जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
साहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.
ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे.
चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू. त्यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ रोजी लाहोर येथे झाला. देव आनंद आणि त्यांचे बंधू यांनी अनेक संस्मरणीय चित्रपट निर्माण करून ठेवले आहेत. अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेला चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली. ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते. आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया' या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.
आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला "हकीकत " हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते. बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात 'कर चले हम फिदा जानेमन साथियो" या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद "गाईड" चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला "हकिकत" या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला. पण "हकिकत" हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी "किनारे किनारे "हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी 'हकिकत'नंतर "आखरी खत",हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी "जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. "परमवीर चक्र" ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली.
नवकेतनचा "कालाबाजार"मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..
चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले. चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो "हिर रांझा"असेल वा "हसते जख्म..नीचानगर त्यांच्या "हकिकत"या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे
चार वर्षात केवळ एक एकर जमिनीवरील फुलशेतीतून ३०-४० लाखांचा टर्नओव्हर करणार्या आयटी स्पेशालिस्ट गोपाळ मेखले यांनी आपल्या गावात बचतगट, डेअरी, यासारखे यशस्वी प्रोजेक्टही राबवले आणि त्याची दखल हॉवर्ड युनिव्हसिर्टीने घेतली.
गोपाळ मेखले शिक्षणाने इन्फमेर्शन टेक्नॉलॉजिस्ट, पण सध्या करतोय शेती. वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. चार वर्षांपूर्वी 'डेल' या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडूऩ त्याने़ शेतात राबायचा निर्णय घेतला, तेव्हा असंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण थोड्याच अवधीत त्याने एक मोठी हॉर्टीकल्चर इंडस्ट्री उभी केली आणि सगळ्यांनी त्याच्या यशाचं व त्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करायला सुरुवात केली.
सध्याच्या पिढीचा आपला 'सीव्ही फ्लरीश' करुन सतत कंपन्या बदलण्याकडे कल असताना, काहीतरी वेगळं करायचं, घरची जबाबदारी सांभाळायची अशा विचारानं चाळीशीच्या आतील गोपाळ मार्च २००८ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या आपल्या सुगाव गावी आला. स्वत:च्या ३० एकर शेतीत हायटेक फ्लोरिकल्चर डेव्हलप केलं आणि दरसाल चक्क २०-३० लाखांचा टर्नओव्हर घेऊ लागला, हा त्याचा प्रवास नक्कीच वेधक आहे. पण त्यामागे त्याची बुध्दी आणि कठोर मेहनतही आहे. खरंतर गोपाळ २००२ ते २००८ या कालावधीत पूण्याला नोकरी करत होता. नोकरीत चांगलं चाललं होतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आईवडिलांनी पुण्यात कायमचं आपल्याकडे यावं, असं त्याला वाटलं. पण मुलाकडे राहायची इच्छा असतानाही गोपाळच्या आईवडिलांना पुण्यात नकोसं वाटलं. सुगाव सारख्या लहान गावात आयुष्य काढलेल्यामुळे त्यांना शहराचं आकर्षण होतं, मुलगा सोबत असणार म्हणून आनंदही झाला होता. परंतु पूर्णपणे पुण्यात स्थायिक होणं त्यांना पचलं-आवडलं नाही. शिवाय गावाकडे असलेल्या ३० एकर शेतीचं काय, असा प्रश्न गोपाळच्या आईवडिलांना भेडसावत होता. शेवटी मातीची माया वरचढ ठरली आणि त्यांनी सुगावातच राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे म्हाताऱ्या आईबाबांकडे कोण लक्ष देणार, ते ३० एकराची शेती कशी पाहणार, असे विचार गोपाळला छळायला लागले. त्याचं कामावरुन लक्ष उडालं. अन् एके क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला- आपणच सुगावला गेलं तर! पण पुण्यासारख्या शहरात आठ वर्षं नोकरी केलेल्या गोपाळसाठी गावी परतण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. किंबहुना भविष्य खेड्यात काढायचं या कल्पनेने त्याला जणू काही फ्रस्ट्रेशनच आलं. पण शहर की गाव, आपलं भविष्य की कर्तव्य या संघर्षात अखेर वरचढ ठरलं ते मुलगा म्हणून करायचं कर्तव्य! आणि तडक सात वर्षांची नोकरी सोडून, पुण्यातील गाशा गुंडाळून गोपाळ सुगावला परतला.
सुगावला येताच गोपाळचं पुन्हा नव्यानं स्ट्रगल करणं सुरु झालं. यावेळी स्ट्रगल जरा वेगळं होतं. एकीकडे शेती करण्याचं प्लॅनिंग सुरु असतानाच, पुण्यात नोकरीला असताना सुरू झालेली लग्नाची बोलणी एकदम बंद झाली. स्थळं येणं बंद झालं. घरी येणारा लठ्ठ पगारही बंद झाला. पण एव्हाना काय करायचं त्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याने सुगावातच बचतगट स्थापनं करणं, डेअरी प्रोजेक्ट आखणं, हॉटीर्कल्चर फार्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं ही कामं करायला सुरुवात केली. दरम्यान एक स्थळ येऊन त्याचं लग्नही झालं. त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण गोपाळला अजून खरा टप्पा गाठायचा होता. त्याचं लक्ष होतं, फ्लोरिकल्चर युनिटकडे. इथे तळेगाव दाभाडे येथे हॉटीर्कल्चरचं घेतलेलं शिक्षण उपयोगी आलं.
एकूण ३० एकर पैकी १ एकरात गोपाळचे प्रयोग सुरु झाले. एक एकर शेतात जरबेराचं उत्पादन घेण्याचं ठरलं. काही लाखांची स्वत:ची गुंतवणूक व कॅनरा बॅंकेकडून घेतलेलं कर्ज या बळावर त्याने, 'इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट'करावी तशी शेतीत इन्व्हेस्टमेंट सुरु केली. शेती कोरडवाहू, त्यात अनेक अडचणी. ग्रीनहाऊस, फ्लोरिकल्चर हाऊस कसं उभारावं हा प्रश्न. पण हा प्रश्नही सोडवला गेला तो गावातीलच १२ जणांना घेऊन. गोपाळने़ १२ जणांना रोजगार दिला. मेहनत सुरु झाली. कोरडवाहूत एक पॉलीहाऊस उभारलं गेलं. ऊस, सोयाबीन, तूर यासारखी पीकंही फ्लोरिकल्चरच्या जागे व्यतिरिक्त पारंपरिकपणे घेणं गोपाळने सुरु ठेवलं. लागवडीनंतर रोज किमान ४ हजार जरबेराची फुलं येऊ लागली. त्यामुळे आता त्याच्या माकेर्टिंगची जबाबदारी आली. लातूर, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी माल जाऊ लागला पहिल्या वर्षी जेवढी इनव्हेस्टमेंट केली तेवढी काढणंही कठीण झालं. पण कधीही न संपणारा अनुभव पाठीशी आला. पहिल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यात करण्यात दुसर्या वर्षी यश आलं. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी आल्यानं २००९-२०१० साली १० लाख, त्याच्या पुढील वर्षी २० लाख तर, तर यंदा तब्बल ४० लाखावर उलाढाल गेली. अर्थात फुलांच्या धंद्यात चढउतार नसतात, असं नाही.कधी जरबेराच्या एका फुलाला अडीच, तर कधी ८ रुपये दरही आला. ह्यातून अॅग्रिकल्चर ही एक 'इंडस्ट्री' म्हणून गोपाळने याला 'ट्रीट' केलं. माकेर्टिंग, पॅकेजिंग, अशा टेक्निकल बाबी शिकून घेतल्या. दिल्लीपर्यंत फुलांची बाजार नेल्यानंतर, आता गोपाळ दुबई, अमेरिकेची स्वप्न पाहू लागला आहे. तब्बल बारा जणांच्या बळावर आता ही फुलशेती हायटेक होऊ लागली आहे.
आधुनिक काळात ज्या ज्या म्हणून तांत्रिक बाबी गावात यायला हव्यात, त्या-त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात गोपाळला यश आलं आहे. गावात डेअरी फार्म, ज्वारी-गव्हाच्या पीठाचा कारखाना, बचत गट, भाजीपाला उत्पादन, अत्याधुनिक शेतीकडे युवकांना अॅग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून पाहायला भाग पाडणे, त्या दृष्टीने प्रबोधन करणं, लातूरमध्ये डेअरी फार्म मधून म्हशीचं प्युअर दूध मिळवून देणं, आदी प्रोजेक्टही हळूहळू सुरू करण्यात गोपाळला यश आलं आहे.
नुकतंच हॉवर्ड युनिर्व्हसिटीचं एक डेलिगेशन खास त्याचे हे प्रयोग पाहायला त्याच्या शेतात येऊन गेलं. बॅंकेचं पाठबळ, दुर्दम्य इच्छा शक्ती आणि 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग'ने केलेल्या हायटेक फुलशेतीच्या जोरावर, गोपाळ मराठवाड्याच्याच काय राज्यातील मुलांसाठी एक युथ आयकॉन ठरला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.
दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.
मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.
आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.
रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.
१९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.
नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.
राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.
दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.
दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.
#DattatrayPotnis
“प्रपंच”, “मानिनी” व “रुपा” या मासिकांचे संस्थापक-संपादक माधव राजाराम कानिटकर हे यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.
त्यांनी १५ वर्षांत ५० कादंबर्या आणि शंभरावर कथा लिहिल्या.
चंदनाची वीणा, आषाढमेघ, कथामाधव ही त्यांच्या कथासंग्रहांची तर ग्रीष्माची चाहूल, जिंदगी, तृष्णा ही प्रकाशित कादंबर्यांची काही नावे.
Madhav Rajaram Kanitkar
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं.
जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार
शिवाजीराजे १४ वर्षांचे असतांना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, अदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला, शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले.
आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. राजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नात जिजाबाईंच्या प्रेरणेचा खूप मोठा हातभार होता.
जीवन
शहाजी राजांनी बंगळूरात तुकाबाईंशी दुसरे लग्न केल्यावर जिजाबाईंच्या वाटयाला फारसे पती प्रेम व राजांच्या वाटयाला पिताप्रेम आले नाही. परंतु आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती. राजांचाही त्याला पाठींबा होता. या धर्म-राजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढंच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णतः जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर थोडयाच दिवसांत, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले.
भास्करबुवा बखले यांचे शिष्य बालगंधर्व हे मास्तर कृष्णराव यांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या चढत्या काळात त्यांचं गाणं ऐकून दस्तुरखुद्द बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली व पुढे ते त्याच नावाने जास्त प्रसिद्ध झाले.
चन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते
Copyright © 2025 | Marathisrushti