जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
फडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
१८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.
एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. मा.रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. मा.रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.
स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.
आपत्ती ओढवू नये तसेच आपत्तीमुळे होणारे परिणाम कमी करणे यासाठी उपाययोजना हा मुख्य केंद्रबिंदू ठरला. देशाच्या विकास आराखडा धोरणात व विकास नियमावलीत सुयोग्य बदल करणे, ही उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरली. त्याच बरोबरीने सर्व विकासास मानवी चेहरा मिळाला कारण सजीव प्राणी व वनस्पती हे विकासाचे केंद्रबिंदू असावेत असे जागतिक धोरण ठरले आहे.
महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.
साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या ‘झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत ‘अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली.
१९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले. गुगलने महाश्वेता देवी यांच्या स्मृतीदिना निमित्त डुडल केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
स्टीव्ह बकनर हे वेस्ट इंडीज अनुभवी पंच. स्टीव्ह बकनर यांनी डिकी बर्ड यांचा विक्रम २००२ मध्ये मागे टाकून २००५ मध्ये कसोटीत १०० सामन्यात पंचगिरी करणारे ते पहिले पंच ठरले होते. बकनर यांनी १९९२, १९९६, १९९९, २००३ व २००७ च्या वर्ल्ड कप फाइनल मध्ये अम्पायरिंग केले होते. हे एक रेकॉर्ड आहे.
फ्रान्स सरकारचा यंदाचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतीय वाद्य संगीतातील मेरुमणी पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर होणे म्हणजे भारतीय संगीताचा जागतिक पातळीवर सन्मान होण्यासारखे आहे. जगातल्या सगळ्या मानवी समूहांना भारतीय संगीताबद्दल नेहमीच कुतूहल असते. हे संगीत त्यांना कळतेच असे नाही, पण त्यांना ते ऐकताना त्यांना वेगळे समाधान मिळत असले पाहिजे. मेलडी आणि हार्मनी या संगीत व्यक्त करण्याच्या दोन तऱ्हा जगातल्या, अनेक देशांमध्ये विभागल्या गेल्या आहेत..
भारताने. आणि खरे तर भारतीय उपखंडाने मेलडी म्हणजे एका स्वरावर आधारित अशी संगीताविष्कार पद्धती सिद्ध केली. निसर्गात निर्माण होणाऱ्या विविध आवाजातून स्वर शोधण्याचा मानवाने केलेल्या प्रयत्नाचे पहिले यश बासरी किंवा फ्लूट या वाद्यामध्ये दिसते. बासरी हे तर, पूर्णतः नैसर्गिक वाद्य. माणसाने आपल्या कल्पनेने त्यातून सातही स्वर व्यक्त करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करून संगीताच्या निर्मितीसाठी अनुकूल अशा वाद्याची निर्मिती केली. ज्या कृष्णाच्या हाती मुरली होती आणि ज्या मुरलीवर सगळ्या गोपी लुब्ध होत असत, ती मुरली म्हणे तीन -स्वरांचीच होती. तीन स्वरांमधून व्यक्त होणाऱ्या संगीताच्या आविष्काराला मर्यादा असल्या, तरीही ते गळ्यातून व्यक्त होणाऱ्या हरिप्रसाद संगीताशी साधर्म्य राखणारे होते.
किमान चार ते पाच हजार वर्षांत जगातल्या सगळ्या भागात या वाद्याची निर्मिती झाल्याचे पुरावे सापडतात. भारतीय अभिजात संगीतात बासरीचा प्रवेश अनिवार्य होता, कारण त्या वाद्यातून गायकी व्यक्त करण्याचे अफाट सामर्थ्य होते. हे सामर्थ्य खऱ्या अर्थाने ओळखले ते पन्नालाल घोष यांनी. आपल्या असामान्य प्रतिभेने त्यांनी या वाद्याला अशा एका उंचीवर नेऊन ठेवले, की त्या वाद्याला भारतीय संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळाले. घोष यांची ही परंपरा आजही तेवढ्याच समर्थपणे पुढे सुरू ठेवण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा आहे.
फ्रान्स सरकारचा 'रोव्हेलियर डान्स ऑर्डर देस आर्ट्स एट डे लेटर्स' हा पुरस्कार त्यांना मिळणे यासाठीच अतिशय समर्थनीय आहे. अगदी लहान वयात चौरसिया यांचे स्वरावर जे प्रेम बसले, ते त्यांचे सुखनिधान कधी झाले, ते त्यांच्याही लक्षात आले नाही. वडील पैलवान असले तरीही हरिप्रसाद यांना गाण्याचेच वेड होते. गाणे शिकायला त्यांनी सुरूवात केली, ती बनारसच्या पंडित राजाराम यांच्याकडे. गाणे शिकत असतानाच पंडित भोलानाथ यांचे बासरीवादन त्यांनी ऐकले आणि ते त्या वाद्याच्या प्रेमात पडले. त्यांनी बासरीवर जेवढे मनापासून प्रेम केले, तेवढेच प्रेम बासरीनेही त्यांच्यावर केले आणि त्यामुळेच गेल्या पाच दशकांतील एक अतिशय प्रतिभावान कलावंत म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. चौरसिया यांचे वैशिष्ट्य असे की त्यांनी बासरीवादनाची आपली पद्धत स्वतः विकसित केली. बारसी वादनातील त्यांच्या शैलीचे ते स्वतः निर्माते आहेत. घराण्याचे संस्थापकच. जगातल्या कोणत्याही संगीतात सहजपणे मिसळून जाणाऱ्या या वाद्यावर त्यांची हुकुमत अशी, की रसिकांनी दिव्य आनंदाच्या लहरींवर डोलत राहावे. रागदारी संगीताबरोबरच पाश्चात्त्य संगीताशी तेवढ्याच प्रतिभेने फ्युजन करण्याची क्षमता पंडितजींनी साध्य केली आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी सादर केलेला 'कॉल ऑफ द व्हॅली' हा अल्बम रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. त्यातील पहाडी धून तर पंडितजींची खूण होऊन बसली. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि ब्रिजभूषण काब्रा (गिटार) या दोन वाद्यांच्या संगतीत त्यांनी सादर केलेल्या अल्बमला खऱ्या अर्थाने फ्यूजन म्हटले पाहिजे. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारानी मंडित असलेल्या चौरसिया यांना फ्रान्स सरकारचा सर्वोच्च सन्मान मिळणे ही भारतीय संगीतासाठी अतिशय मंगल घटना आहे.
मिलींद मुळिक हे प्रख्यात चित्रकार प्रताप मुळीक यांचे सुपूत्र. लहानपणी अगदी पाच वर्षांचे असल्यापासूनच मिलींद यांना त्यांच्यामधील नैसर्गिक व प्रतिभावंत चित्रकार गवसला होता. तेरा वर्षांचे असल्यापासून त्यांनी वॉटर कलर्स मध्ये सुंदर व देखणी चित्रे साकारण्यास सुरूवात केली. निसर्गाच्या, प्रत्येक ऋतुंनुसार बदलणार्या सुक्ष्म रूपांना अचूक टिपणारी निसर्गचित्रे, शहरी व ग्रामीण संस्कृतींचे नयनरम्य दर्शन घडवणारी, तिथल लोक जीवन व वन्य जीवन अलगदपणे उलगडणारी चित्रे, स्थीर चित्रे, मुक्तहस्त चित्रे हे प्रांत त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचे आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti