जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
त्यांचा पहिला चित्रपट १९६६ मध्ये आला त्याचे नाव होते ‘ आखरी खत ‘ लागोपाठ १९६९ ते १९७१ पर्यंत १५ चित्रपट सुपरहिट होणे ही आत्तापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत अशक्य गोष्ट होती ती त्यांनी शक्य केली.
अरुणा ढेरे ह्या मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. एक लेखिका म्हणून त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक निबंध , लघुकथा , कादंबऱ्या, कविता , बालसाहित्य , मोनोग्राफ्स, मालिकांसाठी पटकथा व संवाद अशा विविध विभागात लेखन केले आहे.
मंजूषा कुलकर्णी-पाटील यांची तब्बल दोन दशकांहून अधिक सांगीतिक कारकिर्द आहे. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९७१ रोजी सांगली येथे झाला. थेट काळजाला भिडणारा स्वर, लांब पल्ला असणाऱ्या आणि दाणेदार ताना, तारसप्तकातील स्वरांची सहज फिरत, सुरांवरची घट्ट पकड, गायनाकडे पाहण्याची सौंदर्यपूर्ण दृष्टी आणि त्यामागचा विचार नेमका पोहोचवण्याची हातोटी या वैशिष्ट्यांमुळे मंजूषा पाटील या सातत्याने देशभरातील रसिकांची दाद घेत आल्या आहेत. मुर्ती लहान पण किर्ती महान याची प्रचिती त्यांचे गायन ऐकल्यावर येते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताप्रमाणेच ठुमरी, दादरा, अभंग आणि नाट्यसंगीत या प्रकारांमध्येही आपले नाव कोरले आहे. मूळच्या सांगलीच्या असलेल्या व पुण्यात स्थाईक झालेल्या मंजूषा पाटील कुलकर्णी यांनी पंडित चिंतूबुवा म्हैसकर यांच्याकडून गायनाचे प्राथमिक धडे गिरवले.
मिरजेच्या ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’तून त्या संगीत विशारद झाल्या. त्यानंतर, त्यांनी हिंदी या विषयातील पदवीसह कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून संगीतातही सुवर्णपदकासह मास्टर्स पदवी संपादन केली. देशभरातील प्रसिद्ध संगीत स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवणाऱ्या मंजूषा यांच्या गायनाकडे इचलकरंजीचे संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा यांचे एकदा लक्ष गेले. मग त्यांच्याकडील मार्गदर्शन हाच मंजूषा यांच्या गायन कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरला.
काणेबुवांकडे मंजूषा यांनी आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे रीतसर शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित नरेंद्र काणेकर आणि त्यानंतर डॉ. विकास कशाळकर यांचेही मार्गदर्शन मंजूषा यांना लाभले. त्यांनी पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडे गायनाचे अध्ययन केले आहेत. त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले आहेत. संगीतकार राम कदम पुरस्कार , पंडित रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, पंडित जसराज गौरव पुरस्कार , विदुषी माणिक वर्मा आणि विदुषी मालती पांडे पुरस्कार, षण्मुखानंद संगीत शिरोमणी पुरस्कार , संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’, राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
सवाई गंधर्व संगीत महोत्सव, ग्वाल्हेरचा तानसेन समारोह, चंदीगढचे आकाशवाणी संगीत संमेलन, धारवाडचे उस्ताद रहमत खाँसाहेब महोत्सव अशा देशभरातील विविध ठिकाणच्या मान्यताप्राप्त संगीत महोत्सवांमध्येही त्यांनी आपले गायन सादर केले आहे. लंडन, बांगलादेश, शिकागो, मस्कत, अमेरिका, सिंगापूर येथेही त्यांनी अनेक मैफली रंगनव्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं.
मराठी साहित्यविश्वामधील सर्वात प्रसिध्द व प्रथितयश असलेल्या मनोरमा प्रकाशन या संस्थेचे अनिल फडके हे संस्थापक आहेत.
पुस्तकातील आकर्षक व रेखीव मांडणी, लक्षवेधक मुख व मलपृष्ठे, व सुबक अंतरंग या ठळक वैशिष्ठयांनी नटलेली त्यांची पुस्तके ही नेत्रसुखदपणाबातीत निश्चितच वेगळ्या स्वरुपाची सगतात. उत्तम उठाव होणारी पुस्तके प्रसिध्द करणे हा अनिल फडके यांचा केवळ व्यवसाय नसून, त्यांचे निश्चल साहित्यप्रेम तसंच निष्ठा या गोष्टी आहेत. जहिराती व मोठ-मोठे प्रकाशन समारंभ या नव्या विक्रीकौशल्यांवर त्यांचा विश्वास नसल्याने अत्यंत साधेपणाने त्यांची पुस्तके प्रकाशित होतात.
लेखकांना पृष्ठसंख्येच्या हिशोबाने तात्काळ मानधन देणे, आणि स्वतःच्या टेम्पोमधून खेड्यापर्यंत मोठया प्रमाणावर पुस्तकांचे वितरण करणे ही त्यांच्या कार्यपध्दतीमधील विलोभनीय पैलू आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
शिवसेना, भाजप, आणि लोकभारती पक्षाच्या आघाडीने उल्हासनगर महानगरपालिकेची सत्ता हाती घेतल्यानंतर शहराच्या विकासाला गती देण्याची यशस्वी कामगिरी राजश्री शिंदे यांनी केली. त्यांनी महापौरपद स्वीकारल्यापासून शहराचा विकास झपाटयाने होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
शहराच्या विकासासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. यात शहराच्या विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये फेरबदल करून त्यात इमारतीची उंची वाढविणे, आरक्षण स्थलांतर, अंतर्गत बदल आणि चटई क्षेत्राच्या लगतच्या जागेत बदल करणे बाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शहराच्या विविध ठिकाणी वाहतुक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. त्यापैकी उल्हासनगर स्टेशनला सॅटिस, पादचारी पुल, रिक्षा स्टँड, वाहनतळ, भाजी मार्केट, व्यापारी संकुल, गणेश विसर्जन घाट असे महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले. शहरातील महत्वाच्या रस्त्यांचे त्यांनी सिमेंट काँक्रिटीकरण केले.
गोरगरिबांसाठी त्यांनी समाजमंदिरे बांधून दिली. त्यांच्या कारकिर्दित ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती.
याकूब सईद पुण्यात शाळेत शिकत असताना दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. त्यांच्या शाळेसमोर असलेल्या ‘शालिमार फिल्म स्टुडिओ’मध्ये शाळा शिकून ते काम करत असत. संध्याकाळी काम करायचे आठ आणे किंवा रुपया मिळत असे. हे झाल्यावर रात्री ‘शिरीन’, ‘अपोलो’,’ऑडियन’, ‘कॅपिटल’ या थिएटर्सवर चित्रपटांच्या ते गाण्यांची पुस्तकं विकत असत.‘बरसात एक आणा, बरसात एक आणा’असं करता करता ते एम.ए. झाले.
काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.
यतीन कार्येकर, एक अत्यंत संवेदनशील, तरल, अंडरप्ले करणारा जातिवंत अभिनेता. कोणतीही भूमिका त्याला द्या, त्या भूमिकेचे तो सोनेच करणार! मुन्नाभाई एम् बी बी एस् मधला तोंडातून एकही शब्द बाहेर न काढता त्या बडबड्या चित्रपटात स्वतःच्या अभिनयाची आगळी छाप सोडून जाणारी आनंदभाईची भूमिका जगणारा सच्चा कलावंत. थरारमधला चिकित्सक, शोधक, खराखुरा वाटणारा इन्स्पेक्टर कर्णिक साकारणारा नटवर्य तर वयाच्या तिशीतच साठीतला कामेश महादेवन साकारणारा रंगकर्मी.
Copyright © 2025 | Marathisrushti