडे सोपविला आणि वडिलांचा हा व्यवसाय आता त्यांचे दोन सुपुत्र अरविंद दातार आणि अरूण दातार समर्थपणे सांभाळत त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.
अरविंद दातार यांची ही सामाजिक तळमळ पाहून मिलिंद बल्लाळ यांनी त्याना ठाण्यामध्ये सुरू झालेल्या चौथ्या रोटरी क्लबच्या सदस्य पदासाठी निमंत्रण दिले. रोटरीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भुषवित ते २०११-२०१२ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष झाले.
अरविंद दातार यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या माध्यमातून वाडा, मोखाडा, जव्हार या परिसरात चेकडॅमद्वारे पाणी साठवून अनेक शेतकर्यांना लाभ मिळवून दिला. वाडा येथे तत्कालीन अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दातार यांनी शाळा दत्तक घेतली. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचा अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय जालन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झाडे लावण्याचा विक्रम केला होता.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. अशा वातावरणात शहरयार यांना शायरीची गोडी कशी लागली याचे अनेकांना आश्चर्य वाटते. त्यांचे शिक्षण बुलंदशहर आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठात झाले. अंजुमन तरक्की ए उर्दू या संस्थेत त्यांनी कारकीर्द सुरु केली. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी...’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला.
मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पीडीएच्या `घाशिराम कोतवाल’मधूनही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. सतिश आळेकरांच्या `महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरीही केली.
सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्टय़ होते. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर कुमार गंधर्वांच्या गायकीचा प्रभाव होता, व ते मान्यही करत अस. मोडक हे अखेरच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राशी संलग्न होते. आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले. ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी १० नाटके, ३६ चित्रपट, तसेच ७ हिंदी, व ८ मराठी मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या नावावर चित्रपट संगीतासाठीचे सर्वाधिक राज्य पुरस्कारांची नोंद आहे. `यशवंतराव चव्हाण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी त्यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. अमळनेरला असताना साने गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यात शाहिरांना सक्रिय सहभाग घेतला. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता आणि मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी चक्कक मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखविता आली. समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहिरांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तननाट्य लिहिली. आबुरावाचं लगीन, बापाचा बाप, ग्यानबाची मेख, आंधळं दळतंय अशी अनेक मुक्तुनाट्ये त्यांनी लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. शाहिरांनी जशी मुक्त नाट्य लिहिली, तसेच अनेक पोवाडेही लिहिले. शाहिरी कलावंतांच्या व्यथा पाहून त्यांना शासनाच्या वतीने सहकार्य मिळवून देण्याचा त्यांनी निश्चीय केला व शासनाच्या वतीने सर्वच ज्येष्ठ लोककलावंतांना अनेक सवलती मिळवून दिल्या.
लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार त्यांना देण्यात आला. याशिवाय संत नामदेव पुरस्कार, पुणे मनपाचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर, अ. भा. मराठी शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान साबळे यांच्या नावावर आहेत. सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार व संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
"जय जय महाराष्ट्र माझा‘प्रमाणेच "हरे कृष्णा हरे कान्हा‘, "दादला नको ग बाई‘, "आठशे खिडक्याज नऊशे दारं‘, "विंचू चावला‘, "या विठूचा‘, "आज पेटली उत्तर सीमा‘, "पयलं नमन‘, "बिकट वाट वहिवाट नसावी‘ आणि "मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून‘ आदी त्यांच्या आवाजातील विविध प्रकारची गाणी तुफान लोकप्रिय झाली. "माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले. शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.
१९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.
Pandurang Shridhar Apte
परिचितांमध्ये आणि कार्यकर्त्यांत त्यांची ओळख ” अजित दादा’ म्हणूनच आहे. अजित पवार यांची आई देवळाली प्रवरा येथील कदम घराण्यातील होत्या, तर शरद पवारांचे मोठे भाऊ असलेले अजित पवार यांचे वडील अनंतराव पवार हे व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टूडिओमध्ये नोकरीला होते.
Copyright © 2025 | Marathisrushti