जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राजेंद्रकृष्ण यांचे खरे नाव राजिंदर दुग्गल. शालेय वयात आठवीपासून राजेंद्रकृष्ण कविता करत असत.त्यांचा जन्म ६ जुन १९१९ रोजी जलालपूर पाकिस्तान येथे झाला.कवितेच्या वेडाने ते पुढे मुंबईत आला आणि सिनेमासाठी लेखन करू लागले. मुंबईतील त्यांचा प्रारंभीचा संघर्ष कंगवे, रूमाल विक्री करण्याइतपत कष्टाचा होता. त्या काळात अनेक गरीब मित्रांनी त्यांना आसरा दिला; १९४७ साली राजेंद्रकृष्ण पटकथाकार झाले आणि त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला ‘जनता.’ गीतकार म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता १९४७ सालचा ‘जंजिर.’
गीतकार आणि लेखक अशा दुहेरी भूमिकेमुळे त्याचा मान अधिक वाढला. मोतीलाल आणि सुरैया यांची भूमिका असलेल्या १९४८ सालच्या ‘आज की रात’ या चित्रपटामुळे ‘राजेंद्रकृष्ण’ नाव फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जाऊ लागले. ‘सुनो सुनो ये दुनियावालो बापुजी की अमर कहानी.’ हे महात्मा गांधींच्यावर राजेंद्रकृष्ण यांनी गाणे लिहिले होतं, त्याला हुस्नलाल भगतराम यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि रफी यांनी गायिलेल्या हे गाणे रेडियो सिलोन खूप गाजले. या गाण्याने राजेंद्रकृष्ण गीतकार म्हणून घरोघरी पोहोचले. कथा-पटकथाकार म्हणून राजेंद्रकृष्ण यांचे नाव हिंदी, मद्रासी सिनेमाच्या पडद्यावर झळकत होतं. तमिळ भाषेचं उत्तम ज्ञान अवगत असल्याने त्यांना सर्वत्र दक्षिणेत व दक्षिणेतील निर्मार्त्यांकडून कामं मिळत गेली. तिथे सी. रामचंद्र ऊर्फ राम चितळकर यांचा दबदबा होता. त्यांच्याशी राजेंद्रकृष्ण यांची गट्टी जमली आणि या जोडीने नंतर पुढे उत्तमोत्तम गाणी हिंदी सिनेसंगीताच्या कोषात अजरामर केली. ‘अनारकली’, ‘आझाद’, ‘आशा’ आणि सर्व जगाला वेड लावणार्याा अलबेलाची गाणी होती. सी. रामचंद्र, राजेंद्रकृष्ण या जोडीने ‘यह जिंदगी उसी की है’ (अनारकली), ‘ए दिल मुझे बता दे, तू आ गया है’ (भाई भाई), ‘मन डोले मेरा तन डोले’ (नागीन), ‘कौन आया मेरे मनके द्वारे’ (देख कबिरा रोया), ‘छूप गया कोई रे दूर से पुकार के’ (चंपाकली), ‘चल उड जा रे पंछी’(भाभी), इतना ना मुझसे तू प्यार बढा (छाया) अशी सुरस गाणी दिली. ३०० हून अधिक चित्रपटांचं गीतलेखन करणाऱ्या राजेंद्रकृष्ण यांनी अनेक चित्रपटांचं कथा, पटकथा लेखनही केलं होते.
नया दिन नयी रात, गीता मेरा नाम, बनारसी बाबू , ब्लॅकमेल, बॉम्बे टू गोवा, रखवाला, गोपी, एक श्रीमान एक श्रीमती, सच्चाई, वारीस, पडोसन, साधू और शैतान, नई रोशनी, प्यार किये जा, खानदान, ब्लफ मास्टर, छाया, नजराना, भाई भाई, नागीन, ‘पडोसन’ची पटकथा मा. राजेंद्रकृष्ण यांनीच लिहिली होती. मा.राजेंद्रकृष्ण रेस खेळण्याचा छंद होता, यात त्यांना १९६० च्या दरम्यान त्यांच्या रेस खेळण्याच्या छंदाला यश लाभलं होतं, ४९ लाखांचा ‘जॅकपॉट’ घोड्यांच्या शर्यतीत लागला होता.
काय योगायोग राजेंद्रकृष्ण यांचा जन्म ६ जून व निधन सुद्धा ६ जून. राजेंद्रकृष्ण यांचे ६ जून १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राजेंद्रकृष्ण यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=tPvqD3K8jXQ
https://www.youtube.com/watch?v=BylUftxAmvo
इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.
अभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.
अनेक दशके पंडित सी.आर.व्यास यांनी जुन्या आणि नविन रागांमध्ये बंदिशांची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. ‘राग सरिता’ ह्या पुस्तकामध्ये त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आलेला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते संतोष जुवेकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९८४ रोजी झाला. मराठी चित्रपट सुष्टित संतोष जुवेकर यांना एक डैशिंग हीरो समजले जाते. या गोजिरवाण्या घरात'मधला शेखर असो, किंवा 'वादळवाट'मधला शैलेश, टीव्ही मालिकांतल्या संतोष जुवेकरच्या या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
संतोष जुवेकर यांनी त्यानंतर काही सिनेमे केले, नाटकातही तो चमकला. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रेम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय मॉडेल होती. उज्वला राऊतने मिलिंद सोमण बरोबर किंगफिशर कैलेंडर हंट स्पर्धेत जज म्हणून काम केले होते. उज्ज्वला राऊतने Elle, Time and Official अशा मासिकाच्या साठी कव्हर गर्ल काम म्हणून काम केले आहे. उज्ज्वला राऊत पहिली भारतीय मॉडेल आहे के जिने फेमस लॉन्जरी व अमेरिकन डिझायनर विक्टोरिया सीक्रेटच्या साठी रॅम्प वॉक केले आहे.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव
मराठी अभिनेता प्रसाद ओक यांचे शालेय शिक्षण भावे स्कूल, व बीएमसीसी पुणे येथे झाले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमासारखाच एक कार्यक्रम पुण्यात चारुदत्त आफळे सादर करायचे. यात चंद्रशेखर महामुनी गायक होते. त्यांच्या टीमसोबत प्रसाद ओक कोरस म्हणून गात असत. प्रसाद ओक यांनी करिअरची सुरुवात नाटकांपासून केली होती. रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो सारेगमप या झीच्या रिअॅलिटी शोचा. प्रसाद ओक यांया आई संगीत विशारद आहेत पण प्रसाद ओक हे कधीच गाणे शिकले नाही, त्यांना उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळालीये, त्यानी आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातनं केली होती, ‘सारेगमप’ स्पर्धेतून गायक म्हणूनही प्रसाद ओक यांनी आपली वेगळी छाप उमटवली आहे. सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद ओक हे झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनले, एका वाहीनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसाद ओक यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते. आतापर्यंत ७० ते ७५ सिनेमे, ८० ते ८५ मालिका आणि २५ नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा प्रसाद ओक यांनी उमटवला आहे. ‘अवघाचि संसार’ मालिकेतली खलनायकी वळणाची भूमिकाही असो वा ‘नांदी’ नाटकातली स्त्री भूमिका, प्रसाद ओक यांनी सर्वच भूमिकांना योग्य न्याय दिला. प्रसाद ओक यांनी आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःचे मोठे फॅन निर्माण केले आहे. नांदी या नाटकात त्यांनी रुक्मीणीची भूमिका केली होती. नांदीचे एकूण १०० प्रयोग केले. ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘नांदी’ या संगीत नाटकांतील त्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक झाले. ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’, ‘असंभव’, ‘वादळवाट’ आणि ‘होणार ‘सून मी ह्या घरची’ या प्रसाद ओक यांच्या मालिका विशेष लोकप्रिय ठरल्या, ‘धतिंग धिंगाणा’, ‘खेळ मांडला’, ‘हाय काय नाय काय’, ‘फुल ३ धमाल’, ‘दोघात तिसरा’, ‘क्षण’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’ हे प्रसाद ओक यांचे गाजलेले सिनेमे.
नुकतीच प्रसाद ओक यांनी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली व ती लोकांच्या खास पसंतीस पडली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti