(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना

    लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं... ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते... कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. त्यांच्या लेखनातून बदलत्या शहरी समाज मनाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखणीतून मध्यमवर्गीयांच्या सुखदु:खाचं चित्रण केलंय.

    शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात.

    १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते.

    ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली. डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    त्यांची साहित्य संपदा ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुंग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’
    मोरावर चोर - (संमिश्र) एकांकिका 200४, पर्वणी - करमणूकपर, विनोदी, रंगसावल्या - नाटक, तिळा उघड - कथासंग्रह, वर्षाव - नाटक, मला भेट हवी हो - नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, हसत हसत फसवुनी - नाटक

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

    समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

    ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश - उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश - उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला.

    मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक - दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

    जया बच्चकन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रतिभा शिंदे

    आदिवासींसाठी अहोरात्र झटणार्‍या प्रतिभा शिंदे यांनी त्यांची बोलीभाषा, रहाणीमान आत्मसात करुन त्यांच्या सुख, दु:खात ही त्या अगदी समरस झाल्या; आदिवासी समाजातील अंधश्रद्धा विरोधात त्यांनी अनेकदा जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहेत.

  • ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम

    एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे

  • हा खेळ कुणाला दैवाचा कळला!

    आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील.

  • डॉ. सचिन पाटील

    कोल्हापूरजवळ वाढलेला एक तरुण केमिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतो, नंतर मिशिगन विद्यापीठात पीएचडी करतो आणि आता अमेरिकेच्या वाइडनर विद्यापीठात स्मृतिभ्रंशावरील संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतो. “अल्झायमर असोसिएशन” ची शिष्यवृत्ती मिळालेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. सचिन पाटील यांची अमेरिकेत स्वत:ची प्रयोगशाळाही आहे.

    स्मृतीचे तल्लख रसायन

  • मराठी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने

    आज २२ सप्टेंबर. पाच तपांहुन अधिक काळ चित्रपटसृष्टीसाठी व्यतीत करणारे व मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे दिग्दर्शक अनंत माने यांची जयंती

    अनंत माने यांचा जन्म २२ सप्टेंबर १९१५ रोजी झाला.

    ’पिंजरा’, ’लक्ष्मी’, ’सुशीला’, ’आई’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तमाशाप्रधान चित्रपटांचा सुवर्णकाळ म्हणजे पन्नास,साठ आणि सत्तरचे दशक असून या कालावधी मध्ये दिग्दर्शक अनंत माने व संगीतकार वसंत पवार अनेक सुंदर सुंदर चित्रपट रसिकांसमोर सादर केले. अवघ्या ६० हजारांत चित्रपट निर्माण करून अनंत मानेंनी मराठी चित्रपट जगवला. याचे श्रेय त्यांच्या ‘सांगते ऐका’ या तमाशापटाला द्यावे लागेल. तमाशापट हा मराठी चित्रपटांचा नवा चेहरा होता. तो मानेंनी मराठी चित्रपटांना दिला.

    वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या "सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. त्या चित्रपटाला 'चित्रपटसृष्टीच्या इतिहासातलं मानाचं पान' असे मानतात. तमाशापट काढणारे अनंत माने असा शिक्का त्यांना बसला. त्यांनी उत्कृष्ट तमाशापट तर दिलेच पण मराठमोळा तमाशा रजतपटावर आणून त्यांनी या अस्सल मराठी मनोरंजनाला एक दर्जा प्राप्त करुन दिला. आज राजकीय पार्श्वयभूमीवर अनेक मराठी, हिंदी चित्रपट आपण पाहतो. या चित्रपटांची सुरुवातही त्यांनीच ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटात प्रथम केली. निळू फुले या चित्रपटातून सर्वप्रथम चित्रपटात आले आणि पुढार्या‘च्या भूमिकेचा चेहरा या चित्रपटाने दिला. त्यानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत राजकीय पार्श्वटभूमीवरील अनेक चित्रपट त्यांनी दिले.

    सत्यकथेवरील आधारित मराठी चित्रपटही माने यांनी दिले. ‘चिमणी पाखरं’ची कथा ते राहत असलेल्या भगीरथ सदनमध्ये घडलेली कथा होती. ती त्यांनी धर्माधिकारी यांना सुचवली आणि त्यानंतर माने यांनी सत्यकथेवरील आधारित काही कथा चित्रपटात आणल्या. त्यांचा ‘सुशीला’ हा चित्रपटदेखील त्यापैकी एक. त्या काळात कोल्हापुरात पद्मा, रॉयल, प्रभात, शाहू या चित्रपटगृहांच्या परिसरात तिकिटांचा काळाबाजार करणारी एक तरुणी दिसायची. तिची कथाच आपल्या चित्रपटाची कथा बनवून मानेंनी तो चित्रपट पडद्यावर आणला. ‘एक गाव बारा भानगडी’ हा त्यांचा चित्रपट राजकीय पार्श्वकभूमीचा होता. याची कथा माझा मित्र अमृत गोरे याला वर्तमानपत्रातील एका बातमीतून सुचली होती. तीच त्याने चित्रपटात आणल्यानंतर वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेऊन तयार होणार्याा पेपर कटिंग चित्रपटांचा ट्रेंड मराठी व हिंदी चित्रपटात आला.

    हिंदी चित्रपटात फ्लॅशबॅकने सुरुवात होणारे अनेक चित्रपट आपण पाहतो. नंतर सेमी फ्लॅशबॅक कथांवरील चित्रपटांचा नवा ट्रेंड चित्रपटात आला. गुलजार यांच्या ‘कोशिश’ या चित्रपटाच्या सेमी फ्लॅशबॅकसाठीच अनेकांनी कौतुक केले होते. परंतु गुलजार यांचा उदयही चित्रपटात झाला नव्हता, तेव्हा अनंत मानेंनी ५0 च्या दशकात आपल्या ‘पुनवेची रात’ या चित्रपटात सेमी फ्लॅशबॅकचा प्रयोग सर्वप्रथम केला.

    ‘एक गाव बारा भानगडी’मधून मानेंनी निळू फुले यांना चित्रपटात पहिला ब्रेक दिलाच; पण अशा कित्येक कलावंतांना त्यांनी चित्रपटात पहिला ब्रेक दिला. राजा गोसावी, राजा परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटापासून लोकांना माहीत झाला असला, तरी त्याआधी दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटात सर्वप्रथम दिसला. या चित्रपटासाठी मानेंनीच त्यांना हेरलं होतं. त्यांच्याबरोबर शरद तळवळकरांच्या रुपेरी जीवनाची सुरुवातही या चित्रपटातून झाली. मराठीत राजा गोसावी व शरद तळवळकर यांची जोडी जमली होती. ही जोडी मानेंनी त्यांच्या ‘दोन घडीचा डाव’ या चित्रपटातच सर्वप्रथम जमवलेली. जयश्री गडकर या ‘दिसतं तसं नसतं’ चित्रपटापासून दिसत असल्या तरी त्यांचं युग खर्याय अर्थाने मानेंच्या ‘सांगते ऐका’ चित्रपटापासून सुरू झाले. ‘सांगते ऐका’ आणि ‘मानिनी’ म्हणजे जयश्रीबाईंच्या रुपेरी जीवनाची हाईट होती. या हाईटला अनंत मानेंनीच त्यांना पोचवले.

    लीला गांधी (प्रीतीसंगम), उषा चव्हाण (केला इशारा जाता जाता), उषा नाईक (पाच रंगाची पाच पाखरं) यांसारख्या अनेक नायिका त्यांनी मराठी चित्रपटाला दिल्या. ’अनंत आठवणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

    अनंत माने यांचे निधन ९ मे १९९५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इसाक मुजावर/ विकिपीडिया

  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.

    'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मोहम्मद अझिज यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
    https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA

  • जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस

    लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे , त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली.

    दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे.

    ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू..' व ' झूलो के संग..' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे. लीला चिटणीस यांनी त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. मा.लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सयाजी शिंदे

    दाक्षिणात्य चित्रपटात त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करून अभिनयाची हुकूमत गाजवली.त्यांनी जोडी नंबर १ आणि सरकार राज सारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केले आहे. त्यांनी बिग ब्रदर, जॅकपॉट,देवधर गांधी, दिशा, वास्तुशास्त्र, परवाना,दानव, लाल सलाम अशे अनेक हिट सिनेमे आपल्या अभिनयाने गाजवले.