(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रसिद्ध समीक्षक, लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर

    श्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत प्रा. श्री. के. क्षीरसागर हे शायरीचे अभ्यासक होते. टीकाकार म्हणूनही ते परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.

  • मेघा लोखंडे

    वाई तालुक्यात भुईंजमधली शिकण्याची व जगण्याची लढाई पुढे सूक्ष्मजीवशास्त्रातील संशोधनाच्या संधीसाठी झगडण्यात परावर्तित होईल, असे मेघाला वाटले नव्हते. स्पेनमध्ये पीएचडी केल्यानंतर मेघा लोखंडे हेपटायटिसमधील संशोधन पुढे नेत स्वित्झर्लंडच्या बर्न्स विद्यापीठात रुजू होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत...

    चिकाटीची झेप... भुईंज ते बर्न्स

  • भटक्या कुत्र्यांची दहशत

    ‘समर्थाघरचे श्वान, त्यास सर्वही देती मान’ असे म्हटले जाते, पण रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्यांच्या नशिबी मात्र आयुष्यभर हाड्तुड सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. परवा एक भटका कुत्रा माझ्या अंगावर भू भू करीत आला.सोबत त्याची सवंगडी खानदानही भुंकू लागली. मला त्याचे विशेष असे काही वाटले नाही. उलट मला त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांची दया आली. या कुत्र्यांसाठी माझे काहीतरी योगदान आहे. त्यांना ठाऊक नाही. खांब बघितल्यानंतर एक तंगडी वर करून घाण करणाऱ्या कुत्र्यांविषयी कविवर्य सुरेश भट म्हणतात, ‘जुना कुत्रा असो वा नवा कुत्रा, शेवटी कुत्र्याप्रमाणे वागती कुत्रे.’ मला नेहमीच किंव वाटते. कारण मी रात्री अपरात्री फिरत असतो. पण असा प्रसंग माझ्यावर कधी गुदरला नाही. या कुत्र्यांकडे आपण नेहमी भूतदयेच्या दृष्टीकोनातून पाहणे हा आपला मानवी धर्म आहे. आपण या भटक्या कुत्र्याविषयी जाणून आहात. उष्ट्या खरकट्यां अन्नाच्या ढिगात स्वत:साठी अन्न शोधीत असतात. खाण्यालायक असेल ते खातात व न खाण्यासारखे देखील खातात. पण हा उद्योग करीत असताना त्या ढिगाऱ्यातून अन्य गोष्टी बाहेर फेकल्या जातात.अस्ताव्यस्त कचरा होतो. घाण निर्माण होते. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांची दहशत सर्वत्र पसरली आहे. एकट्या माणसावर धावून जाणारी कुत्री, गाड्याच्या मागे भुंकत पळणारी कुत्री, काही कुटुंब काबिल्यासह फिरणारी, तर टोळीने फिरणारी कुत्री.... यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढीस लागला आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा कोठे तरी बंदोबस्त व्हावा या दृष्टीने आज तरी प्रयत्नांची गरज आहे. एकूणच श्वान प्रेम आणि त्यांच्याविषयीचा कळवळा या गोष्टी कितीही खऱ्या असल्यातरी आपल्याला त्यांच्या दहशतीपासून दूर राहणे किंवा त्यांच्यावर काही उपाय करण्याची वेळ आली आहे.

    वाघ आणि मांजर यात ज्याप्रमाणे साम्य आढळते त्याप्रमाणे लांडगे आणि कुत्रा यामध्ये साम्य आढळत आले आहे. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. आपल्या धन्याची, घराची शेताची राखण आदि इमानेइतबारे सेवा करीत असतो. वेळेला स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाचे प्राण वाचवितो. त्यामुळे काही मंडळीना भन्नाट प्रेम असते. ते नियंत्रणात असतात. स्वच्छ ठेवले जातात. वेळोवेळी डॉक्टर तपासतात. कुणाला घेतलेला चावा, गुरगुरणे मालकाला मात्र आपल्या बाब्या चिडला असं वाटत असतं. तर त्याने दुसऱ्याच्या जागेत जाऊन केलेली घाण आणि त्यातून उद्भवलेला तंटा... मालकाने म्हणावे ‘ह्यांना मुक्या जनावरांविषयी प्रेमच नाही.’ गमतीची एक गोष्ट आपणापुढे व्यक्त करू इच्छितो की, एका पत्रलेखकाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, कोणत्याही सिनेमात यापुढे ‘कुत्ते मै तेरा खून पी जाउंगा’ ‘कुत्ते की मौत मार दुंगा’ कुत्ते की औलाद’ अशी कुत्र्याची बदनारे संवाद उच्चारण्यास कायद्याने मनाई करावी आणि पालन न करणारावर ATROCITY अंतर्गत कारवाई करावी. ते पुढे असेही लिहितात ‘ कुत्ता मेरा साथी’ असे कुत्र्याचे महती सांगणारे चित्रपट काढेल त्याला ५०% अनुदान द्यावे. जसे वर्षातून विविध दिवस साजरे केले जातात त्याप्रमाणे भटका कुत्रा दिन सर्वत्र साजरा करण्यात यावा. हे वाचून आम्ही धन्य झालो.

    जानेवारी २०१४ मध्ये ह्युमन सोसायटी इंटरनँशनल या स्वयंसेवी संस्थेने ‘हाय-टेक’ साधनाचा वापर करीत मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यात असे आढळले की, मुंबईत दर १३० माणसामागे एक भटका कुत्रा आहे. मुंबई एकूण ९५१७२ भटकी कुत्री वावरत आहेत त्यापैकी ६६ हजार ही रस्त्यावर आहेत तर २९ हजार गल्लीबोळात बस्तान ठोकून आहेत. मुंबई पालिकेच्या सर्वेक्षणानुसार २००७ -०८ साली ४९ हजार भटकी कुत्री होती. आज दुप्पट झाली आहेत. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करूनही दिवसेंदिवस वाढणारी संख्या आणि त्याबरोबर त्यांचा वाढलेला उपद्रव चिंता करण्यासारखा आहे. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त श्री जयराज फाटक यांनी सिंगापूर धर्तीवर भटके कुत्रे दिसताक्षणी ठार करा , असा आग्रह धरला होता. पण विधी खात्याने तसे केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचे आव्हान पेलणे कठीण जाईल अशी भीती व्यक्त केली. त्यामुळे हा विषय अर्ध्यातच थांबला. घरी येणाऱ्या दैनिकात दररोज एकतरी भटक्या कुत्र्याची बातमी असते. मध्यंतरी एका खाजगी वाहनचालकाने गाडीखाली कुत्र्याला चिरडले म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. वर्तमानपत्रात कुत्रा माणसाला चावला ही बातमी होत नाही तर माणूस कुत्र्याला चावला, ही मजेशीर बातमी वूत्तपत्र उचलून धरतात. कारण तसे प्रशिक्षण दिलेले असते. गमतीची गोष्ट सांगायची झाली तर दहिसर कांदरपाडा येथून २४० क्रमांकाची बस लिंक रोडच्या दिशेने निघाली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने वाहनचालक अर्जुन खरात याने बसचा वेग वाढविला होता. अचानक एक भटका कुत्रा धावत बसखाली आला. ब्रेक करकचून दाबला गेला. त्यामुळे प्रवाशी हादऱ्याने दचकले, काही उभे राहिले. काही उत्साही मंडळी खाली उतरली. तो भटका कुत्र्याची अखेरची धडपड सुरु होती. वाहनचालक नम्रपणे गाडीत बसा म्हणून विनवीत होता. पण प्रवाश्यांपैकी एकाने पावा संघटनेच्या कार्यकर्त्याला फोन लावला. अल्पावधीत संघटनेचा कार्यकर्ता हजर झाला. त्याने आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिचारा अर्जुन खरात यांना निष्काळजीपणाने वाहन चालविल्याबद्दल अटक झाली. पण ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रात आली नाही की यावर विशेष विचारमंथन झाले नाही. इतकी दहशत भटक्या कुत्र्यांची पसरलेली आहे. हाड म्हणायला देखील नागरिक घाबरू लागले आहेत. दररोज श्वानदंशामुळे माणसेही मरत असतात. दर मिनिटाला एक अपघात होतो तर दर तीन मिनिटांनी एकजण मृत्युमुखी पडत असतो. रेल्वेच्या रुळावर दररोज दहाबारा जणांना मृत्यू येतो. त्याबद्दल कुणी फारसे दु:ख व्यक्त करीत नाही. एखाद्या माणसाने भटक्या कुत्र्यावर केलेला जीवघेणा हल्ला याबाबतीत आपण विचारमंथन का घडवून आणायचे. अंगावर धावून आलेल्या, चावा घेतलेल्या कुत्र्याला चोप देण्याचा स्व:सरक्षणात्मक अधिकार मानवाला असायला हवेत, याविषयावर चर्चा घडविली पाहिजे.

    या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायचा तरी कसा....! यांच्या दहशतीला लगाम घालणार कोण...? उपद्रवी कुत्र्यांपासून संरक्षण देणार तरी कोण....? भारतीय लोकशाहीत हे तरी आजमितीला कठीण होऊन बसले आहे. प्राणीमित्र संघटना याला कडाडून विरोध करतील. विचार करा भविष्यात या भटक्या कुत्र्याची दहशत वाढण्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. श्वानप्रेमी माझ्या लेखाविषयी गरळ ओकतील पण मी भटक्या आणि उपद्रवी कुत्र्याविषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

    अशोक भेके

  • मराठी हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे

    अश्विनी भावे यांनी १४व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९७२ रोजी झाला.अश्विनी भावे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन त्यांनी आपल्या करियला सुरुवात केली. त्यानंतर ’किस बाई किस’, ’अशी ही बनवाबनवी’, ’कळत नकळत’, ’झुंज तुझी माझी’, ’वजीर’ यांसारखे चित्रपट केले. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. अश्विनी लहानपणापासून ’ऋषी कपूर’ ची फॅन होत्या आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा ’हिना’ चित्रपटाद्वारे पूर्ण झाली. ’हिना’ हा खूप गाजला. अश्विनी भावे यांनी ऋषी कपूर बरोबर ’हनिमून’ व ’मुहब्बत की आरझू’ सारखे अजूनही काही चित्रपट केले. त्यांचे ’अशान्ते’, ’सैनिक’, ’जखमी दिल’ हे चित्रपट अक्षय कुमार सोबतचे आहेत. अश्विनी भावे यांनी मीरा का मोहन, परंपरा, कायदा कानून, चौराह, इक्का राजा रानी, वापसी साजन की व युगपुरुष या चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे दोनच चित्रपट हिट झाले, श्रीधर बरोबरचा ’भैरवी’ (१९९६) आणि जॅकी श्रॉफ बरोबरचा ’बंधन’ (१९९८). २००७ साली त्यांनी ’कदाचित’ ह्या मराठी चित्रपटामध्ये काम केले. कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना त्यांनी अमेरिकास्थित सॉफ्टवेअर इंजिनीयर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. त्यामुळे चित्रपटांत काम करणे, बंद केले. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी चार वर्षाचा ‘अॅपकॅडमी ऑफ आर्ट्स युनिव्हर्सिटी’ हा कोर्स पूर्ण केला. बऱ्या वर्षांनंतर २०१७ त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. तिने निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट ’एवढंसं आभाळ’.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • डॉ. रघुनाथ शेवगावकर

    पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा मुकुट किती काटेरी असतो, याची कल्पना डॉ. रघुनाथ शेवगावकर यांना एव्हाना येऊ लागली असेल! अर्थात, कुलगुरुपदी नियुक्ती होतानाच त्यांनी इतिहास घडवला आहे. पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविणारे ‘आयआयटी’मधील पहिलेच संशोधक होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. इतकेच नव्हे, तर अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून उच्चशिक्षण व संशोधन केलेल्या व्यक्तीकडेही हे पद प्रथमच जात आहे.

    ‘आयआयटी’ आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्था राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिकपात्र असल्या, तरी त्यांच्या कारभाराच्या व्यवस्थेमध्ये आमूलाग्र तफावत आहे. हा ‘धक्का’ डॉ. शेवगावकर यांना पचवावा लागणार आहे. तात्कालिक आंदोलनबाजीचा मुकाबला त्यांना करावा लागेलच, शिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या कार्यकालात संभवतात. महत्त्वाचे म्हणजे सुमारे हजारभर महाविद्यालये-संस्थांमधून शिकणाऱ्या सहा लाख विद्यार्थ्यांचा डोलारा विद्यापीठाला आता डोईजड होऊ लागला आहे. त्यामुळेच विद्यापीठाचे पुणे, अहमदनगर व नाशिक असे त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव जोर धरत आहे.

    मुख्य कॅम्पसमधील पदव्युत्तर विभागातून ‘आयआयटी’प्रमाणे संशोधन करायचे आणि तीन जिल्ह्य़ांमध्ये स्थानिक कॅम्पसच्या माध्यमातून विस्ताराचे उद्दिष्ट साध्य करायचे, असे पथदर्शी मॉडेल विकसित करण्यास वाव आहे. डॉ. शेवगावकर मूळचे ग्वाल्हेरचे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त केल्यानंतर मुंबई ‘आयआयटी’मधून पीएच.डी. संपादन केली. बंगलोरची रामन संशोधन संस्था व अमेरिकेतील मेरीलॅण्ड विद्यापीठातून खगोलभौतिकी विषयामध्ये त्यांनी अद्ययावत संशोधन केले.

    संगीतशास्त्रामध्येही ते पदवीधर असून सतारवादनाचा छंद त्यांनी जोपासला आहे. १९८७ पासून ते ‘आयआयटी’मध्ये संशोधन-अध्यापन करीत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्याच्या केंद्रीय प्रकल्पाचे ते समन्वयक आहेत. त्याद्वारे विद्येच्या माहेरघरातील ज्ञानगंगा अगदी जुन्नरसारख्या आदिवासी क्षेत्रातील महाविद्यालयांपर्यंत पोचविण्याची लक्ष्यपूर्ती केली जाऊ शकते. ‘आयआयटी’चे उपसंचालकपद सांभाळणाऱ्या डॉ. शेवगावकर यांच्याकडे प्रशासन-व्यवस्थापकीय अनुभवाची कमतरता नाही. त्याची कसोटी मात्र ‘पूर्वेकडील ऑक्स्फर्ड’मध्ये नक्कीच पाहिली जाईल!

  • इंदुताई गुप्ते

    इंदुताई गुप्ते ह्या ठाणे शहर महिला मंडळाच्या सक्रीय सदस्या होत्या! या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसंच आर्थिक क्षेत्रांमध्ये ठाणे नगरीला प्रगतीपथावर घेवून जाणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली. १९६० साली त्यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. १९४९-१९५० सालापासून त्यांनी हरिजन वस्तीत जावून संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याचा, कल्पक व अभिनव प्रकल्प आखून आदिवासी महिलांच्या आयुष्यात स्वयंसिध्दतेची नवी पहाट आणण्याचा वसा त्याकाळी हाती घेतला होता.

    अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी, त्यांच्या इतर महिला सहकार्‍यांसोबत इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुध्दा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना व मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक महिलांना शिवणकामात पदविका प्राप्त करता आल्यामुळे व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला .

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण

    १९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.

  • कलामहर्षी बाबूराव पेंटर

    दादासाहेब फाळके यांनी सिनेमा कलेला जन्म दिला. पण त्या कलेचे संगोपन करून ती फुलवली कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी! त्यांचा जन्म २ जून १८९० रोजी झाला. ‘बाबूराव’ करवीर नगरीतील म्हणजे त्या काळच्या कोल्हापूर संस्थानातील एक असामान्य कलावंत! बाबूरावांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री. लाकूडकाम, मूर्तिकला आणि चित्रकलेतील त्यांचे असामान्य कौशल्य पाहून कोल्हापुरातील चाहत्यांनी त्यांचे नामकरण बाबूराव पेंटर केले. ते एक चतुरस्र् कलाकार होते. कलाव्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मुंबईत १९०८-०९च्या सुमारास फोटोग्राफीचा स्टुडिओ सुरू केला. पुढे केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या नाटकांसाठी पडदे रंगवले, इतकेच नव्हे तर त्यांनी ‘गंधर्व कंपनी’ला वेशभूषा, अलंकार, आभूषणे इत्यादींची डिझाइन्सही करून दिली. स्मारक-शिल्पे करण्यात तर त्यांचा हातखंडा होता. ज्या काळात चित्रपटनिर्मितीसाठी लागणा-या मूलभूत सुविधा, यंत्रसामग्रीही उपलब्ध नव्हती, त्या काळात बाबूरावांनी चित्रपटनिर्मितीचे साहस केले. १९१७ मध्ये कोल्हापूरला त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ स्थापन केली व जवळजवळ २६ चित्रपटांची निर्मिती केली. ‘सावकारी पाश’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. हा चित्रपट चित्रपटनिर्मितीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड समजण्यात येतो. झुंजारराव पवार, व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, अनसूयाबाई आदींनी त्यात भूमिका केल्या होत्या.

    बाबूराव हे स्वत: उत्तम इंजिनीअर व संकलक होते. आपल्याला चित्रीकरणासाठी लागणारा हवा तसा कॅमेरा त्यांनी स्वत: बनवून घेतला होता. ते सिनेमाचे पोस्टर, फोटो पाहूनच आपले आगामी सिनेमाविषयीचे मत बनवणार, हे गृहीत धरून बाबूरावांनी आपल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’च्या ‘सिंहगड’ (१९२३) या चित्रपटाची लक्षवेधक पोस्टर्स तयार करून ग्रँट रोडचे ‘नॉव्हेल्टी थिएटर’ असे काही सजवले-नटवले की, त्या काळी अर्धी मुंबई खास ‘नॉव्हेल्टी’ पाहायला तिथे लोटली होती. त्यांचे ‘सिंहगड’चे पोस्टर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण त्यांच्या ‘सतिसावित्री’, ‘कल्याण खजिना’, ‘सावकारी पाश’,‘शाहीर रामजोशी’ आदी चित्रपटांची पोस्टर्स, ‘उषा’ चित्रपटांचे बुकलेट आजही पाहायला मिळते, ही सर्व चित्रे म्हणजे दुर्मीळ कलेक्टर्स आयटम्स आहेत. आपल्या स्टुडिओत चित्र रंगवण्यासाठी चित्रफलकाच्या आधारासाठी लागणारा ईझल त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने डिझाइन केला होता. त्या ईझलसमोर एका जागेवर बसून चित्रकर्त्यांला काम करता येई. त्यांनी चित्रफलक वर-खाली करण्यासाठी व कोणत्याही उंचीवर स्थिर करण्यासाठी ईझलमध्ये पायाने दाबण्याच्या पॅडलची व्यवस्था केली होती. अशी सुविधा असलेला ईझल कुठल्याही पेंटरकडे नव्हता. बाबूराव उत्तम मोटार मेकॅनिकही होते. बोलपटांचे आगमन झाल्यावर ध्वनीने, दृश्यकलेवर आक्रमण केले असे समजून बाबूराव पेंटरांनी सिनेउद्योगातून निवृत्ती पत्करली. पण त्याआधी त्यांनी व्ही. शांताराम, बाबूराव पेंढारकर, दामले, फत्तेलाल, धायबर असे शिष्योत्तम तयार केले.सतत कलेचा ध्यास आणि नावीन्याचा शोध घेण्यात बाबूरावांनी आपली उभी हयात घालविली. मा.बाबूराव पेंटर यांचे १६ जानेवारी १९५४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी

    जयवंत दळवी हे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील आरवली गावचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या दडपणामुळे मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी अभ्यास करू लागले. पण डिप्लोमा अर्धवट टाकून मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’मध्ये गेले.

    एम.ए.साठी त्यांनी ‘इमोशन अॅअन्ड इमॅजिनेशन अॅठन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून त्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी १९७५ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

    बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घेत. त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांच्या लेखणीला बहर आला आणि विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्याळ; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘लोक आणि लौकिक’ हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले.

    दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच कादंबरी मराठी कादंबरीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तेथे वस्ती करणार्यां चे उघडे-नागडे आयुष्य चितारताना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव दळवींना उपयोगी ठरले. बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्याल तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध दळवी घेतात. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण ते करतात. कादंबरीला कथानक नाही, पण त्यातील व्यक्तिचित्रे महत्त्वाची आहेत आणि ती दळवींनी प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो.

    दळवींच्या सर्वच लेखनात विकार-वासनांच्या आवर्तात भोवंडून जाणारी माणसे पदोपदी भेटतात. दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या एकत्र कुटुंबात गेले. जुन्या परंपरा प्राणपणाने जपणारे ते कुटुंब होते. कुटुंबाचा लवाजमा मोठा होता. त्यात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. मध्यरात्री माजघरातून बाहेर येणारे दबलेले उसासे आणि हुंदके त्यांनी ऐकले, वेडसर माणसांचा आयुष्यक्रम त्यांनी न्याहाळला. माणसाच्या आयुष्यातील भोगवट्याचे, अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यांत दिसतात. आदिम कामेच्छांचे अस्वस्थ करणारे चित्र त्यांच्या साहित्यात आढळते.

    वेडी, अर्धवट पात्रे त्यांच्या साहित्यकृतींतून डोकावतात. माणसाचे उघडे-नागडे दुःख, व्यावहारिक जीवनाच्या धबडग्यात त्याची होणारी कोंडी आणि त्यातून अपरिहार्यपणे माणसाच्या वाट्याला येणारे एकाकीपण यांचा मन सुन्न करणारा आविष्कार त्यांच्या ‘संध्याछाया’, ‘सूर्यास्त’, यांसारख्या नाटकांत झालेला दिसतो. ‘चक्र’, ‘स्वगत’, ‘धर्मानंद’, ‘अल्बम’ यांसारख्या कादंबर्यां्त आणि ‘बॅरिस्टर’, ‘पुरुष’, ‘महासागर’, ‘लग्न’ यांसारखा नाटकांत त्यांनी लैंगिक वासनेतून निर्माण होणार्याय विकृतीच्या, वासनेच्या तळाशी असलेल्या क्रूर प्रवृत्ती यांची धगधगती चित्रे रंगविलेली आहेत.

    दळवींच्या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. वाट्याला आलेल्या विलक्षण, व्यामिश्र अनुभवांनी अंतर्यामी उदास असणार्याच माणसांच्या व्यथा-वेदनांचे खिन्न करणारे चित्रण करणार्या या प्रतिभावंताने एक मुखवटा धारण केला होता. त्याचे नाव ‘ठणठणपाळ’! लौकिक जगात दिसणारे दळवींचे रूप प्रसन्न, विनोदी, मिस्कील बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्यां च्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. ‘सारे प्रवासी घडीचे’मध्ये अस्सल कोकणी माणसांची व्यक्तिचित्रे दळवींनी रंगवली. वरून भोळीभाबडी वाटणारी पण मोठी बिलंदर माणसे दळवींनी या पुस्तकात उभी केली आहेत.

    ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. मराठी वाङ्मयातील, वाङ्मयसमीक्षेतील आणि एकंदर वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्यात अनेकविध प्रवृत्तींचे फुगे त्यांनी हसत-हसत फोडून टाकले. ‘ठणठणपाळ’-विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे, ‘ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.’

    गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथा लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले. जयवंत दळवी माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते दूर राहिले. सार्वजनिक सभांत त्यांनी सक्रिय भाग घेतला नाही.

    सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद त्यांनी नाकारले. दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दिवंगत ज्येष्ठ जयवंत दळवी यांच्या स्मरणार्थ जयवंत दळवी स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.

    डॉ. सुभाष भेण्डे
    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा.
    उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
    जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
    चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

  • गुजराती संगीत दिग्दर्शक आणि गायक निनू मजुमदार

    निनू मझुमदार हे गुजराती संगीतातील एक मोठे नाव होते. निरंजन मुजुमदार हे निनू मुजुमदार यांचे पूर्ण नाव.ज्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून २० हिंदी चित्रपट केले, त्यांनी २८ हिंदी चित्रपट गाणी गायली. त्यांचे वडील नागेंद्र मुझुमदार हे मूकपटाच्या युगातील नाटककार आणि दिग्दर्शक होते.