जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
डेम मेरी क्वांट या फॅशन जगतातील सर्वात जास्त प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होत्या. डेम मेरी क्वांट या मिनी स्कर्ट आणि हॉट पॅन्ट डिझाइन करण्यासाठी ओळखल्या जातात.
कथा-कादंबरीकार प्रा. रावसाहेब रंगराव बोराडे यांचा २५ डिसेंबर १९४० रोजी जन्म झाला. 'पेरणी, मळणी, राखण, खोळंबा' मिळून १५ कथासंग्रह. तसेच 'पाचोळा, सावट, चारापाणी, आमदार सौभाग्यवती' या कादंबर्या. 'पिकलं पान, विहीर' ही नाटके आणि काही बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. कृष्णा खोपकर यांच्या राजकीय जीवनाचा आरंभ १९४२च्या भारत छोडो आंदोलनापासून झाला.
रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती.
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (६ जुलै, १९२७ – २८ ऑगस्ट, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.
आज ३० सप्टेंबर. भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुकर्जी यांची जयंती
हृषिकेश मुखर्जी... भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी झाला.
दिग्गज दिग्दर्शक बिमल रॉय यांचे शिष्य आणि 'आनंद', 'अभिमान', 'गोलमाल', 'बावर्ची', 'खुबसुरत' अशा उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून आणि चंदेरी दुनियेतल्या झगमगाटात प्रदीर्घ काळ राहूनही साधेपणा जपणारे प्रतिभावंत दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हिंसाचार किंवा लैंगिकतेला त्यांनी आपल्या चित्रपटांत कधीही स्थान दिले नाही. किंबहुना या गोष्टींना पूर्ण फाटा देऊन साध्या बाबींतूनही जीवनसूत्र सांगता येते, हेच त्यांनी त्यांच्या कलाकृतींतून दाखवून दिले आहे.
हृषिकेश मुखर्जी यानी १९५९ मध्ये राज कपूरला घेऊन तयार केलेला 'अनाडी' आणि त्यातील गाणी खूप गाजल्याचे आपल्याला माहीत आहेच. अनाडीच्या यशाने प्रेरित होऊन हृषिदांनी राज कपूर यालाच केन्द्रस्थानी ठेवून 'आनंद' ची जुळवाजुळव सुरू केली होती. इतकेच नव्हे तर अनाडीच्या वेळेसच आनंदसमवेत गाजलेले 'बाबू मोशाय' हे सहाय्यक पात्राचे नावही नक्की झाले होते...त्याला कारण म्हणजे राजकपूर हृषिकेश मुखर्जी याना सेटवर नेहमी 'बाबू मोशाय' याच नावाने हाक मारीत असे. पण पुढे 'आराधना' नंतर राजेश खन्ना युग आल्यावर आणि त्याच्या अभिनयाची धाटणी त्यावेळी सर्वानाच 'आल्वेज हॅपी काईंड फेलो' अशी वाटू लागल्यावर हृषिदांनी राजेश खन्ना यांना घेऊन 'आनंद' केला.
दिग्दर्शक ही हृषदांची अर्धीच ओळख ठरेल. संकलक, लेखक, पटकथा लेखक, संगीतातले जाणकार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे करडया शिस्तीचा परंतु, अतिशय सहृदय माणूस, हे हृषदांच्या व्यक्तिमत्त्वातले कंगोरे होते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाचे हृषदा भागीदार आणि साक्षीदारही आहेत. बिमल रॉय यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक, गुलजार यांच्यासारखा मनस्वी कवी- लेखक, सलील चौधरी, सचिन देव बर्मन व पंचमदा ऊर्फ राहुल देव बर्मन, हेमंत कुमार, असे गायक संगीतकार, अशोककुमार, दिलीपकुमार, राज कपूर, अमिताभ बच्चन, उत्पल दत्त, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अमोल पालेकर, शत्रुघ्न सिन्हा, रेखा, जया बच्चन अशा नव्या-जुन्या अनेक श्रेष्ठ कलावंतांबरोबर त्यांनी काम केले आहे. जया-अमिताभ ही जोडी काय किंवा रेखा, धर्मेंद्र, अमोल पालेकर, असरानी असे कलाकार काय, या कलाकारांच्या यशात हृषदांचा निश्चितच मोलाचा वाटा आहे.
हृषिकेश मुकर्जी यांचे २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले. हृषिकेश मुकर्जी यांना आदरांजली.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
कच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी ही ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले.
गाडगीळ, बाळ
मराठी साहित्यातील एक समृद्ध प्रांत म्हणून विनोदाला नेहमीच महत्व मिळाले आहे. विनोदी साहित्याची मराठीतील परंपराही फार मोठी आणि संपन्न. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते आचार्य अत्र्यांपर्यंत, आणि पु. ल. देशपांडय़ांपासून ते श्रीकांत बोजेवारांपर्यंत विनोदाच्या नाना तऱ्हा मराठी साहित्यात उमटल्या. ‘टवाळा आवडे विनोद’ अशी संभावना करणाऱ्या मराठी भाषेतच विनोदी वाङ्मयाला एवढा बहर आला आहे की, कुणाही परभाषेला (त्याबाबतीत तरी!) मराठीचा अक्षरश: हेवा वाटावा.
अशा एका परंपरेत योगदान देणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या निधनाने मराठी विनोदाला काही क्षण तरी गंभीर व्हावे लागले आहे. अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय, आवड अध्यापनाची आणि वेड लेखनाचे अशा वेगळ्याच मुशीत तयार झालेल्या बाळ गाडगीळांनी मराठी साहित्यात आपल्या साहित्याने वेगळेपण जपले. गाडगीळ लिहायला लागले, तेव्हाही मराठी साहित्यात विनोदाचे झाड बहरलेले होते. पण पूर्वसूरींच्या खांद्यावर बसूनही समकालीन लेखकांचा कोणताही प्रभाव पडू न देता आपले वेगळेपण जपणारे गाडगीळ हे आगळे साहित्यिक होते. गॉगलच्या काचांचा चष्मा, नीटनेटके राहणीमान- चेहऱ्यावरून हा माणूस विनोदी लेखक असू शकेल, असे जराही वाटणार नाही. अशी जरब प्राचार्य किंवा उपकुलगुरू म्हणून काम करताना या अशा बाह्य़ व्यक्तिमत्त्वाचा आधार घेणाऱ्या बाळ गाडगीळ यांच्या स्वभावात मात्र एक प्रकारचा खटय़ाळपणा होता. फग्र्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून सात वर्षे आणि प्राचार्य म्हणून अकरा वर्षे काम करताना अध्यापनाच्या बरोबरीने व्यवस्थापनाचे कामही त्यांनी चोखपणे बजावले. सभोवतालच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करण्याच्या क्षमतेचा वापर लेखनात करण्याची सिद्धहस्तता फार थोडय़ा लेखकांकडे असते. मध्यमवर्गीय जीवनशैलीतील अनेक वैचित्र्यपूर्ण विसंगती तीच जीवनशैली जगत असताना पाहण्याचे कसब गाडगीळांकडे होते. असे कसब आत्मसात केलेल्या आणि समाजाचे असे चित्रण करणाऱ्या लेखकांचीही मराठीमध्ये एक मोठी परंपरा आहे. मराठी विनोद मुख्यत: प्रासंगिक आणि माणसांची स्वभाववैशिष्टय़े टिपणारा असल्याचे सांगितले जाते. मनुष्य स्वभावाच्या अनेक पदरी कथा त्यामुळे विनोदी पद्धतीने साकारलेल्या आपल्याला दिसतात. गुदगुल्या करून हसवणारा विनोद मराठीत फारच कमी. मिश्किल शैली हे तर मराठीचे खास वैशिष्टय़. गाडगीळांचा विनोद पोट धरून हसायला लावणारा नाही, पण वाचताना मन प्रसन्न करणारा आणि गालातल्या गालात हसायला लावणारा असा हा विनोद गाडगीळांनी मनोभावे जपला, त्याची निगराणी केली आणि त्याला स्वाभाविकपणे फुलू दिले. ‘लोटांगण’ या त्यांच्या पहिल्याच विनोदी लेखसंग्रहाला १९६१ मध्ये राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराची मजा अशी की तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर विभागून देण्यात आला होता. पहिल्याच फटक्यात बाळ गाडगीळांनी अशी सिक्सर मारल्यामुळे त्यांचा त्यानंतरचा खेळ दिमाखदार होणे क्रमप्राप्त होते. ‘सिगरेट आणि वसंतऋतू’ या प्रवासवर्णनाबरोबरच ‘शिरसलामत’, ‘खिल्ली’, ‘कुणालाही थोडक्यात पाडून घेऊ’, ‘हसो हसो’, ‘दुसरा चिमणराव’ यासारख्या सुमारे तीस पुस्तकांचे धनी होण्याचे भाग्य बाळ गाडगीळांच्या वाटय़ाला आले. व्यक्तिचित्रे, नवनीती कथा, विनोदी कादंबरी, प्रवास वर्णने, बालवाङ्मय यासारख्या साहित्य प्रकारांबरोबरच गाडगीळांनी अन्य विषयांवरही विपुल लेखन केले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात आंबेडकर’ हा संपादित ग्रंथ, ‘विनोद तत्त्वज्ञान’ हा टीकाग्रंथ, ‘मिसिसिपीवरील मुशाफिरी’ हा मार्क ट्वेनच्या आत्मवृत्ताचा अनुवाद, ‘अर्थशास्त्राचे शिल्पकार’ हा अनुवादित ग्रंथ हे त्यातील काही निवडक. बाळ गाडगीळांचे मराठी भाषेबरोबरच इंग्रजीवरही प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी गंगाधर गाडगीळांच्या बरोबर आधुनिक मराठी कथांचे भाषांतरही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले. राजेंद्र बनहट्टी यांच्या ‘अखेरचे आत्मचरित्र’ या लघुकादंबरीचा इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. अध्यापन आणि लेखन हाच शेवटपर्यंत ध्यास असलेल्या बाळ गाडगीळ यांनी सिम्बायोसिससारख्या संस्थेत राहून आपल्या शैक्षणिक अनुभवाचा उपयोगही केला. बाळ गाडगीळांच्या निधनाने एक चांगला साहित्यिक, अध्यापक आणि प्रशासक निवर्तला आहे.
उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.
पटकथाकार व ’बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे पार्टनर ही वसंत साठे यांची ओळख.
वसंत साठे यांनी राज कपूर यांच्या देखील चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहेत. ‘थरथराट’ या मराठी चित्रपटाची पटकथा लिहीली.
वसंत साठे यांना हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीचा चालताबोलता इतिहास मानला जायचे. वसंत साठे यांनी लिहिल्या काही चित्रपटाची नावे आवारा, श्री ४२०, मेरा नाम जोकर, डॉ. कोटणीसकी अमर कहानी, राम तेरी गंगा मैली.
वसंत साठे यांचे १२ जुलै १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti